Author archives

रानवस्ती

मी अनिल दामले. पांढरपेशा शहरी. जन्म मुंबईतला. पुण्यात वाढलो. शिकलो. पुण्यातील सुप्रसिद्ध प्रभात फिल्म कंपनीच्या दामल्यांचा मी नातू. सिने सृष्टीच्या आणि शहराच्या झगमगाटांत वावरलो. त्याचबरोबर रानोमाळ हिंडायचो. दऱ्याखोऱ्या, गड, किल्ले, वने पाहिली. शेतीवाडीवर राहिलो. झाडझाडोरा, नदी, तळी, ऊन, वारा, पावसाचे शिंतोडे, पक्ष्यांचे बोल. ह्या सगळ्या निसर्गरूपांवर भाळलो. निसर्गसान्निध्यात राहावे, मनसोक्त, मनमुराद आयुष्य जगावे. शहरी चाकोरी रुळलेली वाट सोडून काहीतरी नवलाईचा मार्ग पत्करावा असे वाटत होते. घरच्यांचे पाठबळ होते. शेती करायची ऊर्मी होती, ध्यास होता. १९७६ साली खामगाव तलावाकाठी एक पडीक रान शेलारवाडीच्या ‘हडवळ्यांत’ विकत घेतले.

पुढे वाचा

अनुभव

माझ्यासारखा सामान्य माणूस काय नवीन अनुभव सांगू शकणार? तरीपण काही लोकांना ज्यांना अजिबातच या विषयीची माहिती अथवा ीीश नाही, त्यांना त्यात ळपींशीशीीं वाटण्याची शक्यता आहे असे वाटून आज काहीतरी लिहावे असे मी ठरवले आहे.

माझे शिक्षण अभियांत्रिकीमधले. मी पास झाल्यावर २-३ वर्षांनी बार्शीला आलो आणि वाटले की आपला पिढीजात व्यवसाय कोणता, तर शेतीचा! मग आपल्याकडे एवढी शेती असताना आपण ती का करू नये? काही लोकांना ती जमते तर आपल्याला का जमू नये? म्हणून मी शेतीमध्ये भाग घ्यायचा असे ठरविले. सुरुवातीला माझ्या वडिलांनी आम्हाला २० गुंठे जमीन आणि त्याला पुरेल एवढे एका विहिरीचे पाणी, मोटार वगैरे गोष्टी वापरायची परवानगी दिली.

पुढे वाचा

शेती, अन्नसाखळी आणि ऊर्जा

मी ज्यावेळी एकटा बसून असतो त्यावेळी सतत माझ्या डोक्यात एकच विचार घोळत असतो : माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे ऊर्जेवरचे परावलंबित्व कमी कसे करता येईल ? खास करून खनिज तेलावरचे (Fossil Fuel). सायकल वापरता येईल, खाजगी गाडी न वापरता सार्वजनिक वाहतुकीचा आश्रय घेता येईल, Compact Fluorescent Bulbs वापरता येतील, विजेवर चालणारी उपकरणे कमी करता येतील, सूर्यचूल, सूर्यबंब वापरता येईल. . . . . पण एक माहिती मिळाली आणि माझे धाबेच दणाणले एक अन्न उष्मांक (food calorie) मिळविण्यासाठी अमेरिका १० खनिज उष्मांक वापरते !

पुढे वाचा

शेतकऱ्यांच्या आत्महत्या : ग्रामीण दुरवस्थेचे दार्शनिक रूप

शेवटी शेतकरी कशासाठी शेती करतात? काय मिळवायचे असते त्यांना? त्यांची सर्व शक्ती उत्पादनापेक्षा अनिश्चिततेच्या दडपणाखालीच खर्च होते. बऱ्याचवेळा त्याला माहीत असते की पेरण्या करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. पण तो तरी दुसरे काय करू शकतो? संपूर्ण दिवाळखोरीत जाइस्तोवर शेतकरी पेरीतच राहणार.

