आता थोडक्यात असे म्हणता येईल की प्रत्यक्षप्रमाणाच्या आवाक्यात जे जे येऊ शकेल ते ऐहिक; प्रत्यक्षाच्या आणि प्रत्यक्षाधिष्ठित अनुमानाच्या आवाक्यात. प्रत्यक्षप्रमाणाने वस्तूच्या अंगी असलेल्या ज्या गुणधर्मांचे आणि शक्तींचे ज्ञान आपल्याला होणे शक्य आहे तेवढेच काय ते गुणधर्म आणि शक्ती वस्तूंच्या ठिकाणी असू शकतात. जे काही अस्तित्वात आहे त्याचे संपूर्ण स्वरूप फक्त अशा गुणधर्मांचे आणि शक्तींचे बनलेले असते. ह्या स्वरूपाच्या वस्तूंचा समग्र समुदाय म्हणजे निसर्ग असे जर म्हटले तर इहवादी सिद्धान्त असा मांडता येईल : विश्व म्हणजे निसर्ग. निसर्गापलिकडचे असे विश्वात काही नाही.
विषय «उवाच»
नीती ही मानवनिर्मितच
“इतिहासाचे सर्व विद्यार्थी राजवाडे या अनुभवी संशोधकाला ओळखतातच. काही जणांना वाटते की अस्तित्वात असलेली सर्व नीतीची तत्त्वे अनादि अनंत आकाशातून उतरलेली आहेत आणि येणाऱ्या अनंत काळातही तशीच राहतील. त्यांना ही नीतीची तत्त्वे मोडणे ही गुन्हेगारी क्रिया वाटते. अशा लोकांना (राजवाड्यांचे लिखाण वाचून) जाणवेल की नीतीसुद्धा मानवी सर्जनशीलतेतून व उत्क्रांतीच्या इच्छेतून उपजलेली एक ‘वस्तू’ आहे, एखाद्या पटाशी किंवा सुरीसारखीच. राजवाड्यांच्या शोधितांबद्दलचे आमचे निष्कर्ष आम्ही राखून ठेवतो, कारण आमचे त्यांच्याशी बरेच मतभेद आहेत.”
[कॉ. श्री. अ. डांगे यांनी सोशलिस्ट या इंग्रजी मासिकाच्या मे-जून १९२३ या अंकात लिहिलेली ही टीप भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या ग्रंथाच्या इंग्रजी ‘धारावाहिक’ प्रकाशनाची प्रस्तावना आहे.
“आम्ही एकशेपाच आहोत”
शेतकऱ्यांना भेटायला मोटारीतून जाऊ नये, पायी गेले पाहिजे. आम्ही खेडेगावात इतके फिरलो की, आमचा अवधा वीस रुपये खर्च झाला. मराठे, ब्राह्मण वेगळे असले तरी लढाईचे वेळेस आम्ही एकशेपाच आहोत. आमचे बरोबर पथकात पोवाडे म्हणणारे व्हॉलंटियर्स होते. आम्ही पंधरावीस मंडळी झेंडा घेऊन प्रत्येक गावी जात होतो, गावात दूध मिळणे मुष्कील होई. खेड्यातील कुणब्याची भाषा आली पाहिजे. खेड्यात पुरुषवर्ग फारसा घरी नसतो. काही खेड्यात गेलो तो आमचे भोवती सर्व लुगडीच लुगडी दिसू लागली. आम्ही शेवटी येरवड्यास जाऊन आलो. तेथे जाताच राष्ट्रगीत म्हटले. तुरुंगाच्या दारात झेंडा उभा केला.
