विषय «पर्यावरण»

घोटभर अवकाश आणि एक विचित्र पेच

इंदौरच्या `नई दुनिया’ दैनिकामध्ये २३ मार्च २०२० रोजी प्रकाशित सोपान जोशी ह्यांच्या हिन्दी लेखाचा अनुवाद

अगदी सामान्य भारतीय नागरिकापासून ते ज्येष्ठ-श्रेष्ठ वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनाच पाण्याविषयी एक महत्त्वाचे तथ्य माहिती आहे – पाणी निर्माण करता येत नाही. आधुनिक विज्ञानाने आज कल्पनातीत प्रगती केली आहे. रेणू ज्यापासून बनलेला असतो त्या सूक्ष्म अणूला भेदून त्यातील ऊर्जादेखील आपण काढू शकतो. अनेक नवनवीन रसायनांचा शोध तर लागलेला आहे, निसर्गात न आढळणारी मूलद्रव्येसुद्धा प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहेत. आणि तरीही, पाण्याची निर्मिती काही आपण करू शकत नाही.

पाण्याचे रासायनिक सूत्र अगदी मुलांनासुद्धा ठाऊक आहे.

पुढे वाचा

वृक्षारोपणाचा ज्वर

सध्या महाराष्ट्रात तरी वृक्षप्रेमाच्या भावनेचा महापूर आला आहे. भारतीय मनोवृत्ती मुळातच भावनेच्या आहारी जाऊन प्रत्यक्ष फायदा- तोटा यांचा विवेक हरवून बसण्याची आहे. त्यात विविध प्रसारमाध्यमांची भर पडल्यामुळे सर्व समाजाला वृक्षप्रेमाचा ज्वर चढला आहे. त्यामुळे अवास्तव खर्च, वाया जाणारे श्रम, वाढती गैरसोय, भूगर्भातील पाणी कमी होणे व काही वेळा हकनाक मृत्यु हे सर्व दोष निर्माण होत आहेत. त्यापैकी काही पैलूंकडे ह्या लेखात लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे.

झाडे व पाऊस

झाडांमुळे, जंगलामुळे पाऊस वाढतो अशी एक समजूत समाजमनात घर करून आहे. पण ह्या समजुतीला काहीही शास्त्रीय आधार नाही!

पुढे वाचा

झळ…

मानवी जंगल पेटते तेव्हा…

राज्य, देश, आणि जग हे सर्वार्थाने वेगवेगळ्या नियमांच्या निकषांवर आधारलेले असले तरी काही प्रमाणात मानवी मनाच्या गाभाऱ्यातून येणाऱ्या हव्यासी आणि स्वार्थी भावना बरेचदा एकाच पातळीवर स्थिरावलेल्या असतात. यामध्ये अपवाद चौकट सोडली तर ना सामान्य नागरिकांमध्ये काही फरक जाणवतो ना राज्यकर्त्यांमध्ये. अगदी जमिनीत वाळूची धडी निघावी तशी जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे सामान्य माणूसही आपल्या सामान्य जगण्याच्या आधारावर हातापाय पसरवत असतो गडगंज संपत्तीच्या हव्यासापायी. याच्यापुढची गोष्ट म्हणजे आणखी दोन पावले पुढे असणारा राज्यकर्ता तर आपल्या कार्याचा परीघ कोणत्याही थराला जाऊन वाढवत असतो.

पुढे वाचा

मोठ्या प्रकल्पांचे वास्तव

आपण नागपूरकर काही बाबतीत फारच सुदैवी आहोत असे मला वाटते. चार-पाच महिने उन्हाळा सहन केला की आपण मोकळे. भूकंप, चक्रीवादळ, बर्फाची वादळे, भूस्खलन या अपरिमित हानी करणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आपल्याकडे ढुंकून पहात नाहीत. आपल्या शहराला असलेल्या तीन (किरकोळ) नद्यांना मिळूनही आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्राने एवढ्यातच अनुभवला तसा अभूतपूर्व पूर येत नाही. ओला दुष्काळ व कोरडा दुष्काळ या वार्षिक आपत्ती अर्धाअधिक महाराष्ट्र व्यापून असल्या तरी मोठ्या शहरांना त्या फक्त वर्तमानपत्रांतून कळतात. त्यामुळे ओढवणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य ही नैसर्गिक आपत्ती मानायची की मानवनिर्मित हा प्रश्नही कोणाच्या मनात येत नाही.

