विषय «इतर»

लैंगिक वाङ्मय — एक तुलना (पूर्वार्ध)

(२२ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या वाङ्मय प्रकाशन मंडळाच्या विनंतीवजा लिहिलेला लेख)
या अवाढव्य विषयाचे समर्पक विवेचन करण्यास जरूर तितकें वाचन आम्ही केलेले नाही, हे प्रथमच सांगणे बरें. असे असूनहि असा विषय लिहावयास घेतला याचे कारण इतकेंच, की या विषयावर लेख लिहिण्याचे विनंतीला दुसऱ्या कोणीही मान दिला नाही. तेव्हा तो अपुरा वाटल्यास तो आमचा दोष नाही.
वाङ्मयांत सामान्यतः जरी फक्त लिखाणाचाच समावेश करण्याची पद्धत आहे, तरी त्या शब्दाचा मूल अर्थ पाहिल्यास त्यांत भाषणाचाही समावेश करणे जरूर आहे आणि कामविषयक बाबतींत याला महत्त्व आहे.

पुढे वाचा

नीतीला धर्माकडून प्रेरणा कशी मिळत राहील?

[रिचर्ड पी. फाईनमन हा या शतकातला एक अग्रगण्य भौतिकीतज्ज्ञ. विज्ञानाची चुकतमाकत, तात्पुरती मते बनवत, थोड्याशाच पण अत्यंत भरवशाच्या ज्ञानाकडे जाणारी पद्धत वारंवार इतर अ-वैज्ञानिकांसमोर मांडण्यासाठीही त्याची ख्याती. या पद्धतीवरच्या आग्रहानेच सतत ‘हे मला माहीत नाही’, ‘हे मला समजायला अवघड वाटते’, असे तो म्हणतो — सामान्य माणूस ज्या ठामपणाने ‘हे चूक आहे’, ‘हे तर्कविसंगत आहे’, असे म्हणतो, त्या ठामपणाला फाईनमन हट्टाने सौम्य करतो. त्याने १९६३ साली दिलेल्या तीन ‘जॉन डान्झ व्याख्यानां’चे ‘द मीनिंग ऑफ इट ऑल’ या नावाने पुस्तक निघाले आहे (पेंग्विन, १९९८).

पुढे वाचा

डॉ. आंबेडकर पुतळा-प्रक्षालन : एक लाक्षणिक कृती

विवेकवाद वाढवावयाचा असेल तर बौद्धिक लढ्यांबरोबर लाक्षणिक कृत्यांच्या माध्यमातूनही जनजागरणाचे प्रयत्न करावयाचे असतात ह्या श्री. भा. ल. भोळे यांच्या मताशी मी सहमत आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर पुतळा धुण्यामागे हेच कारण होते. आ. सु.च्या सल्लागार–मंडळातून श्री. भोळे यांना काढण्याची चूक आजचा सुधारक करणार नाही याची मला खात्री वाटते.
भारताला पाकिस्तानसारख्या धार्मिक व फासिस्ट राज्यकारभाराकडे घेऊन जाण्याचा संघाचा मानस आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध लिहिणाऱ्या श्री. बा. के. सांवगीकर व श्री. रवीन्द्र विरूपाक्ष पांढरे यांना समजला नसेल असे नाही. विवेकवादाचा मुखवटा घालून संघिस्ट प्रवृत्तीला पोषक अशी कृती करणारे हे अरुण शौरी यांचे चेले भारतात व इथे अमेरिकेतही कमी नाहीत.

पुढे वाचा

विद्वेषाने विद्वेष वाढतो

‘आजचा सुधारक’च्या जून २००० च्या अंकात नागपूरच्या दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शुद्धीकरणाच्या संदर्भात दोन पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. माझी ही प्रतिक्रिया.
विसाव्या शतकात भारतात (की हिंदुस्थानात?) लो. टिळक, गोखले, म. गांधी, पं. नेहरू स्वा. सावरकर, भारतरत्न आंबेडकर आदी थोर व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्याविषयी सर्व भारतीयांना (केवळ हिंदूंनाच नव्हे) पुरेसा आदरभाव असणे अपेक्षित आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी भारतीय घटनेच्या पुस्तकातच बंदिस्त आहे का? रा. स्व. संघाच्या प्रमुखांनी घटनेच्या समीक्षेच्या संदर्भात हिंदुत्वाची पुष्टी करणारे विधान करून डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातल्याबरोबर ब्राह्मणी पद्धतीने ‘शांत पापम्’ म्हणून पुतळ्याला स्नान घालण्यात कोणता पुरोगामीपणा आहे ?

पुढे वाचा

देवदानवां नरें निर्मिलें . . .

आमच्या देशात आजही यंत्रसंस्कृतीपेक्षा मंत्रसंस्कृतीचाच पगडा अधिक आहे. आणि ती केवळ ब्राह्मणांपुरतीच मर्यादित नाही. दर मंगळवारी गणपतीपुढे नारळ, उदबत्त्या, पेढ्यांचे पुडे घेऊन तास न् तास हजारो माणसे उभी राहतात, ती काही फक्त ब्राह्मणच नसतात. ही माणसे वैयक्तिक नवस आणि परलोकात स्वतःची सोय करू पाहतात. … पण अशी रांग इस्पितळाच्या पुढल्या पेट्यांतून स्प्रया-सव्वा रुपया टाकायला कधी उभी राहत नाही. परलोक, स्वर्गलोक ह्या मंत्रसंस्कृतीतल्या पगड्यामुळे आम्ही मंत्रमुग्ध होऊन विचाराची दारे बंद करून झोपेत चालल्यासारखेच जीवनात चालतो आहोत. ह्या मंत्रसंस्कृतीतच जन्मजात शुद्धाशुद्धत्वाच्या कल्पना स्तलेल्या असतात.