“परंपरा”
“याहून महत्त्वाचा भाग समग्र मराठशाहीच्या आर्थिक पायाचा किंवा आत्यंतिक भाषेत बोलावयाचे म्हणजे हीस खरा पाया होता की नाही? कां ती केवळ बिनबुडाची होती?” . . . केतकर विनोदाने म्हणत असत की, मराठ्यांच्या मोहिमांचें मूळ सावकारांच्या तगाद्यांत शोधले पाहिजे! मानी बाजीराव कर्जाच्या भारामुळे ब्रीद्रस्वामींपुढे कसा नमत असें याबद्दलचे राजवाड्यांचे निवेदन प्रसिद्ध आहे. . . ही कर्जे, कधीच कां फिटली नाहीत? पुढील वसुलाच्या भरंवशावर आधींच रकमेची उचल करावयाची, असे सर्वांचेच व्यवहार सदैव कसे राहिले? यांचा शास्ता, नियंता कोणी नव्हताच काय? आमच्या सत्ताविस्ताराच्या आर्थिक पायामुळेच आमच्यांतील मिरासदारी वृत्ती, ऐदीपणा व गैरहिशेबीपणा हे आजचे पुढील दुर्गुण उत्पन्न झाले काय?
जातींचा उगम – एक दृष्टिकोन
कोठेही केव्हाही जा, बापाचा धंदा मुलानें उचलला नाही, असें क्वचित् दृष्टीस पडते. बहुतेक ठिकाणी व प्रसंगी असेंच पाहाण्यांत येते की बाप वैद्य असला तर मुलगाही बापाची गादी चालवितो. बापाचा कारकुनी किंवा शिपाई पेषा असला तर मुलगाही कलमबहाद्दर किंवा तरवारबहादर होण्याची ईर्षा धरितो. लक्षावधि धंदे अस्तित्वांत असतांना व त्यांत हरघडी शतशः भर पडत असतांना आणि ते शिकण्याची साधनें व सोयी विपुल व मुक्तद्वार असतांना जर आज आपणाला असे स्पष्टपणे दिसते की, मुलाचा ओढा बहुधा बापाच्या धंद्याकडे असतो, मुलाने आपला धंदाच पुढे चालवावा असा मनोदय बापाचाही असतो, आणि त्याप्रमाणे उभयपक्षी तयारी करतात; तर जेव्हां धंदे थोडे आणि त्यांचे ज्ञान मिळविण्याची सार्वजनिक साधने व सोयीही थोड्या व एक घरी होत्या, अशा प्राचीन काळांत बापाच्या धंद्याची माळ मुलाच्या गळ्यांत सर्रास पडे, ह्यांत नवल ते कोणतें?
अप्रिय मतांचे नियमन
ज्या मूर्ख मतांमुळे सार्वजनिक जीवनाला अपाय होण्याचा संभव नसेल त्याबद्दल कोणाला तुरुंगात घालणे मला अर्थशून्य वाटते. जर हा नियम टोकापर्यंत ताणला तर फारच थोडे लोक त्याच्या तडाख्यातून वाचतील. शिवाय अश्लीलतेचा बंदोबस्त कायदा आणि तुरुंगवास यांनी करण्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होण्याचा संभव आहे. जे केवळ मूर्खपणाचे किंवा दुष्कर्म असेल त्याला मोहक वलय मात्र प्राप्त होते. राजकीय बंद्यांविषयी तर माझ्या भावना अधिक तीव्र आहेत. केवळ राजकीय मतांमुळे एखाद्याला तुरुंगात घालणे कितीही आकर्षक वाटले तरी त्याने त्या मतांचा प्रसार होण्याचाच संभव जास्त असतो. ते मानवी दुःखात भर घालण्यासारखे असून त्याने हिंसेला उत्तेजन मिळते यापलीकडे काही नाही.
बुद्धि आणि भावना
मला केवळ नकारात्मक भावनिक वृत्तीचा उपदेश करायचा नाही. सर्व बलेवान भावनांचा उच्छेद करावा असे मी सुचवीत नाही. ही भूमिका मी फक्त ज्या भावनांवर सामूहिक उन्माद आधारलेले असतात त्यांच्याच बाबतीत घेतो, कारण सामूहिक उन्माद युद्ध आणि हुकूमशाही यांना पोषक असतो. शहाणपणा केवळ बौद्धिक असण्यात नाही. बुद्धी वाट दाखविते आणि मार्गदर्शन करते; पण ज्यातून कृति निर्माण होते ते बळ तिच्यात नाही. हे बळ केवळ भावनांमधूनच मिळवावे लागते. ज्यांतून इष्ट सामाजिक परिणाम घडून येतात त्या भावना द्वेष, क्रोध आणि भय यांच्या इतक्या सहज निर्माण होत नाहीत.
