मासिक संग्रह: जुलै, २०१४

निवेदन : सामाजिक समता केंद्र

नितिन आगे हत्येमुळे दलितांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोहसीन शेखच्या हत्येने धर्मांध राजकारणाचा धोका स्पष्ट केला आहे. आदिवासी आणि भटक्या जमातींच्या लोकांवर आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार ही तर नित्याचीच गोष्ट आहे. या घटना थांबल्याच पाहिजेत. दलित, आदिवासी, भटके, आदी पददलितांना आणि अल्पसंख्याक व स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी निरनिराळ्या आघाड्यांवर कामगार कर्मचारी संघटना, सामाजिक संस्था, – प्राध्यापक शिक्षक संघटना, महिला संघटना अशा संस्था व व्यक्तींनी खारीचा वाटा उचलला आणि अशा कामांमध्ये समन्वय साधला तर निश्चित प्रगती साधता येईल. त्यासाठी आपल्या गावात सामाजिक समता केंद्र स्थापन करावे व त्यामार्फत प्रबोधनात्मक व कृतिशीलतेचे काम करावे, असा प्रस्ताव ठेवत आहोत.

पुढे वाचा

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

“तुम्ही तुमच्या शब्दांनी मला जखमी करा
डोळ्यांनी माझे तुकडे तुकडे करा
तुमच्या द्वेषाने मला ठार मारा
पण हवेतून वर मी परत उभी राहीन”

ती आठ वर्षाची होती तेव्हाच तिने बोलणे टाकले. त्याच वर्षी तिच्या आईच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या पोटातील तीव्र यातना, रक्त, खटकन्, ऊसकलेली तिची कंबर, या पेक्षा तिला सर्वात भयानक जाणीव होती ती तिच्या आवाजाने घेतलेल्या त्या नराधमाच्या प्राणाची ! न्यायालयात त्याच्या विरुद्ध तिने उंच आवाजाने भोकांड पसरल्यावर त्याला जोड्यांनी ठार मारण्यात आले होते. त्यानंतर ती पाच वर्ष आपल्या भावाशिवाय इतर कोणाशीच बोलली नाही.

पुढे वाचा

मोठी धरणे बांधावीत का?

धरण प्रकल्पांच्या पद्धतशीरपणे खालावलेल्या दर्जाचे सगळे श्रेय मूर्ख आणि खोटारडे लोक यांना जाते. मूर्ख म्हणजे अवाजवी आशादायी जे भविष्याकडे केवळ गुलाबी चष्म्यातूनच बघतात आणि त्यासाठी यश मिळण्याची शक्यता अगदीच कमी असतानासुद्धा जवळच्या सगळ्या पुंजीचा जुगार खेळतात. खोटारडे लोक स्वतःच्या आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी प्रकल्पांबाबतच्या गुंतवणुकीचे अति चांगले भवितव्य रंगवून जनतेची मुद्दाम दिशाभूल करतात जेणेकरून येन-केन-प्रकारेण प्रकल्प मंजूर होतील. महाकाय धरण प्रकल्पांचे प्रस्तावक अपवादात्मक यशोगाथांवरच भर देतात जेणेकरून त्यांचे प्रस्ताव मंजूर होतील.

‘महाकाय धरण प्रकल्पांचे प्रस्तावक अपवादात्मक यशोगाथांवरच भर देतात जेणेकरून त्यांचे प्रस्ताव मंजूर होतील’.

पुढे वाचा

हिंदू कोण?

पूर्वीच्या काळी दिनचर्या, खाणेपिणे, वेशभूषा, व्यवसाय आदींबाबत मनुस्मृतीने घालून दिलेल्या नियमांपैकी काहींचे जरी उल्लंघन केले, तरी त्यामुळे संबंधित व्यक्तीचे हिंदू म्हणून असलेले इतर हक्क हिरावून घेतले जात नसत. मग काही नियम अनिवार्य तर काही उल्लंघनीय असे झाले. परंतु मग हिंदू कोणास म्हणावे असा प्रश्न उपस्थित झाला. स्मृती व रीतिरिवाज ह्यांचा मिळून असलेला हिंदू कायदा लागू होण्यासाठी हिंदू कोण, ह्याचा निर्णय होणे आवश्यक होते.

