( 1)
मे 2016 च्या संपादकीयात आपण वाचकांच्या संवादहीनतेबद्दल चिंता प्रकट केली आहे, ती शंका रास्त असली तरी तिला दुसरी बाजूही आहे. कोणत्याही नियतकालिकाचा वाचक हा त्या नियकालिकाचा फक्त शिष्य असावा/व्हावा, त्याचे (वाचकाचे) मित्रत्व मान्य होणार नाही, ही विचारधारा बहुतेक नियतकालिक चालकांची असते. शिष्यत्व म्हणजे जुन्या परिभाषेत एक पायरी खाली व मित्रत्व म्हणजे समपायरीवरील, असा हा प्रकार आहे. काही वाचकांना, किंबहुना बहुतेक वाचकांना शिष्यत्व मान्य नसून ते मित्रत्वाची अपेक्षा करतात, परंतु त्यांची ती अपेक्षा म्हणजे नियकालिकाच्या ध्येय धोरणाला, विचारधारेला विरोध अशी भावना संचालकांच्या मनात सुप्तरूपाने का होईना अवतरित झालेली असते.
विषय «पत्र-पत्रोत्तरे»
प्रतिसाद
तलवार दाम्पत्त्य,आरुषी व हेमराज, चित्रपट
—————————————————————————–
फेब्रुवारी महिन्याच्या ‘आ सु’ च्या अंकात धनंजय मुळी ह्यांचा ‘तलवारच्या निमित्ताने’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी गतेतिहासपरिणाम ह्या संकल्पनेचे मानसशास्त्रीय विवेचन करून एका वेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आज काही काळ गेल्यानंतर, काही गोष्टी घडून गेल्यावर आपल्याला वाटते की हेच तर आपण आधी म्हटले होते. परंतु वास्तविक तेव्हा आपल्याला तसे वाटलेले नसते. एवढेच नव्हे तर तेव्हा तसे वाटले नव्हते हे आपण आज विसरूनही गेलेलो असतो.
हे तथ्य ‘तलवार’ सिनेमा ज्यावर आधारित आहे त्या घटनेला लागू करून ते म्हणतात की–आरुषी व हेमराज ह्यांचे हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी अगदीच शून्यापासून सुरुवात केली होती.
प्रतिसाद
‘आसु’मधील दिवाकर मोहनी ह्यांचा ‘आमच्या देशाची स्थिती’ हा लेख वाचला. आमचे स्नेही प्रमोद सहस्रबुद्धे यांनी या लेखावर मोकळेपणाने चर्चा व्हावी आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया पाठवावी असे आवाहन केले होते. अनेकवेळेला हा विषय वैचारिक चर्चेपेक्षा भावनिक अंगाने अधिक मांडला जातो म्हणून सर्वप्रथम श्री. मोहनी ह्यांनी केलेल्या ‘वैचारिक विवेचनाचे’मन:पूर्वक स्वागत. मी दोन टप्यांमध्ये या लेखावर प्रतिक्रिया देऊ इच्छितो. पहिल्या टप्प्यात लेखातील काही मुद्द्यांवर माझे मत आणि दुसऱ्या टप्प्यात सद्यःपरिस्थितीतील व्यवहारातील अनुभव.
जातीच्या उतरंडीवरून असे लक्षात येते की उच्चवर्णीयांनी – शूद्रातिशूद्रांवर जसे अन्याय केले आहेत, तसेच या सर्वांनी मिळून स्त्रियांवर अन्याय केले आहेत, अजून करत आहेत.
प्रतिसाद
1. मराठी नियतकालिकांची हतबलता
राम जगताप यांचा आजचा सुधारकात पुन:र्मुद्रीत लेख वाचला. मराठी नियतकालीकांची परवड होत असल्याचे वाचून वाईटही वाटते. पण याला जबाबदार संपादकांची वृत्तीही कारणीभूत असावी असे वाटते. उदाहरण द्यायचे झाल्यास शरद जोशींचा शेतकरी संघटक मोठ्या आवडीने वाचत असूं पण जोशींना सत्तेचे डोहाळे लागून संसदेत स्थिरावले. शिवार नावांच्या कंपनीसाठी शेअर गोळा केले. त्याचे पुढे काय झाले. कळलेच नाही.
साधना साप्ताहिकाने तहहयात वर्गणीची मागणी ग्राहकांकडून केली. यदुनाथजी गेल्यावर काहीकाळ मा. प्रधानसरांकडे त्याच संपादकत्व आलं त्यानी वर्गणी वाढवून फरकाची रक्कम भरा नाही तर अंक बंद केला जाईल असा दम दिला.
पत्रसंवाद
प्रिय मिलिंद,
कसा आहेस? आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस वाटलं…
काल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी संगितलेसं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण त्या पलीकडे अनेक चांगले विद्यार्थी घडवणारे शिक्षक होते. ते मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि समाज चांगला कसा होईल यासाठी कृती करायला शिकवत होते. अगदी डॉ.दाभोलकर
संपादक, आजचा सुधारक…
आपल्या नोव्हेंबर २०१४ च्या अंकात अरुण फाळके ह्यांचे पत्र प्रकाशित झाले आहे. त्यांचे पत्र वाचून असे वाटले की, त्यांनी माझे धर्म-धर्मनिरपेक्षता वगैरे विषयावरील तीन लेख वाचले नाहीत; त्यांनी केवळ शेवटचा लेख वाचला आहे.
