विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

प्रा. दि.य. देशपांडे यांस, स.न.
आपले दि. ३ मार्चचे पत्र पोचले. त्यापूर्वीच एक आठवडा आजचा सुधारकच्या जास्तीच्या प्रती मिळाल्या होत्या व मी त्या काही निवडक मंडळींना माझ्या पत्रासह पाठविल्याही होत्या. सोबत त्या पत्राची प्रत आपणास माहितीसाठी पाठवीत आहे. त्यांपैकी दोघांचा (नरेन तांबे व ललिता गंडभीर) वर्गणी पाठवीत असल्याबद्दल फोन आला. (एकाचे ‘माझा आजकाल अशा लेखनाचा समाजावर काही परिणाम होऊ शकतो यावरचा विश्वास उडाला आहे’ असेही नकारात्मक पत्र आले.) आणखीही काही जणांकडून वार्षिक वर्गणी निश्चितच येईल असे वाटते. मध्यंतरी काही कामामुळे ‘बृहन्महाराष्ट्रवृत्तासाठी अर्धवट लिहून ठेवलेला मजकूर पूर्ण करून पाठविणे जमले नाही, ते या महिन्यात पूर्ण करीन.

पुढे वाचा

निसर्ग आणि मानव – परिसंवाद

निसर्ग आणि मानव – परिसंवाद
साधना साप्ताहिकाच्या १८ जुलै १९९२ च्या अंकात श्री. ना. ग. गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात गांधीवादी पर्यावरणविचाराविषयी काही प्रतिकूल मते व्यक्त केली होती. त्या लेखाला २९ ऑगस्ट ९२ च्या साधनेत श्री वसंत पळशीकर यांनी उत्तर दिले. या उत्तराला मी साधनेत (नोव्हेंबर ९२) दिलेले उत्तर आजचा सुधारक (नोव्हेंबर-डिसेंबर १९९२) मध्ये पुनर्मुद्रित झाले. या लेखावर दोन प्रतिक्रिया आमच्याकडे आल्या आहेत. एक आहे प्रा. सु.श्री. पांढरीपांडे यांची, आणि दुसरी अर्थात् श्री. पळशीकरांची. या दोन्ही प्रतिक्रियांचे प्रतिपादन असे आहे की ज्या विज्ञानाच्या आधारे मी श्री पळशीकरांना उत्तर दिले होते ते विज्ञान आता जुने झाले असून, आज वैज्ञानिक पद्धतीचा एक नवाच आदर्श (paradigm) निर्माण झाला आहे, आणि त्यानुसार माझे म्हणणे आता जुने आणि कालबाह्य झाले आहे.

पुढे वाचा

चर्चा- डॉ. के. रा. जोशी यांना उत्तर

डॉ. के. रा. जोशी यांच्या मूळ आक्षेपांना दिलेले माझे उत्तर त्यांना पटलेले नाही. आणि त्यांनी अनेक आक्षेप घेणारा एक लेख पाठविला आहे. त्याला यथामति उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.
त्यांचा पहिला आक्षेप असा आहे मी कांट आणि उपयोगितावाद यांची सांगड घालण्याच्या केलेल्या प्रयत्नावर. ते म्हणतात की त्या दोन उपपत्ती तमःप्रकाशवत् परस्परविरुद्ध असून त्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा एकही नीतिमीमांसक झाला नाही. हे त्यांचे म्हणणे मान्य केले तरी त्यावरून असा समन्वय कोणाला जमणारच नाही असे सिद्ध होत नाही. निदान त्यांनी माझ्या प्रयत्नात काय दोष आहे ते सांगायला हवे होते.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक,
स.न.वि.वि.
प्रा. रूपा कुलकर्णी ह्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्याचे वाचले. त्यांचे अभिनंदनसुद्धा केले गेले. वास्तविकरीत्या आपण ज्या देशाचे नागरिक आहोत, त्या देशाच्या घटनेचे आणि इतर कायदेकानूंचे पालन केले की, ह्या पृथ्वीतलावर सुखाने जगण्यास ते पुरेसे आहे.
भारताच्या घटनेनुसार धर्म ही ज्याची त्याची खाजगी बाब आहे. व्यक्ती कोणत्या धर्माची आहे, ह्याच्याशी शासनाला कर्तव्य नाही. सर्वच धर्म पारलौकिक समाधान कशा प्रकारे मिळावे ह्यासाठी आहेत. इहलौकिक समाधानासाठी धर्माची जरुरी नाही.
ज्येष्ठ नागरिक नात्याने इंग्रजी म्हण सांगावयाची झाली तर व्यक्ती वयाच्या साठीनंतर शहाणी झाली असे समजतात.

पुढे वाचा

सेक्युलरिझम : प्रा. भोळे-पळशीकर यांना उत्तर

‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या संपादकांनी ‘धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) या विषयावर एक परिसंवाद घ्यावा या हेतूने प्रा. भा. ल. भोळे आणि श्री वसंत पळशीकर ह्या महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंतांकडून एक दहा कलमी प्रश्नावली तयार करून घेऊन एप्रिल १९९१ च्या अंकात प्रकाशित केली. अनेक लेखकांनी ह्या उपक्रमांला प्रतिसाद देऊन आपापले विचार मांडले. मीही गेली ३०-४० वर्षे सेक्युलरिझम ह्या विषयावर लिहीत, बोलत असल्याने ‘आजचा सुधारक’मध्ये तीन लेख लिहिले.
गेल्या शंभरसव्वाशे वर्षांच्या इतिहासात आपल्या देशाला विनाशाकडे खेचून नेणार्‍या ज्या समस्येने आजच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे आणि ज्या समस्येची सोडवणूक अद्यापही होऊ शकली नाही ती समस्या म्हणजे हिंदु आणि मुस्लिम या दोन प्रमुख धार्मिक लोकसमूहांतील संघर्ष ही होय.

