दत्तक, स्त्री-पुरुष भेदभाव
—————————————————————————
एकविसाव्या शतकात मुलगी दत्तक घेण्याच्या एका जोडप्याच्या निर्णयावर सुशिक्षित समाजाकडून मिळालेला प्रतिसाद, आपल्याला अंतर्मुख करणारा
—————————————————————————
गाथा तिच्या घरी आली त्याला आता पुढच्या महिन्यात (ऑगस्टला) तीन वर्ष होतील. तेव्हा ती एक वर्षाची होती. या तीन वर्षांत आनंदाच्या अगणित क्षणांनी आमची ओंजळ भरलीये तिनं ! मूल दत्तक घ्यायचा निर्णय मी लग्नाआधीच – व्या वर्षी घेतला होता चतुरंगमधल्या एका लेखामुळे. लग्न ठरवताना मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला, अनिलला सांगितलं तेव्हा त्यालाही हा निर्णय आवडला. लग्न झाल्यावर आम्हाला जे मूल होईल त्याच्या अपोझीट सेक्सचं मूल दत्तक घ्यावं असं मला वाटलं.
देवाच्या नावावर राजकारण नको
ख्रिश्चन धर्म, डावा विचार, समाजपरिवर्तन, भांडवलशाही
—————————————————————————
अमेरिकेत डाव्यांनी उदारमतवादी धर्माच्या बाजूचे राजकारण करावे असे सुचविणाऱ्या मताचा प्रतिवाद करणारी ही मांडणी
—————————————————————————
दोन हजार तेरा सालची गोष्ट. टेक्सास राज्यात गर्भपाताची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी विधिमंडळात मांडण्यात आलेल्या एका विधेयकावर चर्चा सुरू होती. (ते विधेयक नंतर संमतही झाले.) त्या चर्चेत भाग घेताना सिनेटर डॅन पॅट्रिक अन्य सदस्यांना उद्देशून म्हणाले – “जर तुम्ही ईश्वराला मानता, तर देव इथे असता तर त्याने कोणाच्या बाजूने मत दिले असते ह्याचा विचार करा.”
हेच महाशय नंतर (देवाच्या कृपेने नव्हे, तर मानवी निवडणुकीच्या माध्यमातून) लेफ्टनंट गव्हर्नरपदी निवडले गेले.
डाव्या चळवळीत धर्माचे स्थान
ख्रिश्चन धर्म, डावा विचार, समाजपरिवर्तन, भांडवलशाही
—————————————————————————
सध्याचे दिवस धर्माला अफूची गोळी मानून त्याच्यापासून दूर राहण्याचे नाहीत. ख्रिश्चन धर्माची मूलतत्त्वे डाव्या विचारांच्या खूप जवळची आहेत. त्याचे नाते भांडवलशाहीशी जोडणे ही धनदांडग्यांची चलाखी आहे. धर्मातील पुरोगामी प्रवाहाशी नाते जोडले तर डाव्या चळवळींना अमेरिकन राजकारणातील कोंडी फोडता येईल असे प्रतिपादन करणारा लेख.
—————————————————————————
गेल्या काही दशकांत अमेरिकेत झडलेल्या सांस्कृतिक वादविवादांमध्ये तसेच दैनंदिन जीवनाच्या विविध अंगांवर धर्माचा पगडा स्पष्टपणे दिसून येतो. त्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न पुढे आले आहेत. उदा.; सरकारी शाळांमध्ये धार्मिक प्रार्थना सक्तीची केली जाईल का?
