विषय «पर्यावरण»

रावणातोंडी रामायण

[ पाण्याचा पुरवठा व त्याचे वितरण ही आजच्या काळातील अतिशय गहन समस्या आहे. व ती अधिकाधिक तशी बनतेही आहे. आधुनिक विज्ञान, त्याचे उपयोजन करणारी अनेकविध तंत्रे, तज्ज्ञ शासकीय अधिकारी व त्यांनी पाण्याच्या समान वाटपासाठी तयार केलेल्या योजना इतक्या साऱ्या गोष्टी आपल्या हाताशी आहेत, परंतु ह्यामधून निष्पन्न काय होते आहे, तर एकीकडे दिवसेंदिवस कोरडे पडत जाणारे जलस्रोत, तर दुसरीकडे पाण्यावरून होणारी भांडणे. आणि वाढत जाणारी पाणीटंचाई.
सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचे व्याख्यान ऐकण्याची मला गेल्या महिन्यात संधी मिळाली. राजस्थानच्या मरुभूमीतील जलस्रोतांचे जतन हा प्रामुख्याने त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे.

पुढे वाचा

‘प्रारूप राष्ट्रीय जल नीती’तील सुधारणा

‘प्रारूप राष्ट्रीय जल नीती’ २०१२ मध्ये पिण्याचे आणि स्वच्छतेचे पाणी सोडल्यास बाकी सर्व पाण्याला आर्थिक वस्तू समजले जावे असे सुचवले गेले. नंतरच्या आवृत्त्यां ध्ये अन्नसुरक्षा आणि शेतीसाठीचे पाणी ही प्राथमिक गरज समजली जावी याची खातरजमा करण्यात आली. १९९५ मध्ये घडलेली एक घटना आज इतक्या वर्षानंतरही माझ्या मनात ताजी आहे. मी एका मित्रासोबत कोई तूर च्या गर्दीच्या बाजारात खरेदी करीत असताना एक महागडी गाडी आमच्याजवळ येऊन थांबली. गाडीच्या खिडकीतून दोन हात बाहेर आले. दुकानातून नुकत्याच खरेदी केलेल्या एक लिटरच्या मिनरल बाटलीतल्या पाण्याने ते हात धुतले गेले.

पुढे वाचा

अणुकचराः भीती व वास्तव

अणुकचरा जनसामान्यांसाठी एक कठीण व अमूर्त विचारधारणा असल्याने त्याबद्दल गैरसमज पुष्कळ आहेत. तसेच त्यामुळे अणुकचऱ्याबद्दल भीती निर्माण होणेही स्वाभाविक आहे. या सगळ्यामागचे मुख्य कारण किरणोत्सार किंवा ‘रेडिएशन’ या शब्दाने मानवी मनात जी कल्पनासृष्टी रुजवलेली आहे तीत सापडते. अणुकचरा काय असतो, तो कसा निर्माण होतो व त्याची सुरक्षित साठवण व योग्य विल्हेवाट कशी लावता येते, हे जरा पाहू.
सन १९९१ मध्ये अमेरिकेच्या ‘ऊर्जाविषयक जाणीव’ समिती (USCEA) साठी केलेल्या सर्वेक्षणातून ‘किरणोत्सार’ हा शब्द शारीरिक इजा (उदा. कॅन्सर व इतर असाध्य रोग, मृत्यू इ.)

पुढे वाचा

पाणी प्रश्नाचे स्वरूप, गुंतागुंत आणि तिढे

(१) मनुष्य स्वभाव मोठा मजेशीर आहे. जे फुकट मिळते त्याचा तो बेजबाबदार वापर करत राहतो मग गरज असो की नसो. निसर्ग साधनसंपत्ती तर सार्वजनिक, कोणाच्याच मालकीची नाही. त्यामुळे तिचा तर वापर कसाही, केव्हाही, कुठेही करण्याचा जणू जन्मसिद्ध हक्कच. आजपर्यंत हवा, पाणी, जमीन, जंगले यांचा असाच वापर आपण करत आलो. हे करता करता अमर्याद वाटणारे पाणी १०-१२ रुपये लीटरपर्यंत केव्हा येऊन पोहोचले ते कळलेही नाही!
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची लोकसंख्या ३५ कोटीच्या आसपास होती. आज ती ११० कोटीच्या घरात गेली आहे ड्ड म्हणजे तिप्पट.

पुढे वाचा

हवामानबदलाचे नीतिशास्त्र

हवामानबदलाबाबत आपण काय करावे, हा नैतिक प्रश्न आहे. विज्ञान, त्यात अर्थशास्त्रही आले, हे आपल्याला हवामानबदलाची कारणे आणि परिणाम सांगू शकेल. आपण काय केल्याने काय होईल, हेही विज्ञान सांगू शकेल. पण काय करणे इष्ट आहे, हा मात्र नीतीच्या क्षेत्रातला प्रश्न आहे.

अशा प्रश्नांच्या विचारी उत्तरांत वेगवेगळ्या मानवसमूहांच्या इच्छा-आकांक्षांमधल्या संघर्षांचा विचार करावा लागतो. जर हवामानबदलाबाबत काही करायचे असेल तर आजच्या माणसांपैकी काहींना (विशेषतः सुबत्ता भोगणाऱ्यांना) त्यांच्यामुळे होणारी हरितगृहवायूंची (यापुढे GHG उर्फ ग्रीनहाऊस गॅसेस) उत्सर्जने कमी करावी लागतील नाहीतर भावी पिढ्यांना सध्यापेक्षा गरम जगात भकास जिणे जगावे लागेल.

पुढे वाचा

इकोटोपिया पर्यावरणीय जीवनशैलीचे कल्पनाचित्र

कादंबरी हा साहित्यप्रकार किती सर्जनशीलपणे हाताळता येऊ शकतो याचा अद्भुत प्रत्यय अर्नेस्ट कॅलनबाख यांची इकोटोपिया ही कादंबरी वाचताना येतो. मानवी संबंधातील गुंतागुंत, ताणतणाव, सर्जनशील पैलू, विश्वाचे आकलन, मनुष्य आणि विश्व यांच्यातील सहसंबंध हे असे कादंबरीचे विविधांगी विषय असतात हे आपण नेहमीच अनुभवतो. लेखकाची कल्पनारम्यता, चिंतनशीलता, भाषेच्या माध्यमातून एखाद्या कथेच्या अनुषंगाने कादंबरीत व्यक्त होते. याशिवाय ही कादंबरी वाचकाला खूप काही देऊ शकते हे इकोटोपिया वाचताना लक्षात येते. विश्वातील मनुष्यप्राणी व निसर्ग यांच्यातील सहसंबंध कसे आहेत हे प्रभावीपणे सांगणे पुरेसे न मानता, हे सहसंबंध कसे असावेत, हे कसे घडवले पाहिजेत, काय केले म्हणजे ते संबंध अधिक न्याय्य, आनंददायी होतील, याची एक ब्लू प्रिंट देण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.

पुढे वाचा