Author archives

अर्थनीतीमागील वास्तवता आणि वैचारिका

१. एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे भाव काय आहेत हे दर आठवड्याला, महिन्याला, तिमाहीला, टिपून ठेवले गेले, आणि त्याचप्रमाणे त्या वस्तूची किंवा सेवेची किती विक्री (खरेदी) झाली याचे मोजमाप टिपलेले असले तर एक तालिका आपल्याला उपलब्ध होते. अशी तालिका (Time Series) सातत्याने ठेवली असली तर अभ्यासाला अत्यंत उपयुक्त ठरते. कोळसा, सोनेचांदी आणि अन्य धातु, आगगाडीची प्रवासी वाहतूक व मालाची वाहतूक, टिकाऊ उपभोग्य वस्तू (जशा की धुलाई यंत्रे, शीतकपाटे, शिवणयंत्रे इ.), दुचाकी-तीनचाकी-चारचाकी वाहने, शाळांतून शिक्षण घेणारे विद्यार्थी, कापूस व कापडचोपड, तयार कपडे, पोलाद, पेट्रोल, अशा अनेक तालिका उपलब्ध असल्या तर (आणि तरच) देशांतील एकंदर उलाढालीचा अंदाज करता येतो.

पुढे वाचा

शिक्षणाचे स्वातंत्र्य

श्री. निर्मलचंद्र यांच्या ‘नयी तालीम का नया आयाम—-लोकशिक्षण’ या हिन्दी पुस्तकात एक प्रसंग वर्णन केला आहे. हा प्रसंग आहे १९४७ सालचा. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांमधला. एका कार्यक्रमात ध्वजारोहणाला विनोबा होते. त्यांनी तिरंगी ध्वज फडकावला. नंतर म्हणाले, “हा तिरंगी ध्वज मिनिटभर उतरवून ‘युनियन जॅक’ तेथे फडकवण्याची मला इच्छा आहे.” लोक चकित झाले. गहजब माजू लागला. लोकांनी प्रखर विरोध केला. तेव्हा समजावणीच्या सुरांत विनोबा म्हणाले, “तिरंगी ध्वज हे आमचे पवित्र प्रतीक आहे. ज्याप्रमाणे गुलामीचे प्रतीक असणारा ध्वज (युनियन जॅक) आम्ही उतरवला, त्याचप्रमाणे आपली गुलामी कायम राखणाऱ्या सर्व गोष्टींचा आपण ताबडतोब त्याग केला पाहिजे.

पुढे वाचा

कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (भाग २)

‘स्त्रीकेन्द्रित कुटुंब’ याचा अर्थही स्पष्ट करण्याची गरज आहे. कुटुंब हे किमान द्विकेन्द्री तर असते, व असायलाही हवे. ते बहुकेन्द्री असणे अधिक इष्टही ठरेल. पण ‘स्त्रीकेन्द्री’ असे म्हणण्यामागे, आजचे बिघडलेले संतुलन पुन्हा एकवार दुरुस्त करण्याची गोष्ट प्रधान असावी.
कुटुंबाच्या गाभ्याशी मुले व त्यांचे संगोपन ही गोष्ट आहे. याचाच अर्थ मातृत्व व पितृत्व या दोन्ही भूमिका योग्य रीत्या पार पाडणारे कुटुंब असले पाहिजे. पति-पत्नींचे दांपत्यजीवन त्यांच्या परस्परपोषणासाठी स्वतंत्रपणेही महत्त्वाचे असतेच. पण त्यांच्या पोषणासाठी त्यांना कुटुंबाबाहेर पोचणारे अन्य मैत्रीसंबंध व त्यावर उभारलेले सहजीवन यांचीही तेवढीच आवश्यकता असते.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला, तेव्हा प्रेतातील वेताळ बोलू लागला:
आटपाट नगर होते, तेथे एक राजा राज्य करत होता. राजा प्रगतिशील होता आणि प्रजेला सुशिक्षित, संपन्न करण्यासाठी झटत होता. परंतु इतक्यात त्याची झोप एका विचित्र प्रश्नामुळे उडाली होती. त्याची प्रजा जरी सुशिक्षित व संपन्न होत चालली होती तरीही प्रजेतील मुलींची संख्या मुलांच्या प्रमाणात न राहता घसरत चालली होती. राजाने निरीक्षण केल्यावर एक भयानक गोष्ट त्याच्या लक्षात आली. मुलींचे आईबापच त्यांच्या जिवावर उठले होते.