त्या काळात, एखाद्या व्यक्तीने काही रीतिरिवाज पाळले नाहीत तर त्याला घराबाहेर काढणे, संयुक्त कुटुंबाच्या संपत्तीतला हिस्सा नाकारणे अशा प्रकारची शिक्षा करण्याचा अधिकार कुटुंबप्रमुखाला होता.

पुढे वाचा

जातिव्यवस्था आणि न्यूनगंड

भारतीय समाजामध्ये जातिव्यवस्था खूप खोलवर रुजली आहे. त्याचे दूरगामी परिणाम आपल्या व्यावहारिक जगण्यावर तसेच मानसिकतेवरही झाले याहेत. जातिनिर्मूलनाचे अनेक प्रयत्न व चळवळी ह्या देशात झाल्या, त्याने थोडाफार फरक पडला, पण निर्मूलन झाले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक परिवर्तनासाठी ज्या ज्या संघटना उभारण्यात आल्या, त्यांचे स्वरूप वरकरणी जरी जातिभेद न मानणारे दिसत असले, तरी जातिव्यवस्थेने घडविलेल्या मानसिकतेतूनच त्या मुळातून काम करीत असतात. ह्या मानसिकतेचे एक व्यक्त रूप म्हणजे तथाकथित खालच्या जातींना येणारा न्यूनगंड. ह्या न्यूनगंडाची कारणमीमांसा व परिणाम आपण ह्या लेखात पाहणार आहोत.

पुढे वाचा

आश्वासक सहजीवन कशातून शक्य होऊ शकेल?

जगाच्या परिस्थितीचे आकलन करून घेताना त्यातल्या अनेकानेक लोकसमूहांना आश्वासक सहजीवनाची शक्यता निर्माण झाल्याचे कितपत जाणवते किंवा हे जाणवण्यासारखी परिस्थिती आहे असे म्हणता येऊ शकते, हे अर्थातच उलगडायला हवे आहे. कारण जागतिक परिस्थितीतल्या लोकसमूहांनी ज्या तऱ्हेच्या व्यवस्थांचे व त्याच्या राजकीय स्वरूपांचे अनुसरण केले व त्यांचा अनुभव घेतला, अर्थात तो अनुभव अद्याप घेतला जातोहो आहेच, त्यातून आश्वासक सहजीवनाची परिपूर्ती करता आली किंवा काय, हा प्रश्न उपस्थित झालेलाच आहे.
जगातल्या कोणत्याही व्यवस्थेत राजकीयतेचे जे प्रमाण वाढले आहे व त्याचे महत्त्व निर्माण झालेही आहे, ते अपरिहार्यतेतलेच जरी मानले जात असले, तरी राजकीय व्यवस्था आश्वासक सहजीवनाची पूर्तता करण्याच्या पात्रतेची झाली आहे, किंवा ती त्या पात्रतेची होऊ शकेल, असे सर्वच व्यवस्थेतले अंतर्विरोध ज्या एका प्रमाणात उफाळून वर येताना दिसते आहे, त्यावरून तरी वाटत नाही.

पुढे वाचा

विज्ञान आश्रमातील समुचित तंत्रज्ञान

ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे, अशी कलबाग सरांची श्रद्धा होती. आपल्या कामाचा वेग, उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकते. म्हणून विज्ञान आश्रमात तंत्रज्ञानावर भर आहे.

कुठले तंत्रज्ञान कुठल्या भागात आणि कशासाठी सोयीचे आहे, हे पडताळून बघावे लागते. ते तंत्रज्ञान कोणत्या परिस्थितीत स्वीकारले जाईल ते तपासून बघावे लागते. हे तपासून बघण्याचे काम शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पामार्फत करता यावे असा आमचा प्रयत्न असतो. प्रदर्शनामध्ये त्यांना जे प्रकल्प करायचे असतात, त्यासाठी हेच प्रयोग देता येतात. गावातले विकासाचे जे प्रश्न आहेत, त्यांना उत्तरे शोधण्यासाठी काही तंत्रे वापरून बघितली जातात.

