संपादक आजचा सुधारक यांस
गेली चार वर्षे मी आपल्या मासिकाची वर्गणीदार आहे. पुणे मुंबई प्रवासात विद्या बाळ यांच्याकडे हे मासिक मी पाहिले अन् लगेच वर्गणीदार झाले.
आपल्या मासिकात सद्य:परिस्थितीवरील लेख वाचायला मिळतात, विचारमंथन होते आणि मतांना बहुधा योग्य दिशा मिळते असा माझा अनुभव आहे.
ओरिसातल्या एका मिशन-याची दोन मुलांसमवेत केलेली निघृण हत्या ह्या विषयाच्या अनुषंगाने मार्चच्या अंकातील ‘धर्मान्तर व राष्ट्रनिष्ठा’ हे स्फुट–स्पष्ट आणि परखडपणे लिहिलेले असून मनाला अंतर्मुख करणारे ठरले. या हत्येच्या बातमीने संपूर्ण जग हादरून गेले. त्यानंतर काही आठवड्यांनीच इंडोनेशिया येथे धार्मिक प्रश्नावरून निर्माण झालेले दंगे आणि अत्याचार याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
विषय «इतर»
भारतीयांची परदेशाकडे ओढ
….कोणाच्या अमेरिकेस जाण्याला आक्षेप घ्यायचे काहीच कारण नाही. योगक्षेमासाठी माणसे कोठेही जातात. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत सगळीकडे कोकण झाले आहे, ते आपल्याला अभिमान वाटावा असेच आहे. देशांच्या सीमा निरर्थक होत जाण्याच्या ह्या काळात आपल्या बौद्धिक बळाच्या जोरावर ही मराठी माणसे तेथे पराक्रमच गाजवत आहेत. पण मग विदेशी लोकांच्या सुरांत सूर मिसळून हिंदुस्थानाविषयी गैर बोलणे समजावून घेणे अवघड आहे. आपल्या सगळ्या भांडणा-तंटणासकट, वादविवादासकट, भ्रष्टाचार, झुंडीसकट आपला देश मला सुंदर वाटतो. पृथ्वीतलावर माणसाने वस्ती करण्यासाठी सगळ्यांत आदर्श असाच तो आहे. विदेशांत गेलेली आपली माणसे ह्या ना त्या प्रकारे ह्या देशाविषयी, लोकांविषयी प्रेमभावनाच प्रकट करीत असतात.
अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ
‘अध्यात्म’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ आहे ‘आत्मानं अधिकृत्य’, म्हणजे आत्म्याविषयी. अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयी विचार.
‘आत्मा’ म्हणजे काय हा प्रश्न लगेच उद्भवतो.
पण ‘आत्मा’ या शब्दाची स्थिती मोठी चमत्कारिक आहे. तो सामान्य, दैनंदिन व्यवहारातील शब्द नाही. तो तत्त्वज्ञानातील शब्द आहे. सामान्य माणसे, विशेषतः खेड्यातील अशिक्षित माणसे आत्म्याविषयी कधी आपसात बोलत असतील असे म्हणता येत नाही. ‘आत्मा’ या शब्दाचा जवळजवळ संपूर्ण अर्थ त्याला अतिभौतिकीने (metaphysics) दिलेला आहे असे दिसते. एका अर्थी आत्मा म्हणजे ज्याला आपण ‘मी’ किंवा ‘अहं म्हणतो तो पदार्थ हे खरे आहे.
चर्चा
सत्य, विज्ञान आणि अध्यात्म
संपादक, आजचा सुधारक
आजचा सुधारक (फे. ९९) च्या अंकामध्ये डॉ. अनंत महाजन यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावरून खालील विचार सुचले.
‘सत्य’ म्हणजे खरे विधान असा अर्थ घेण्यास हरकत असू नये. अर्थात् ‘सत्य’ एकच नसून अनेक असू शकतात. संत्र्याचा आकार गोल आहे; त्याचा रंग पिवळा आहे, त्याची चव गोड आहे, त्यामध्ये फोडी असतात इ. अनेक ‘सत्ये’ संत्र्याशी निगडित आहेत. परंतु यांमध्ये संत्र्याला साल असते, ते खडबडीत असते इ. सत्याचा अंतर्भाव होत नाही. याच प्रकारे यांत्रिकीमध्ये कोणत्याही वस्तूचे वस्तुमान एका बिंदूत सामावलेले आहे, त्याला बिंदु-वस्तूमान म्हणतो त्यावेळी आपण abstraction करतो.
जातीचे त्याज्य स्वरूप
सर्व समाज परप्रज्ञ व रूढिबद्ध बनल्यामुळे फार दिवसांच्या वहिवाटीने जातीजातींच्या गैरसोयी व दोष सर्वांच्या अंगवळणी पडत जाऊन त्यांचे त्याज्य स्वरूप कोणालाही दिसेनासे झाले आहे. रुपयाला दोन मणांची धारण होती अशा काळांत जन्मास आलेल्या तेहतीस कोटी देव-देवतांचे सण-उत्सव व कुलधर्म आणि अठरा पगड स्वधर्मी व परधर्मी भिक्षुकांचे हक्क सध्यांच्या काळीं चालविण्यांत आपण विनाकारण खोरीस येतों, आणि ऋण करून सण केल्याने पुण्य लाभत नाही, असे कोणाही हिंदूला वाटेनासे झाले आहे. जातिधर्म, कुलधर्म ह्यांनी निर्माण केलेल्या व अजूनही निर्माण करीत असलेल्या प्रतिषेधांनी तर एकंदर हिंदू समाजाला भंडावून सोडले आहे.
