मासिक संग्रह: ऑक्टोबर , २००९

संपादकीय नवे गडी, नवा राज!

आजचा सुधारक चालवण्याशी अनेकांचे, वेगवेगळ्या पातळ्यांवरचे, वेगवेगळ्या प्रकारचे संबंध असतात. वाचक/ग्राहक हा संबंधितांच्या संख्येने सर्वांत मोठा प्रकार. यांतही आजीव, दरवर्षी वर्गणी देणारे, परदेशस्थ, संस्थासदस्य, (ज्यांच्याशी आसुचे आदानप्रदान होते अशी) नियतकालिके, (ज्यांनी आसु वाचावा असे वाटल्याने अंक सप्रेम पाठवले जातात, असे) विचारवंत, इत्यादी प्रकार असतात. या सर्वांकडून येणारे प्रतिसाद, हा आसु चे धोरण ठरण्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. पण कागदोपत्री एक व्यक्ती मासिकाची प्रमुख असावी लागते, आणि तिने शेवटी प्रकाशनाची सर्व जबाबदारी घ्यायची असेत. ही व्यक्ती म्हणजे प्रकाशक. आसु च्या सुरुवातीला काही वर्षे दिवाकर मोहनी व काही वर्षे विद्यागौरी खरे यांनी प्रकाशक म्हणून काम केले.आज

पुढे वाचा

पत्रसंवाद

पत्रसंवाद
कृ.अ.शारंगपाणी, ३९१, शिवाजीनगर, पुणे ४११ ००४.
पूर्वी साहित्यिक विश्राम बेडेकरांच्या ‘सिलिसबर्गची पत्रे’ या पुस्तकात ‘ब्रहा म्हणजे सीमातीत केवळ जागृती’ असे वाक्य वाचले होते. परंतु ते काय सांगत आहेत, हे कळले नव्हते. आता आपल्या ऑगस्टच्या अंकात प्रसन्न देवदत्त दाभोलकर “मी आहे आणि माझे अनुभव आहेत.’ हा व्यक्तिगत अनुभव ज्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म, असे सांगतात. हेही कळले नाही. कृपया मार्गदर्शन करावे. चैतन्यस्वरूप नसणारे ब्रह्मही असते काय, हेही कळवावे. म.ना.गोगटे, .पसेसरींश.लो साहित्य संमेलन ….पत्रक ऑगस्ट २००९
नमस्कार ! मराठी साहित्य संमेलनाने मराठी विज्ञान संमेलनास प्रेरणा दिली.

पुढे वाचा

मालिकाबद्ध पुस्तकातले डोह

आजचा सुधारक ची पहिली दोन वर्षे (एप्रिल ‘९० ते मार्च ‘९२) पानांचे क्रमांक दर महिन्यात नव्याने सुरू केले जात. एखाद्या महिन्यात एक ते बत्तीस क्रमांक दिले, की पुढील महिना परत एक पासून सुरू केला जाई. नंतर असा विचार आला, की लेखांवरील चर्चा, पत्रे, प्रतिक्रिया, असे करत एखाद्या विषयावरील सर्वांचे सर्व मुद्दे समजून घेण्यामुळे मासिक खरे तर मालिकाबद्ध पुस्तकासारखे रूप घेते. त्यामुळे एकेक वर्ष तरी पानांचे क्रमांक सलग द्यावेत. एप्रिल ‘९२च्या अंकापासून आजवर ही पद्धत सुरू आहे. त्यावेळी मी आसु चा वाचकही नव्हतो, पण दि.य.देशपांडे,

पुढे वाचा

स्लमडॉग करोडपती

D: It is written पण नेमकं काय? पाण्याच्या वाफेवर लिहिलेला जमालचा संघर्षमय भूतकाळ की फसवा वर्तमानकाळ की उज्ज्वल भविष्यकाळ ??
जमाल… एक अमिताभवेडा क्रिकेटप्रेमी, तर सलीम, त्याचा मोठा भाऊ, आईसोबत ‘आमची’ मुंबईच्या झोडपट्टीत राहात असतात. हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये जीव वाचवताना राम भेटतो. पण आईला गमावून अनाथ, निष्पाप भावंडे – द टू मस्केटीयर्स – आणि लतिका – द थर्ड – जगण्यासाठी एकांडा संघर्ष सुरू करतात.
पोटासाठी कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या या मुलांना भिकारी बनवण्यासाठी एक दिवस ममनचे लोक घेऊन जातात. मुलांचे डोळे काढून काहींना पांगळे करून भिकेला लावण्याच्या या धंद्याचा ममन बादशाह असतो.

पुढे वाचा

नैतिकतेची वैश्विकता

मार्क हॉसर हे नामवंत मानसतज्ज्ञ असून मन, मेंदू व वर्तणूक यांविषयी विशेष अभ्यास करत आहेत. त्यांच्या मॉरल माइंड्स (Moral Minds: How Nature Designed Our Universal Sense of Right and Wrong) या पुस्तकात नीतिमत्तेच्या वैश्विक स्वरूपाबद्दल विस्तृतपणे चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेल्या काही प्रश्नोत्तरांतून नैतिकतेविषयी त्यांना काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल. माणसांमध्ये नीतिमत्ता उपजतच असते असे विधान आपण करत आहात. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे?

