विज्ञान आश्रमातील समुचित तंत्रज्ञान

ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे, अशी कलबाग सरांची श्रद्धा होती. आपल्या कामाचा वेग, उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकते. म्हणून विज्ञान आश्रमात तंत्रज्ञानावर भर आहे.

कुठले तंत्रज्ञान कुठल्या भागात आणि कशासाठी सोयीचे आहे, हे पडताळून बघावे लागते. ते तंत्रज्ञान कोणत्या परिस्थितीत स्वीकारले जाईल ते तपासून बघावे लागते. हे तपासून बघण्याचे काम शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पामार्फत करता यावे असा आमचा प्रयत्न असतो. प्रदर्शनामध्ये त्यांना जे प्रकल्प करायचे असतात, त्यासाठी हेच प्रयोग देता येतात. गावातले विकासाचे जे प्रश्न आहेत, त्यांना उत्तरे शोधण्यासाठी काही तंत्रे वापरून बघितली जातात.

पुढे वाचा

आयन रँडचा भांडवलवाद

जर कुणी स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असेल तर त्याने मानवाच्या व्यक्तिगत हक्कांचाही पुरस्कार केला पाहिजे, जर कोणी मानवाच्या व्यक्तिगत हक्कांचा पुरस्कार करीत असेल तर त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यावरील हक्काचा, त्याच्या स्वातंत्र्याचा, त्याच्या स्वतःच्या सुखलोलुपतेचाही पुरस्कार केला पाहिजे, ह्याचाच अर्थ असा की त्याने अशा हक्कांना संरक्षण व त्यांची हमी देणारी राज्यव्यवस्था म्हणजेच भांडवलवादाची राजकीय आर्थिक व्यवस्था हिचाच पुरस्कार केला पाहिजे.
– आयन रँड

निरंकुश अर्थव्यवहार ह्याचा अर्थ, सर्व गोष्टी शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय, नैसर्गिक क्रमाने घडणे. लोकांची भरभराट झाली, तर ठीकच. अन्यथा जर त्यांची उपासमार झाली, त्यांना राहायला निवारा मिळाला नाही, औषधे खरेदी करण्यासाठी जर त्यांच्याजवळ पैसे नसतील तर त्याचा दोष त्यांच्याकडेच जातो.

पुढे वाचा

पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न

मागच्या लेखात धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यांविषयी हिन्दुनेतृत्व काय म्हणते आणि त्यांनी केलेल्या कृतीमध्ये कशी विसंगती निर्माण होते ते आपण पाहिले. ह्या लेखामध्ये त्यांच्या व्याख्येमध्ये मला बुचकळ्यात पाडणारे आणखी अनेक शब्द आहेत त्यांच्या विचार करावयाचा आहे, तसेच पूर्वीच्या लेखात ज्यांचा परामर्श घेता आला नाही असे मुद्दे विचारार्थ घ्यावयाचे आहेत व थोडे मागच्या लेखातील मुद्द्यांचे स्पष्टीकरणही करावयाचे आहे.

मला वाटते, हिन्दुनेतृत्वाच्या हिन्दूंच्या व्याख्येमुळे हिन्दु कोण आहे ते पुष्कळसे स्पष्ट होते, पण हिन्दु कोण नाही हा प्रश्न थोडा संदिग्ध राहतो. हिन्दुसंस्कृतीविषयी अभिमान ही हिन्दु होण्यासाठी असलेली अट कधीकधी शिथिल झाल्यासारखे मला जाणवते, आणि मग हिन्दु कोण नाही ते ठरविणे मला कठीण जाते.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझमचा अर्थ

एकनाथांचे तत्त्वज्ञान हे धर्माधर्मांमधील सामंजस्य वाढून त्यांच्यात संवाद प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या संवाद सामंजस्यासाठी ते या दोन्ही धर्मांची गुळमुळीत तरफदारी करीत नाहीत. त्यांच्यातील मूलतत्त्ववादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देत नाहीत. आपल्या संविधानातील सेक्युलॅरिझम या तत्त्वाची ओढाताण करीत बुद्धिवाद्यांनी त्याचा धर्मउच्छेदक अर्थ लावला तर सर्वधर्मसमभाववाद्यांनी त्याचा अर्थ शासनाने धर्मांत साक्षेप न करता सर्व धर्मांचे सारखे कौतुक व सारखे चोचले असा घेतला. त्यामुळे सर्वच धर्मांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या. एकीकडे शहाबानो प्रकरणात घटनादुरुस्ती करायची व दुसरीकडे बाबरी मशिदीचे कुलूप उघडायचे अशी दुहेरी कसरत सुरू झाली.

पुढे वाचा

प्रिय मोदी,

भारतातील सर्व धार्मिक अल्पसंख्यकांच्या मनावर ओरखडे उमटलेले आहेत. फक्त मुस्लिमच नव्हे तर पश्चिम पंजाबमधून विस्थापित झालेले हिंदू व शीख तसेच काश्मीरी पंडितही असे ओरखडे बाळगून आहेत. खऱ्याखुऱ्या किंवा घडवून आणलेल्या चिथावणीमुळे अचानक दंगली भडकण्याचे व त्याचा अनेकपटीने, सूड घेण्यासाठी महिलांना लक्ष्यित केले जाईल ह्याचे भय सगळ्यांच्या मनात आहे. दलित, आदिवासी व विशेषतः स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील मिनिटामिनिटाला अवहेलना व शोषण ह्यांचाच अनुभव घेत आहेत. अवमान, भेदाभेद आणि दडपशाही ह्यांच्यामुळे सतत मानगुटीवर बसणारी अस्वस्थता ही नागरिक म्हणून द्यावयाचा साधा सन्मान, नीतिमत्ता आणि माणुसकी हिरावून घेणारीच असते.

