मासिक संग्रह: नोव्हेंबर, १९९२

संपादकीय २ – लोकसंख्यावाढ आणि कुळकर्णी सामितीचा अहवाल

महाराष्ट्र सरकारने लोकसंख्या व कुटुंबनियोजन कार्यक्रम यांच्या स्थितीची पाहणी करण्याकरिता नेमलेल्या कुळकर्णी समितीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. सरकारची आणि लोकांचीही झोप खाडकन उतरावी असे त्या अहवालाचे स्वरूप आहे. गेल्या २५-३० वर्षांत कुटुंबनियोजनाचा जो कार्यक्रम देशात चालू आहे त्याला लोकसंख्यावाढीला आळा घालण्याच्या कामात प्रचंड अपयश आले आहे हे त्यातून स्पष्ट होते. १९७१ ते १९८१ या दहा वर्षांत महाराष्ट्राची लोकसंख्या ५ कोटी ४ लाखांवरून ६ कोटी २८ लाखांवर आणि पुढील दहा वर्षात १९९१ साली ती जवळपास ८ कोटीवर गेल्याचे आढळून आले आहे.

पुढे वाचा

संपादकीय

आजच्या संपादकीयाचे स्वरूप वेगळे आहे. श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी आमच्या सल्लागार मंडळाच्या एक सभासद डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या धर्मान्तराच्या निमित्तानेआम्हाला पाठविलेल्या पत्रामुळे काही खुलासा करण्यासाठी हे आम्ही लिहीत आहोत.
आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक सुरू झाल्याला लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील. ह्या अवधीत आम्हाला महाराष्ट्रातील विचारी वाचकांकडून पुष्कळच प्रोत्साहन मिळाले आहे. ह्या मासिकात कोणते विषय कसे मांडले जातात त्याकडे आमच्या वाचकांचे बारीक लक्ष असते.
ह्या मासिकाच्या संचालनासाठी दोन मंडळे नेमली आहेत. एक संपादक मंडळ व दुसरे सल्लागार मंडळ. संपादक मंडळाचे सभासद संपादकांना दैनंदिन कामात मदत करतात.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय

सुदृढ समाजनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषसमानता या तत्त्वाचा उद्घोष स्त्रीमुक्ती आंदोलन सुरुवातीपासून करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्त्री उवाच वार्षिक प्रकाशित होत असते. या वार्षिकाचा सहावा अंक मार्च ९२ मध्ये प्रकाशित झाला. स्त्रीचा व त्या अनुषंगाने समाजाचा ‘मायक्रोस्कॉपिक व्ह्यू’ घ्यावा तसे या अंकाचे स्वरूप आहे. स्त्रीजीवनावर परिणाम करणार्‍या सर्व महत्त्वाच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक-अंगांचा ऊहापोह तर यामध्ये केला आहेच, परंतु समाजापासून सहसा दडवून ठेवलेले असे जे स्त्रीचे कौटुंबिक जीवन, त्यावर या अंकात विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम या अंकातील स्त्री कुटुंबातील आई म्हणून कशी आहे ते बघू .

पुढे वाचा

पुस्तकपरीक्षण -‘सत्या’पेक्षा अधिक ‘विपर्यासां’चाच ऊहापोह।

सावरकरांचे एक निष्ठावंत व व्यासंगी अभ्यासक म्हणून प्रा. शेषराव मोरे यांचे नाव आता प्रतिष्ठित झाले आहे. व्यावसायिकदृष्ट्या अभियांत्रिकीत पारंगत असलेले प्रा. मोरे इतिहास, समाजशास्त्र, तर्कशास्त्र व भाषा वगैरे विषयांचेही जाणकार आहेत. स्वातंत्र्यवीर हा तर त्यांच्या अध्ययन-मनन-चिंतनाचा नव्हे तर निजिध्यासाचाच विषय गेल्या अनेक वर्षांपासून ठरला आहे. यातूनच निष्पन्न झालेल्या त्यांच्या ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या ग्रंथराजाने चार वर्षांपूर्वी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या ग्रंथाच्या दुसर्‍या आवृत्तीसोबतच ‘सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास’ नामक त्यांचा दुसरा बृहद्ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

पुढे वाचा

विवेकासाठी चळवळ हवी!

व्यक्तिजीवन आणि समाजजीवन सुख-शांतीचे व्हावयाचे असेल तर त्यासाठी विवेकाच्या संगोपन-संवर्धनाची नितान्त आवश्यकता आहे. बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा आणि विवेक या संकल्पना परस्परांच्या फार जवळ आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण आणि बुद्धिप्रामाण्य यांना सोडून विवेक असू शकणार नाही आणि विवेक नसेल तर खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य असू शकणार नाहीत. विवेक ही अधिक व्यापक अशी जीवनसंवर्धक संकल्पना आहे. विवेकाची सविस्तर चर्चा केल्यास बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, reason, श्रद्धा, अंधश्रद्धा इत्यादी सर्व विषयांचा ऊहापोह होऊन जाईल.

सृष्टीतील अचेतन आणि सचेतन अशा सर्व वस्तूंना निश्चित गुणधर्म असतात. अचेतन वस्तूंमध्ये स्वतःच्या अंगचे चैतन्य नसते तर सचेतन वस्तूंमध्ये (वनस्पती आणि प्राणी) अंगभूत चैतन्य असते.