पुढे वाचा

राजकारण आणि पर्यावरण

नुकतीच लोकसभा निवडणूक होऊन मोदी सरकार पुन्हा एकदा आधीपेक्षाही जास्त अशा बहुमताने निवडून आले. जनतेने या सरकारवर मागील पाच वर्षांच्या त्याच्या कामगिरीबद्दल समाधान आणि पुढील पाच वर्षांचा विश्वास मतदानाद्वारे दाखवला. अपेक्षेप्रमाणे पर्यावरण हा मुद्दा या सगळ्या धामधुमीत पूर्णपणे अडगळीत टाकला गेला होता. याची दोन कारणे दिसतात – पाहिले म्हणजे इतर अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी दाखवू शकलेल्या मोदीसरकारची पर्यावरण-क्षेत्रातील कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. पर्यावरण निर्देशांकाच्या बाबतील भारताचा क्रमांक जगात प्रथमच तळातील पाच देशांत इतका प्रचंड घसरला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला याबाबतीत काहीही सांगण्यासारखे राहिलेच नव्हते.

पुढे वाचा

ध्यान-मीमांसा

विपश्यना, साक्षात्कार, वैज्ञानिक आकलन, मेंदूविज्ञान

——————————————————————————

       ‘आजचा सुधारक’च्या जून व जुलै 2016च्या भागामध्ये ‘साक्षात्कारामागील वैज्ञानिक सत्य’ व ‘साक्षात्कार : वैज्ञानिक स्पष्टीकरण’ ह्या दोन लेखांमधून डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी ‘साक्षात्कार’ची ह्या संकल्पनेचे वैज्ञानिक विश्लेषण केले होते. त्याच विषयाची दुसरी बाजू मांडणारा व त्याचबरोबर ध्यान, ईश्वर, भक्ती ह्या संकल्पनांचा गांधी-विनोबा परंपरेतला अर्थ विशद करून सांगणारा आणखी एका डॉक्टरांचा हा लेख, आजचा सुधारकची संवादाची परंपरा नक्कीच पुढे नेईल.

——————————————————————————

        आपल्यालेखनात डॉ. रवीन्द्र टोणगावकरांनी साक्षात्काराची वैज्ञानिक विश्लेषणात्मक बाजू मांडताना खालील विधाने केली आहेत: ‘‘ध्यानावस्थेत देवांच्या विचाराचा कैफ चढल्यामुळे किंवा त्या विचारांनी आलेली उन्मादावस्था, झिंग (God Intoxication) या अवस्थेत स्वतःच्या अंतर्मनातून आलेले जे विचार असतात, त्यांनाच अंतिमसत्य मानून, त्यावर भाबडा विश्वास ठेवून, त्यांना साक्षात्कार किंवा दैवी संदेश म्हटले जाते.’’

पुढे वाचा

दुष्काळ – चांगल्या कामांचाही

दुष्काळ, राजस्थान, पारंपरिक जलव्यवस्थापन
—————————————————————————–
कमी पाऊस म्हणजे दुष्काळ हे समीकरण खोडून काढणारा, सामूहिकता, पारंपरिक शहाणपण व बंधुभाव म्हणजे काय हे समजावून सांगणारा स्वानुभव.
—————————————————————————–

आज टेलिव्हिजन कुठे नाही? आमच्याकडेही आहे. आमच्याकडे म्हणजे जैसलमेरपासून सुमारे शंभर किमी पश्चिमेला पाकिस्तानच्या सीमेवर. आता हेही सांगून टाकतो की आमच्याकडे देशातील सर्वात कमी पाऊस पडतो. कधीकधी तर पडतच नाही. तशी लोकसंख्या कमी आहे म्हणा, पण तेवढ्या लोकांनाही जरूरीपुरते पाणी तर लागतेच. त्यातूनही येथे शेती कमी व पशुपालन अधिक आहे. येथील लाखो बकऱ्या, गाई, उंटांसाठीही पाणी पाहिजे.

