विषय «पुस्तक/व्यक्ती परिचय»

अनोखा उंबरठा

लेखक : वि. गो. कुळकर्णी
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, मूल्य : ६० रुपये

आमच्या मित्राला ‘अनोखा उंबरठा’ हे पुस्तक अतिशय आवडले, म्हणून त्याने आमच्यासह आणखी काही इष्टमित्रांना ते चक्क सप्रेम भेट दिले. पुस्तक अगदी ताजे म्हणजे १ मे १९९७ रोजी प्रथमावृत्ती निघालेले! झपाटल्यासारखे वाचून काढले अन् मित्राच्या निवडीला व भेट देण्यातील कल्पकतेला मनोमन दाद दिली.

‘अनोखा उंबरठा’ हे पुस्तक वि.गो. कुळकर्णी ह्यांनी लिहिलेल्या विज्ञानविषयक चिंतनपर ललित निबंधांचा संग्रह आहे. १९९५ मध्ये दैनिक ‘लोकसत्ते’त दर रविवारी हे सदर प्रसिद्ध होत असे. जवळजवळ ५२ लेखांचा हा संग्रह पुस्तकरूपाने आज वाचकांसमोर सादर होत आहे.

पुढे वाचा

कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स यांमधील एक महत्त्वाचा मतभेद – आस्तिकतेविषयी

माझे विज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचे आकर्षण हे मुख्यतः The Self and Its Brain या कार्ल पॉपर व जॉन एकल्स या उच्च दर्जाच्या दोन विद्वान तज्ज्ञांनी एकत्र मिळून लिहिलेल्या ग्रंथापासून सुरू झाले.

कार्ल पॉपर हे अर्वाचीन तत्त्वज्ञान्यांत, विशेषत: विज्ञानविषयक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात, आघाडीवरचे तत्त्वचिंतक म्हणून आता सर्वमान्य झाले आहेत. The Logic of ScientificDiscovery या उद्बोधक ग्रंथाचे ते लेखक आहेत. जॉन एकल्स (Eccles) हे नोबेल पारितोषिक विजेते, प्राणिशास्त्र (Biology), वैद्यकशास्त्र, आणि मानवाच्या शरीरातील अत्यंत उन्नत भाग म्हणजे मेंद यांवर प्रायोगिक स्वरूपाचे संशोधन करणारे श्रेष्ठ दर्जाचे वैज्ञानिक आहेत.

पुढे वाचा

चार्वाक ते आगरकर आणि सद्यःस्थिती

प्रथमच सांगतो की, माझे एकुणच वाचन फार मर्यादित आहे आणि प्रतिपाद्य विषयाचे तर खूपच कमी आहे. तरी पण आगरकरांच्या चरित्रातून, लेखनातून उद्भवलेले काही विचार कुठेही, विशेषतः आगरकर विशेषांकात न आढळल्यामुळे हे टिपण. त्यानंतर काही आनुषंगिक विचार.
आगरकरांच्या विवेकवादाचे सूत्र पूर्वीच्या एखाद्या तत्त्वशाखेशी जोडायचे असल्यास ते चार्वाकमताशी जोडता येते. प्रत्यक्ष प्रमाणाने वा सार्वत्रिक अनुभवाने जाणवत असेल ते सत्य, बाकी सर्व असत्य, असे उभय विचारप्रणालीतील साम्य ढोबळमानाने सांगता येईल. जगाचे आदिकारण, मृत्यूनंतर काय, असले प्रश्न पुरेशा साधनांच्या अभावी गैरलागू ठरतात, असा अज्ञेयवाद दोघांनाही अभिप्रेत होता.

पुढे वाचा

पुस्तक परिचय: अमेरिका: अवचटांना दिसलेली

अमेरिका
ले. अनिल अवचट मॅजेस्टिक प्रकाशन, ऑगस्ट ९२ मूल्य ६५ रु.