सर्वांत प्रथम नीतिमत्तेचे मूळ कुठे असेल याचा विचार करायला हवा. बरोबर वा चूक असे निकाल देत असताना त्यामागील मानसिक प्रक्रिया कोणती असेल?

पुढे वाचा

पाणी व्यवस्थापनः सोपे उपाय

आ.सु.चा एप्रिल २००९ च्या अंकातील लेखात शेतीला लागणारे एकूण पाणी यासंबंधीचे विवेचन वाचले. मला शेतीला लागणाऱ्या पाण्याविषयी काही सांगावेसे वाटले म्हणून हे पत्र !
शेतीसाठी अथवा इतर उपयोगांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत हा पडणारा पाऊस आहे. आता त्याच्यावर आपले म्हणजे एकूणच मनुष्यप्राण्याचे फारसे नियंत्रण नाही. या शास्त्रात काम करणारे आपले जे दिग्गज शास्त्रज्ञ आहेत त्यांचे काम छान झाले याचा अर्थ त्यांनी वर्तवलेला पुढील वर्षीचा पावसाचा अंदाज जवळ जवळ बरोबर वर्तवला असे असते! तेव्हा जेवढा पाऊस पडेल व त्यातून जेवढे पाणी उपलब्ध होईल, ते साठवून (जमिनीवर अथवा जमिनीखाली) व काटकसरीने वापरून आपली गरज भागविण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे निर्विवाद.

पुढे वाचा

राजा दीक्षित यांचा लेख,

“महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार”, प्रतिमा प्रकाशन, पुणे च) ख. ते (सावरकर) असे म्हणतात की, ‘चातुर्वर्ण्याच्या किंवा जातिभेदाच्या सर्व मुख्य प्रकारांच्या मुळाशी आनुवंशिक गुणविकासाचे सर्वसामान्य असे मुख्य तत्त्व आहे हे तत्त्व ‘जनहितकारक’ असून, ‘ज्यांच्या उपकारक प्रवृत्तीच्या पुण्याईच्या वशिल्यावरच आजवर ही संस्था (=जातिभेद) जगत आली’ त्या सर्वात हे तत्व ‘खरोखरच महत्त्वाचे’ आहे असेही ते (सावरकर) सांगतात.” वसंत पळशीकर यांचा लेख, जात्युच्छेदक निबंध व सावरकरांचे अस्पृश्यता निवारक कार्य, सुमंत यशवंत, (संपा.) महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार, प्रतिमा प्रकाशन, पुणे खख. “सावरकर हे वंश व वर्णश्रेष्ठत्ववादी कसे होते त्याचा परामर्श घेताना वसंत पळशीकर म्हणतात, “काही गुण श्रेष्ठ, काही कर्मे श्रेष्ठ, अशी त्यांची धारणा कायमच होती.

पुढे वाचा

उत्क्रांतिसिद्धान्त, जात आणि जनुके

जाति-विभङ्ग पाणानं, अनामना हि जातियो ।।
एवं नत्थि मनुस्सेसु, लिङ्गं जातिमयं पुथु ।।* –
तथागत गौतम बुद्ध
(मनुष्येतर) प्राणिमात्रांमध्ये भिन्नभाव दाखविणाऱ्या जाती असतात; पण मनुष्यांमध्ये पृथक्ता दाखवणारे जातिमय लिंग नसते. (मज्झिमनिकाय, वासेट्ठसुत्त (२.४८.२.३), उद्धृत – शरद पाटील, दासशूद्रांची गुलामगिरी, खंड १ : भाग २, प्राज्ञ प्रकाशन, वाई, १९८७, पृ. ४५८)
उत्क्रांतिसिद्धान्ताने चार्ल्स डार्विनला (१८०९-१८८२) इतिहासात अढळ असे स्थान प्राप्त करून दिले आहे. जैवविज्ञानाच्या ज्ञानशाखेस त्याने जे योगदान दिले ते आजही त्याच्या काळाइतकेच महत्त्वाचे आणि पायाभूत मानले जाते. मानवाला, तो अगदी आदिमावस्थेत असतानापासून आपली उत्पत्ती आणि विकास कसा आणि कोणत्या क्रमाने होत आला हा प्रश्न भेडसावत होता.

पुढे वाचा

यक्षप्रश्न

भारताला चीनबद्दल तिहेरी भीती वाटते. चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य, व्यापारी आक्रमकता व अणुशस्त्रसज्जता. चीनने कुरापत काढून १९६२ सारखे दुसरे युद्ध उभे केले तर?
छोट्या स्वस्त मालाची चीनची उत्पादनक्षमता जबर आहे. गेल्या काही वर्षांतच अनेक त-हेची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, खेळणी, लसूण अशा विविध मालांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आहे. हे असेच वाढत राहिले, तर भारतीय उद्योगधंद्यांवर आणि लक्षावधी कामगारांवर उपासमारीची पाळी यायची. आणि तिसरा लोकशाहीच्या कार्यक्षमतेचा व उपयुक्ततेचा यक्षप्रश्न. अविकसित देशाला महागडी लोकशाही परवडत नाही की काय ? खरे म्हणजे अशी तुलना करणे दिशाभूल करणारे आहे.

पुढे वाचा