आजची अर्थव्यवस्था अगदी भिन्न-भिन्न नैसर्गिक परिस्थितीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांत जीवघेणी चढाओढ लावते. आणि खरोखरच शेतकरी घायाळ होतात, मरतातही.

श्रीमंत आणि गरीब यांना आहार-उष्मांक (food calories) सारखेच लागतात. अन्नधान्याच्या पुरवठ्यात म्हणून फारशी लवचीकता असत नाही. शेतकऱ्यांना सातत्याने उत्पादन वाढवायला म्हणून वावच नसतो, लिोकसंख्यावाढ सोडू५ पीक खलास होणे आणि अमाप येणे त्याच्यासाठी आपत्तीच ठरतात.

पुढे वाचा

अल्पभूधारक, महिला, वंचित गट यांच्यासाठी दहा गुंठ्यांचा पथदर्शक प्रयोग

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन दशकांपर्यंत भारतातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहत होती. शेतीव्यवस्था, गावगाडा बऱ्यापैकी चालला होता. मोठी शहरेसुद्धा शांत आणि लोकसंख्या मर्यादित असल्याने राहायला सुखाची होती. सोईसुविधा होत्या तेवढ्या पुरेशा होत्या. बरीचशी अर्थव्यवस्था भोवतालच्या परिसरावर अवलंबून होती. लोकांच्या गरजा मर्यादित होत्या, धनलालसा आजच्याएवढी वाढली नव्हती तेव्हा ग्रामीण भागातली कुटुंबव्यवस्था स्थिर होती, कुटुंबातला एखादा मुलगा फारच हुशार असला तर शिकायला शहरापर्यंत पोचत होता. अन्यथा गावातले शिक्षण दैनंदिन व्यवहार पार पाडायला पुरेसे होते.

७० च्या दशकानंतर कारखानदारी वाढू लागली. त्यांना कुशल कामगारांची गरज भासू लागली.

पुढे वाचा

समृद्ध सेंद्रिय किफायतशीर शेतीची एक नवी वाट

सुलतानी व अस्मानी जुलुमातून सोडवणूक शक्य?
अतिशय दाहक आणि धक्कादायक स्थितीमध्ये आज आपण येऊन पोहोचलो आहोत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कुपोषणाचे बालमृत्यू हे वर्तमानपत्रात ठळकपणे आले. न आलेले पण तेवढेच दाहक आणखी एक सत्य लपलेले आहे पन्नास कोटींपेक्षा अधिक स्त्रिया या देशात अनीमिया या जीवघेण्या स्थितीत अर्धमेल्या जगताहेत मरायच्या शिल्लक आहेत म्हणून.

सुलतानी व अस्मानी जुलुमाच्या दुहेरी कात्रीत सापडलेला, शेतीप्रधान राष्ट्रातला शेतकरी स्वतःची सोडवणूक कशी करणार?

या ज्वलंत आणि होरपळणाऱ्या परिस्थितीतून शेतीची सोडवणूक करणारी वाट काढणे काळाची निकड आहे. ही वाट शोधताना काही महत्त्वाच्या अटींची मर्यादा घालून पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे.

पुढे वाचा

शेतीचे जागतिकीकरण, दारिद्र्यनिर्मूलन व शासनाची भूमिका

१९९४ च्या एप्रिल महिन्यात जेव्हा भारत सरकारने डब्ल्यूटीओमध्ये आंतरराष्ट्रीय शेती करारांवर सह्या केल्या तेव्हा देशातील वातावरण खूपच तापले होते. या करारावर सह्या करून सरकारने भारतीय शेतीवर मोठे गंडांतर आणले आहे अशी तीव्र टीका विरोधी पक्षांकडून व पक्षबाह्य डाव्या उजव्या संघटनांकडून करण्यात आली. देशातील शेतकऱ्यांच्या संघटनादेखील ह्या प्रश्नावर विभागल्या गेल्या. उत्तर प्रदेशातील महेंद्रसिंग टिकैत यांची भारतीय किसान युनियन व कर्नाटकातील नंगँडस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक राज्य रयत संघटना यांनी या कराराला पूर्ण विरोध दाखवला तर शरद जोशींच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील शेतकरी संघटने ने कराराला संपूर्ण समर्थन देत आर्थर डंकेल यांना शेतकरी संघटना आपला बिल्ला लावण्यासदेखील तयार आहे अशी घोषणा केली.

