विषय «इतर»

ब्राह्मणांचे गोमांसभक्षण

धार्मिक दृष्टीने गोहत्या हा विषय संवेदनशील असला तरी सत्यशोधन कोणालाही आक्षेपार्ह वाटू नये. वैदिकवाडमयाचे व प्राचीन संस्कृत, पालि-प्राकृत साहित्याचे जे विद्वान यांच्या संशोधनातून व खुद्द वेदांतून मूळ वचने देऊन प्रस्तुत निबंध सज्ज केला आहे.
रजनीकांत शास्त्री, साहित्य सरस्वती, विद्यानिधि –
(१) “ऋग्वेद के अध्ययनसे पता चलता है कि वैदिककाल में जौ और गेहूं खेतों की आज तत्कालीन हिन्दुओंके मुख्य खाद्य पदार्थ थे।… मांसभोजनभी उस कालमें बहुत प्रचलित था और आधुनिक हिन्दू जनता यह जानकर चौक उठेगी कि अन्य खाने योग्य पशुओंके मांस की तरह गोमांस भी खाद्य पदार्थों में सम्मिलित था”
(हिंदु जाति का उत्थान ओर पतन पृ.

पुढे वाचा

आम्ही आणि ‘ते’! (भाग १)

खिलारे नानावटींनी निर्माण केलेला वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच मिलिंद देशमुख ह्यांचे पत्र आले. (पत्र पुढे येत आहे.) त्या पत्राच्या निमित्ताने आजचा सुधारकची जातिवादासंबंधीची भूमिका अधिक स्पष्ट होईल असे वाटले आणि जातिवाद म्हणजे फक्त ब्राह्मणब्राह्मणेतर वाद नाही हेही एकदा निःसंदिग्धपणे सांगता येईल असे मनात आले. त्याशिवाय संपत्ती कशी निर्माण होते, तिचा लाभ काही गटांनाच का होतो, तिचे सर्वत्र सारखे वाटप आजपर्यंत का होऊ शकलेले नाही, भविष्यात तसे व्हावे म्हणून काय करावे लागेल, ह्या प्रश्नांची चर्चा त्या पत्राच्या प्रकाशनातून सुरू करता येईल असे वाटले.|

पुढे वाचा

सुखाचा दर्जा केवळ मानीव (?)

‘कांही विशिष्ट प्रकारच्या शरीरसुखांना लोक उच्च कां मानतात आणि इतर प्रकारांना नीच कां मानतात . . . . संगीताने होणारा आनंद उच्च प्रकारचा मानण्याची पद्धत आहे, पण एखादा आवडीचा पदार्थ खातांना होणारा आनंद कमी दर्जाचा मानतात. असे कां? सुख शरीराच्या एका विशिष्ट भागाला होते असे मानले, किंवा सर्व प्रकारच्या संवेदनांचे स्थान मेंदूतच आहे असे मानले, तरी या दोन प्रकारांत किंवा इतर प्रकारांत उच्चनीच भाव कां असावा? शरीरसुखासंबंधी आणखी विचार केला तर त्यांत पुष्कळच गंमती दिसतात. वेळीं अवेळीं उपास करणे हा धर्मबाजीत एक विशेष सद्गुण समजतात आणि गांधींनी तर जरा कोठे खुट झाले की उपास करायची फॅशनच पाडली आहे.

पुढे वाचा

हिंदू-मुस्लिम सहजीवन

‘इतिहासाच्या एका क्षणी हिंदुस्थानची फाळणी झाली. फाळणीची चिकित्सा होऊ शकेल, फाळणीचे गुन्हेगारही ठरवता येतील. पण ते चक्र आता उलट फिरविण्याचे स्वप्न पाहू नका. कित्येक प्रांतातल्या लोकांनी या देशातून फुटायचा निर्णय त्यावेळी घेतला होता हे विसरू नका. आता भारतातल्या आठ कोटी मुसलमानांना पाकिस्तान आश्रय देणार नाही. ही आठ कोटी माणसे आपण काही समुद्रात बुडवू शकत नाही. तेव्हा यांच्याशी जुळवून घेण्याचाच विचार केला पाहिजे. त्यांना बरोबरीचे स्थान देऊन सर्वसामान्य मुस्लिम समाजाची मुल्लामौलवींच्या संधीसाधू पकडीतून कशी सुटका करता येईल ते पाहा. त्यासाठी त्यांचा द्वेष करणे सोडून त्यांच्यातल्या सामाजिक सुधारणांना हात घातला पाहिजे.

