विषय «पत्र-पत्रोत्तरे»

प्रतिक्रिया

‘संदर्भ न पाहता लावलेले अर्थ’ या शीर्षकांतर्गत डॉ. के. रा. जोशी ह्यांची दोन टिपणे आजचा सुधारक (मे, १९९४) च्या अंकात प्रसिद्ध झाली आहेत. त्यातील दुसऱ्या टिपणासंबंधीची माझी प्रतिक्रिया नोंदवीत आहे.

डॉ. के. रा. जोशी हे माझे शिक्षक. ते गंभीरपणे करीत असलेल्या ज्ञानसाधनेविषयी पूर्ण आदर बाळगून मी मतभेदाचे मुद्दे नमूद करू इच्छिते.

दुसऱ्या टिपणाच्या शेवटच्या चार ओळीत सरांनी एका दगडात बुद्धिवादी, पुरोगामी, स्त्रीमुक्तिवादी असे अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मी स्वतः स्त्रीमुक्तीच्या विचारांना मानणारी व त्यानुसार आचरण करणारी एक व्यक्ती आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक
आजचा सुधारक ह्यांस,
आपल्या मार्च ९४ च्या अंकांतील प्रा. प्र. ब. कुळकर्णी ह्यांनी लिहिलेला ‘गोमंतकातील रथोत्सव’ हा लेख वाचून एक-दोन गोष्टी सहज लक्षात आल्या.
(१) मराठी माणसे (व-हाडातली काय, पश्चिम महाराष्ट्रातील काय) मराठीसाहित्याभिमुख झाली आहेत किंवा होत आहेत हा कुळकर्ण्यांचा आशावादी विश्वास फार मोहवणारा आहे ह्यात शंका नाही. वर्हामडाचे मला काही सांगता यायचे नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात तरी मराठीची दुर्दशा लक्षात घेतली तर पन्नास-साठ शेवाळकरांनी कुळकर्णी म्हणतात तसे कार्य पन्नाससाठ वर्षे केले तर कदाचित थोडी धुगधुगी निर्माण होईल. एरवी राष्ट्रवाद्यांमुळे हिंदी व आंतरराष्ट्रीयवाद्यांमुळे इंग्रजी ह्या दोन भाषांचाच विकास व्हायचा हे स्वच्छ दिसते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

– १ –

स.न.वि. वि.
सीतारामपंत देवधर यांचे ‘माझा जीवनवृत्तांत’ (१९२७) हे आत्मचरित्र वाचण्यात आले. ते आगरकरांचे सुधारक चालविण्यात प्रथमपासूनचे सहकारीआगरकरांच्या निधनानंतरही दीर्घकाल त्यासाठी धडपडणारे. त्या पुस्तकातील पृ. १०५ ते १६७ हा भाग आपल्या पाहण्यात आला नसल्यास आपल्याला कुतूहलाचा वाटेल. या मजकुरातील खूपच भाग ‘आद्य सुधारक या शीर्षकाखाली आपल्याला प्रसिद्धही करता येईल असे वाटते.
वाचताना काही निर्देश आढळले.
(१) सुधारकाचे सर्व अंक उपलब्ध नाहीत (पृ. १५५).
(२) १४ ऑक्टोबर १८९५ चा सुधारकचा अंक. न्या. रानड्यांनी याच्या दहा हजार प्रती काढून वाटल्या होत्या.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक आजचा सुधारक यांस, स. न. वि. वि.
श्री. प्रमोद सहस्रबुद्धे यांनी ‘मनस्मृती व विवेक’ (आजचा सुधारक, फेब्रु. ९४) या लेखात म्हटले आहे त्याप्रमाणे मनुस्मृतीचा त्याग करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच तिचा विसर न पडू देणे हेही महत्त्वाचे, कारण तिच्यासंबधीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पुनरुज्जीवनवादी शक्ती तिच्या समर्थनार्थ पुढे येत राहतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण त्याकडे बऱ्याच सुधारणावादी लोकांचे पुरेसे लक्ष जात नाही. हिटलरच्या जर्मनीचा विसर पडू न देण्याचा इझराएल व अनेक यहुदी संस्था यांचा जसा सारखा प्रयत्न असतो तसा काही प्रमाणात तरी आपणही मनुस्मृतीबाबत दृष्टिकोन ठेवायला हरकत नाही.

पुढे वाचा

प्रा. श्रीनिवास दीक्षित यांना उत्तर

प्रा. दीक्षितांनी ‘विज्ञानाला उद्गामी विज्ञान म्हणतात’ या माझ्या वाक्यातील एका अडचणीवर बोट ठेवले आहे. ते वाक्य विश्लेषकही आहे आणि संश्लेषकही आहे असे म्हणावे लागेल ही ती अडचण. प्रा. दीक्षितांचे म्हणणे मला स्थूलपणे मान्य आहे. माझ्या नीतिशास्त्राचे प्रश्न या पुस्तकात त्यांना अभिप्रेत असलेला भेद मी केला आहे. परंतु खरे म्हणजे खुद्द इंग्रजीत (आणि मला वाटते जर्मन भाषेतही) ‘Science’ या शब्दाचा उपयोग अजून बराच शिथिल आहे. उदा. द्वाकच्या तर्कशास्त्रावरील एका पुस्तकाचे नाव ‘Introduc- tion to Logic and the Methodology of Deductive Sciences’ असे आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजचा सुधारकच्या चौथ्या वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या (एप्रिल-मे १९९३) जोड अंकाच्या संपादकीयातील मला महत्त्वाची वाटलेली वाक्ये उद्धृत करून त्यांना अनुलक्षून मी काही सूचना करू इच्छितो. ही वाक्ये अशी- “बालमृत्यू घडवून आणणाऱ्या कारणांना न सुदृढ होत जुमानता आजचा सुधारक ज्या चिवटपणाने उभा आहे त्यावरून हे बाळ असेच जाईल आणि दीर्घायुषी होईल असा विश्वास आम्हाला वाटतो आहे. परंतु ते अजून स्वावलंबी होण्याइतके सुदृढ झालेले नाही हेही सांगितलेच पाहिजे.”

