मासिक संग्रह: मे, १९९०

आगरकर म्हणतात –

‘व्यक्तीच्या शरीरातील अवयवांत आणि समाजाच्या शरीरातील अवयवांत एक मोठा भेद आहे, तो हा की, ज्याप्रमाणे समाजाच्या प्रत्येक अवयवास ज्ञान, संवेदन, इच्छा इत्यादि मनोधर्म पृथक्त्वाने असल्यामुळे सुखदुःखाचा अनुभव प्रत्येकास होत असून ते संपादण्याविषयी अथवा टाळण्याविषयी प्रत्येकाचा प्रयत्न निरंतर चालू असतो, त्याप्रमाणे व्यक्तीच्या शरीरातील प्रत्येक अवयवाची स्थिती नाही. त्यापैकी प्रत्येकास मन नाही. त्या सर्वांचे व्यापार नीट चालणे ही गोष्ट ज्या एका व्यक्तीचे ते अवयव आहेत त्या व्यक्तीस कल्याणकारक आहे. समाज हा काल्पनिक पुरुष आहे. समाजाचे कल्याण म्हणजे या काल्पनिक पुरुषाचे कल्याण नव्हे; तर त्याच्या अवयवांचे कल्याण होय.

पुढे वाचा

‘नवा सुधारक’ चा प्रकाशन समारंभ

दि. ३ एप्रिल १९९० रोजी प्रा. म. गं. नातू द्वितीय स्मृतिदिनी विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे ‘नवा सुधारक’ चे प्रकाशन न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, डॉ. य. दि. फडके यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगाचा वृत्तांत आणि प्रा. राम शेवाळकर, डॉ. य. दि. फडके आणि न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या भाषणांतील महत्त्वाचे अंश खाली देत आहोत.

‘नवा सुधारक’च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन ३ एप्रिल १९९० रोजी विदर्भ साहित्य संघाच्या गडकरी सभागृहात समारंभपूर्वक पार पडले. ३ एप्रिल हा श्रीमती म. गं. नातू यांचा दुसरा स्मृतिदिन. प्रकाशनसमारंभ वि.सा.

पुढे वाचा

खरा सुधारक कोण? प्रा. य. दि. फडके ह्यांच्या भाषणाचा सारांश

सुधारक कोणाला म्हणावे हा एक मूलभूत मुद्दा आहे. शंभर वर्षापूर्वीच्या ज्या अनेक प्रश्नांना आजही उत्तर दिले गेलेले नाही त्यापैकी हा एक प्रश्न आहे. १८९३ साली प्रार्थनासमाजात दिलेल्या एका व्याख्यानात न्या.मू. रानड्यांनी “सुधारक कोण?” असा प्रश्न उपस्थित केला होता. लोकांना राजकारणात भाग घेण्याची हौस असते. अशा वाचाळवीरांची सामाजिक सुधारणेच्या वेळी मात्र दातखीळ बसते. राजकारणाच्या वेळी आणलेला ताव पार नाहीसा होतो. त्या काळी केला जाणारा एक सवाल सुधारणाविरोधी आजही करतात. “सगळ्या सुधारणा हिंदू समाजालाच तेवढ्या का?” असा प्रश्न लोक विचारीत. त्यावेळी जे पाच जणांना जमवू शकत नसत असे वक्ते हा प्रश्न करीत.

पुढे वाचा

“बाई”

सुमारे ३० वर्षापूर्वी मी नातूबाईंना प्रथम पाहिले. “वाचक पाहिजे” अशी जाहिरात त्यांनी दिली होती. मला शिक्षण घेता घेता करण्याजोगे काही काम हवे होते. त्यांच्या खोलीत मी प्रवेश केला तेव्हा खोलीत काळोख होता. पडदे सरकवलेले होते. पंखा मंद सुरू होता आणि हाताशी असलेल्या आटोपशीर स्टुलावर डोके खाली केलेला टेबललॅम्प जळत होता. बाई पलंगावर किंचित रेलून, विसावून पहुडलेल्या होत्या. अंगावर शुभ्र सुती साडी, कपाळावर अगदी बिंदुले काळे कुंकू, लख्ख गोरा वर्ण, काळेभोर केस. त्यांनी पुस्तक पुढे केले तेव्हा दिसलेला मृदू गुलाबी तळवा आणि नाजुक त्वचा.