पुढे वाचा

मुस्लिम समाज-सुधारकांची परिषद

नोव्हेंबरच्या २० आणि २१ या तारखांना पुणे येथे एस. एन. डी. टी. कॉलेज, कर्वे रोड, पौड फाटा या ठिकाणी एक मुस्लिम महिला परिषद होणार आहे. देशभरातून महिलांना या परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण आहे. पुण्याबाहेरच्या व्यक्तींची राहण्याखाण्याची व्यवस्था परिषदेच्या जागी होईल. ज्यांना प्रवासाचा खर्चही झेपणे अवघड आहे त्यांना दुस-या वर्गाचे रेल्वेचे भाडे मिळेल. ही परिषद ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स’ या संस्थेच्या वतीने होत आहे. तिचे जनरल सेक्रेटरी श्री. सय्यदभाई, पुणे ह्यांनी आगामी परिषदेचे माहितीपत्रक आमच्याकडे धाडले आहे. या परिषदेत मुस्लिम महिलांच्यासाठी पुढील मागण्या केल्या आहेत.

पुढे वाचा

पुनर्जन्म, धम्म आणि आरक्षण

आजचा सुधारक अप्रत्यक्षरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उचलून धरीत आहे. त्यामुळे दलितोद्धाराच्या कामास हातभार लागत आहे. डॉ. आंबेडकरांना देव व आत्मा यांचे अस्तित्व मान्य नव्हते. आजचा सुधारकला हा विचार आपल्या विवेकवादातून मांडावयाचा आहे.

आपल्या जुलै १९९९ च्या अंकात श्री. अनिलकुमार भाटे लिहितात, बौद्धधर्माचा कर्मसिद्धान्त व हिंदुधर्माचा कर्मसिद्धान्त एकच आहे. बौद्धधर्मात ईश्वराचे अस्तित्व मानले नाही तरी हा कर्मसिद्धान्त अबाधित राहतो. अनेक जन्मांमध्ये पडलेल्या (संचिताच्या) असंख्य प्रतिबिंबाचा प्रचंड साठा आपण सदैव वागवीत असतो.”

याउलट डॉ. चिंचोळकरांनी सप्टेंबरच्या अंकात तर्कशुद्ध बाजू मांडली. कर्मसिद्धान्त सृष्टिनियम आहे असे मानल्यास एखाद्या चेतनशक्तीद्वारे कर्मफल उत्पन्न होते व कर्मसिद्धान्त चालतो, असे मानावे लागेल.

पुढे वाचा

धर्मांतर-ग्रॅहॅम स्टीन्सची हत्या

सांप्रत धर्मांतर हा आपल्या देशांत, कधी नव्हे तो अतिशय वादग्रस्त विषय बनलेला आहे. ओरिसामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या करण्यात आलेल्या हत्या, गुजरातमध्ये अल्पसंख्यक ख्रिस्ती समाजावर आदिवासींकडून झालेले तथाकथित हल्ले, या सर्वांचे मूळ धर्मांतर आहे असे म्हटले जाते. त्यांचे जगभरांत पडसाद उमटले. निरनिराळ्या देशांतील वृत्तपत्रांनी या प्रकरणाला अशी काही प्रसिद्धी दिली की हिंदूधर्माचा सहिष्णुतेचा दावा पोकळ वाटावा. एवढा गदारोळ माजल्यानंतर विरोधी पक्षनेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी डांग जिल्ह्याला भेट दिली. डांगमधील ख्रिश्चन आणि आदिवासी यांच्यातील संघर्ष किरकोळ असून त्याची विदेशी वृत्तपत्रांनी अतिशयोक्त आणि अतिरंजित वर्णने दिली आहेत असा पंतप्रधानांनी खुलासा केला.