पुढे वाचा

स्त्री: पुरुष प्रमाण

२००१ साली झालेल्या जनगणनेनुसार सर्वच भारतात व विशेषतः काही राज्यांत दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ९२७ इतकी कमी झाली आहे व आणखीच कमी होत चालली आहे. त्यामुळे समाजाचे काही मोठे नुकसान होणार आहे, या कल्पनेने भयभीत होऊन अनेक व्यक्ती धोक्याची घंटा वाजवत आहेत.

समाजातील स्त्रियांची संख्या कमी होणे याचा अर्थ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात स्त्री-हत्या होत आहे. शास्त्र-तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे स्त्रीहत्येचे स्वरूप अधिकाधिक सोपे, निर्धोक, वेदनारहित व ‘मानवी’ (Humane) बनत आहे. पूर्वीचे स्त्रीहत्येचे प्रकार असे:

(१) नवजात स्त्री अर्भकाला मारणे — उशीने दाबून, पाण्यात/दुधात बुडवून, जास्त अफू घालून, न पाजून, भरपूर मीठ किंवा विष पाजून, थंडीत उघडे ठेवून, कचरा कुंडीत किंवा अन्यत्र टाकून वा अन्य रीतीने.

पुढे वाचा

समाजसुधारकांचा वर्ग

प्रत्येक वर्ग तत्त्वे आपल्या वर्गाच्या दृष्टीने किंवा आपल्या विशिष्ट अनुभवाच्या दृष्टीने मांडीत असतो. त्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची तपासणी करताना तत्त्वे मांडणारांचा वर्ग कोणता होता आणि त्यांची परिस्थिती काय होती याचा नि चय आपणास केला पाहिजे. सामाजिक भावना आणि शासनसंस्था यांचा निकट संबंध असला तरच सामाजिक सुधारणेस प्रवृत्ती होणार आणि कर्तव्यात्मक समाज-शास्त्राची उत्पत्ती होणार. सामाजिक भावना असेल तरच विविध कार्यक्रम लोकांमध्ये उत्पन्न होईल. हिंदुस्थानात १९१९ च्या सुधारणा आल्या तरी समाजाच्या सुखाची आणि संरक्षणाची जबाबदारी घेणारी सामाजिक भावना जन्मास आली नाही. काँग्रेसचे लक्ष ती मवाळ वर्गाच्या ताब्यात होती तोपर्यंत केवळ सिव्हिल सर्व्हिसच्या नोकऱ्या हिंदी लोकांस अधिक मिळाव्यात आणि त्यासाठी त्या नोकरीभरतीच्या परीक्षा हिंदु-स्थानात व्हाव्यात इकडेच होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

पत्रसंवाद
केशवराव जोशी, तत्त्वबोध, हायवे क्र. ३५, नेरळ (रायगड) — ४१० १०१
मला ताठ वागणारी माणसे आवडतात. राजवाडे नातेवाईकांकडे राहत नसत; कारण ते म्हणत, “लोकांकडे राहिले की, त्यांच्या मुलाचे कौतुक करावे लागते. परंतु पात्रता सिद्ध झाल्याशिवाय मला ते जमणारे नाही”. अण्णासाहेब कर्वे मुलाकडे चहा प्यायले, तरी कपात एक आणा टाकून जात. तत्त्वामध्ये थोडीशी जरी तडजोड केली तरी समाज घसरत जातो. म्हणूनच बेडेकर आणि रेगे यांचेपेक्षा मला दि. य. देशपांडे जास्त आदरणीय वाटतात. ईश्वर नाही हे ते स्पष्टपणे सांगतात.
दुर्गाबाई भागवतांनी लिहिले आहे की, “आद्य शंकराचार्यांनी ‘शांकरभाष्यात ज्ञानाच्या वरच्या पातळीवर ईश्वर नाही’ असे म्हटले आहे”.

