विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

टी.बी. खिलारे यांनी चर्चेला दिलेले उत्तर काही बाबतीत चांगले व पटणारे आहे. पण तीन बाबतीत ते पटणारे नाही, तिथे त्यांचा युक्तिवाद तोकडा आहे. दि. य. देशपांडे आ.सु.चे संपादक असताना कित्येक विषयांवर मनमोकळ्या चर्चा झाल्या होत्या. विरोधकांची ग्राम्य भाषेकडे झुकणारी पत्रेही त्यांनी छापली होती. ‘आम्ही श्रद्धेची चिलखते काढून टाकली आहेत, त्यामुळे आम्हाला कुठलाही बाण वर्ण्य नाही’ असा तो बाणा होता. त्यामुळे केवळ विवेकवादी मजकूर हे आ.सु.च्या तत्त्वात बसणारे नाही तर अविवेकी विचार व त्याला दिलेले मुद्देसूद उत्तर हेही त्या तत्त्वात समाविष्ट असते.

पुढे वाचा

पत्रचर्चा –

घारपांडेना मिळालेल्या इंटरनेटवरील प्रतिक्रिया विकास देशपांडे, बोस्टन
“परमसखा मृत्यू: किती आळवावा….” लेख वाचताना मला पटकन आठवले ते भा. रा. तांब्यांचे आणि लताच्या आवाजात स्वरबद्ध झालेले सुप्रसिद्ध गीत: “नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते, फिरते. कळे मला तू प्राणसखा जरि, कळे तूच आधार सुखा जरि, तुजवाचून संसार फुका जरि… मन जवळ यावया गांगरतें”.
शाळेत या गाण्याचा अर्थ समजला की तांबे ही कविता साक्षात् मृत्यूस आपला नवरदेव आणि स्वतःस त्याची नववधू म्हणत मृत्यूस एकीकडे कवटाळण्यासाठी आतुर तर दुसरीकडे थोडे लांबूनच… अशी अवस्था वर्णन करीत आहेत.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सुनेत्रा आगाशे, २६१, शनिवार पेठ, सातारा, फोन २१६२२३२००५८
जातिनिर्मूलनः
तुकाराम, कबीर वगैरे कैक थोर संतांच्या वेळेपासून या जातीच्या राक्षसाला हरवण्याचे बरेच प्रयत्न झाले; पण या बलदंड राक्षसापुढे सर्वांनी हात टेकले. आता तर मतांच्या राजकारणाने त्याला आणखीच बळकट केले आहे. जातीच्या अभिमानाचा इतका मोठा प्रभाव आहे की देशासाठी बलिदान द्यायला तयार होणार नाहीत पण जातीच्या इज्जतीसाठी काहीही करायला तयार होतील. जातीबाहेर लग्न करणे हा तर फार मोठा गुन्हा ठरतो. त्यासाठी शिक्षा एकदम देहदंडाचीच. हरयाणा, उत्तरप्रदेश, पंजाब अगदी आपला पुरोगामी महाराष्ट्रसुद्धा या राज्यांमध्ये हा जात्याभिमान फारच जाज्वल्य असल्याचे दिसते.

पुढे वाचा

पत्रचर्चा

देवयानी बुचे
आसु च्या ऑगस्ट २००८ अंकांतील “परमसखा मृत्यू किती आळवावा’ हा लेख वाचला. मी एक फिजिशियन असून गंभीरपणे आजारी असलेल्या रुग्णांची चिकित्सा (शरीशपीं) करते. अशा प्रकारचा वृद्ध रुग्णांची चिकित्सा करताना तीसुद्धा अत्यंत महागडी, क्लिष्ट आणि सरकारी खर्चाने देताना “”Critical care for whom?’ हा प्रश्न मला वारंवार भेडसावतो.
लेखिकेने म्हटल्याप्रमाणे पस्तीस वर्षे नोकरी आणि पंचेचाळीस वर्षे पेन्शन बरोबरीस पंचेचाळीस वर्षे सतत औषधोपचार आणि शेवटी आठवडेच्या आठवडे आय.सी.सी.यु.मध्ये Intensive treatment हा कुठला हिशेब? शिवाय ट्रीटमेंटनंतर परावलंबी आयुष्य आणि तेसुद्धा रिटायर झालेल्या वयस्क मुलांकडून!

पुढे वाचा

पत्रचर्चाः

जात व आरक्षण (सुधीर बेडेकर यांनी पुरविलेले साहित्य)
क) जात व आरक्षण विशेषांकावरील चर्चेत एक मुद्दा मांडला गेला, की आरक्षणाला विरोध असणाऱ्यांची बाजू समर्थपणे मांडून तिला उत्तर दिले गेले नाही. यासंबंधात तात्पर्य मासिकाच्या मे १९७८ च्या अंकातील संपादकीय (संपादकः सुधीर बेडेकर) टिपणात असा प्रयत्न सापडला. त्याचा काही भाग (साभार) असा
गुणवत्तेनुसार संधी व मोबदलाः सवर्णांचा आक्षेप : सवर्णांचा प्रमुख आक्षेप असतो तो गुणवत्तेबाबतचा. समाजात व्यक्तीला तिच्या गुणवत्तेनुसार योग्य संधी व मोबदला मिळाला पाहिजे असे जर मानले, तर ३५% गुण मिळालेल्या दलिताला मेडिकलला प्रवेश मिळतो व ६५% गुण मिळालेल्या ब्राह्मणाला मिळत नाही हा अन्याय नाही का ?

