विषय «जीवनशैली»

जगावेगळे

(विदर्भातील तत्त्ववेत्ते व विचारवंत दि.य. देशपांडे ह्यांनी आपल्या विदुषी पत्नी मनू गंगाधर नातू ह्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आजचा सुधारक ह्या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकाची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ह्या जगावेगळ्या दांपत्यावरील, लोकमत २०१४ च्या दिवाळी अंका पूर्वप्रकाशित झालेला हा लेख – का.सं.)

गोष्ट खूप जुनी आहे. पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची म्हणजे जवळजवळ गेल्या जन्माची वाटावी अशी. पण मला अद्यापही तो काळ विसरता येत नाही. लहानशा खेड्यातून मी विदर्भ महाविद्यालयात शिकायला आले होते. शहरात छोटीशी खोली घेऊ न राहात होते आणि सायकलने कॉलेजात येत होते.

पुढे वाचा

‘त्यांच्या’ बायका, ‘त्यांची’ इभ्रत!

बायकांसंबंधीचे लेख सहसा 8 मार्चच्या निमित्ताने लिहिण्याची आपली प्रथा आहे. कारण त्या दिवशी (हल्लीच्या) भारतात बायकांचा बैलपोळा साजरा केला जातो. त्या दिवशी स्त्रियांच्या सक्षमीकरणाची, त्यांच्या आत्मनिर्भरतेची, त्यागाची, हक्कांची, मातृहृदयाची, जिद्दीची, समंजसपणाची इतकी चर्चा केली जाते की त्या उमाळ्यांनी आपले सामुदायिक सांस्कृतिक रांजण भरून वाहायला लागते. आपल्या एकंदर सार्वजनिक-सांस्कृतिक जीवनाचे उथळ व्यापारीकरण आणि माध्यमीकरण झाल्याने अलीकडे तर स्त्रियांना 8 मार्चचा दिवस म्हणजे ‘नको त्या जाहिराती आणि सवलती’ असे वाटले नाही तरच नवल! परंतु 8 मार्चचे हे उमाळे अजून एप्रिलही सरत नाही तोच पुरते आटून आता स्त्रियांचे सक्षमीकरण तर सोडाच, पण त्यांना सार्वजनिक जीवनातून देखील हद्दपार करण्याची तयारी आपण चालवली आहे आणि त्या हद्दपारीचे नाना परीने गौरवीकरणही घडते आहे.

पुढे वाचा

कुटुंबसंस्था: काही प्रश्न

आजचा तरूण अस्वस्थ आहे, असंतुष्ट आहे. बेभान आहे, बेदरकार आहे, बेजबाबदार आहे हिसंक आहे, विध्वंसक आहे. त्याला कोणतीही बंधने नकोत. त्याला मुक्ती हवी आहे पण ही अराजकवादी मुक्ती आहे. हा बेबंदपणा आहे. हे आजच्या समाजशास्त्रज्ञांचे तरूणाचे विश्लेषण आणि हा राज्यकर्त्याच्या, त्याच बरोबर आईवडिलांच्या डोक्याच्या काळजीचा विषय. उपाय अनेक सुचविले जातात, तरूणांना विधायक कार्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. खेड्यात पाठविले पाहिजे. त्यांची उसळती युवाशक्ती सृजनासाठी वापरली पाहीजे. तरूणांने राजकारणात पडू नये सरकारी पातळीवर विद्यापीठातून ह्या युवाशक्तीला बांध घालण्याचे प्रयत्न होतात. आईवडिलाकंडून पैशाच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न होतो.

पुढे वाचा

पाचवा धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यामधून उद्भवणारे काही प्रश्न

प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी हिन्दू कोण नाही असा प्रश्न मी उपस्थित केला आहे. कारण हिन्दू कोण नाही हे नक्की ठरल्याशिवाय अल्पसंख्याक कोण व बहुसंख्याक कोण ह्याचा, त्याचप्रमाणे कोण कोणाचा अपमान करीत आहे ह्याही प्रश्नांचा उलगडा होत नाही. माझ्या मते कोणीच बहुसंख्याक नाहीत व त्यांचा अपमानही होत नाही. ‘तुमचा, तुम्ही बहुसंख्याक असून अपमान होत आहे’ अशी एक हूल उठवून गेली आहे व त्या आवईला आमचे भाबडे देशबान्धव बळी पडत आहेत.