पुढे वाचा

निसर्ग आणि मानव : श्री वसंत पळशीकरांना उत्तर

१८ जुलैच्या साधनेत श्री नानासाहेब गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या उत्तरार्धात नानासाहेबांनी गांधीवादी पर्यावरणवाद्यांवर परखड टीका केली आहे. तिला श्री वसंत पळशीकरांनी २९ ऑगस्टच्या साधनेत उत्तर दिले आहे. त्या उत्तरावरील ही प्रतिक्रिया.

ज्याला आपण निसर्ग म्हणतो तो प्रथमतः भौतिक, निर्जीव पदार्थांचा आणि शक्तींचा, आणि नंतर वनस्पती आणि प्राणी यांचा, त्यांच्या जीवनव्यवहारांचा बनलेला आहे. यांपैकी भौतिक निसर्ग हा पूर्णतः अचेतन, निर्जीव अशा शक्तींचा आणि त्यांच्या घडामोडींचा वनलेला आहे; परंतु निसर्गाचा जो भाग वनस्पती आणि प्राणी यांचा बनलेला आहे त्यात जीव, संज्ञा, हेतुपुरस्पर कृती या गोष्टी आढळून येतात.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

समतावादी कुटुंब!
संपादक आजचा सुधारक यांस,
ऑक्टो. ९२ च्या ‘आजचा सुधारक’मध्ये ‘विवाह आणि नीती-आमची भूमिका’ या संपादकीयात समतावादी कुटुंबाची केलेली तरफदारी केवळ भयानक आहे. समतावादी कुटूंब कोणाला नको आहे? प्रत्येक गृहस्थाला व गृहिणीला ते हवेसे वाटते. ते सहजी होणारे नाही हे खरे, पण प्रयत्नसाध्य तर आहेच. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ह्या व्यवहार्य तत्त्वालाही कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण वरील संपादकीयात तथाकथित समतावादी कुटुंबाची ज्या पद्धतीने भलावण केली गेली आहे ती समाजस्वास्थ्यावरच घाला घालणारी आहे.
कामप्रेरणा ही भुकेसारखी स्वाभाविक व प्रबल प्रवृत्ती असल्याने तिची पुरुषार्थात गणना होऊन तिला वाट मिळून विवाहसंस्थेत तिचे उदात्तीकरण झालेले आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक आजचा सुधारक
स. न. वि. वि.
श्री. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी माझे वाक्य उद्धृत करताना त्याच वेळी, दुसर्याअ अंगाने हे शब्द गाळले आहेत. सावरकरांच्या सुधारणेची प्रेरणा त्यांच्या अनुयायांवर जे परिणाम घडवून आणताना दिसते त्याकडे मला लक्ष वेधायचे होते. सुधारणेमागील प्रेरणा आणि परिणाम यांचा काही अंगभूत संबंध आहे असे मला सुचवावयाचे होते. त्यांनी सावरकरांचे जे युक्तिवाद उद्धृत केले आहेत ते लक्षात घेतलेच पाहिजेत यात शंका नाही. ते ध्यानात घेऊन मी माझी मांडणी सुधारून घेऊन असे जरूर म्हणेन की, सावरकरांच्या सुधारणाकार्याची प्रेरणा संमिश्र व गुंतागुंतीची होती.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक,
आजचा सुधारक स.न.वि. वि.
श्री केशवराव जोशी यांना पळशीकरांनी दिलेले उत्तर वाचले (आजचा सुधारक, ऑगस्ट ९२). सावरकरांची ‘धार्मिक-सामाजिक सुधारणेमागची प्रेरणा …. माणसांना कडवी, आंधळी, निरुंद, निर्दय, वैरवृत्तीची बनविणारी, विध्वंसक व विनाशक होती, असे पळशीकर म्हणतात. हिंदुसमाज बलवान करण्यासाठी सावरकरांना समाजसुधारणा हवी होती, त्यामागे न्याय, माणुसकी ही प्रेरणा नव्हती, असा आरोप समोर ठेवून पळशीकरांनी हे विधान केलेले आहे.
मी थोडाबहुत सावरकर वाचलेला आहे. अस्पृश्यता पाळणे म्हणजे ‘मनुष्यत्वाविरुद्ध अत्यंत गर्छ असा अपराध करणे होय असे सावरकर म्हणतात (खंड ३, पृ.४८३). न्यायाच्या दृष्टीने, धर्माच्या दृष्टीने, माणुसकीच्या दृष्टीने ते कर्तव्य आहे, म्हणूनच अस्पृश्यतेचे बंड आपण हिंदूंनी साफ मोडून टाकले पाहिजे.

पुढे वाचा

चर्चा-केशवराव जोशी यांच्या पत्रास उत्तर

श्री. केशवराव जोशी यांचा मी आभारी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव मी उल्लेख केलेल्या नामवलीत घेणे शक्य होते. पं. नेहरूंनी, सावरकरांप्रमाणे, जाणीवपूर्वक समाजसुधारणेचे कार्य केले असे म्हणता येणार नाही. जसे रानड्यांचे शिष्य नामदार गोखले यांनीही केले नाही. पण या दोघांचेही जीवन व कार्य सामाजिक सुधारणांना उपकारक ठरले. पं. नेहरू दीर्घकाळ पंतप्रधान नसते तर केंद्रशासनाचे वळण जेवढे सुधारणांना अनुकूल राहिले तेवढेही राहिले नसते हे अगदी शक्य आहे.
मला जो मुद्दा करावयाचा होता त्या दृष्टीने सावरकरांचे नाव तेथे घेणे आवश्यकचहोते असे मात्र नाही.

पुढे वाचा