पुढे वाचा

प्रिय वाचक

चाटे कोचिंग क्लासेस निमित्ताने काही प्रश्न पुढे आले आहेत. सरकारी भरघोस मदतीवर शाळा कॉलेजेस चालू असताना कोचिंग क्लासेसची गरजच काय हा त्यातला एक प्रश्न. त्यांच्यावर बंदी घालावी हा तसलाच एक भाबडा उपाय. प्रचंड खर्च करून आणलेली अद्ययावत यंत्रसामग्री, सोयीस्कर इमारती आणि उत्तम तज्ज्ञ डॉक्टर सरकारी हॉस्पिटलमध्ये असताना खाजगी डॉक्टरांची, जशी आवश्यकता वाटत असते तसेच काहीसे कोचिंग क्लासेसचे आहे. दुसरे उदा. द्यायचे झाले तर प्रवासाच्या किमान सोयी पुरविणाऱ्या, माफक दरात चालणाऱ्या एस्. टी. गाड्या असता, नुसत्या दर्शनी आरामगाड्या हव्यात कशाला असाही प्रश्न पडू शकतो.

पुढे वाचा

संस्कृती व लग्नाचे वय

भारताची संस्कृती फार उच्च दर्जाची आहे, पाश्चात्त्य देशांमध्ये नीती खालच्या दर्जाची आहे, अशी एक समजूत आपल्यात आहे. आजची नाही तर गेल्या शंभर वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. आपली संस्कृती वरच्या दर्जाची असण्याची जी अनेक कारणे मानली जातात, त्यांत लवकर लग्न करणे हे एक, आणि स्त्रियांच्या बाबत ९९ टक्के स्त्रिया व पुरुष दोघांचीही दुराचाराची शक्यता कमी होते अशी एक भ्रामक कल्पनाही आहे.

नव्याण्णव टक्के लवकर लग्न करण्याला संस्कृती व दारिद्र्य दोन्हीही गोष्टी कारणीभूत आहेत. स्त्रीला रोजगार मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसल्याने लग्न करणे प्राप्तच होते.

पुढे वाचा

अरवली गाथा (२)

प्रस्तुत लेखकाने फेब्रुवारी महिन्यात, १०-२-२००० पासून १४-२-२००० पर्यंत पाच दिवस तरुण भारत संघाच्या काही कार्यकर्त्यांच्या समवेत ६/८ गावांची भटकंती केली, २०/२५ जोहड, अनिकट इत्यादि पाहिले, जमेल तितक्या मंडळींशी संवाद, चर्चा केल्या आणि जो अनुभव मिळाला तो थोडक्यात असा —-
१. फेब्रुवारी २००० मध्ये २०/२५ पैकी फक्त दोन जोहडांमध्ये थोडेसे पाणी होते. बाकी जोहड, अनिकट, बांध हे कोरडे होते.
२. गावांमधल्या आणि शेतांमधल्या विहिरींना भरपूर पाणी होते. शेतांवर डिझेलचे पंप होते आणि कितीही उपसा केला तरी चालेल अशी परिस्थिती होती.
३. शेते हिरवीगार होती.

पुढे वाचा

लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?

‘लग्नानंतर स्त्रीचे नाव बदलावे का?’ हा मुळी कधी प्रश्नच उपस्थित झाला नाही. त्याचा स्त्रीच्या अस्मितेशी काही संबंध आहे अशी जाणीवही होऊ नये इतकी ती अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. मग त्याचे वेगवेगळे कंगोरे बोचू लागणे ही गोष्ट दूरच! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीने पुरुषाच्या अधीन राहावे ही समाजमानसाने, मग त्यात स्त्रियाही आल्याच, पूर्णतः स्वीकारलेली गोष्ट असल्यामुळे पिढ्यानपिढ्या त्यात कुणाला काही वावगे वाटलेले नाही. परंतु गेल्या ५०-६० वर्षांत स्त्रीविषयक कल्पना भराभर बदलत गेल्यामुळे आणि स्त्रीमुक्तीचे वारे वाहू लागल्यामुळे स्त्रीची अस्मिता आणि स्त्रीचा समान दर्जा या जाणीवा निर्माण झाल्या.

पुढे वाचा

विवेक म्हणजे काय?

‘विवेक’ हा शब्द ‘reason’ या इंग्लिश शब्दाचा पर्याय म्हणून आम्ही वापरत आहोत हे आमच्या वाचकांना माहीत आहे. Reason’ या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून ‘बुद्धि’ हा संस्कृत शब्द वापरला जातो हे खरे आहे. पण ‘बुद्धि’ या शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळे तो शब्द वापरणे आम्हाला गैरसोयीचे वाटते. शिवाय आगरकरांनी ‘Rationalism’ ला समानार्थी म्हणून ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला होता. त्यामुळे ‘विवेकवादी म्हणजे rationalist’ हे आम्हालाही अभिप्रेत आहे याचे वाचकांना स्मरण देऊन या लेखाच्या विषयाकडे वळतो.
या लेखाचा विषय आहे ‘विवेक म्हणजे काय?’ याचे उत्तर विवेक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये “reason” म्हणतात ते’ हे उत्तर वर येऊन गेले आहे असे कोणी म्हणेल.

पुढे वाचा