हिन्दू कोण नाही हिन्दू कोण नाही असा मला पडलेला प्रश्न मी पुढे एका पद्धतीने सोडवून अशी दाखवीत आहे.

पुढे वाचा

आश्वासक सहजीवन कशातून शक्य होऊ शकेल?

जगाच्या परिस्थितीचे आकलन करून घेताना त्यातल्या अनेकानेक लोकसमूहांना आश्वासक सहजीवनाची शक्यता निर्माण झाल्याचे कितपत जाणवते किंवा हे जाणवण्यासारखी परिस्थिती आहे असे म्हणता येऊ शकते, हे अर्थातच उलगडायला हवे आहे. कारण जागतिक परिस्थितीतल्या लोकसमूहांनी ज्या तऱ्हेच्या व्यवस्थांचे व त्याच्या राजकीय स्वरूपांचे अनुसरण केले व त्यांचा अनुभव घेतला, अर्थात तो अनुभव अद्याप घेतला जातोहो आहेच, त्यातून आश्वासक सहजीवनाची परिपूर्ती करता आली किंवा काय, हा प्रश्न उपस्थित झालेलाच आहे.

जगातल्या कोणत्याही व्यवस्थेत राजकीयतेचे जे प्रमाण वाढले आहे व त्याचे महत्त्व निर्माण झालेही आहे, ते अपरिहार्यतेतलेच जरी मानले जात असले, तरी राजकीय व्यवस्था आश्वासक सहजीवनाची पूर्तता करण्याच्या पात्रतेची झाली आहे, किंवा ती त्या पात्रतेची होऊ शकेल, असे सर्वच व्यवस्थेतले अंतर्विरोध ज्या एका प्रमाणात उफाळून वर येताना दिसते आहे, त्यावरून तरी वाटत नाही.

पुढे वाचा

धर्मसुधारणा – विचाराचा एक अंतर्गत प्रवाह

श्रद्धा आणि परंपरा हीच धर्माची बलस्थाने असतात असे मानले जाते. त्यामुळे धर्म आणि धार्मिक आचार यांच्यात सुधारणा संभवत नाही, असे गृहीत धरले जाते. जो धर्म एकाच धर्मग्रंथाचे प्रामाण्य मानत नाही, त्या हिंदुधर्मात थोडी लवचिकता होती; परंतु पारतंत्र्याच्या काळात ती नष्ट होऊन रूढींना कवटाळून बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.
ह्यावर मात करून धर्मचिकित्सा करण्याचे प्रयत्न दीडशे वर्षांपूर्वी सुरू झाले. धार्मिक परंपरा न मानणाऱ्यांनी व त्या न पाळणाऱ्यांनी धर्मसुधारणेचा विचार मांडला तर तो लोकांना पटणे अवघड असते. वाईसारख्या क्षेत्री धर्मशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या एका ज्ञाननिष्ठ तपस्व्याने धर्मसुधारणेचा एक क्रांतिकारक प्रयत्न केला.