बाजारपेठ आणि लोकशाही
ए. डी. गोरवाला हे एक आज विसरले गेलेले पण आदरणीय मानावे असे नाव आहे. ते गेल्याला आता चौदा-पंधरा वर्षे झाली. आय.सी.एस. मधली उच्च पदे विभूषित करून निवृत्त झाल्यावर गोरवालांनी राजकीय-सामाजिक भाष्यकार म्हणून आपला काळ व्यतीत केला. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता निर्भीडपणे विश्लेषण आणि टीका करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.
त्यांच्या टीकेचे एक महत्त्वाचे लक्ष्य अर्थातच शासन आणि शासनव्यवहार हे होते. सरकारी खाती व सरकारी औद्योगिक उपक्रम यांवर ते विशेष झणझणीत टीका करीत. प्रारंभी त्यांचे लेख टाइम्स ऑफ इंडियासारख्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत.
राजकारण – पाण्याचे
“राजकारण पाण्याचे” हा डॉ. सुधीर भोंगळे यांचा ग्रंथ हा त्या लेखकाच्या राज्यशास्त्रातील पीएचडी पदवीसाठी सादर केलेला प्रबंध आहे. या प्रबंधासाठी लेखकाने अनेक आधार वापरले आहेत. शासकीय व बिगरशासकीय कागदपत्रे, नियतकालिकांमधील लेख व वृत्ते, मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तींशी झालेल्या चर्चा, असे अनेकविध आधार लेखक वापरतो. मुळात लेखक शिक्षणाने अर्थशास्त्रज्ञ व राज्यशास्त्रज्ञ आहे, आणि पेशाने शेतीविषयावर दृष्टी रोखणारा बहुपुरस्कृत पत्रकार आहे. म्हणजे उपलब्ध माहितीचा अन्वयार्थ लावण्यासाठीची सर्व सामग्री लेखकाजवळ आहे-न्यून असलेच तर थोडेसे स्थापत्यशास्त्राचे, त्यातही नदीविषयक यांत्रिकीचे ज्ञान जरा कमी आहे. पण यामुळे लेखनात फारसा कमकुवतपणा आलेला नाही.
एकोणविसाव्या शतकातले एक विलोभनीय अद्भुत: डॉ. आनंदीबाई जोशी
काळ: एकोणिसाव्या शतकाचा तिसरा चरण. १८६५ च्या मार्च महिन्याची ३१ तारीख. त्यादिवशी कल्याण येथे एका मुलीचा जन्म झाला. नऊ वर्षांनी, १८७४ च्या मार्च महिन्याची पुन्हा तीच ३१ तारीख. त्या मुलीचा, नऊ वर्षांच्या घोडनवरीचा विवाह झाला. वर वधूपेक्षा फक्त २० वर्षांनी मोठा. बिजवर. आणखी नऊ वर्षांनी वयाच्या १८ व्या वर्षी ही ‘मुलगी उच्च शिक्षणासाठी, तेही वैद्यकीय, अमेरिकेच्या आगबोटीत बसली. एकटी. सोबतीला आप्त-स्वकीयच काय कोणी मराठी माणूसही नाही. ही घटना इ.स. १८८३ ची. तारीख ७ एप्रिल. त्या काळी नव्याने गुरु बनून बायकोला शिकविणे हा प्रकार दुर्मिळ असला तरी अद्भुत नव्हता.
स्फुट लेख : महागाई नाही – स्वस्ताई!
मागच्या अंकामध्ये महागाईवर एक लेख आम्ही प्रसिद्ध केला आहे. त्या लेखाच्या लेखिकेने प्रगट केलेल्या मतांशी आमचा काही बाबतीत मतभेद आहे. परंतु त्याविषयी आता जास्त न लिहिता एका निराळ्या नजरेने आर्थिक व्यवहारांकडे बघितल्यास वस्तु स्वस्त कश्या होत जातात ते सांगण्याचा इरादा आहे.
कोणतीही वस्तु प्राप्त करण्यासाठी माणसाला काही ना काही श्रम करावे लागतात. मागच्या अंकात सायकलचे उदाहरण दिले आहे. आणि कोणाचे किती उत्पादक श्रम सायकल विकत घेण्यासाठी खर्ची पडतात त्याचे कोष्टक पृ. ३६३ वर दिलेले आहे. पैशाच्या स्वरूपात सायकलची किंमत चुकती करण्यासाठी प्रत्येक माणसाला कमी-अधिक श्रम करावे लागतात हे खरे असले तरी सायकल विकत घेण्यासाठी कोणालाही पूर्वीपेक्षा अधिक श्रम करावे लागत नाहीत, हा मुद्दा आम्हाला आज स्पष्ट करावयाचा आहे.
स्फुट लेख – धर्मान्तर आणि राष्ट्रनिष्ठा
चालू महिन्यात जिची दखल घ्यावयालाच पाहिजे अशी जी एक घटना आहे ती ओरिसातल्या एका मिशनन्याच्या क्रूर हत्येची. दोन निरागस, ‘मासूम बच्च्यांसोबत केलेल्या एका शुद्धाशयाच्या निघृण वधाची. हा वध कोणी आणि कशासाठी केला हे नक्की माहीत नसले तरी तो धर्मज्वरातून झाला असण्याची शक्यता आहे.
धर्म एकीकडे मानवाची श्रेष्ठ कर्तव्ये कोणती हे सांगणारा असला तरी दुसरीकडे त्याचाच उपयोग पापभीरूंकडून अमानुष कृत्ये घडवून घेण्यासाठी करता येतो; एकदा का धर्मज्वर चढला, माणूस धर्ममदाने उन्मत्त झाला, की त्यांच्या भरात त्याची नृशंस कृत्यांची लाज नाहीशी होते हे धर्माचार्यांना चांगले माहीत आहे आणि धर्माचा तसा उपयोग करून घेण्यात त्यांना संकोच वाटत नाही.