पैशाने श्रीमंती येत नाही (१)
श्रम, संपत्तिनिर्माण, तंत्रज्ञान
—————————————————————————
आपण बहुतेक वेळी संपत्तीचा संबंध पैशाशी लावतो. पण त्याचा संबंध तंत्रज्ञानाच्या वापरातून माणसाला मिळणाऱ्या फुरसतीशी आहे, अशी अभिनव मांडणी करणारा; भारतात तंत्रज्ञानातील नवसर्जन का घडत नाही, उत्पादन, चलनवाढ व उपभोग ह्यांचा परस्परसंबंध कसा असावा अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणारा लेख
—————————————————————————
श्रीमंती पैशाने येत नाही. ती श्रम वाचवल्याने येते. येथे श्रम म्हणजे शरीरश्रम, बौद्धिक श्रम नव्हे. आपल्या सर्व गरजा भागवून ज्याला काही फुरसतीचा काळ मिळतो तो श्रीमंत. ज्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी दिवसभर हातापायांचे श्रम करावे लागतात तो गरीब.
प्रतिसाद
‘आसु’मधील दिवाकर मोहनी ह्यांचा ‘आमच्या देशाची स्थिती’ हा लेख वाचला. आमचे स्नेही प्रमोद सहस्रबुद्धे यांनी या लेखावर मोकळेपणाने चर्चा व्हावी आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया पाठवावी असे आवाहन केले होते. अनेकवेळेला हा विषय वैचारिक चर्चेपेक्षा भावनिक अंगाने अधिक मांडला जातो म्हणून सर्वप्रथम श्री. मोहनी ह्यांनी केलेल्या ‘वैचारिक विवेचनाचे’मन:पूर्वक स्वागत. मी दोन टप्यांमध्ये या लेखावर प्रतिक्रिया देऊ इच्छितो. पहिल्या टप्प्यात लेखातील काही मुद्द्यांवर माझे मत आणि दुसऱ्या टप्प्यात सद्यःपरिस्थितीतील व्यवहारातील अनुभव.
जातीच्या उतरंडीवरून असे लक्षात येते की उच्चवर्णीयांनी – शूद्रातिशूद्रांवर जसे अन्याय केले आहेत, तसेच या सर्वांनी मिळून स्त्रियांवर अन्याय केले आहेत, अजून करत आहेत.
दरी
नकाच पडू माझ्या भानगडीत
चालू देत माझं आपलं
वेगळंच काहीतरी, भलतंच काहीतरी
तुम्हाला नाहीच कळणार
माझा आवाज तुमच्यापर्यंत नाहीच पोहोचणार
कारण आपल्यामधे एक दरी आहे
हां म्हणजे नातं आहेच, कचकड्याचं
तो डीएने पण आहे, ते जीन्स पण
पण या सगळ्याला व्यापून उरणारी
एक भली थोरली दरी आहे आपल्यात
या दरीत ते शेतकरी आहेत
ज्यांच्या विषयी तुम्हाला जराही कणव नाही
कारण ते टॅक्स भरत नाहीत
’ती लोकं’ आहेत फॅंड्रीमधली
ज्यांची तुम्हाला किळस वाटते
ती आदिवासी लोकं पण आहेत
विकासाच्या मार्गातले धोंडे बनलेली
आणि ती विस्थापित लोकं पण
ती नाही का — सिग्नल्स वर दिसतात
त्यांचे घाणेरडे हात आपल्याला, आपल्या गाडीला लावत भीक मागतात
असं सगळं तुम्ही नाकारलेलं वास्तव या दरीत साचलंय
नदीत वाहून आलेल्या गाळासारखं
दिवसागणिक थरावर थर साचताहेत
घट्ट होत जाताहेत
भीतीदायक आहे सगळं
प्रलय येऊन पुनश्च सृजनाची सुरुवात असलेला
पिंपळाच्या पानावरचा तो बाळकृष्ण दिसेपर्यंत तरी
amrutapradhan@gmail.com
हिटलरसंबंधी दोन चित्रपट
हिटलर, एकाधिकारशाही, फॅसिझम
आधुनिक मानवी इतिहासातील काळाकुट्ट पट्टा म्हणून दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंची वंशहत्या या घटनेकडे बघितले जाते. त्यासाठीचा खलनायक म्हणून आणि प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या आणि युद्धाच्या काळातील जर्मनीचा हुकूमशहा म्हणून हिटलर आपल्याला ज्ञात आहे. हिटलरसंबंधी दोन चित्रपटांची ओळख करुन देणे हा या लेखाचा हेतू आहे. यातील पहिला चित्रपट आहे ’डाऊनफॉल’; ज्याची मांडणी हिटलरच्या आयुष्यातील शेवटच्या दहा दिवसांतील घटनांवरती आधारलेली आहे. दुसरा चित्रपट आहे ’हिटलर : द राईज ऑफ इव्हिल’; ज्यात हिटलरच्या राजकारणातील प्रवेशापासून तो हुकुमशहा बनण्यापर्यंतच्या कालावधीतील राजकीय घटनांवर आधारलेले चित्रण आहे.