पुढे वाचा

मेंदू, भावना, सहजप्रवृत्ती, नैवेद्य वगैरे

मेंदूची रचना आणि कार्य यांचा अभ्यास दाखवतो की मेंदू आणि संगणक या एकाच नमुन्याच्या रचना आहेत. बाहेरून मिळणाऱ्या संवेदना आणि स्वतःत साठलेले सूचनांचे संच यांच्यावर तार्किक प्रक्रिया करून काही क्रिया घडवणे, हे संगणकाचे काम, आणि मेंदूचेही. बाहेरच्या संवेदना आणि सूचनांचे साठे वापस्न तर्क लढवणाऱ्या यंत्राची कल्पना अॅलन टुरिंग ह्या ब्रिटिश गणितीला १९३५ साली सुचली. १९४३ मध्ये मॅककुलक आणि पिट्स या अमेरिकन जैवभौतिकीतज्ञांनी मज्जाव्यवस्था आणि मेंदू यांचे काम टुरिंगच्या कल्पनेतल्या यंत्रासारखेच चालते, हे दाखवून दिले. तेव्हापासून आजवर मेंदूचे काम आणि संगणकाचे काम ह्यांच्या समरूपतेला पुष्टीच मिळत गेली आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

उषा गडकरी, २५७, शंकरनगर, नागपूर — ४४० ०१०
जुलै २००१ च्या अंकात श्री. ग. के. केळकर यांची पुण्याच्या ‘सकाळ’च्या १८ मे २००१ च्या अंकात श्री. यशवंत पाठक यांनी ‘नैवेद्य’ या शीर्षकांतर्गत केलेल्या लिखाणासंबंधातली प्रतिक्रिया वाचली. ती मला मननीय वाटली.
विवेकवादानुसार मेंदू, बुद्धी व मन यांचा परस्पर संबंध काय? असा प्रश्न समोर आल्यास विवेकवादी ‘मन’ या संज्ञेला कुठलाही शास्त्रीय वा वैज्ञानिक आधार नसल्यामुळे ‘मना’ला मोडीत काढतील. परंतु आपला प्रत्यक्ष अनुभव आपणास या बाबतीत वेगळी प्रचीती देतो. एखाद्या व्यक्तीने अत्यंत आपुलकीने, जिव्हाळ्याने व प्रेमाने आपले स्वागत केले; विचारपूस केली, आपली दखल घेतली व एखाद्याने केवळ शिष्टाचार म्हणून आपल्या संबंधात काही गोष्टी केल्या तर पहिल्या व्यक्तीच्या कृतीचा आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.

पुढे वाचा

भारत नावाचे सामर्थ्य

आ.सु.च्या जुलै अंकात प्रा. द. भि. दबडघावांनी परीक्षण केलेले ‘आय प्रेडिक्ट’ हे भारताच्या लोकसंख्येवरचे माझे तिसरे पुस्तक. जवळजवळ हजार पानांच्या पाच आवृत्त्यांचा आशय दबडघावांनी पाच पानांमध्ये खूप परिणामकारकपणे सांगितला आहे.
आ.सु.च्या वाचकांपैकी कुणाला कदाचित वाटेल की पावसाचे विज्ञान मी सांगणे ठीक, पण लोकसंख्येशी माझा काय संबंध? तेव्हा एक खुलासा करतो. इंडियन सायन्स काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनाचा अध्यक्ष असताना ‘सायन्स, पॉप्युलेशन अँड डेव्हलपमेंट’ हा माझ्या अध्यक्षीय भाषणाचा विषय होता. या तीन घटकांतील समान धागे तपासावेत, त्यासाठी स्वच्छ मनाने निरीक्षण करावे अशी वैज्ञानिक भावना माझ्या डोक्यात होती.

पुढे वाचा