(अ) मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या मजकुराविषयीच्या सूचना

१) कोणताही लेख जास्तीत जास्त एक हजार शब्दांचा म्हणजे मासिकाच्या तीन पानांइतकाच राहील याची सर्व लेखकांनी कटाक्षाने काळजी घेतली पाहिजे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

मा. संपादक, आजचा सुधारक, नागपूर. स.न.वि.वि.
आजचा सुधारक मध्ये आपण लिहिलेले विवेकवादावरील लेख, माझ्या पत्रांना व इतरही व्यक्तींच्या (उदा. दाभोलकर) प्रतिक्रियांना आपण दिलेली उत्तरे यांमुळे माझे समाधान झाले नाही. म्हणून पुन्हा हा पत्र लिहिण्याचा उपद्व्याप करीत आहे.
१. विवेकवाद्यांच्या मतानुसार “विश्वाचे ज्ञान मिळवण्याचे वैज्ञानिक पद्धतीहून अन्य साधन मानवाजवळ नाही असा विज्ञानाचा दावा आहे.” (आजचा सुधारकनोव्हेंबर १९९०). मी स्वतः विज्ञानाशी संबंधित शाखेचा स्नातक आहे व असा दावा विज्ञानाने वा वैज्ञानिकाने केल्याचे माझ्या तरी वाचनात आले नाही. पत्रलेखकाच्या प्रत्येक विधानास संदर्भ मागणाऱ्या देशपांडेसाहेबांनी कृपया याचा एखादा संदर्भ असेल तर तो उद्धृत करावा.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. प्र. ब. कुळकर्णी यांसी
स.न.वि.वि.
ऑगस्ट १९९३ (आजचा सुधारक) च्या अंकात ‘रक्तपहाट’ ह्या पुस्तकावरील आपले परीक्षण वाचले. ह्यांतील काही उद्धरणे खालीलप्रमाणे आहेत:
तळवलकर म्हणतात, ‘पं. नेहरू वेगळ्या त-हेने (रीतीने) तत्त्वभ्रान्त होते. धर्माच्या प्रेरणेचा प्रभाव पाकिस्तान अव्यवहार्य ठरविण्यासाठी विचारात घेतला नाही. लोकसंख्येची पद्धतशीर अदलाबदल झाली असती तर जिनांना आणखी चार कोटी मुसलमानांचा भार सहन करावा लागला असता. पण नेहरूंनी विरोध का करावा ? त्यांचा पाकिस्तानच्या संबंधातला तत्त्वभ्रान्तपणा या रीतीने पुन्हा एकदा प्रकट झाला. तात्पर्य राजकारण्यांच्या सत्तालोभाने आणि वार्धक्यातील टुबळेपणाने त्यांनी जो उतावळेपणा केला तो केला नसता तर हिंदुमुसलमान प्रजेची प्राणहानि टळली असती.’

पुढे वाचा

चर्चा

श्री. मा. श्री. रिसबूड यांना उत्तर
स.न.
आपले दि. १५-७ चे पत्र आणि आपले पुस्तक ‘फलज्योतिष दोन्ही मिळाली. त्याबद्दल आभारी आहे.
आधी आपल्या पत्राला उत्तर देतो, मग आपल्या पुस्तकातील ‘बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये या परिशिष्टाविषयी लिहितो.
प्रथम विवेकवाद्याच्या तोंडी आपण जो युक्तिवाद घातला आहे त्यात थोडी दुरुस्ती सुचवितो.
आपण म्हणता की ‘सृष्टीचे आदिकारण म्हणजे एक अज्ञेय अशी शक्ति हा आजच्या घटकेला तरी दुर्भेद्य स्तर आहे. यावर माझे म्हणणे पुढीलप्रमाणे आहे असे आपण म्हणता. ‘त्या दुर्भेद्य स्तरापर्यंत जायचेच कशाला? थोडे आधीच थांबावे, म्हणजे सृष्टीला आदिकारण नसून हे सर्व आपोआप चालले आहे असे मानावे.’

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक , आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
भारतातून जे लोक अमेरिकेला जातात त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने मला फार जाणवते, ती अशी की हे सर्वजण उच्च शिक्षित आहेत. ते हुशार आहेत. ते ज्या काळांत उच्च शिक्षित झाले त्या काळांत कॅपिटेशन फीची कॉलेजेस् नव्हती.
साहजिकच हे सर्वजण शासकीय शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षित झाले. तेथे शुल्क अत्यल्पच होते. त्या शुल्कामधून मिळणाऱ्या पैशातून कोणतीही शिक्षणसंस्था चालविता येणार नाही. साहजिकच ह्या उच्च शिक्षणाच्या संस्था सरकारी अनुदानावर चालविण्यात येतात. जे. जे., के. ई. एम. किंवा पवईचे आय. आय. टी.

पुढे वाचा