विषय «पत्र-पत्रोत्तरे»

प्रतिसाद

( 1)
मे 2016 च्या संपादकीयात आपण वाचकांच्या संवादहीनतेबद्दल चिंता प्रकट केली आहे, ती शंका रास्त असली तरी तिला दुसरी बाजूही आहे. कोणत्याही नियतकालिकाचा वाचक हा त्या नियकालिकाचा फक्त शिष्य असावा/व्हावा, त्याचे (वाचकाचे) मित्रत्व मान्य होणार नाही, ही विचारधारा बहुतेक नियतकालिक चालकांची असते. शिष्यत्व म्हणजे जुन्या परिभाषेत एक पायरी खाली व मित्रत्व म्हणजे समपायरीवरील, असा हा प्रकार आहे. काही वाचकांना, किंबहुना बहुतेक वाचकांना शिष्यत्व मान्य नसून ते मित्रत्वाची अपेक्षा करतात, परंतु त्यांची ती अपेक्षा म्हणजे नियकालिकाच्या ध्येय धोरणाला, विचारधारेला विरोध अशी भावना संचालकांच्या मनात सुप्तरूपाने का होईना अवतरित झालेली असते.

पुढे वाचा

प्रतिसाद

तलवार दाम्पत्त्य,आरुषी व हेमराज, चित्रपट
—————————————————————————–
फेब्रुवारी महिन्याच्या ‘आ सु’ च्या अंकात धनंजय मुळी ह्यांचा ‘तलवारच्या निमित्ताने’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी गतेतिहासपरिणाम ह्या संकल्पनेचे मानसशास्त्रीय विवेचन करून एका वेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आज काही काळ गेल्यानंतर, काही गोष्टी घडून गेल्यावर आपल्याला वाटते की हेच तर आपण आधी म्हटले होते. परंतु वास्तविक तेव्हा आपल्याला तसे वाटलेले नसते. एवढेच नव्हे तर तेव्हा तसे वाटले नव्हते हे आपण आज विसरूनही गेलेलो असतो.
हे तथ्य ‘तलवार’ सिनेमा ज्यावर आधारित आहे त्या घटनेला लागू करून ते म्हणतात की–आरुषी व हेमराज ह्यांचे हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी अगदीच शून्यापासून सुरुवात केली होती.

पुढे वाचा

प्रतिसाद

‘आसु’मधील दिवाकर मोहनी ह्यांचा ‘आमच्या देशाची स्थिती’ हा लेख वाचला. आमचे स्नेही प्रमोद सहस्रबुद्धे यांनी या लेखावर मोकळेपणाने चर्चा व्हावी आणि त्याबद्दलची प्रतिक्रिया पाठवावी असे आवाहन केले होते. अनेकवेळेला हा विषय वैचारिक चर्चेपेक्षा भावनिक अंगाने अधिक मांडला जातो म्हणून सर्वप्रथम श्री. मोहनी ह्यांनी केलेल्या ‘वैचारिक विवेचनाचे’मन:पूर्वक स्वागत. मी दोन टप्यांमध्ये या लेखावर प्रतिक्रिया देऊ इच्छितो. पहिल्या टप्प्यात लेखातील काही मुद्द्यांवर माझे मत आणि दुसऱ्या टप्प्यात सद्यःपरिस्थितीतील व्यवहारातील अनुभव.
जातीच्या उतरंडीवरून असे लक्षात येते की उच्चवर्णीयांनी – शूद्रातिशूद्रांवर जसे अन्याय केले आहेत, तसेच या सर्वांनी मिळून स्त्रियांवर अन्याय केले आहेत, अजून करत आहेत.

पुढे वाचा

प्रतिसाद

1. मराठी नियतकालिकांची हतबलता
राम जगताप यांचा आजचा सुधारकात पुन:र्मुद्रीत लेख वाचला. मराठी नियतकालीकांची परवड होत असल्याचे वाचून वाईटही वाटते. पण याला जबाबदार संपादकांची वृत्तीही कारणीभूत असावी असे वाटते. उदाहरण द्यायचे झाल्यास शरद जोशींचा शेतकरी संघटक मोठ्या आवडीने वाचत असूं पण जोशींना सत्तेचे डोहाळे लागून संसदेत स्थिरावले. शिवार नावांच्या कंपनीसाठी शेअर गोळा केले. त्याचे पुढे काय झाले. कळलेच नाही.
साधना साप्ताहिकाने तहहयात वर्गणीची मागणी ग्राहकांकडून केली. यदुनाथजी गेल्यावर काहीकाळ मा. प्रधानसरांकडे त्याच संपादकत्व आलं त्यानी वर्गणी वाढवून फरकाची रक्कम भरा नाही तर अंक बंद केला जाईल असा दम दिला.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रिय मिलिंद,
कसा आहेस? आज फार अस्वस्थ व्हायला झालं म्हणून तुझ्याशी बोलावस वाटलं…
काल कर्नाटकात डॉ.कलबुर्गी सरांचा खून केला दोघाजणांनी सकाळीच. अगदी डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना मारलं ना तसच… काही लोक आता त्यांना बदनाम करणारे मेसेज फिरवत आहेत. तुला खर वाटेल त्यांनी संगितलेसं… डॉ. कलबुर्गी हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक तर होते पण त्या पलीकडे अनेक चांगले विद्यार्थी घडवणारे शिक्षक होते. ते मुलांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि समाज चांगला कसा होईल यासाठी कृती करायला शिकवत होते. अगदी डॉ.दाभोलकर

पुढे वाचा

संपादक, आजचा सुधारक…

आपल्या नोव्हेंबर २०१४ च्या अंकात अरुण फाळके ह्यांचे पत्र प्रकाशित झाले आहे. त्यांचे पत्र वाचून असे वाटले की, त्यांनी माझे धर्म-धर्मनिरपेक्षता वगैरे विषयावरील तीन लेख वाचले नाहीत; त्यांनी केवळ शेवटचा लेख वाचला आहे.

