विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

तारक काटे, धरामित्र, वर्धा

[आजचा सुधारक च्या जुलै २०१३ (२४-०५) च्या अंकात ‘बीज स्वायत्ततेकडून गुलामगिरीकडे – बीजसंवर्धनाचे महत्त्व’ हा तारक काटे ह्यांचा लेख प्रकाशित झाला होता. त्यामध्ये त्यांनी प्राचीन भारतीय शेतीची बलस्थाने काय होती. त्यानंतर आलेले संकरित बियाणे व त्यानंतर जनुकीय बदलांद्वारे निर्माण करण्यात आलेले बियाणे ह्या दोन गोष्टींमुळे शेतीव्यवस्थेत काय परिवर्तन झाले व त्या परिवर्तनाची दिशा काय आहे ह्याचे विवेचन करून पारंपरिक पद्धतीच्या बीजसंवर्धनाचा पुरस्कार केला होता. त्यावर राजीव जोशी ह्यांनी दिलेली प्रतिक्रिया, जी नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झाली, ज्यामध्ये जोशी ह्यांनी, वस्तुस्थिती आपल्याला माहीत नाही, परंतु काटे ह्यांचे म्हणणे तर्कास पटत नाही असे सांगून व साईड इफेक्ट्स असले म्हणून नवीन शास्त्र स्वीकारायचेच नाही काय ?

पुढे वाचा

पत्रसंवाद :

श्री. दाभोलकरांच्या पत्रांच्या निमित्ताने
श्री दत्तप्रसाद दाभोलकर ह्यांची तीन पत्रे गेल्या दोन अंकांत प्रसिद्ध झाली आहेत. त्याचप्रमाणे गेल्या अंकाबरोबर आपल्या मासिकाची बावीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
1990 मध्ये नवा सुधारक सुरू झाला तेव्हापासूनच ह्या मासिकात जाहिराती कधीही घ्यायच्या नाहीत आणि हे मासिक एका ‘रिसर्च जर्नल’सारखे चालवावयाचे असे संपादकांच्या मनात होते. इतकेच नव्हे तर विवेकवादाविषयी ज्यांना जिज्ञासा असेल त्यांच्यात बंधुभाव निर्माण होईल आणि त्या मंडळींकडूनच हे मासिक पुढे चालवले जाईल असेही संपादकांना वाटत होते. पहिली दोन वर्षे आजीव वर्गणी स्वीकारण्यात आली नाही.

पुढे वाचा

पत्रसंवाद/प्रतिक्रिया

अनंत बेडेकर, ४७, शांतिसागर सोसा., भारतनगर, मिरज ४१६४१०, मो.९४२१२२१७८२
‘गुंडोपंत’ या नावाने सायबरावकाशात काही अन्य संदर्भात आलेल्या प्रतिक्रियेत ‘आसु हिंदुत्वविरोधी व परधर्मधार्जिणा असण्याबाबत’ आक्षेप घेण्यात आला आहे. (जून २०१०, अंक २१.३) असे नमूद करून नंदा खरे यांनी आसुचे संस्थापक दि.य.देशपांडे यांनी मागे या आक्षेपाला जे उत्तर दिले होते त्याचा त्यांना समजलेला गाभा म्हणून जी भूमिका स्पष्ट केली आहे ती पुढीलप्रमाणे ‘वाचकांपैकी, वाचक ज्या क्षेत्रातून येतात त्या क्षेत्रापैकी ८५% किंवा अधिक लोक हिंदू धर्मात जन्मलेले आहेत. त्यांना जागे करण्याने इतर १५% किंवा कमींनाही जाग येईल.

पुढे वाचा

पत्रसंवाद/प्रतिक्रिया

पत्रसंवाद/प्रतिक्रिया
नंदा खरे
गेल्या विशेषांकाचे अतिथि-संपादक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी त्यांचे अंधश्रद्धांबाबतचे सर्वेक्षण सायबरावकाशात टाकले (mr.upakrama.org — नवे लेखन). त्यावरील चर्चा बहुतांशी सर्वेक्षण, ते सुधारण्याबाबत व व्यापक करण्याबाबत सूचना, अशी होती. एक प्रतिक्रिया मात्र जरा वेगळी होती, ती अशी — प्रेषकः गुंडोपंत लेखन मुळाबरहुकूम.]
काही वेळा काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणण्याच्या नादात देशी ते सर्व गौण असे मानूनच चालू लागतात की काय असे मला वाटले. ख्रिश्चन धर्मात संत बन(व)ण्यासाठी चमत्कार व्हावा लागतोच! येथे अंधश्रद्धा नसते असे काही लोकांना वाटत असावे असो, आपला आपला विषय.

पुढे वाचा

पत्रसंवाद

ऑक्टोबर ०९ च्या अंकातील, देवेन्द्र इंगळे यांच्या लेखावर प्रतिक्रिया – भावनांना हात घालणारे आणि प्रचारकी थाटाचे लिखाण आ.सु.ने प्रसिद्ध करणे चूक आहे. आपल्या मूळ हेतूपासून सुधारक दूर जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. इंगळे यांच्या लेखातील आक्षेपार्ह वाक्ये (गडद ठशामधील) आणि त्यांवरील आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत.

जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचा डार्विनप्रणीत सिद्धान्त त्यावेळच्या सर्वच ईश्वरवादी धर्मपंथासाठी आह्वानास्पद ठरला. डार्विनच्या उत्क्रांतिसिद्धान्त त्यावेळच्या ख्रिस्ती-इस्लामिक जगताला आह्वानास्पद वाटला तसाच तो ब्राह्मणीधर्मासही आह्वान देणारा ठरला.

