आजचा सुधारकच्या जानेवारी २००० च्या अंकात श्री. वि. ग. कानिटकर आणि श्री. माधव रिसबूड यांची म. गांधींच्या शेवटच्या उपोषणाबाबतची पत्रे वाचली. त्यांच्या मते म. गांधींचे हे उपोषण भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावेत यासाठीच होते. याबाबतची वस्तुस्थिती ध्यानात यावी म्हणून लिहीत आहे.
देश भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये विभाजित झाल्यानंतर भारतातील मालमत्तेचेही वाटप झाले. भारतातील शस्त्रास्त्रे व दारूगोळा निर्माण करणारे कारखाने भारतातच राहावेत आणि त्याबदली पाकिस्तानला ७० कोटी रुपये द्यावेत असा करार झाला. त्यांतील १५ कोटी रुपयांचा हप्ता पाकिस्तानला देण्यात आला होता.
विषय «इतर»
गोमांसभक्षण: एक ऐतिहासिक वास्तविकता
डिसेंबर १९९९ आ. सु.च्या अंकात मित्रवर्य डॉ. भाऊ लोखंडे यांचा ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला. लेखावरील प्रतिक्रिया वाचनात आल्या. लेखकाच्या हेतूविषयी त्यांत चर्चा आहे. पण ऋग्वेदकाली ब्राह्मण गोमांस खात नसत असे विधान या प्रतिक्रियावाद्यांनी केलेले नाही. याचा अर्थ असा की भाऊंचा पूर्वपक्ष त्यांना मान्य असावा. उत्तरपक्ष करण्यासाठी त्यांनी ऋग्वेदाचे सांस्कृतिक अध्ययन केले नसावे. डॉ. लोखंडे ह्यांनी संशोधनात्मक लेखात ऋग्वेद ते भवभूती (सातवे शतक) या कालखंडील मांसभक्षणाचा पुरस्कार करणारी वचने दिलेली आहेत. सोमेश्वराच्या मानसोल्लास (१२ वे शतक) या संस्कृत ग्रंथात महाराष्ट्रात प्रचारात असणा-या मांसभोजनात डुकराच्या मांसापासून किती प्रकारचे पदार्थ बनतात त्याची पाकक्रिया सांगितली आहे (तिसरा उल्लास) या अशा लेखामुळे कर्मठांचा दुर्वास होऊ शकतो.
सॉक्रेटीस: सत्यप्रेमी की स्वार्थप्रेमी?
सॉक्रेटीसचे स्थान पौर्वात्य अन् पाश्चात्त्य संस्कृतीत ध्रुवाच्या तान्यासारखे अढळ होऊन बसले आहे. माझे अमेरिकन शिक्षक त्याच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा करून त्यानेच जनकल्याणासाठी तत्त्वज्ञान स्वर्गातून पृथ्वीवर आणले असे मोठ्या अभिमानाने ठासून सांगत. त्यावेळी मला नेहमी आम्हाला शिकविणा-यांना अशा शिक्षकांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास किती एकांगी असतो ह्याची चांगली कल्पना येई. मी एकदा चर्चेच्या वेळी म्हणालो, “सर, प्लेटोच्या पुस्तकांतील साक्रेटीसने आत्म्याच्या अमरत्वाबाबतची व पुनर्जन्माबाबतची केलेली चर्चा माझ्यासारख्या भारतीय विद्यार्थ्याला नवीन अशी वाटत नाही. ह्याची सांगोपांग चर्चा आमच्या उपनिषदांत व गीतेत मी वाचली आहे. त्यामुळेच सुप्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ एमर्सन हा उपनिषदांची जगातल्या उत्तम वाङ्मयात गणना करीत असे.”
आगरकरांच्या विद्याभूमीत आजचा सुधारक
अकोल्याला आगरकरांची दोन स्मारके, एक तिथले जिल्हापरिषद आगरकर हायस्कूल आणि दुसरे मनुताई कन्या शाळा. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी आगरकरांनी ज्या सरकारी हायस्कुलात विद्या घेतली त्याला आता सरकारने त्यांचे नाव दिले आहे. मनुताई कन्याशाळेची कहाणी वेगळी आहे. आगरकरांनी अकोल्याला भागवतमामांच्याकडे राहून विद्या केली. त्यांपैकी अनंतराव भागवतांची मुलगी मनुताई चार वर्षे नाममात्र वैवाहिक जीवनाचे कुंकू लावून बालविधवा झालेल्या. आगरकरांच्या प्रेरणेने पुण्याला मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन अकोल्याला त्यांनी प्रौढ स्त्रियांसाठी मोफत शिक्षण देणारे वर्ग काढले. पुढे ह्या वर्गांना लेडिज होम क्लास असे नाव देण्यात आले. तेथील शिक्षिका फुकट शिकवीत.
‘साँस’च्या निमित्ताने थोडेसे –
साँस ही टी. व्ही. च्या स्टार प्लस चॅनेलवरील मालिका शंभरावर एपिसोड्स होऊन अजून चालू आहे. ही मालिका खरोखर सरस आहे. मालिकेचा विषय साधा जिहादाचा आणि एका गंभीर समस्येला स्पर्श करणारा आहे. एका विवाहित पुरवा या विवाहबाह्य संबंधाची ही कथा आहे. पुरुष प्रथम परिणामांची पर्वा करीत पारो, cण तोही त्यांत भरडला जातो हे दाखविताना त्यात प्रबोधनाचा अभिनिवेश नसे. तो एक प्रांजळ असा कलात्मक आविष्कार वाटतो.