त्यांचा लेखकाच्या शीर्षकावर आहे. धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यातील ‘धर्म’ ह्या शब्दाच्या ऐवजी ‘हिन्दुधर्म’ म्हणायला हवे होते असे ते म्हणतात. त्याबद्दल माझा खुलासा असा की, हे शीर्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एके काळचे बौद्धिकप्रमुख श्री. मा.गो. वैद्य ह्यांच्या एका पुस्तकाच्या वाचनानंतर मी घेतले आहे. त्यांनी हिन्दु-धर्माची व्याख्या करताना ती कशा प्रकारे केली आहे की ‘ह्या जगात धर्म ह्या संज्ञेला पात्र अशी एकच विचारप्रणाली आहे आणि ती हिन्दुधर्माची होय आणि त्यामुळे धर्म आणि हिन्दुधर्म ह्यांत काही फरक नाही.
पत्रसंवाद :
श्री. दाभोलकरांच्या पत्रांच्या निमित्ताने
श्री दत्तप्रसाद दाभोलकर ह्यांची तीन पत्रे गेल्या दोन अंकांत प्रसिद्ध झाली आहेत. त्याचप्रमाणे गेल्या अंकाबरोबर आपल्या मासिकाची बावीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
1990 मध्ये नवा सुधारक सुरू झाला तेव्हापासूनच ह्या मासिकात जाहिराती कधीही घ्यायच्या नाहीत आणि हे मासिक एका ‘रिसर्च जर्नल’सारखे चालवावयाचे असे संपादकांच्या मनात होते. इतकेच नव्हे तर विवेकवादाविषयी ज्यांना जिज्ञासा असेल त्यांच्यात बंधुभाव निर्माण होईल आणि त्या मंडळींकडूनच हे मासिक पुढे चालवले जाईल असेही संपादकांना वाटत होते. पहिली दोन वर्षे आजीव वर्गणी स्वीकारण्यात आली नाही.
पत्रसंवाद/प्रतिक्रिया
अनंत बेडेकर, ४७, शांतिसागर सोसा., भारतनगर, मिरज ४१६४१०, मो.९४२१२२१७८२
‘गुंडोपंत’ या नावाने सायबरावकाशात काही अन्य संदर्भात आलेल्या प्रतिक्रियेत ‘आसु हिंदुत्वविरोधी व परधर्मधार्जिणा असण्याबाबत’ आक्षेप घेण्यात आला आहे. (जून २०१०, अंक २१.३) असे नमूद करून नंदा खरे यांनी आसुचे संस्थापक दि.य.देशपांडे यांनी मागे या आक्षेपाला जे उत्तर दिले होते त्याचा त्यांना समजलेला गाभा म्हणून जी भूमिका स्पष्ट केली आहे ती पुढीलप्रमाणे ‘वाचकांपैकी, वाचक ज्या क्षेत्रातून येतात त्या क्षेत्रापैकी ८५% किंवा अधिक लोक हिंदू धर्मात जन्मलेले आहेत. त्यांना जागे करण्याने इतर १५% किंवा कमींनाही जाग येईल.
पत्रसंवाद/प्रतिक्रिया
पत्रसंवाद/प्रतिक्रिया
नंदा खरे
गेल्या विशेषांकाचे अतिथि-संपादक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी त्यांचे अंधश्रद्धांबाबतचे सर्वेक्षण सायबरावकाशात टाकले (mr.upakrama.org — नवे लेखन). त्यावरील चर्चा बहुतांशी सर्वेक्षण, ते सुधारण्याबाबत व व्यापक करण्याबाबत सूचना, अशी होती. एक प्रतिक्रिया मात्र जरा वेगळी होती, ती अशी — प्रेषकः गुंडोपंत लेखन मुळाबरहुकूम.]
काही वेळा काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणण्याच्या नादात देशी ते सर्व गौण असे मानूनच चालू लागतात की काय असे मला वाटले. ख्रिश्चन धर्मात संत बन(व)ण्यासाठी चमत्कार व्हावा लागतोच! येथे अंधश्रद्धा नसते असे काही लोकांना वाटत असावे असो, आपला आपला विषय.
पत्रसंवाद
ऑक्टोबर ०९ च्या अंकातील, देवेन्द्र इंगळे यांच्या लेखावर प्रतिक्रिया – भावनांना हात घालणारे आणि प्रचारकी थाटाचे लिखाण आ.सु.ने प्रसिद्ध करणे चूक आहे. आपल्या मूळ हेतूपासून सुधारक दूर जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. इंगळे यांच्या लेखातील आक्षेपार्ह वाक्ये (गडद ठशामधील) आणि त्यांवरील आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत.
जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा डार्विनप्रणीत सिद्धान्त त्यावेळच्या सर्वच ईश्वरवादी धर्मपंथासाठी आह्वानास्पद ठरला. डार्विनच्या उत्क्रांतिसिद्धान्त त्यावेळच्या ख्रिस्ती-इस्लामिक जगताला आह्वानास्पद वाटला तसाच तो ब्राह्मणीधर्मासही आह्वान देणारा ठरला.
इंगळे यांची “आपली (मानवाची) उत्पत्ती आणि विकास कसा आणि कोणत्या क्रमाने होत आला हा प्रश्न भेडसावत होता.