कॉलेजात शिकत असताना मनाला अमेरिकेची ओढ वाटायची. खरं तर मुळात इंग्लंड, इटाली, ग्रीस हे कुतूहलाचे विपय असत. ‘नेपल्स पाहावे मग मरावे’ असे भूगोलाच्या पुस्तकात पढलो होतो. ‘Rome was not built in a day अशा म्हणी, सीझर, सिसेरो, अँटनी-क्लिओपाट्रा यांचे इतिहास या साऱ्यांमुळे इटाली, व्हेनिस, पिरॅमिड्स यांच्याबद्दल जबर आकर्षण वाटे. अमेरिकेला चारशे वर्षांमागे इतिहास नाही. पण कॉलेजात राजा म्हणायचा, ‘प्रभू, इतिहास सोड. वर्तमानात ये. आज अमेरिका नंबर वन आहे. कधी ऐपत आलीच तर अमेरिका पाहा.

पुढे वाचा

कालचे सुधारकः ताराबाई मोडक (पूर्वार्ध)

१९ एप्रिल १९९२ रोजी, ताराबाई मोडकांची जन्मशताब्दी झाली. ताराबाई थोर शिक्षणतज्ज्ञ, विशेषतः पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दलचे त्यांचे कार्य फार मोठे आहे. पण लक्षात आले की, ताराबाईंचे कार्यच काय, नावही असावे तितके प्रसिद्ध नाही. लोकांचे अशा गोष्टींकडे लक्षच कमी आहे का? असेल. महाराष्ट्राचे सामाजिक सुधारणेसाठी थोडेबहुत नाव आहे. हे कौतुक ऐकायला बरे वाटते. पण त्याच्या मागे शेदीडशे वर्षांचे काम आहे, हे विसरायला होते. सुधारणावाद्यांची महाराष्ट्रात एक परंपरा आहे. ती क्षीण असेल, पण अजून खंड नाही. अशा कार्याच्या बाबतीत ताराबाईंनी म्हटले आहे, हा खटाटोप कशाला करायचा, हा प्रश्न … खुर्चीवर बसून विचार करण्याच्यापेक्षा प्रत्यक्ष काम करणार्‍यांना जास्त वेळा बोचतो.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय, चार्वाकदर्शन

द्वितीयावृत्तीत ( १९८७ ) पदार्पण केलेले ‘चार्वाकदर्शन’ हे डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे उपलब्ध ग्रंथांच्या मदतीने चार्वाकमताचे विवेचन करण्याचा प्रयत्न होय. चार्वाकदर्शन हे एक नास्तिक दर्शन, वैदिक परंपरेची चाकोरी सोडून अनुभव व त्यावर आधारलेली विचारप्रणाली निर्भीडपणे मांडणारे. त्यामुळे इतर दर्शनांच्या तुलनेत त्याचे वेगळेपण जाणवते. दुर्दैवाने भारतात या दर्शनाची सदैव उपेक्षाच झाली. जडवादाचा पुरस्कार करणारे हे दर्शन खऱ्या अर्थाने ‘दर्शन’ (तत्त्वज्ञान) नाहीच, हे दर्शन लिहिणाऱ्या व्यक्ती व त्यांचे अनुयायी अगदीच यथातथा बौद्धिक कुवत असलेल्या व्यक्ती असून हे अत्यंत हास्यास्पद असे दर्शन आहे, अशी याच्याविषयीची अन्य दार्शनिकांची व विद्वानांची भूमिका आहे.

पुढे वाचा

एक निरीश्वरवादी ग्रामसेवक दांपत्य

आंध्रमध्ये विजयवाडा या ठिकाणी ‘एथिइस्ट सेंटर’ ही संस्था आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ म्हणून अलिकडेच असा तीन दिवस एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याला आशिया, युरोप आणि अमेरिका या तीन खंडांतून मानवतावादी, निरीश्वरवादी, बुद्धिवादी, बिनसांप्रदायिक, स्वतंत्र विचारांचे पुरस्कर्ते, नास्तिकता समर्थक आणि परिवर्तनवादी चळवळीशी निगडित प्रतिनिधी आले होते. देशातूनही ८०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रा रामचंद्र गोरा आणि त्यांच्या पत्नी सरस्वती गोरा यांनी या वैशिष्टयपूर्ण संस्थेचा ५० वर्षापूर्वी मुदुनुरु या आंध्र प्रदेशामधील कृष्णा जिल्ह्यातील खेड्यात पाया घातला..