पुढे वाचा

स्वच्छतेची घडी

दक्षिण भारतातील एक साधासा मुलगा. शाळा सोडलेला. त्याने ग्रामीण महिलांसाठी पाळीच्या दिवसांतील स्वच्छता व आरोग्य ह्यासाठी चांगला प्रयत्न केला. अरुणाचलम मुरुगनंतम् ह्यांनी पाळीची घडी (सॅनिटरी पॅड) तयार करण्याचे यंत्र बनविले, त्याची गोष्ट.

सन 1998 मध्ये त्यांचे नवीन नवीन लग्न झाले होते, तेव्हाची गोष्ट.त्यांची पत्नी शांती त्यांच्यापासून काहीतरी लपवीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या कसल्यातरी चिंध्या होत्या. ती त्यांना घाणेरडा फडका म्हणत होती. पाळीसाठी बाजारू पॅड का वापरीत नाहीस असे विचारल्यावर ती म्हणाली, मी जर ते वापरले तर आपल्याला घरात दूध आणता येणार नाही.

पुढे वाचा

ज्यू आणि ख्रिस्ती कल्पना

पॅलेस्टाइनमधील ज्यू विचारवंत, नंतरच्या काळातील ख्रिस्तप्रणीत धर्म आणि तज्जन्य विवेचन ह्यातून आलेले इतिहासविषयक सिद्धान्तसुद्धा असेच ईश्वरी सूत्राच्या कल्पनेवर आधारलेले आहेत. ज्यू तत्त्वज्ञांच्या मते मानवाचा आणि मानवाच्या इतिहासाचा परमेश्वर हा जनकच आहे. माणसाच्या इतिहासातील सर्व चढउतार, यशापयश हे ईश्वरी हस्तक्षेपानेच होत असतात. म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. त्या आज्ञा प्रत्यक्षात माणसांना कधी धर्मगुरूंमार्फत किंवा उपदेशकांमार्फत समजतील, तर कधी राज्यकर्त्यांमार्फत. धर्मोपदेशक आणि राजे हे दोघेही ईश्वरांचे अधिकृत प्रतिनिधीच आहेच. पुष्कळदा दुष्काळ, युद्ध वगैरे ज्या आपत्ती येतात त्यांत ईश्वराचा हेतू माणसांना धडे शिकविण्याचा असतो.

पुढे वाचा

नेहरू नसते तर

(अनुवाद: रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ) इ.स. 2014 हे वर्ष जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यस्मरणाचे पन्नासावे वर्ष आहे. योगायोग असा की यंदा 14 नोव्हेंबरला त्यांची 125 वी जयंती आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महान् व्यक्तींपैकी इतक्या प्रेमादराने ज्यांची अजूनही आठवण काढली जाते असे नेहरूंसारखे महापुरुष विरळाच!

अर्थात आपल्याला हेदेखील विसरून चालणार नाही की त्यांच्या प्रदीर्घ व उज्ज्वल राजकीय कारकीर्दीत त्यांना बहुसंख्य देशवासीयांचे अलोट प्रेम मिळाले असले तरी आज मात्र देशातील अनेकजण भारतातील बहुसंख्य समस्यांबद्दल नेहरूंनाच जबाबदार धरतात. आता तर त्यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांना मोकळे रानच मिळाले आहे.

पुढे वाचा

ग्रीक आणि रोमन कल्पना

प्राचीन ग्रीक लोकांनी विश्वाविषयी आणि मानवी जीवनाविषयी अनेक अंगानी व अनेक दृष्टींनी विचार केला. अनेक ज्ञानशाखांच्या क्षेत्रांत ग्रीकांचे विचार तर्कशुद्ध, मूलभूत आणि पुरोगामी असे होते. रोमन लोक हे ग्रीकांइतके ज्ञानपिपासू नव्हते. ते अधिक व्यवहारी होते, तथापि रोममध्येही अनेक वचारवंतांनी ग्रीकांचे विविधा विचार आत्मसात करून पुढे त्यांचा विस्तार केलेला आढळून येतो.

फलज्योतिषावर आधारलेल्या राजकीय भाकितांचे भवितव्य !

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी 4 एप्रिल 2014 रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील ‘मतसंग्रामा’च्या बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.

नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणाच्या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास करून वर्तविलेले भाकित व प्रत्यक्षनिवडणुकीचे निकाल व त्यावरून काढलेले निष्कर्ष खाली दिलेले आहेत. अंदाज / भाकितं निकाल निष्कर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही चूक कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही भाजप 282 चूक काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही युती 334+ चूक भाजपला 155 ते 165 जागा 282 चूक काँग्रेसला 115 ते 126 जागा 44 चूक राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा 6 चूक शिवसेनेला 10 ते 12 जागा 18 चूक समाजवादी पक्षाला 18 ते 22 जागा 5 चूक बसपाला 16 ते 18 जागा 0 चूक महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखीच परिस्थिती चूक आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही बरोबर वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी मोदींना यश मिळेल बरोबर वाराणसीत त्यांना ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांची कडवी लढत मिळेल फरक 371784 चूक एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही बरोबर पुण्यात विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे यांच्यात अटीतटीची लढत फरक 315769 चूक विश्वजित कदम यांची सरशी होणार चूक मुंबईत सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील.

पुढे वाचा