Author archives

हे छोटे सरदार की खोटे सरदार

गुजरात राज्यातील हिंदूराष्ट्राच्या प्रयोगशाळेचे मुख्य संचालक नरेंद्र मोदी यांनी रा.स्व.संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद वगैरे परिवाराच्या सहकार्याने आणि संपूर्ण सरकारी यंत्रणा वेठीस धरून २७ फेब्रुवारी २००२ च्या गोध्रा हत्याकांडानंतर जो बहात्तर तासांचा अभूतपूर्व नरसंहार त्या राज्यात घडवून आणला त्याबद्दल प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया प्रभृती श्रेष्ठींनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले. या देशाने गेल्या पन्नास वर्षांत जेवढे म्हणून मुख्यमंत्री पाहिले त्यांत सर्वोत्तम मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच असल्याचे शिफारसपत्र अडवाणींनी दिले. मोदींनी गुजरातेत यशस्वी केलेला प्रयोग भारतभरच्या गावोगावी आणि खेडोपाडी करू असा दृढसंकल्प तोगडियांनी व्यक्त केला.

पुढे वाचा

स्त्रियांच्या ‘दौर्बल्या’बद्दल

संपादकीय
एप्रिल २००३ च्या अंकात (१४:१) रा. ग. शहा यांचा एक लेख प्रकाशित झाला. त्याला ‘स्त्रियांची संख्या’ हा मथळा देऊन शेवटी मी एक संपादकीय टीप लिहिली. लेखातील मुद्दे पटले नाहीत, पण इतर वाचकांनी प्रतिवाद करावा यासाठी लेख छापत आहे, अशी ती टीप. पण वाचकांकडून प्रतिक्रिया आल्या नाहीत. याने मी तर व्यथित झालोच, पण (अर्थातच) शहा अधिकच व्यथित झाले. त्यांचे एक ताजे पत्र या अंकाच्या पत्रसंवादात आहे. त्यासोबत सुभाष आठले यांचे खालील पत्रही आले.
एखाद्या लेखकाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर न देता, त्या लेखकाला “विवेकी असण्याचा आव आणणारा”, कर्मठ, “पुरुषसत्ताक दृष्टिकोन मांडणारा’ वगैरे शिव्या देणे आ.सु.च्या

पुढे वाचा

भाकीत

“मानसशास्त्रज्ञांनी…. सांगोपांग अभ्यासातून अधिकारशाही व्यक्तिमत्त्वाविषयी काही दंडक निश्चित केले, लक्षणे…. कसोट्या ठरवल्या. (नरेंद्र मोदी यांना जवळपास त्या साऱ्याच कसोट्या लागू पडतात… अत्यंत कडक सोवळेपणा, संकुचित भावनात्मक जीवन, स्वतःच्या भावनावशतेची भीती असल्यामुळे — आत्म-नकारी वृत्तीमुळे — स्वतःच्या अहंच्या रक्षणार्थ दुसऱ्यावर दुष्ट हेतू लादणे अशा सर्व लक्षणांचे मिश्रण त्यांच्या मुलाखतीमध्ये प्रत्ययास आले. त्यातून त्यांच्या डोक्यात कपोलकल्पित हिंसाचाराची भुते थैमान घालीत होती हेसुद्धा स्पष्टपणे दिसले. एवं सर्व लक्षणांना कोंदण होते ते एका नादिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे. भारताविरुद्ध साऱ्या जगात सर्वत्र एक कट रचला जात आहे याबद्दल मोदी यांना बालंबाल खात्री वाटत होती.