पुढे वाचा

विवेकवाद – २

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण ज्ञानक्षेत्रातील विवेकित्वाचा एक नियम पाहिला. तो नियम असा होता की ज्या विधानाच्या सत्यत्वाचा पुरेसा पुरावा उपलब्ध असेल अशाच विधानावर आपण विश्वास ठेवावा, आणि तो विश्वास पुराव्याच्या प्रमाणात असावा. तसेच विधानाचा पुरावा तपासण्याची शक्ती आपल्याजवळ नसेल तर त्या त्या ज्ञानक्षेत्रातील तज्ज्ञाला किंवा वैज्ञानिकाला प्रमाण मानावे.
नंतर आपण कर्मक्षेत्रातील विवेकाकडे वळलो, आणि आपली कर्मे विवेकी केव्हा होतील याचा विचार करण्यास आरंभ केला. आपल्या असे लक्षात आले की कर्माचा विचार आपण जसा साध्य म्हणून करू शकतो तसाच एखाद्या साध्याचे साधन म्हणूनही करू शकतो.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग २)

मातृवंशीय समाज
वैवाहिक रूढींमध्ये नेहमीच तीन घटकांचे मिश्रण आढळते: (१) साहजिक किंवा सहजात किंवा राजप्रवृत्तिमय (instinctive), (२) आर्थिक, आणि (३) धार्मिक. हे घटक स्पष्टपणे वेगळे दाखविता येतात असे मला म्हणायचे नाही; जसे ते अन्य क्षेत्रात वेगळे दाखविता येत नाहीत, तसेच ते येथेही येत नाहीत. दुकाने रविवारी बंद असतात याचे मूळ धार्मिक आहे. पण आज ही गोष्ट आर्थिक झाली आहे; आणि अंगिक बाबीतील कायदे आणि रूढी यांचीही गोष्ट अशीच आहे. धार्मिक मूळ असलेली रूढी जर उपयुक्त असेल तर तिचा धार्मिक आधार कमकुवत झाल्यावरही ती पुष्कळदा टिकून राहते.

पुढे वाचा

फुले-आंबेडकर शताब्दी समारोहाच्या निमित्ताने

हे वर्ष सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेबद्दल आस्था बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण या वर्षीपासून जोतीराव फुले यांची मृत्युशताब्दी आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी प्रचंड उत्साहानिशी साजरी होत आहे. कालगतीने जयंतीमयंती आणि त्यांच्या शताब्दीही येतच असतात, पण त्या सगळ्याच समारंभपूर्वक साजऱ्या होत नसतात. तुरळक महापुरुषांच्याच वाट्याला हे सन्मान येत असतात कारण त्यांच्या विचाराबद्दल व कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी समाजाला या सोहळ्यांमधून मिळत असते. पण त्याचबरोबर काळाचा संदर्भही तितकाच महत्त्वाचा असतो. १८२७ साली जन्मलेल्या जोतीरावांची जन्मशताद्वी १९२७ साली कालक्रमाने आली होती. अगदीच नगण्य प्रमाणावर ती साजरी झाली असावी असे काही पुरावेही कागदोपत्री सापडतात, पण एक गोष्ट निश्चित की महाराष्ट्र राज्य-स्थापनेनंतर जोतीरावांच्या प्रतिमेला जेवढा उजाळा मिळाला आणि त्यांच्या कीर्तीचा जेवढा उदोउदो झाला तेवढा पूर्वी कधीच झाला नव्हता.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

समस्या हिंदुत्वाची – श्री. दिवाकर मोहनींना उत्तर
श्री. दिवाकर मोहनींनी ‘नवा सुधारक’च्या पहिल्या अंकात मुख्य दोन प्रश्न उपस्थित केले आहेत :- (१) हिंदू म्हणून करावयाची कर्तव्ये कोणती? आणि (२) ती न करताही एखाद्याला हिंदू म्हणवून घेता येईल काय? यांपैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर निश्चित ठरले तर दुसरा प्रश्न निकालात निघतो. कारण एखाद्याने ती किमान कर्तव्ये पार न पाडल्यास त्याला हिंदू म्हणवून घेणे वा त्याला हिंदू म्हणणे हे चुकीचे होईल.
या प्रश्नाची पार्श्वभूमी म्हणून श्री. मोहनींनी रामजन्मभूमी व बाबरी मशीद याविषयीचा वाद व त्यातून उसळलेल्या दंगली यांचा उल्लेख केला आहे.

पुढे वाचा