पुढे वाचा

इकॉलॉजी आणि इकॉनॉमी

(जवळजवळचे वाटणारे आणि असणारे इकॉलॉजी आणि इकॉनॉमी (इंग्रजी) हे शब्द परस्परांपासून दुरावल्याची ‘आपत्ती’ )

इकॉनॉमी हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनला आहे. eco म्हणजे घर, परिसर आणि nomy म्हणजे व्यवस्थापन. या पार्श्वभूमीवर पृथ्वीचे, निसर्गाचे ज्ञान म्हणजे इकॉलॉजी आणि निसर्गाचे व्यवस्थापनशास्त्र म्हणजे इकॉनॉमी. या दोन्ही शब्दांचे जवळचे नाते ग्रीक भाषेत सहजपणो मांडले गेले आहे.

इतकेच नाही तर भारतामध्ये दोन हजार वर्षांपूर्वी कौटिल्याने लिहिलेले अर्थशात्रही हेच सांगते. कौटिल्य म्हणतो, ‘अर्थशास्त्र म्हणजे भूमीचे किंवा पृथ्वीचे अर्जन, पालन आणि अभिवर्धन कसे करावे हे शिकविणारे शास्त्र’.

पुढे वाचा

दुष्काळ – पाण्याचा की विचारांचा?

(थोर पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचा हा लेख काश्मीरमधील प्रलयाच्या पार्श्वभूमीवर ह्या अंकात प्रकाशित करीत आहोत. डॉ राजेन्द्रप्रसाद ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे विचार प्रथम आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले होते. प्रस्तुत लेखात, समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटीची जंगले नष्ट केल्यामुळे त्या प्रदेशात किंवा मुद्दाम उंचावरून रस्ते काढल्यामुळे सखल प्रदेशात पूर आल्याची उदाहरणे देऊन त्यांनी एक महत्त्वाचा सिध्दान्त मांडला आहे, तो असा की दुष्काळ किंवा पुरासारख्या आपत्ती अचानक कधीच येत नाहीत. त्यांच्या आधी चांगल्या विचारांचा दुष्काळ आलेला असतो. ‘ज्ञानोदय’ मासिकाच्या जून २०१४ च्या अंकातून अनुवादित, संपादित, साभार.

पुढे वाचा

रावणातोंडी रामायण

[ पाण्याचा पुरवठा व त्याचे वितरण ही आजच्या काळातील अतिशय गहन समस्या आहे. व ती अधिकाधिक तशी बनतेही आहे. आधुनिक विज्ञान, त्याचे उपयोजन करणारी अनेकविध तंत्रे, तज्ज्ञ शासकीय अधिकारी व त्यांनी पाण्याच्या समान वाटपासाठी तयार केलेल्या योजना इतक्या साऱ्या गोष्टी आपल्या हाताशी आहेत, परंतु ह्यामधून निष्पन्न काय होते आहे, तर एकीकडे दिवसेंदिवस कोरडे पडत जाणारे जलस्रोत, तर दुसरीकडे पाण्यावरून होणारी भांडणे. आणि वाढत जाणारी पाणीटंचाई.
सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचे व्याख्यान ऐकण्याची मला गेल्या महिन्यात संधी मिळाली. राजस्थानच्या मरुभूमीतील जलस्रोतांचे जतन हा प्रामुख्याने त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे.

पुढे वाचा