पुढे वाचा

हिंदू कशाचा अभिमान बाळगू शकतात आणि त्यांनी कशाचा अभिमान बाळगावा

मूळ लेखक: रामचन्द्र गुहा

धर्माच्या भविष्याची चिंता करणाऱ्यांनी सुधारकांच्या कार्याचे मूल्य लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी ह्या प्राचीन, अश्मीभूत अनेक तुकड्यां ध्ये विभागल्या गेलेल्या धर्माला त्याच्या पूर्वग्रहापासून, त्याच्या संकुचित मनोवृत्तीपासून मोकळे केले.”
माझ्या एका उच्चवर्णीय ‘भद्रलोक’ मित्राचे असे मत आहे की १६ डिसेंबर हा दिवस भारत-सरकारने ‘विजय-दिवस’ म्हणून साजरा करावा. १९७१ साली बांगलादेश युद्धात, पाकिस्तानी सेनेने भारतीय सेनेसमोर त्यादिवशी शरणागती पत्करली होती. त्याच्यामते सर्वसाधारण भारतीय आणि प्रामुख्याने हिंदू ज्या सोशीक, पराभूत मनोवृत्तीमुळे पांगळे बनले आहेत त्यातून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे आणि विजय दिवसासारखे समारंभ त्यासाठी आवश्यक आहेत.

पुढे वाचा

भांडवलशाही टिकते कशी?

एकोणिसाव्या शतकात युरोपात सुरू झालेली भांडवलशाही, विसावे शतक संपता संपता केवळ युरोपीय देशातच नव्हे, तर सर्व खंडांत, सर्वनैव नांदू लागली. खऱ्या अर्थाने ती जागतिक अर्थव्यवस्था झाली. भांडवलशाही ही अर्थव्यवस्था म्हणून राष्ट्राच्या सीमा ओलांडणार व जागतिक होणार हे मार्क्सने आधीच लिहून ठेवले आहे. तेव्हा प्रश्न भांडवलशाही जागतिक होण्याचा नाही, तर ती इतक्या वेळा अरिष्टात सापडूनही त्यातून बाहेर कशी येते किंबहुना पूर्णपणे बाहेर न येताही कशी टिकते, हा आहे. त्याचबरोबर भांडवली लोकशाही असो, लष्करी हुकूमशाही, की एकधर्मीय हुकूमशाही, इतकेच काय चीनच्या तथाकथित कम्युनिस्ट पक्षाचे शासन जरी असले, तरी भांडवलशाही कुठल्याही राज्यव्यवस्थेत आपली अर्थव्यवस्था अंलात आणते.

पुढे वाचा

अन्नाचा व्यवसाय

मूळ लेखक : नीता देशपांडे

काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या एका खेड्यात स्वयंसेवक म्हणून काम करताना तिथल्या दोन हसऱ्या किशोरींनी एक दिवस मला जेवायला बोलावलं. त्या तेव्हा रोज दुपारी शाळेत येऊन हिन्दी वर्णाक्षरे शिकायचा चिकाटीने प्रयत्न करीत असत. मी जेवायला बसले तसा एक प्रश्न माझ्या मनात आला, जो शहाण्या मुलींनी विचारायचा नसतो हे मला माहीत होतं. ते जेवणात भाजी खात नाहीत काय? काही दिवसांतच मला त्याचं उत्तर मिळालं. त्या दिवशी मुलींनी वरण केलं होतं, म्हणून भाजी नव्हती. ज्या दिवशी त्या भाजी करायच्या, त्या दिवशी वरणाला सुटी असायची.

पुढे वाचा

पैशाने श्रीमंती येत नाही (पुढे चालू)

ग्रामोद्योग व चंगळवाद
अंदाजे गेल्या दोनशे वर्षांपासून उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनाच्या पद्धतीत विलक्षण फरक पडला आहे. आणि तो फरक युरोपातून इकडे आला आहे. आपल्या भारतीय पद्धतीत, गरज पडल्यानंतर ती निर्मिती करायची अशी पद्धत होती आणि अजून आहे. शेतीला लागणारी अवजारे, गावातले सुतार व लोहार लोकांच्या मागणीवरून तयार करीत. घरे बांधण्याचे कामसुद्धा गरजेपुरती होत असे. वस्तू आधी तयार करायची व नंतर तिच्यासाठी ग्राहक शोधायचा हे आपल्याकडे कपड्याच्या बाबतीतसुद्धा कधी घडलेले नाही, कापडाच्या गिरण्या भारतात सुरू होऊन ५०-६० वर्षे झाल्यानंतरही भारतात माणशी सरासरी २० वार इतका कपडा तयार होत होता.

पुढे वाचा