इंगळे यांची “आपली (मानवाची) उत्पत्ती आणि विकास कसा आणि कोणत्या क्रमाने होत आला हा प्रश्न भेडसावत होता.

पुढे वाचा

पत्रसंवाद

यमन गोखले, नागपूर.
आज आपण सर्व एकविसाव्या शतकात जगत आहोत. आजच्या विकसित तंत्रज्ञानामुळे आपले जगणे अधिकाधिक सुकर होत चालले आहे. ह्या तंत्रज्ञानाची आणि देववादाची सांगड भावनिक पातळीवर घालण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. जसे एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला लागलेल्या विमानाचा शोध म्हटले तर आपला भारतीय म्हणतो, “ते काय सांगता ? त्या अमक्या तमक्या पुराणात देवाने विमानाचा वापर केला होता की!’ अशी धार्मिक ग्रंथांची उदाहरणे देऊन आधुनिक तंत्रज्ञानाला जणू काही आह्वानच दिले जाते. आणि तंत्रज्ञान आणि ज्ञान ही काय चीज आहे हे जाणून घेण्याचा मार्गच कुंठित केला जातो.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रसन्न दाभोलकर, सातारा
आ.सु.च्या २००९ च्या अंकात श्री. कृ.अ.शारंगपाणी यांनी माझ्या लेखाबाबत दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांचे उत्तर –
१) ‘माझ्या लेखात “मी आहे आणि माझे अनुभव आहेत.” हा व्यक्तिगत अनुभव ज्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म’ असे वाक्य आहे. ‘हेही कळले नाही.’ असे श्री. शारंगपाणी लिहितात.
माझी भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.
श्री. शारंगपाणी यांनी ‘हेही कळले नाही’ या वाक्याचा कर्ता दिलेला नाही. तो अर्थातच गृहीत आहे – ‘मी’. म्हणजे पूर्ण वाक्य ‘हेही मला कळले नाही’ असे होते. आता शारंगपाणींनी लेख वाचणे, त्यावर विचार करणे आणि त्यातला काही भाग कळला नाही या निष्कर्षावर येणे’ येथपर्यंतच्या क्रिया त्यांच्या मेंदूत घडल्या आहेत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

पत्रसंवाद
मोरेश्वर वडलकोंडावार, मूल-४४१२२४ (मोबाईल – ९४२१८७८००५) अर्थशास्त्र्यांनी गरिबीत गाडलेल्यांचाही अभ्यास करावा!
‘मारक खाजगीकरण’ या शीर्षकाने इंडियन एक्सप्रेस/प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यातील एका बातमीकडे लक्ष वेधण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रापिकल मेडिसिन या संस्थांनी सोवियत युनियनची छकले व पूर्व युरोपातील इतर देश अशा पंचवीस देशांचा नव्वदच्या दशकातील मृत्युदराचा अभ्यास केला. निष्कर्ष असा की तो दर १३% नी जास्त आहे. त्यावर टिप्पणी करताना आयुमर्यादा झपाट्याने कमी झाली असून, होणाऱ्या मृत्युदराला/बेकारीला खाजगीकरणाला जबाबदार मानले आहे. लागलीच आघाडीच्या वृत्तपत्रांची ती मुख्य बातमी बनली.

पुढे वाचा

पत्रसंवाद

पत्रसंवाद
कृ.अ.शारंगपाणी, ३९१, शिवाजीनगर, पुणे ४११ ००४.
पूर्वी साहित्यिक विश्राम बेडेकरांच्या ‘सिलिसबर्गची पत्रे’ या पुस्तकात ‘ब्रहा म्हणजे सीमातीत केवळ जागृती’ असे वाक्य वाचले होते. परंतु ते काय सांगत आहेत, हे कळले नव्हते. आता आपल्या ऑगस्टच्या अंकात प्रसन्न देवदत्त दाभोलकर “मी आहे आणि माझे अनुभव आहेत.’ हा व्यक्तिगत अनुभव ज्यामुळे शक्य होतो ते चैतन्यस्वरूप ब्रह्म, असे सांगतात. हेही कळले नाही. कृपया मार्गदर्शन करावे. चैतन्यस्वरूप नसणारे ब्रह्मही असते काय, हेही कळवावे. म.ना.गोगटे, .पसेसरींश.लो साहित्य संमेलन ….पत्रक ऑगस्ट २००९
नमस्कार ! मराठी साहित्य संमेलनाने मराठी विज्ञान संमेलनास प्रेरणा दिली.

पुढे वाचा

पत्रचर्चा

रविन थत्ते, ४६, शिरीष, १८७, वीर सावरकर मार्ग, मुंबई ४०० ०१६.
आसु (जाने. २००९, १९-१०) मध्ये किशोर वानखडे ह्यांनी आत्म्याचे नास्तित्व ह्यावर लिहिले आहे. माणूस मरतो तेव्हा आत्मा त्याला सोडून जातो ह्या तथाकथित कोठलाही वैज्ञानिक किंवा औपनिषदिक आधार नसलेल्या विधानावर ह्या पत्रात प्रहार करण्यात आले आहेत. मुळात जे सत्य नाही त्याला असत्य ठरवण्याचा हा प्रयत्न दोरीला साप समजून त्याला धोपटण्यासारखा वाटतो. माठ फुटतो तेव्हा किंवा मठ कोसळतो तेव्हा अवकाश, आकाश, पोकळी कोठे जात नाहीत तिथेच राहतात, असे अनेक वेळा अनेक ठिकाणी रूपकात्मकरीत्या सांगून झाले आहे.

पुढे वाचा