पुढे वाचा

आयन रँडचा भांडवलवाद

जर कुणी स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असेल तर त्याने मानवाच्या व्यक्तिगत हक्कांचाही पुरस्कार केला पाहिजे, जर कोणी मानवाच्या व्यक्तिगत हक्कांचा पुरस्कार करीत असेल तर त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यावरील हक्काचा, त्याच्या स्वातंत्र्याचा, त्याच्या स्वतःच्या सुखलोलुपतेचाही पुरस्कार केला पाहिजे, ह्याचाच अर्थ असा की त्याने अशा हक्कांना संरक्षण व त्यांची हमी देणारी राज्यव्यवस्था म्हणजेच भांडवलवादाची राजकीय आर्थिक व्यवस्था हिचाच पुरस्कार केला पाहिजे.
– आयन रँड

निरंकुश अर्थव्यवहार ह्याचा अर्थ, सर्व गोष्टी शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय, नैसर्गिक क्रमाने घडणे. लोकांची भरभराट झाली, तर ठीकच. अन्यथा जर त्यांची उपासमार झाली, त्यांना राहायला निवारा मिळाला नाही, औषधे खरेदी करण्यासाठी जर त्यांच्याजवळ पैसे नसतील तर त्याचा दोष त्यांच्याकडेच जातो.

पुढे वाचा

पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न

मागच्या लेखात धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यांविषयी हिन्दुनेतृत्व काय म्हणते आणि त्यांनी केलेल्या कृतीमध्ये कशी विसंगती निर्माण होते ते आपण पाहिले. ह्या लेखामध्ये त्यांच्या व्याख्येमध्ये मला बुचकळ्यात पाडणारे आणखी अनेक शब्द आहेत त्यांच्या विचार करावयाचा आहे, तसेच पूर्वीच्या लेखात ज्यांचा परामर्श घेता आला नाही असे मुद्दे विचारार्थ घ्यावयाचे आहेत व थोडे मागच्या लेखातील मुद्द्यांचे स्पष्टीकरणही करावयाचे आहे.
मला वाटते, हिन्दुनेतृत्वाच्या हिन्दूंच्या व्याख्येमुळे हिन्दु कोण आहे ते पुष्कळसे स्पष्ट होते, पण हिन्दु कोण नाही हा प्रश्न थोडा संदिग्ध राहतो. हिन्दुसंस्कृतीविषयी अभिमान ही हिन्दु होण्यासाठी असलेली अट कधीकधी शिथिल झाल्यासारखे मला जाणवते, आणि मग हिन्दु कोण नाही ते ठरविणे मला कठीण जाते.

पुढे वाचा

सेक्युलॅरिझमचा अर्थ

एकनाथांचे तत्त्वज्ञान हे धर्माधर्मांमधील सामंजस्य वाढून त्यांच्यात संवाद प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एकनाथांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या संवाद सामंजस्यासाठी ते या दोन्ही धर्मांची गुळमुळीत तरफदारी करीत नाहीत. त्यांच्यातील मूलतत्त्ववादी प्रवृत्तीला प्रोत्साहन देत नाहीत. आपल्या संविधानातील सेक्युलॅरिझम या तत्त्वाची ओढाताण करीत बुद्धिवाद्यांनी त्याचा धर्मउच्छेदक अर्थ लावला तर सर्वधर्मसमभाववाद्यांनी त्याचा अर्थ शासनाने धर्मांत साक्षेप न करता सर्व धर्मांचे सारखे कौतुक व सारखे चोचले असा घेतला. त्यामुळे सर्वच धर्मांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या. एकीकडे शहाबानो प्रकरणात घटनादुरुस्ती करायची व दुसरीकडे बाबरी मशिदीचे कुलूप उघडायचे अशी दुहेरी कसरत सुरू झाली.

पुढे वाचा