पुढे वाचा

जातिव्यवस्था आणि नीरद चौधरी

एवढ्यातच, निधन झालेल्या सुप्रसिद्ध लेखक व इतिहासकार नीरद सी. चौधरी यांच्या “दि कॉन्टिनन्ट ऑफ सर्सी” या ग्रंथाबद्दल मला एक कुतूहल वाटते.
संदर्भ आहे, हिंदूंच्या जातिव्यवस्थेचा. हा मुद्दा चावून चोथा झालेला आहे, हे मान्य आहे. पण त्याचे महत्त्व वा अस्तित्व अजूनही कायम असल्याने, त्यावर पुन्हापुन्हा बोलले-लिहिले जाते. नव्या सहस्रकाच्या उदयाला जेमतेम एक वर्ष बाकी आहे. सा-या जगाचे स्वरूप इंटरनेटसारख्या साधनांनी बदलून गेले आहे. पण हिंदू लोक अद्यापही कालबाह्य झालेली जातिव्यवस्था मानतात आणि आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत, हे सत्य आहे. त्यातच, नीरद चौधरीसारख्यांनी जातिव्यवस्थेची केलेली भलावण वाचून माझ्यासारख्या जिज्ञासू पण अल्पवुद्धी माणसाला गोंधळल्यासारखे होते.

पुढे वाचा

एकविसावे शतक : बायोगॅस तंत्रज्ञानासमोरील आव्हाने

आपल्या देशामध्ये वायोगॅस तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावरील प्रसारकार्याला साधारणपणे २० वर्षांचा इतिहास आहे. या २० वर्षांमध्ये एकीकडे बायोगॅस तंत्रज्ञानाने, ग्रामीण भागामध्ये विकेंद्रित व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून योग्य, अशा पद्धतीने ऊर्जेची व खताची समस्या सोडविण्यामध्ये एक नवा आशावाद जागविला असला, तरी दुसरीकडे गावोगावी उभारलेल्या बायोगॅस-संयंत्रापैकी अनेक संयंत्रे बंद असल्यामुळे त्या त्या ठिकाणी गावकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानासंबंधी उदासीनता आली आहे व काही ठिकाणी “बायोगॅस संयंत्रे चालू शकत नाहीत, हे तंत्रज्ञान कुचकामी आहे” अशा प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे. या वीस वर्षांच्या इतिहासामधून आपण धडा शिकलो नाही व तंत्रज्ञानाच्या भविष्यकालीन अंमलबजावणीमध्ये आपण योग्य ती सुधारणा केली नाही तर या कार्यक्रमामध्ये आज जे मरगळलेले वातावरण तयार झाले आहे ते दूर होणार नाही.

पुढे वाचा

हे प्रभो विभो, अगाध किति तव करणी!

(१) धरणीकंपासारख्या प्रसंगीही महात्मा गांधीसारखे वकील ईश्वराचा चांगुलपणा सिद्ध करू पाहतात. त्याहून ताण युक्तिवाद एका कॅथॉलिक धर्मगुरूने केला. तो असा-कॅनडामधील माँट्रील शहरी एकदा एका सिनेमागृहाला आग लागली. तो खेळ मुद्दाम शाळेतील लहान मुलांसाठी होता. त्या आगीत सुमारे शंभर मुले जळून मेली. ती रोमन कॅथॉलिक पंथाच्या फ्रेंच लोकांची होती ईश्वराच्या दयाळूपणाचा हा विचित्र प्रकार ईश्वराला कमीपणा आणणारा होता. पण धर्मगुरू वस्ताद होते. त्यांनी असे पुकारले की शहरात पाप वाढल्यामुळे ईश्वराने लोकांना शिक्षा करण्याकरिता असा सूड घेतला. एकाने याहीपेक्षा जास्त कुशलतेने ईश्वराच्या दयाळू पणाचा खुलासा केला की, स्वर्गात देवदूत कमी झाले होते आणि ईश्वराला आणखी देवदूतांची गरज होती.

पुढे वाचा