पुढे वाचा

पत्रसंवाद

वर्ष 14, अंक 4, हा जुलैचा अंक वाचला. त्यांतील दोन विषयांवर काही मते मांडत आहे.
1. गांधीजी व सावरकर यांच्या एकूण वैचारिकांची तुलना करणे योग्य होईल. अस्मृश्यता निवारण सोडल्यास हे दोघे मान्यवर पुढारी दोन विरुद्ध टोकाना उभे होते. गांधीजींचे अर्थकारण, राजकारण व समाजकारण सुसंगत होती. शेतीप्रधान व खेडीप्रधान अशी उत्पादनाची रचना, सूतकताई व हाथविणाई असा खादी-उद्योगाचा पुरस्कार, नांगरासाठी सशक्त बैल, दुधासाठी सशक्त गायी असा गोरक्षण कार्यक्रम, वैयक्तिक आचरणांत ब्रह्मचर्य व अहिंसा यावर अतिरेकी भर, ही गांधींच्या वैचारिकेची मुख्य सूत्रे होती. सावरकर हे गिरण्यांचे कापड, आधुनिक(तम) तांत्रिकी, अतिरिक्त गोधनाची हिंसा, इत्यादीचा पुरस्कार करीत.

पुढे वाचा

तंत्रज्ञान आणि विचारांची पद्धत

भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातले अनेक तज्ञ आजच प्रयोगांचे निष्कर्ष काढायला आणि समजून घ्यायला इलेक्ट्रॉनिक तर्कशास्त्राची मदत घेत आहेत. समाजशास्त्री आणि अर्थशास्त्री संगणकांशिवाय कामे करू शकत नाही आहेत. मानव्यशास्त्री, विचारवंत आणि सर्जनशील लेखकांना आज तरी या यंत्राचा फारसा वापर करता येत नाही. पण हे लवकरच बदलेल, कारण संगणकाने मजकुराचे संपादन करणे कागद-लेखणी वा टंकलेखकाने तसे करण्यापेक्षा खूपच सोपे जाते. प्रकाशन उद्योगाला इलेक्ट्रॉनिक अक्षरजुळणीचे फायदे आधीच कळलेले आहेत. पुढे साहित्यिक आणि वैज्ञानिक ग्रंथालयेही इलेक्टॉनिक रूपात संगणकावर उपलब्ध होतीलच. साहित्य, तत्त्वज्ञान किंवा इतिहासाचा अभ्यास अंकबद्ध करून संगणक हुकूमनाम्यांमध्ये साठवता येईल का, हा प्रश्नच नाही आहे—-मुळात संवाद साधायला शास्त्रीपंडितांना संगणक हेच महत्त्वाचे साधन उरणार आहे.

पुढे वाचा

‘देहभान’: एका आदिम सत्याचा पुनरुच्चार

अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहनी दिग्दर्शित देहभान नाटक पाहिले. नीना कुलकर्णी आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकमींनी त्यात भूमिका केलेल्या आहेत. इतर सहकलाकारांनी त्यांना दिलेली साथही उल्लेखनीय आहे. नाटक दोन पातळ्यांवर घडतंय. एका महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त होणाऱ्या स्नेह-संमेलनात उत्कृष्ट नाटक सादर केले जावे ह्या हेतूने ‘देहभान’ या कादंबरीवर आधारित नाटक सादर करण्याचा धाडसी निर्णय दिग्दर्शिका प्राचार्यांच्या संमतीने घेते. नाटकातच नाटक घडतं आहे. बहुतेक प्रमुख पात्रे दुहेरी भूमिका करताहेत. प्राचार्या दमयंती आणि विकास केंद्रातील मावशी ह्या भूमिका नीना कुळकर्णी ह्यांनी समर्थ अभिनयाने साकार केल्या आहेत.

पुढे वाचा

स्वातंत्र्योत्तर भारतीय विज्ञानाचे यशापयश (भाग १)

विषयप्रवेश
काळात भारताचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. या विकासात विज्ञानाचा मोठा हातभार होता. आपण केलेला हा विकास पुरेसा झाला की नाही, आपल्या क्षमतेएवढा झाला की नाही, ज्या क्षेत्रात हवा त्या क्षेत्रात झाला की नाही, समाजातील निम्नस्तरांना फायदेशीर झाला की नाही, या प्रश्नांना होकारार्थी उत्तरे मिळतीलच असे नाही. पण विकास झालाच नाही असे कोणी म्हणू शकणार नाही. आपल्याला हवी तशी व हवी तेवढी प्रगती का झाली नाही या प्रश्नाचा शोध आपल्याला राज्यकर्ते व त्यांची धोरणे, समाज व सामाजिक परिस्थिती त्याचप्रमाणे व्यक्तिशः आपण स्वतः यांच्यापर्यंत नेऊन पोचवतो.

