नास्तिक्य हा सहसा लोकांच्या फार आवडीचा नसलेला किंवा दुर्लक्षित केलेला विषय. मग नास्तिक म्हणजे स्वतःला जास्त शहाणे समजणारे, दीड शहाणे, आगाऊ, इथपासून ते नास्तिकता म्हणजे टोकाची भूमिका घेणे इथपर्यंत बिरुदांचा वर्षाव केलेला असतो. आणि हे सगळं करताना नास्तिक, नास्तिक्य, बुद्धिप्रामाण्य, विवेक म्हणजे नेमकं काय, हे येतं कुठून, भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात नास्तिकांची परंपरा किती मोठी आहे, ह्या सगळ्याचा विचार तर सोडाच पण कित्येकदा गंधही नसतो. तेव्हा नास्तिक परिषद म्हटल्यावर हे नास्तिक एकत्र येऊन करतात काय, ह्यांना परिषद घ्यायची काय गरज पडते, असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
विषय «विवेकवाद»
किर्लोस्कर मासिक, अंधश्रद्धा निर्मूलनाची एक सामाजिक चळवळ
महाराष्ट्रातील औंध संस्थानात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० साली पहिला उद्योगसमहू काढला. ह्या किर्लोस्कर उद्योगसमहूाचे ‘किर्लोस्कर खबर’ हे मुखपत्र हे त्या काळचे एक नवमतवादी, पुढारलेले मासिक होते. १९२० ऑगस्टला त्याचा पहिला अंक निघाला.
आपल्या समाजात ज्या अनिष्ट कल्पना व रूढी बोकाळल्या आहेत त्यांचे स्वरूप उघडे करून त्यांना आळा घालण्याचे प्रयत्न हे मासिक करील असे आश्वासन शंकरराव किर्लोस्कर यांनी या अंकात दिले. सामाजिक सुधारणा, जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये वैचारिक पातळीवर किर्लोस्कर मासिकातून तर प्रत्यक्षात किर्लोस्करवाडीमध्ये जोपासली जातच होती. र.धों. कर्वे, महादेवशास्त्री दिवेकर, वि.दा.
नास्तिकता कशासाठी?
आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आपल्या आजूबाजूच्या समाजातील माणसे काही प्रमाणात आस्तिक तर काही प्रमाणात नास्तिक असतात. पण उघडपणे आपण आस्तिक आहोत असे सांगणाऱ्यांपेक्षा नास्तिक आहोत असे सांगणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. ज्यांची धर्मग्रंथ, श्रुती-स्मृती, मंत्रसंहिता, उपनिषदे ह्यांवर परमश्रद्धा आहे आणि ज्यांना वेदाच्या दिव्यतेबाबत आस्था आहे अशांना आस्तिक म्हणतात. तर ज्यांचा वेदावर विश्वास नाही, जे वैदिक सिद्धांताबाबत तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची चिकित्सा करतात ते नास्तिक आहेत. मात्र नास्तिकता म्हणजे एवढेच असे नव्हे. नास्तिकता म्हणजे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टिकोन होय.
शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार
काही महिन्यांपूर्वी एका जीवश्चकंठश्च मित्राला अखेरचा निरोप देण्याचा दुर्दैवी अनुभव घेतला. त्यावेळी मनात आलेले विचार अस्वस्थ करून गेले. ते समविचारी बुद्धिमंतांसमोर ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच.
माझा मित्र अत्यंत श्रद्धाळू, देवभक्त आणि सर्व कर्मकांडांवर ठाम विश्वास ठेवणारा होता. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पद्धतीने होणार याविषयी मनात काही संदेह नव्हता. तरीही तो सर्व प्रकार पाहून गलबलून आले. मित्राच्या जाण्याचे दुःख बाजूला राहिले. त्याच्या पार्थिव देहाची विटंबना चालू होती आणि विधींच्या नावाखाली त्याच्या सुपुत्राकडून जे काही प्रकार करून घेतले गेले, ते पाहून उद्वेग वाटला. काही काळापूर्वी आद्य सुधारक आगरकरांचा ‘शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार’ या शीर्षकाचा एक निबंध वाचल्याचे आठवले आणि गेल्या दीड शतकात आपल्या धर्मात आणि संस्कृतीत किती फरक झाला ते पाहाण्याची इच्छा झाली आणि तो लेख पुन्हा एकदा वाचला.
विवेकवाद आणि नास्तिकता
आपण दररोजच्या व्यवहारात नास्तिकता आणि विवेक यांचा सर्रास वापर करतो. कोणत्याही गोष्टीबाबत सारासार विचार करण्याच्या वृत्तीला लोकभाषेत विवेक करणे असे म्हटल्या जाते. थोडक्यात, कोणत्याही गोष्टीची योग्यायोग्यता ठरविताना किंवा विशिष्ट कृती करताना विवेक बाळगला पाहिजे, असे नेहमी आपल्या कानावर येते. नास्तिकता या संज्ञेबाबत ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणाऱ्याला लोक नास्तिक म्हणतात आणि ते बरेचसे बरोबरही आहे. परंतु या शब्दांचे नेमके अर्थ आणि त्यांचा इतिहास काय आहे, याचा सामान्य माणूस फारसा विचार करीत नाही. किंवा तसा विचार करून या शब्दांचा वापर करीत नाही. तसेच या दोन संकल्पनांचा परस्परात काय सबंध आहे, याचाही बारकाईने विचार करण्याचे कारण कोणाला वाटत नाही.
