दिवाकर मोहनी (आ. सु. ऑगस्ट १९९३) व श्रीनिवास दीक्षित (आ. सु. जानेवारी १९९४) यांमधील चर्चेच्या संदर्भात पुढील माहिती उपयुक्त ठरेल.
१) कुपोषण
कुटुंबातल्या कुटुंबात अन्नाचे जे वाटप होते त्यात स्त्रीला पुरुषापेक्षा कमी हिस्सा मिळतो याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे. मैत्रेयी कृष्ण राज यांनी दिल्लीतील सफदरजंग इस्पितळातून घेतलेली आकडेवारी पुढे दिली आहे. हीत सर्व वयांच्या स्त्रीपुरुषांचा समावेश आहे.
पोषणाची पातळी पुरुष (टक्के) स्त्रिया (टक्के)
तीव्र कुपोषण २८.५७ ७१.४३
मध्यम कुपोषण ४३.०७ ५६.९३
सौम्य कुपोषण ५६.४० ४३.६०
योग्य पोषण ६१.२० ३०.३०
तीव्र व मध्यम कुपोषणाचा असर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे असे या सारणीवरून दिसते.
राष्ट्रवाद की संस्कृतिसंघर्ष ?
शीतयुद्धाची अखेर झाल्यानंतर जगातील राजकीय सत्तासमतोल बदलला त्याचबरोबर अर्थकारणातही स्थित्यंतरास सुरुवात झाली. जागतिक व्यापार खुला करण्याच्या प्रक्रियेने जोर धरला. या पार्श्वभूमीवर आर्थिक सिद्धांतांची पुनर्तपासणी करण्यात येऊ लागली आहे. त्याचप्रमाणे राजकीय तत्त्वज्ञानांचीही फेरमांडणी करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. सोव्हिएत संघराज्याचा अस्त, त्यानंतर येल्त्सिन यांनी पाश्चिमात्यांकडे केलेली आर्थिक मदतीची मागणी, शस्त्रास्त्रकपातीचे करार, ‘गॅट’ करारावर झालेल्या स्वाक्षऱ्या -या घडामोडींनंतर अमेरिकेतील राजकीय पंडित राष्ट्रवादाचा अस्त होत असल्याचा निर्वाळा देऊ लागले आहेत. वाढत्या आर्थिक परस्परावलंबित्वामुळे शुद्ध राष्ट्रीय सार्वभौमत्वही लोप पावत असून, देशांच्या भौगोलिक सीमा पुसट होत आहेत, असे या अभ्यासकांचे मत आहे.
विज्ञानानंतरचा समाज – उत्तर
काही महिन्यांपूर्वी आजच्या सुधारकात निसर्ग आणि मानव या विषयावर एक चर्चा झाली. मथळ्यात स्थान नसूनही विज्ञानाला चर्चेत महत्त्वाचे स्थान होते. त्याच चर्चेचा भाग असावा असा एक नुकताच प्रकाशित झालेला लेख भाषांतररूपात सोबत दिला आहे.
लेखकाला विज्ञानात जाणवलेल्या काही विशिष्ट गुणधर्मांची यादी अशी :- (क) विज्ञान चंचल आहे. त्यात ठाम मते नसतात. (ख) विज्ञानातील प्रत्येक बदल आधीच्या जवळपास सर्व ज्ञानाला खोटे पाडू शकतो. (ग) विज्ञान स्वतःला सर्वज्ञ समजते, आणि म्हणून ते इतर श्रद्धा-प्रणालींबद्दल कमालीचे असहिष्णु असते. (घ) विज्ञानाकडे मानवी जीवनाचा अंतिम अर्थ किंवा अंतिम कारणे समजण्याची क्षमताच नाही.
विज्ञानानंतरचा समाज
[टाइम्स ऑफ इंडियाच्या १२ डिसेंबर १९९३च्या अंकात Brian Appleyard या अमेरिकन लेखकाचा ‘Post-Scientific Society’ या शीर्षकाचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात विज्ञानाचे स्वरूप आणि अधिकार यांविषयी अनेक चुकीचे व अनर्थावह पूर्वग्रह व्यक्त झाले असून त्यामुळे वाचकांची दिशाभूल होण्याचा संभव असल्यामुळे त्याला समर्पक उत्तर देणे अवश्य होते. येथे श्री. नंदा खरे यांनी केलेला या लेखाचा अनुवाद आणि त्यांनीच दिलेले उत्तर छापले आहे. ते वाचकांना उद्बोधक वाटेल.]
विज्ञान ही एखाद्या समाजाला पाश्चिमात्य समाजांच्या भौतिक सामर्थ्यात वाटा मिळवून देणारी निरागस (innocent) गोष्ट नाही.
सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे
सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे
सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे आणि ते मुख्यतः समाजातील ज्या वर्गात पुरुष बायकांना पोसतात अशा वर्गाने बनविले आहे आणि ते सर्व समाजाच्या माथी मारले आहे. हिंदुस्थानात ज्या स्त्रिया कुटुंबपोषणासाठी बाहेर जाऊन काम करतात अशाच स्त्रिया तीन चतुर्थांश आहेत. असे असता पुरुषांनी पोसलेल्या एक चतुर्थांश स्त्रियांना लागू पडणारे नियम सर्व समाजावर लादणे हा अन्याय आहे…… आणखी असे की राष्ट्र म्हणजे बायका, पुरुष नव्हेत. समाजातले तीन चतुर्थांश पुरुष मरून गेले व बायकाच उरल्या तरी पुढची पिढी अनेकपत्नीपद्धतीचा अवलंब करून भरून काढता येईल; पण बायकाच जर मेल्या आणि पुरुष सपाटून उरले, तर राष्ट्रसंवर्धन होणार नाही.