ही कथा एका साध्या, सुखी, उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात घडते. गौतम आणि प्रिया कपूर यांचे सधन, सुखवस्तु घर, दोन शाळेत जाणारी मुले, १५ वर्षांचा रुळलेला संसार अशी सर्वसाधारण परिस्थिती आणि त्यांच्या सरळ जीवनात मनीषा नावाचे वादळ येते.
पुण्याचा सुधारक-मित्रमेळा
पुण्याला सुधारकचे आजी-माजी मिळून सुमारे २५० वर्गणीदार, नागपूर दूर एका टोकाला, पुणे मध्यवर्ती, तिथे सुधारकच्या सहानुभूतिदारांचा – हितचिंतकांचा एक मेळा होऊ देत, परस्परांच्या गाठी-भेटी होतील विचारांची देवाण घेवाण होईल अशा. आपुलकी वाढवणाच्या सूचना काही बुजुर्गाकडून येत. त्या आम्हालाही हव्याशा वाटणारयाच होत्या. डिसेंबरच्या शेवटी ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये काही विदेशस्थ वाचक मायदेशी असण्याची शक्यता हा एक जादाचा मुद्दा. या सगळ्यांचा संदर्भ देऊन सहकारी संपादक श्री दिवाकर मोहनींनी पुण्याच्या वाचक-मेळाव्याची घोषणा केलेली. (आ. सु. – सप्टेंबर-९९)
जानेवारीच्या ६ तारखेला हा मित्रमेळा ठरला. स्थळ साधना सभागृह.
खरी पूजा
जर ह्या विश्वातील अद्ययावत वस्तुजाताच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ति आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व, मनुष्यास त्याचा मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी, आणि खोटी आहे.
काही झाले तरी मनुष्य हा ह्या विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही. जशी कीडा, मुंगी, माशी, तसाच ह्या अनादि-अनंत कालाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक.
विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पाहावा तसा कोणताही बादरायण संबंध जोडण्याची लालची हाव मनुष्याने आमूलाग्र सोडून द्यावी.
प्रिय वाचक
१. ६ जानेवारीला पुण्याला झालेल्या सुधारक-मित्रमेळाव्याचा वृत्तान्त या अंकात आहे. तो सविस्तर आहे असा आमचा दावा नाही. मुख्य पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या भाषणातला आणि दुस-याही वक्त्यांच्या बोलण्यातला प्रशंसेचा भाग गाळला आहे. सूचना, टीका-टिप्पणी यांना प्राधान्य दिले आहे. साधनाचे संपादक श्री नरेन्द्र दाभोलकर आणि सुधारकचे चाहते-वाचक श्री. प्रकाश व मंजिरी घाटपांडे यांच्या भरीव सहकार्यामुळे हा मेळा शक्य झाला. तसेच ज्यांचा नामोल्लेख आम्ही केला नाही अशाही अनेकांच्या मदतीचा जेवढा उपयोग झाला तेवढाच त्यांच्या उपस्थितीचाही झाला. या सर्वांचे आभार.
यावेळी काही गोष्टी करायच्या राहून गेल्या.
प्राचीन आर्यसंस्कृति – २
पुराणांत व इतिहासग्रंथांतहि भाऊबहिणीच्या लग्नाचे उल्लेख आलेले आहेत. पुराणांत राजांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यांत राजाची राणी ही कोणत्या राजाची कन्या हे दिलेले असते. काही ठिकाणी पितृकन्या असा उल्लेख असतो, ती कन्या पितृलोकांतील असा अर्थ टीकाकार करतात, पण तो अर्थ बरोबर नाही. बापाची मुलगी हा खरा अर्थ आहे. म्हणजे लग्न सख्ख्या बहिणीबरोबर किंवा सावत्र बहिणीबरोबर झाले असेल.
पुराणांत अगदी जुना असा संबंध अंग व त्याच्या बापाची मुलगी सुनीथा यांचा आहे. यांचाच पुत्र वेनराजा. वेन हा पुराणांत तर प्रसिद्ध आहेच, परंतु वेदांतहि त्याचे नांव अनेकदा आलेले आहे.
ब्राह्मणेतर चळवळ
कॉ. शरद पाटील ह्यांनी समाज प्रबोधन पत्रिकेच्या सप्टें. ऑक्टो. १९७८ च्या अंकात ब्राह्मणेतर चळवळीवर एक प्रदीर्घ लेख लिहून मार्क्सवाद भारतातील जातीय गुंतागुंत समजून घेण्यास असमर्थ असल्यामुळे त्याचा विचार पुन्हा झाला पाहिजे असे प्रतिपादन केले आहे. कॉ. शरद पाटील ह्यांचे विचार कितपत बरोबर आहेत ते पाहण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे.
कॉ. नारायण देसाई लिहितात : “वर्गविग्रहाची धग जेव्हा जेव्हा असह्य झाली तेव्हा तेव्हा बहुजनसमाज नव्या धर्माला घेऊन पुढे आला. शास्त्या वर्गाचे बंदे पंडित-पुरोहित नेहमी ह्या नवधर्मावर तुटून पडत. परंतु बहुजनसमाजाचे बंड प्रभावी ठरून शेवटी शास्त्या वर्गाला एका निराळ्याच मार्गाचे बहुजनसमाजाला हतबल करावे लागे.