विषय «इतर»

एक प्रतिक्रिया- खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (७)

‘सायंटिफिक अमेरिकन’ फेब्रुवारी ९५ च्या अंकामध्ये पार्थ दासगुप्ता ह्यांच्या ‘लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण’ ह्या शोधनिबंधाविषयी माहिती आली आहे. उद्याचे जग जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे सुखी होण्यासाठी लोकसंख्या, दारिद्रय व पर्यावरण ह्या घटकांचा विकासाशी संबंध आहे अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. ह्या संदर्भात लेखकाने ह्यामध्ये स्त्रियांच्या स्थानाबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या मते, स्त्रिया जेव्हा संपूर्ण आर्थिक स्वावलंबन मिळवितात तेव्हाच कौटुंबिक सामाजिक निर्णयप्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात. आपल्याला आकडो न आवडो, समाजामध्ये ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच मानाने व आदराने वागविले जाते. मारून मुटकून कुणी कुणाला मान देऊ शकत नाही किंवाआदराने बघणार नाहीं.

पुढे वाचा

बंडखोर पंडिता (भाग ४)

आगरकरांनीही अखेर पाठिंबा काढून घेतला ही गोष्ट रमाबाईंना लागली असणार. ज्या समाजात मोठमोठ्या धुरंधर नेत्यांबरोबर त्यांची उठबस होती, ज्योतिबा फुल्यांसारख्या बहुजनसमाजातल्या सुधारक कार्यकत्र्यापासून तो केरूनाना छत्र्यांसारख्या ज्योतिर्विद पंडितापर्यंत सर्वांच्या कौतुकादराचा विषय त्या झालेल्या होत्या, त्या समाजापासून त्या तुटत जाऊन एखाद्या मठस्थ जोगिणीचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. तेही त्यांनी शांतपणे पत्करले.
यानंतर १८९६ सालची गोष्ट. आता शारदासदनात ख्रिस्ती झालेल्या १५ मुली उरल्या होत्या. त्यांच्या पालक अर्थातच रमाबाई होत्या. या १५ धर्मकन्यकांना घेऊन एका प्रार्थनाशिबिरासाठी त्या लोणावळ्याला गेलेल्या होत्या. तिथे त्यांनी अत्यंत मनोभावे देवापाशी प्रार्थना चालविली की, ‘देवा!

पुढे वाचा

चर्चा : अमेरिकेतील लोकांची लैंगिकता

“अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” (आ. सु. १९९५, ६: २,४९-५४) या माझ्या लेखावर (१) श्रीमती ललिता गंडभीर व (२) प्रा. फक्रुद्दीन बेनूर यांनी अभिप्रायात्मक लेख लिहिले आहेत. (आ. सु., ऑगस्ट ९५). सुधारकातील लेख वाचले जातात व त्यांच्यावर विचार होतो हे पाहून प्रसन्नता वाटते. या उभयतांच्या मतप्रदर्शनाच्या संदर्भात मला थोडे विवेचन करण्याची इच्छा आहे.
(१)लेख अमेरिकेतील लोकांच्या लैंगिकतेविषयी झालेल्या सर्वेक्षणाचा परिचय साक्षेपी मराठी वाचकांना करून देण्यासाठी होता. या सर्वेक्षणाचे निकाल अनपेक्षित असल्यामुळे, सर्वेक्षणाच्या नमुन्यात आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन लोकांचा योग्य प्रमाणात सहभाग नसावा अशी शंका व्यक्त केली होती.

पुढे वाचा

शारदेचा पुनर्जन्म

माझे परम मित्र प्रा. कुळकर्णी यांचा पुनर्जन्मासंबंधी शोध घेणारा एक प्रश्नांकित लेख वाचला. (आजचा सुधारक, ऑगस्ट १९९५) प्रा. व. वि. अकोलकरांनी कधी काळी पुनर्जन्मासंबंधी त्यांना अनुकूल असे जे चूक निष्कर्ष काढलेत त्या लेखाचे वाचन करून त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. त्यांच्या अश्रद्ध अशा भूमिकेला या लेखाने हादरा बसला. एखाद्या मृत व्यक्तीचा आत्मा दुसऱ्यां देहाचा आश्रय घेऊ शकतो हे प्रा. कुळकर्णीना मान्य झाले असावे. अन्यथा त्यांनी प्रा. अकोलकरांशी प्रतिवाद केला असता.
शारदा नावाच्या बंगाली युवतीचा आत्मा बंगालमधून शेकडो मैल अंतर कापून शंभर वर्षानंतर, बंगाल नागपूर दरम्यान असणारी लक्षावधी शरीरे नाकारून फक्त उत्तरा नावाच्या नागपुरातील एका युवतीच्या देहाचा आश्रय घेऊनच अवतीर्ण झालेला असतो अशी ही नाट्यमय घटना, प्रा.