ही खरेदीविक्रीची पद्धत किती दिवस चालणार?
लग्न ही सर्वसामान्य प्रत्यही घडणारी गोष्ट आहे. मग ही खरेदीविक्रीची पद्धत अजून का नाही बंद पडत? विशेषतः शाळा कॉलेजांतून जाणाऱ्या मुलींना ‘पाहण्याची’ काय आवश्यकता आहे? आम्ही पडदानशीन थोड्याच आहोत? शाळेत जाता-येता मुलगी अव्यंग आहे की नाही हे सहज अजमावता येईल. घरी येऊन तरी चहापोहे झोडून मुलीला चारदोन मामुली प्रश्न विचारण्यापलीकडे वरपक्ष काय करतो? मुलीचे शील व स्वभाव एका दृष्टिक्षेपात ओळखण्याची कुवत वरपक्ष झाल्याने अंगात येते थोडीच! मग वधूपरीक्षेचा अर्थ तरी काय? पाहून मुलगी केल्यावरही ‘तिला अंधारात उभी केली होती’, ‘ती जरा पाठमोरी बसली होती’ वगैरेसारखी क्षुल्लक कारणे सांगून मुलीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न नाही का लोक करीत!
बालमजुरांची ससेहालपट
एका ‘आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना’, या म्हणीप्रमाणे देशातील सुमारे एक कोटी ८० लाख बालमजुरांची स्थिती सरकारने कशी करून टाकली आहे, याचे उदाहरण म्हणून रमेश कुमारच्या कर्मकहाणीकडे बोट दाखविता येईल. रमेश कुमारचे अपहरण करण्यात आले तेव्हा त्याचे वय होते सात वर्षांचे. आज रमेश कुमार १४ वर्षांचा आहे. गेली सात वर्षे त्याने उत्तर प्रदेशातील एका गालिचे बनविण्याच्या कारखान्यात वेठबिगार बालमजूर म्हणून काढली आहेत. दिवसाचे १३ ते १५ तास काम, अपुरे जेवण, कारखान्यातच राहण्याची सक्ती यामुळे रमेश कुमार १४ वर्षांचा असूनही तेवढ्या वयाचा वाटत नाहीं.
नोव्हेंबर १९९३ च्या अंकातील ‘फलज्योतिषावर शोधज्योत’ या डॉ. पु. वि. खांडेकर यांनी लिहिलेल्या लेखाला पुरवणी.
वरील लेखाच्या शेवटी जी भाकिते दिली आहेत त्यातील ‘इलस्ट्रेटेड वीकली’ च्या २० मे ८४ च्या अंकात ज्यांची भाकिते दिली आहेत त्यांची नावे अशी- फलज्योतिषी बेजन दारूवाला व तांत्रिक प्रवीण तलाठी ह्यांची भाकिते समोरासमोर दिली आहेत. त्यांतील काही परस्पर-विरोधी आहेत. आणखी लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे हा मुलाखत-वजा लेख थिल्लर व पोरकट विधानांनी— दोघांच्याही – भरगच्च भरलेला आहे. प्रवीण तलाठीची काही भरमसाठ वक्तव्ये. त्यातले एक असे- “मी आणखी एक हवन केले आणि चरणसिंगाला पंतप्रधान केले.” आणखी एक नमुना पहा. “आपल्या देशातील परदेशांच्या राष्ट्रविघातक कारवायांचा नायनाट करण्यासाठी तंत्रविद्येचा उपयोग केला पाहिजे.”
प्रा. श्रीनिवास दीक्षित यांना उत्तर
प्रा. दीक्षितांनी ‘विज्ञानाला उद्गामी विज्ञान म्हणतात’ या माझ्या वाक्यातील एका अडचणीवर बोट ठेवले आहे. ते वाक्य विश्लेषकही आहे आणि संश्लेषकही आहे असे म्हणावे लागेल ही ती अडचण. प्रा. दीक्षितांचे म्हणणे मला स्थूलपणे मान्य आहे. माझ्या नीतिशास्त्राचे प्रश्न या पुस्तकात त्यांना अभिप्रेत असलेला भेद मी केला आहे. परंतु खरे म्हणजे खुद्द इंग्रजीत (आणि मला वाटते जर्मन भाषेतही) ‘Science’ या शब्दाचा उपयोग अजून बराच शिथिल आहे. उदा. द्वाकच्या तर्कशास्त्रावरील एका पुस्तकाचे नाव ‘Introduc- tion to Logic and the Methodology of Deductive Sciences’ असे आहे.
चारचौघी
चारचौघी पाहिले त्यावेळी त्या नाटकाने बऱ्यापैकी वादळ उठविले होते. मिळून साऱ्याजणीने चर्चा घडवून आणली होती. उत्तरे शोधत असणाऱ्या या चौघी प्रश्नच जास्त उभे करतात असे वाटले. या चौघीतली आई एक सुविद्य शिक्षिका. तीन मुलींची अविवाहित माता. मुलींचे वडील आबा स्वतःचा स्वतंत्र संसार सांभाळून या तीन मुलींचे जन्मदाते होतात. त्यांच्या आईशी लग्न न करता.
बहिणींतली मोठी विद्या. नावाप्रमाणे शिकून एम्. ए., पीएच.डी झाली. कॉलेजात प्राध्यापक म्हणून यशस्वी झालेली. तिचा नवरा आशिस हा पत्रकार. त्याचे एका सहव्यावसायिकेबरोबर लफडे सुरू असल्याचे पाहून त्याच्याशी भांडून विद्या आईकडे माघारी आलेली.