पुढे वाचा

सुरक्षित शेतीतच भारताची प्रगती

भारताचे पहिले पंतप्रधान कै. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पाण्याची धरणे ही आधुनिक मंदिरे आहेत आणि इतर कोणत्याही गोष्टी करण्यास वेळ लागला तरी चालेल पण शेतीविषयी कोणतीही कृती करण्यास वेळ लागता कामा नये असे विधान केले होते. आता आयटीबीटीच्या युगात शेतीला सर्वांत कमी प्राधान्य दिले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून जागतिक व्यापार परिषदेमुळे जग ही एकच व्यापारपेठ आहे, ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागली आहे. जागतिकीकरणाचे अर्थशास्त्र रिकार्डो यांच्या तुलनात्मक फायदा या तत्त्वावर अवलबून आहे. याचा अर्थ कोकणामध्ये पोषक वातावरणामुळे आंबा अधिक किफायतशीर येत असेल, तसेच सोलापूर जिल्ह्यातील जिरायत भागात जर बाजरी/ज्वारी फायदेशीर येत असेल तर त्या भागात तीच पिके करावीत.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ : सहकारी साखर, सूतगिरण्या व दुग्धव्यवसाय

सहकारी चळवळीच्या प्रगतीत महाराष्ट्र हे सर्व देशात अग्रगण्य राज्य समजले जाते. महाराष्ट्रातील सहकारीचा खास विशेष म्हणजे शेतमालावर प्रक्रिया करणारे सहकारी उद्योग. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने सहकारी अर्थव्यवस्थेचे बलस्थान म्हणून मानले जाते. सहकारी साखर कारखान्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याच धर्तीवर सहकारी सूतगिरण्या प्रस्थापित झाल्या. सहकारी साखर कारखाने स्थापन करण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता तर सहकारी तत्त्वावर डेअरी स्थापन करण्यात गुजरात आघाडीवर होता. गुजरातेतील आणंद येथील अमुल डेअरीने सहकारी दुग्धव्यवसायाची मुहूर्तमेढ घातली. त्याच धर्तीवर गुजरातेत अन्यत्र, महाराष्ट्रात व देशात सहकारी दुग्धव्यवसायाचा प्रसार झाला.

स्वातंत्र्याच्या काळात सहकारी उद्योगांना सरकारचे पाठबळ मिळाले याचे कारण सरकारचे आर्थिक धोरण.

पुढे वाचा

अन्न व फळ प्रक्रिया उद्योग : काल, आज व उद्या

अन्न आणि फळ प्रक्रिया उद्योग अलिकडे संरक्षण उत्पादन व निर्यात उत्पादनाइतकाच प्राधान्याचा उद्योग झाला आहे.

जगामध्ये दुधाच्या उत्पादनात भारत प्रथम क्रमांकाचा तर अन्न, भाजीपाला, फळे व साखर उत्पादनात आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी आपल्या शेतीची दर हेक्टरी उत्पादकता जगाच्या तुलनेत एक-चतुर्थांश किंवा एक-षष्ठांश इतकी कमी आहे. निर्यातीमध्ये आपला जगाच्या बाजारपेठेतील वाटा ०.७१ टक्के म्हणजे एक टक्क्याहूनही कमी आहे. शेतीच्या २२० दशलक्ष टन उत्पादनापैकी भाजीपाला, फळे इतर शेतमालाच्या १२० दशलक्ष टन मालापैकी जवळ जवळ ४० दशलक्ष टन माल दरवर्षी खराब होतो किंवा सडून जातो व अशा त-हेने तीस टक्के नाश पावणाऱ्या मालाची किंमत रु.

पुढे वाचा