पुढे वाचा

वर्तमान

‘वर्तमान’ ही श्री. सुरेश द्वादशीवारांची अद्यावधि शेवटची कादंबरी. तिच्या वेष्टनावर तिचे वर्णन ‘राजकीय कादंबरी’ असे केले आहे. तिच्यात इ.स. 2002 या कालखंडावर आणि त्यातल्या मातब्बरांवर प्रकाशझोत टाकला आहे. केंद्र-सरकार, राज्यसरकारे. पक्ष. संघटना. प्रसारमाध्यमे आणि लोकमानस यांचा आढावा घेत वर्तम आणि लोकमानस यांचा आढावा घेत वर्तमान राजकारणाचा पट उलगडणारी’ हे तिचे वर्णन बरोबर आहे. पण त्या वर्णनांत न आलेले अनेक सामान्यपणे दुर्मिळ गुणही तिच्यात आहेत. प्रथम सांगायचा गुण म्हणजे तिची विलक्षण मनोवेधकता. चारशेचार पृष्ठांची ही कादंबरी इतकी चित्ताकर्षक आहे की वाचक एकदा वाचायला लागला की झपाटल्यासारखा ती वाचतच राहतो, आणि त्याला सवड असेल तर एक-दोन बैठकीत ही संपवितो.

पुढे वाचा

परस्परावलंबनाविषयी आणखी काही (२)

७. (क) मोहनी: आम्ही आम्हाला पैसा जास्त मिळाल्याने श्रीमंत होत नाही, तर आमच्या परिश्रमांच्या मोबदल्यात आपल्याला किती उपभोग मिळाला ते पाहून पूर्वीइतक्याच श्रमांत जास्त उपभोग मिळत असेल तरच आम्ही संघशः आणि त्यामुळे सरासरीने व्यक्तिशः श्रीमान् झालो आहोत हे समजू शकते.
(ख) पंडित: ह्याला अर्थ नाही. एक उपाशी तर दुसरा तुडुंब! सरासरीने दोघेही अर्धपोटी!
(ग) मोहनी: वरील वाक्यात, म्हणजे ७क मध्ये, पूर्वीइतक्याच श्रमात प्रत्येकाला जास्त उपभोग हा शब्द घालायला हवा आणि सरासरीने हा शब्द काढायला हवा म्हणजे माझ्या म्हणण्यातील अर्थ स्पष्ट होईल.

पुढे वाचा

रस्ते आणि मोटारी: एक न संपणारी शर्यत

1908 साली अमेरिकेत फोर्ड मोटारीच्या कारखान्यातून पहिली मोटार बाहेर पडली आणि माणसाच्या भ्रमंतीला क्रांतिकारी वेग प्राप्त झाला. दुसरे महायुद्ध संपेपर्यंत या मोटारींचा म्हणावा तितका प्रसार शहरांमध्ये झाला नव्हता. शेतकरी मात्र या वाहनांवर खूष होते. त्यांचा ताजा शेतीमाल शहरांत आणावयाला हे वाहन फार उपयोगी ठरले होते. शिवाय त्या काळात युरोप-अमेरिकेतील सर्व शहरांमध्ये रुळांवरून ट्राम, मेट्रो, आणि उंच पुलांवरून धावणारी छोटी रेल्वे यांसारखी सार्वजनिक आणि स्वस्त वाहतूक-साधने उपलब्ध झाली होती. यामुळे मोटारी या प्रामुख्याने खेड्यांमध्ये प्रचलित झाल्या होत्या हे आज खरे वाटणार नाही.

पुढे वाचा