धर्म आणि मैत्री…
धर्म, मैत्री
तिच्या वडिलांबरोबर ती प्रथमच माझ्या बँकेच्या शाखेत आली होती. तिचे वडील नेहमीच माझ्याकडे येत, त्यांना मी एक एकाकी वृद्ध प्रोफेसर म्हणून ओळखत होते. या सधन वस्तीतील एका श्रीमंत स्टायलिश मुलांनी गजबजलेल्या कॉलेजमध्ये ते उर्दू शिकवत तेव्हापासून मी त्यांना पाहात होते.
प्रोफेसर मुस्लिम होते. अत्यंत देखणे रूप, गोरापान रंग, खानदानी वावर, देहबोली. या वार्धक्यात अधिकच गहिरलेली डोळ्यातली निळाई. सर उर्दूतले प्रसिद्ध शायर-साहित्यकारही होते.
आणि जिभेवर उर्दू शेरोशायरीबरोबरच फर्मास इंग्लिश भाषेची साखरपेरणी. त्यातच रंगतदार आठवणी. कधी कॉलेजचे किस्से, कधी फिल्म इंडस्ट्रीतल्या खमंग कहाण्या, सरांची दिलीपकुमार वगैरे फिल्मी दिग्गजांशी अंतरंग मैत्री होती.
लंडन पार्लमेंट स्क्वेअरमध्ये गांधी
गांधी, लंडन, लोकशाही, वसाहतवाद
गांधीजी हे एक सातत्याने उत्क्रांत होत गेलेले व्यक्तित्व होते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट संदर्भबिन्दूवरून त्यांची भूमिका ठरविण्याने नेहमीच गफलत होते. इंग्रजी राज्य, वसाहतवाद, पाश्चात्त्य सभ्यता ह्या सर्वांविषयीची त्यांची भूमिका कशी बदलत गेली व बदलाची ही प्रक्रिया त्यांच्या एकूण जीवनदर्शनातील स्थित्यंतराशी कशी समांतर होती, ह्याचा एका युवा अभ्यासकाने घेतलेला हा अनोखा शोध.
महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले त्याला ह्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यायोगाने गांधींच्या कारकीर्दीचे पुनर्विलोकन करण्याचा प्रयत्न चालू आहे.
आर्थिक प्रगतीसाठी सहिष्णुता आवश्यक
आर्थिक प्रगती, सहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्य
प्रश्न विचारणे आणि पर्यायी दृष्टिकोन मांडणे यांतच नवीन संकल्पनांचा उगम असतो. म्हणूनच भारताला आर्थिक प्रगती करायची असेल तर येथील समाजजीवनात प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहायला हवे. देशाच्या आर्थिक विकासाची सहिष्णुता ही पूर्वअट आहे. एकविसाव्या शतकात मानाने जगायचे असेल तर आपल्याला आपल्या परंपरेतील विमर्श व खुली चिकित्सा ह्या प्राणतत्त्वांची जोपासना करावी लागेल. आय आय टी दिल्ली येथील पदवीदान-समारंभात भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांनी केलेले महत्त्वाचे प्रतिपादन.
मला या संस्थेमध्ये पदवीदानाचे भाषण देण्यास बोलाविल्याबद्दल मी आपला आभारी आहे. तीस वर्षांपूर्वी मी याच संस्थेतून विद्युत्-अभियांत्रिकीची पदवी मिळविली होती.