श्रद्धा आणि श्रद्धा
आदरांजली : मेघश्याम पुंडलिक रेगे
(२४-१-१९२४ ते २८-१२-२०००)
महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानात्मक व वैचारिक क्षेत्रात गतशतकाच्या उत्तरार्धात ज्यांनी आपल्या वैचारिक व्यक्तिमत्वाने ठसा उमटविला, त्यांपैकी प्रा. मे.पुं. रेगे हे एक महत्त्वाचे विचारवंत होते. त्यांच्या जीवनाचे वर्णन करतांना प्रा. रा.भा. पाटणकरांनी लिहिले आहे, “प्रा. रेगे एक तत्त्वज्ञ, प्रबोधनकार आणि सॉक्रेटिक शिक्षक होते. त्यांचे जीवन म्हणजे समाजातील सर्व थरांवर काम करीत करीत मुक्त होण्याचा एक मूर्तिमंत प्रवास होय.”
तर, तत्त्वज्ञ दि.य.देशपांडे यांनी रेग्यांविषयी लिहिले आहे, “या व्यक्तीपुढे आपण सर्व खुजे आहोत हे सतत जाणवते.”
स्वत: ‘आजचा सुधारक’ परिवाराने त्यांच्याविषयी म्हटले आहे, “प्रा.
स्फुट
वैयक्तिक आयुष्यात देवावर, नियतीवर श्रद्धा असण्याला आक्षेप असण्याचे कारण नाही. पण सार्वजनिक, सामाजिक जीवनात तिची लुडबूड होते तेव्हा चिंता वाटते, वाढते. संघटित धर्मसंस्था सत्तापिपासू लोकांना हमखास आपल्याकडे खेचून घेते आणि मग त्यात राजकारणातील अनिष्ट गोष्टी शिरतात. पाश्चिमात्य राष्ट्रात चर्चचा इतिहास पाहा. आपल्याकडील रथयात्रेपासून सुरुवात झालेल्या घटना पाहून हेच दिसते की जास्त संख्येने लोक आकृष्ट होतात तेव्हा राजकारण्यांचे लक्ष तिकडे जाते आणि राममंदिर हा भक्तीचा नव्हे तर राजकारणाचा विषय होतो. राम हा दर्शनी किंवा ‘फ्रंट’ म्हणतात तसा दाखवायचा भाग बनतो आणि त्याच्या आडून राजकारणाची सूत्रे हलू लागतात.
नास्तिकवादः एक अल्प परिचय
अगदी लहानपणापासूनच आपल्यावर संस्काराच्या नावाखाली देव-धर्म यांची शिकवण दिली जाते. पालकांना जरी देव-धर्माचे अवडंबर पसंद नसले तरी समाजात वावरताना त्यांच्या मुलां/मुलींची कळत-नकळत देव-धर्माची, पुसटशी का होईना ओळख होते. सण-उत्सव साजरा करत असताना देव-धर्माच्या उदात्तीकरणाला पर्याय नसतो. कुठल्याही गावातील वा शहरातील गल्लीबोळात एक फेरी मारली तरी कुठे ना कुठे देऊळ दिसते. या देवळाच्या गाभाऱ्यातील देवाच्या/देवीच्या मूर्तींची मनोभावे पूजा-अर्चा करणाऱ्यांची कधीच कमतरता नसते.
परंतु एकविसाव्या शतकात वावरताना आजच्या पिढीतील विचार करू शकणाऱ्या तरुण/तरुणींच्या मनात देव-धर्म, पूजा-अर्चा, सण-उत्सव, जत्रा-यात्रा इत्यादींच्याबद्दल नक्कीच प्रश्न पडत असतील.
बुद्धिप्रामाण्यवादाचे स्वरूप
प्रा. मे.पुं रेगे ह्यांचे बुद्धिप्रामाण्यवादाचे विवेचन :
आज एकविसाव्या शतकातही ‘बुद्धिप्रामाण्यवादाचा’ उत्स्फूर्तपणे प्रचार करण्याची, त्याचे महत्त्व पटवून सांगण्याची आवश्यकता अनेकांना वाटते, त्यामागचे कारण काय? बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करणे हे आपले जीवितकार्य आहे आणि ते आपण केले तरच भारतीय समाजात काही ‘सुधारणा’ होऊ शकेल, अशी समजूत बहुधा त्यामागे असते. बुद्धिप्रामाण्यवाद ही केवळ एक विचारसरणी नसून, ती एक जीवनपद्धती आहे. मनुष्याने आपले सर्व जीवन बुद्धिप्रामाण्याने जगावे, त्याच्या जीवनाची सर्व अंगोपांगे ही बुद्धिप्रामाण्यानेच नियंत्रित व्हावीत, असे हे प्रतिपादन असते.
बुद्धिप्रामाण्यवादाचा जीवनमार्ग म्हणून स्वीकार आणि प्रचार करण्याआधी एक प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे : बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे नेमके काय?
विवेक
आस्तिक विरूद्ध नास्तिक हा वाद अनेक वर्षांपासूनचा आहे. पूर्वी आपण नास्तिक आहोत हे सांगायला माणूस घाबरायचा, पण आता तो एवढा धीट झालाय की नास्तिकांचे मेळावे भरवून, व्यासपिठावर उभा राहून “मी नास्तिक आहे” असे तो निर्भीडपणे सांगू शकतोय. एवढेच नाही तर शंतनू अभ्यंकरांसारखा डॅाक्टर ‘असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठे?’ असा लेखही लिहू शकतोय (संदर्भ : लोकसत्ता, १८ डिसेंबर २०२२ चा अंक)
देवाला मानले, कर्मकांडे केली, उपवास धरले (साग्रसंगीत उपासाचे पदार्थ खाऊन) तर तो आस्तिक व ह्यातले काहीसुद्धा केले नाही तर तो नास्तिक ठरतो का?