पुढे वाचा

पुस्तक परिचय

हिंदू संस्कृती आणि स्त्री
ले. आ. ह. साळुखे (प्रकाशक: स्त्री उवाच, मुंबई, १९८९ मूल्य रु.३५)

‘स्त्री उवाच ने अलीकडे प्रकाशित केलेले (९ डिसेंबर १९८९) डॉ. आ. ह. साळुखे यांचे हिंदू संस्कृती आणि स्त्री हे पुस्तक वाचनात आले. यात लेखकाने हिंदू संस्कृतीचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोण किती अन्याय्य होता ह्याचे अतिशय संतुलितपणे, कोणताही अभिनिवेश न बाळगता, अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन जवळ जवळ तेवीस ग्रंथांच्या साह्याने केलेले आहे. त्या ग्रंथांची सूची पुस्तकाच्या सुरुवातीला दिली आहे. त्यात मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती इत्यादि स्मृतींबरोबरच इतरही धर्मग्रंथांचा समावेश आहे.

हे विवेचन करीत असतांना डॉ.

पुढे वाचा

वा.म. जोशी यांची वाङ्मयविषयक भूमिका

वामन मल्हार जोशी यांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी प्रस्तुत लेखात केलेली नाही. त्यांच्या वाड्मयविचाराची अशा प्रकारची मांडणी व चिकित्सा वा.ल. कुळकर्णी व अन्य काही ज्येष्ठ समीक्षकांनी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळेच वामन मल्हारांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी करण्यापेक्षा त्यांचा वाड्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण कोणता आहे, म्हणजेच त्यांची वाड़मयविषयक भूमिका कोणती आहे, ती कोणत्या तत्त्वांवर, सूत्रांवर आधारलेली आहे. तिची वैशिष्टये कोणती आहेत, याची चर्चा -चिकित्सा प्रस्तुत लेखात केली आहे.

वामन मल्हारांनी फार मोठ्या प्रमाणात वाङ्मयविषयक लेखन केले आहे असे दिसत नाही. ‘विचारसौंदर्य’ हा वाङ्मयविषयक लेखसंग्रह व अन्य काही ग्रंथनिविष्ट वा असंगृहीत वाङ्मयविषयक लेख वा परीक्षणे हे त्यांचे या प्रकारचे लेखन आहे.

पुढे वाचा

वामन मल्हार जोशी

वामन मल्हारांचा जन्म २१ जानेवारी १८८२ रोजी झाला, आणि सुमारे ६१ वर्षाचे कृतार्थ जीवन जगून २० जुलै १९४३ या दिवशी मुंबईला त्यांचा अंत झाला. या घटनेलाही जवळ जवळ अर्धशतक लोटले आहे. वामनरावांची साहित्यातील कामगिरी तशी मोलाचीच. परंतु तत्त्वचिकित्सा – विशेषतः नैतिक तत्त्वज्ञान आणि एकूणच चौफेर तत्त्वविवेचन करणारे ते मराठीतले पहिले आधुनिक लेखक आहेत असे म्हणता येईल. त्यांच्या जीवनाचा पुढील संक्षिप्त आलेख नव्या पिढीतील सामान्य वाचकांना उपयुक्त होईल असे वाटते.

वामन मल्हार तत्त्वज्ञान हा विषय घेऊन १९०६ साली एम.ए. झाले. १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाला ते गेले असता त्यांची प्रोफेसर विजापूरकरांशी गाठ पडली.

पुढे वाचा