पुढे वाचा

लोकहिताचे विवेकी भाष्यकार : लोकहितवादी

उणीपुरी दोन वर्षे आपण महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी उत्सवाने काढीत आहोत. आपला समाज ज्यावेळी गलितगात्र, स्तंभित आणि संवेदनाहीन होऊन पडला होता त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याच्या कशा मशाली पेटवल्या आणि त्याला चेतवले याचे संस्मरण करणे आपले कर्तव्यच आहे. याच भावनेने आपण आणखीही एका पणतीची आठवण ठेवली पाहिजे. ही आठवण करणे हे जेवढे सौजन्याचे तेवढेच औचित्याचे आणि कृतज्ञपणाचेही होणार आहे. त्या मिणमिणत्या पणतीने पुढे मोठमोठ्या दीपस्तंभांना ज्योत पुरविली आहे. आणि आज तिची गरज आपल्याला मुळीच उरली नाही असेही नाही.

पुढे वाचा

श्रद्धेपुढे शहाणपण चालत नाही- सावरकर ते भाजप ह्या पुस्तकाच्या निमित्ताने

डॉ. स. ह. देशपांडे ह्यांनी अत्यन्त अभ्यासपूर्वक लिहिलेला सावरकर ते भा. ज. प. हिन्दुत्वविचाराचा चिकित्सक आलेख हा ग्रन्थ माझ्या नुकताच वाचनात आला. ग्रन्थ वाचल्यानंतर माझ्या मनात पुष्कळ विचार आले. त्यांपैकी काही येथे संक्षेपाने मांडण्याचा प्रयत्न करतो.

मुस्लिम विरोधात हिन्दुत्व
हिन्दुत्वविचाराचा आलेख मांडताना डॉ. देशपांडे (सहदे) ह्यांनी फक्त मुस्लिमविरोधात हिन्दुत्व अशी त्याची मांडणी केली असल्यामुळे ग्रंथ वाचून माझे तरी समाधान झाले नाही. लेखकाने मनाशी काही एक निष्कर्ष आधीच काढून ठेवला असून त्या निष्कर्षाला पूरक अशीच अवतरणे (उद्धरणे) त्यांनी प्रचुर मात्रेमध्ये जमविली आहेत असे मनात आल्यावाचून राहिले नाही.

पुढे वाचा

धारणात् धर्म इत्याहुः

गेली काही वर्षे धर्म या विषयावर बरेच विचारमंथन चालू आहे. त्यात एक नवा विचार प्रामुख्याने पुढे येत आहे. तो विचार म्हणजे असा की ‘धर्म म्हणजे religion नव्हे. हिंदुराष्ट्रवादी विचारवंतांकडून यासंबंधात असा युक्तिवाद केला जातो की ‘धर्म म्हणजे religion मानल्याने सेक्युलरिझम (secularism) या विषयासंबंधी मोठा गोंधळ माजून राहिला आहे. ‘Secular’ विरुद्ध ‘ religious’ असल्यामुळे, आणि ‘religious’ म्हणजे धार्मिक असे मानले गेल्यामुळे, ‘सेक्युलर’ म्हणजे ‘निधर्मी, धर्मनिरपेक्ष’ असे अर्थ निष्पन्न झाले आहेत. पण हे चूक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. मा. गो.

पुढे वाचा

आम्हांलाही पूर्वाचार्यांएवढेच अधिकार

पूर्वेतिहास आणि पूर्वाचार हे पुनःपुन्हा पुढे आणून त्यांचे फिरून अवलंबन करा, असे सांगत न बसतां, अलीकडील न्यायाच्या भात्यांतून तीव्र बाण काढून त्यांचा त्यांवर संपात केला पाहिजे. कोणतेहि आचार घालण्यास पूर्वीच्या ऋषींस जितका अधिकार होता तितकाच आम्हांसहि आहे. पूर्वकालीन आचार्यांवर ईश्वराची जितकी कृपा होती, तितकीच आम्हांवरहि आहे, व त्यांच्याशी त्यांचा जितका संबंध होता तितकाच आम्हांसहि आहे. बर्‍या-वाईटाची निवड करण्याची जितकी बुद्धि त्यांना होती तितकी, तीहून अधिक आम्हांसहि आहे. सृष्टिविषयक ज्ञान जितकें त्यांना होते, तितकें, किंबहुना त्याहून अधिक ज्ञान आम्हांस आहे. सबब त्यांनी घालून दिलेल्या नियमांपैकी जेवढे हितकारक असतील तेवढ्यांचंच आम्ही पालन करणार आणि जे अपायकारक असतील ते टाकून देऊन त्यांचे जागी आम्हांस निर्दोष वाटतील असे नवीन घालणार.

पुढे वाचा

निसर्ग आणि मानव : श्री वसंत पळशीकरांना उत्तर

१८ जुलैच्या साधनेत श्री नानासाहेब गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या उत्तरार्धात नानासाहेबांनी गांधीवादी पर्यावरणवाद्यांवर परखड टीका केली आहे. तिला श्री वसंत पळशीकरांनी २९ ऑगस्टच्या साधनेत उत्तर दिले आहे. त्या उत्तरावरील ही प्रतिक्रिया.

ज्याला आपण निसर्ग म्हणतो तो प्रथमतः भौतिक, निर्जीव पदार्थांचा आणि शक्तींचा, आणि नंतर वनस्पती आणि प्राणी यांचा, त्यांच्या जीवनव्यवहारांचा बनलेला आहे. यांपैकी भौतिक निसर्ग हा पूर्णतः अचेतन, निर्जीव अशा शक्तींचा आणि त्यांच्या घडामोडींचा वनलेला आहे; परंतु निसर्गाचा जो भाग वनस्पती आणि प्राणी यांचा बनलेला आहे त्यात जीव, संज्ञा, हेतुपुरस्पर कृती या गोष्टी आढळून येतात.

पुढे वाचा