पुढे वाचा

पत्रचर्चा

देवयानी बुचे
आसु च्या ऑगस्ट २००८ अंकांतील “परमसखा मृत्यू किती आळवावा’ हा लेख वाचला. मी एक फिजिशियन असून गंभीरपणे आजारी असलेल्या रुग्णांची चिकित्सा (treatment) करते. अशा प्रकारचा वृद्ध रुग्णांची चिकित्सा करताना तीसुद्धा अत्यंत महागडी, क्लिष्ट आणि सरकारी खर्चाने देताना “Critical care for who?’ हा प्रश्न मला वारंवार भेडसावतो.
लेखिकेने म्हटल्याप्रमाणे पस्तीस वर्षे नोकरी आणि पंचेचाळीस वर्षे पेन्शन बरोबरीस पंचेचाळीस वर्षे सतत औषधोपचार आणि शेवटी आठवडेच्या आठवडे आय.सी.सी.यु.मध्ये Intensive treatment हा कुठला हिशेब ? शिवाय ट्रीटमेंटनंतर परावलंबी आयुष्य आणि तेसुद्धा रिटायर झालेल्या वयस्क मुलांकडून!

पुढे वाचा

पत्रचर्चा

अर्थ असा नाही की या मंडळींचे विचार प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. परंतु विचारांवर बंदी नको. धर्मनिष्ठांना धार्मिक जशा भावना असतात तशाच तीव्र भावना धर्मावर विश्वास न ठेवणारांच्याही असू शकतात याची जाणीव प्रत्येक प्रगतिशील शासनाने ठेवली पाहिजे.
धर्मावर टीका केली म्हणून मारा; आम्ही अमुक अमुक बक्षीस देऊ अशा प्रकारचे काही फतवे भारतातही निघाले होते. भारतात असे फतवे काढणाऱ्यांत जसे इस्लाम धर्मातील लोक आहेत तसेच हिंदू कट्टरपंथीयही आहेत. आणि असे फतवे काढणाऱ्यांवर काही विशेष कार्यवाही झाल्याचे माझ्या तरी माहितीत नाही. जर असे फतवे काढणारांवर कार्यवाही करायची नसेल तर भारतातील न्यायालये बंद करावी व न्यायव्यवस्था मुल्ला-पंडित यांच्यावरच सोपवावी हेच बरे.

पुढे वाचा

पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, ए-९/१, कुमार पद्मालय, न्यू डी पी रोड, स. नं. १६०/१, औंध, पुणे ४११ ००७. फोन (०२०) २५८९७३५९
लंकाधिपति-सम्राट-रावणाशी युद्ध करण्यासाठी समुद्राचे उल्लंघन आवश्यक होते. त्यासाठी रामेश्वर व लंका यांच्यामधील महासागरावर सेतू बांधावा लागला. रामाने वानरांच्या साह्याने पाच दिवसांत महासागरावर पाषाण, वृक्ष टाकून सेतू बांधला अशी कथा आहे. हा रामसेतू रामायण प्रत्यक्ष घडल्याचा पुरावा म्हणून दिला जातो व त्यावरून प्रतिपादन केले जाते. डॉ. भावे यांनी संशोधन करून हा सेतू रामाने प्रत्यक्षात बांधला होता असा दावा केला आहे. रामसेतू (हनुमान सेतू) वरून वानरसेनेने लंकेत प्रवेश केल्यावर शत्रूने पळून जाण्यासाठी अथवा अन्य कारणासाठी त्याचा उपयोग करू नये म्हणून रामाने एक बाण मारून सेतू महासागरात बुडवून टाकला व त्याचेच अवशेष आज दिसताहेत.

पुढे वाचा

पत्रचर्चा

ह. आ. सारंग, प्लॉट नं. ३२, सुभाषनगर, ‘हॉटेल अश्वमेघ’च्या पाठीमागे, एम.आय.डी.सी. रोड, लातूर – ४१३ ५३१.
‘अभ्यासेंनि प्रगटावें’ या संपादकीयाद्वारे आपण वाचकांशी साधलेला सुसंवाद आवडला. त्यामुळे आ.सु. च्या मागील अंगावर प्रतिक्रिया द्यायला प्रोत्साहित झालो. ‘पत्रबोध’ हे नामकरण व त्याला दिलेली जास्तीची जागा या दोन्ही गोष्टी आवडल्या. आ.स्. मध्ये चुटके-विनोद असण्याची गरज नाही. त्यासाठी इतर माध्यमे आहेत. याबाबतीत पंकज कुरुलकरांशी सहमत व्हावेसे वाटते. आ.सु.चे स्वरूप अलीकडे बदलले आहे, हे खरेच. हा बदल आवश्यकच होता. विनोदाप्रमाणेच कामजीवनावरील तथ्यांनाही आ.सु.त जागा देण्याची गरज आहे, असे वाटत नाही.

पुढे वाचा

पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, पुणे ४११ ००७
हिंदू धर्मानुसार विष्णूचे दहा अवतार मानले जातात. काहींच्या मते ३९ अवतार आहेत. लेखकाचे म्हणणे असे आहे की इतर कोणत्याही धर्मात मानवाचा उदय अथवा विकास उत्क्रांतीमुळे झाला याची पुसटशीसुद्धा कल्पना नाही. सर्व प्राणी, पक्षी व मानव ईश्वराने एका झटक्यात निर्माण केले असे यहुदी (ज्यू), ख्रिस्ती व इस्लाम धर्म मानतात. याला हिंदुधर्मही अपवाद नाही. हिंदुधर्मात ब्रह्मदेवाने हे जीव जगत् निर्माण केले आहे असे मानले जाते तर परमात्म्याने ब्रह्माला निर्माण केले आहे असे मानले जाते.
वेदकाळात तेहतीस [? सं.]

पुढे वाचा