त्यांचा लेखकाच्या शीर्षकावर आहे. धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यातील ‘धर्म’ ह्या शब्दाच्या ऐवजी ‘हिन्दुधर्म’ म्हणायला हवे होते असे ते म्हणतात. त्याबद्दल माझा खुलासा असा की, हे शीर्षक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एके काळचे बौद्धिकप्रमुख श्री. मा.गो. वैद्य ह्यांच्या एका पुस्तकाच्या वाचनानंतर मी घेतले आहे. त्यांनी हिन्दु-धर्माची व्याख्या करताना ती कशा प्रकारे केली आहे की ‘ह्या जगात धर्म ह्या संज्ञेला पात्र अशी एकच विचारप्रणाली आहे आणि ती हिन्दुधर्माची होय आणि त्यामुळे धर्म आणि हिन्दुधर्म ह्यांत काही फरक नाही.

पुढे वाचा

पत्रसंवाद

उत्पल वनिता बाबूराव आजचा सुधारकच्या मे अंकातील बाईमाणूस ह्या पुस्तकावरील लेख वाचला. लेखातील मुद्दे पटले. त्यांनी परखड परीक्षण केले आहे. (मी पुस्तक वाचलेले नाही) काही मुद्द्यांबाबत चर्चा होऊ शकेल असे वाटते. काही मुद्दे नव्याने समोर आले आहेत.

भारतात तरी वर्ग-वर्णाच्या पलीकडे जाऊन स्त्रियांना एक होऊन समष्टिरूप धारण करता आलेले नाही. हो. हा मुद्दा इथल्या बऱ्याच शोषित घटकांना लागू होतो असे वाटते. स्त्री म्हणून एकमेकांशी जोडून घेण्याची प्रेरणाच कुठे दिसत नाही. हे पटले. आजच्या नवबौद्ध स्त्रिया हिंदू दलित स्त्रियांपेक्षा अधिक प्रगत व प्रगल्भ असतात असे पुस्तकात एके ठिकाणी म्हटले आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

अॅड. अतुल सोनक, दिवाकर मोहनी यांचा ‘जातिभेद आणि निवडणूक’ हा लेख वाचला. त्यांनी सुचवलेल्या निवडणूकपद्धतीसाठी घटनेतील आणि निवडणूक कायद्यातील अनेक कलमे बदलवावी लागतील. असे होण्याची मुळीच शक्यता नाही. त्यांच्या लेखातील इतर अनेक बाबींवरील आक्षेप न नोंदवता सरळ निवडणूक प्रक्रियेत त्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्या अंमलात का येऊ शकणार नाहीत याबद्दल मला काय वाटते ते इथे नोंदवतो.

समजा चार प्रमुख पक्ष आहेत, अशी सुरुवात करून त्यांनी काही उपाय सुचवले आहेत. आपल्या इथे लोकशाही आहे आणि अनेक पक्ष आहेत, त्यात अजून नवी भर पडतेच आहे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

पण जर स्त्रीने स्वःतःला मोकळे सोडलेच नाही, तर ती कोठवर जाऊ शकते हे तिला कसे कळेल ? जर तिने आपल्या पायातले उंच टाचांचे बूट काढले नाहीत तर ती कोठवर चालू शकते किंवा किती जोरात पळू शकते, हे तिला कसे बरे कळणार ? मरणाला टेकलेले सर्व समाज पुरुषी आहेत. केवळ एक पुरुष असणारा समाज जगू शकतो, पण स्त्रियांचे दुर्भिक्ष असणारा समाज टिकाव धरू शकणार नाही.
— जर्मेन ग्रीअर

स्त्रियांना सु ार पुरुष हवे असतात, आणि पुरुष अधिकाधिक सु र बनण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

धनंजय मुळी, बी-१, विशभारती सोसायटी, प्लॉट नं.आर.एम.-३७, संभाजीनगर, एमआयडीसी, चिंचवड, पुणे ४११०१९.

किशोर देशपांडे यांची एप्रिल २०१३ ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत आसु मध्ये प्रकाशित झालेली अनवरत भंडळ ही मालिका वाचली. ती वाचल्यानंतर तिच्यात जीवशास्त्रीय उत्क्रांतीबद्दल अनेक चुकीची किंवा दिशाभूल करणारी विधाने आढळून आली. तसेच त्यांच्या लेखां ध्ये विज्ञानाचे सार्वत्रिक स्वरूप पुरेशा स्पष्टतेने पुढे आलेले नाही. या दोन मुद्द्यांच्या दृष्टीने देशपांडे यांच्या लिखाणाचा प्रतिवाद करणे आवश्यक वाटले. देशपांडे यांच्या लेखमालेध्ये ते अनेक विषयांना स्पर्श करतात. प्रस्तुत लेखनात मात्र विज्ञानाचे सार्वत्रिक स्वरूप, जडवाद आणि अध्यात्मवाद यांतील फरक, आणि उत्क्रांती या संदर्भातील मांडणी एवढीच चर्चा केली आहे.

पुढे वाचा