निंद्य आणि हीन कृत्य
मी कोणत्याही प्रकारच्या युद्धात कोणत्याही परिस्थितीत आणि कधीही सामील होणार नाही. मग त्या युद्धामागची कारणं मला कितीही पटणारी असोत.
लढाई ही एक अतिशय नीच आणि घृणास्पद कृती आहे असं मी मानतो. मानवजातीला लांच्छनास्पद अशा या कृतीवर लवकरात लवकर बंदी घातली पाहिजे. बँडच्या तालावर रांगेने चालण्यात धन्यता मानणाच्या माणसांविषयी माझ्या मनात चीड आहे. अशा माणसाला मेंदू अनवधानानं देण्यात आलेला असावा. नुसत्या पाठीच्या कण्यावरही त्याचं उत्तम भागू शकलं असतं. रणांगणावर हुकुमाची तामिली म्हणून देशभक्तीच्या नावाखाली जे काही शौर्य गाजवलं जातं, अमानुष हत्याकांड चालतं आणि एकूणच जो काही मूर्खपणा चाललेला असतो, त्याची मला अतिशय किळस येते!
लोक काय म्हणतील?
वास्तविक पाहिले तर ज्यांना आपण लोक म्हणतो, व ज्यांच्या अपवादाला आपण भीत असतो, त्यांवर आपले फारच थोडे अवलंबून असते. लोकांना संतुष्ट राखण्याकरिता स्ववंचन करणे हे महापातक आहे असे समजले पाहिजे. सामान्य लोक अंधासारखे गतानुगतिक असतात. विचारी पुरुष अशांच्या छंदाने नेहमी वागतील तर सत्पक्षाचा प्रसार कधीच व्हावयाचा नाही. तेव्हा अज्ञानमग्न, अविचारी आणि ज्यांच्याशी आपला अर्थाअर्थी संबंध नाही अशा लोकसमुदायाच्या निंदेकडे आणि स्तुतीकडे दुर्लक्ष्य करून ज्याच्या मनाला जी मते प्रशस्त वाटत असतील त्यांचे त्याने निर्भयपणे प्रतिपादन करावे. असे केल्याने उलट पक्षांचे ऐकून घेण्याची व विचारपूर्वक सत्यासत्याचा निर्णय करण्याची संवय सर्वास लागेल,
प्लेटोचे आदर्श राज्य
प्लेटोच्या Republicच्या राज्यशास्त्रीय मतांची भल्या लोकांनी प्रशंसा करावी हे वाङ्मयीन भद्रमानी वृत्तीचे (snobbery) चे अत्यंत आश्चर्यकारक उदाहरण आहे. या एकतंत्री हुकूमशाही प्रबंधाविषयीच्या काही गोष्टी पाहा. शिक्षणाचे मुख्य प्रयोजन युद्धात धैर्य निर्माण करणे हे असून अन्य सर्व गोष्टी त्याला साधनीभूत मानल्या पाहिजेत. याकरिता माता आणि आया यांच्याकडून बालकांना सांगितल्या जाणार्यास गोष्टींची कडक तपासणी केली पाहिजे. होमरचे वाचन बंद केले पाहिजे, कारण तो भ्रष्ट लेखक वीरांना रडवतो आणि देवांना हसवतो. नाटकाला मनाई केली पाहिजे, कारण त्यात खलपुरुष आणि स्त्रिया असतात. संगीत काही विशिष्ट प्रकारचेच असले पाहिजे, म्हणजे आजच्या परिभाषेत Rule Britannia सारखे.