पुढे वाचा

अन्तर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही

टॉप क्वार्कचा शोध लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या ९ एप्रिल ९५च्या अंकात आणि त्याच्या आधारे प्रा. काशीकरांचा लेख आजच्या सुधारकच्या प्रस्तुत अंकात प्रसिद्ध झाला आहे. अॅनी बेझंट आणि लेडबीटर यांनी भौतिक आणि रसायनशास्त्रातील विशेषेकरून अणुसंरचनेविषयी काही संकल्पना अंतर्दृष्टीने प्राप्त करून पूर्वीच प्रतिपादन केल्या होत्या. यावरून अंतर्दृष्टीने ज्ञान मिळू शकते असे मत ध्वनित करण्यात येत आहे. परंतु हा समज नवा नाही. विश्लेषण, संश्लेषण, विवेक, तर्क आणि प्रत्यक्ष पुरावा याभक्कम पायावर आधारलेल्या विज्ञानाने दिलेली आव्हाने पारंपारिक धर्मकल्पनांना पेलताआली नाहीत. याची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान धोकादायी आहे अशी कल्पना गेल्या शतकात : रूढ झाली.

पुढे वाचा

इस्लाम आणि लैंगिकता

आजच्या सुधारकच्या मे १९९५ च्या अंकात, डॉ. र. वि. पंडित यांचा, “अमेरिकेतील लोकांची लैंगिकता” हा लेख आहे. त्या लेखात वेगवेगळ्या जमाती आणि संस्कृतीतील लोकांच्या लैंगिक आचरणासंबंधी डॉ. पंडित यांनी विवेचन केले आहे; मुसलमान आणि इस्लामसंबंधाने त्यांनी काही विधाने केलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, “इस्लाम लैंगिक आचरणासंबंधी बराच कठोर असला तरी, त्यातील बहुपत्नीकत्वाची, तसेच तात्पुरत्या पत्नीची प्रथा, पुरुषांच्या लैंगिक आचरणाला भरपूर सूट देते”. येथे डॉ. पंडितांनी धर्मशास्त्रांनी घालून दिलेले नियम आणि संबंधित धर्माचे अनुयायी पाळत असलेल्या प्रथा, या दोन गोष्टींची गल्लत करून, इस्लामी धर्मशास्त्राच्या नियमामुळे मुसलमानांतील लैगिक आचरण मोकळे असल्याचे सूचित केले आहे.

पुढे वाचा

अमेरिकेमधील वास्तव परिस्थिती

डॉ. र. वि. पंडित यांच्या “अमेरिकन लोकांची लैंगिकता’ या लेखात आफ्रिकन अमेरिकन लोकांचा “काही पिढ्यांपूर्वी झाडीत राहणार्याप व वनचरांना शोभेशी नैतिक मूल्ये असणार्या ” असा उल्लेख आहे. त्यांच्या मूल्यांची तुलना डॉ. पंडित कोणाशी करीत आहेत?
डॉ. पंडितांच्या मते ह्या माणसांना पळवून अमेरिकेत आणून गुलाम म्हणून । विकणाच्या समाजाची मूल्ये कुठल्या दर्जाची होती?साधारण त्याच काळी पेशवाईत पुण्यातही “स्लेव्ह मार्केट” चालविणार्याु आपल्या पूर्वजांचा नैतिक दर्जा काय होता?
डॉ. पंडित यांनी श्री प्रल्हाद केशव अत्रे यांचे “आम्ही चावट होतो’ हे पुस्तक वाचले तर आपल्या भारतीय पायांखाली तेव्हा काय जळत होते हे त्यांना समजेल.

पुढे वाचा

पुस्तक-परीक्षण- ‘ज्याचा त्याचा प्रश्न’

‘देव’ ही आजची ज्वलंत समस्या आहे हे जाणून त्या समस्येवर घणाघाती प्रहार करणारे, प्रेक्षकांना विचार करायला लावणारे ‘ज्याचा त्याचा प्रश्न हे नाटक रंगभूमीवर आले आहे. प्रेक्षकातील कुठल्या ना कुठल्या प्रवृत्तीच्या द्योतक असलेल्या चार प्रमुख व्यक्तिरेखा नाटकात आहेत. या व्यक्तिरेखांच्या मनातले विचार हे प्रेक्षकांपैकी कुणाचेही असू शकतात. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे जास्त कर्मकांडात रमून न जाता देव मानणारी निर्मला. अगोदर नीतिवादी व नियतिवादी असल्यामुळे हार पत्करणारा परंतु भौतिक यश प्राप्त झाल्यावर नीति-अनीतीचीही पर्वा न करणारा निर्मलेचा पती-सुभाष. कोवळ्या वयात समाजाकडून देवाबद्दल घडवल्या जाणार्याण संस्कारांत वाढणारा व घरातून नास्तिकतेच्या संस्कारांत वाढणारा मनू.

पुढे वाचा

इतर

आम्ही आग्न्याचा किल्ला बघायला गेलो, वाटाड्याने आम्हाला सुंदर बागबगीचे, महाल, कलाकुसर दाखविली. पण ह्या बाह्य देखाव्याने माझे समाधान झाले नाही. मला तिथली तळघरे पाहायची होती. पण तिथला रक्षक ते दाखवेना. तेव्हा मी त्याला पैसे देऊन तळघरांत प्रवेश मिळविला. राजाच्या मर्जीतून उतरलेल्या स्त्रियांना तेथे कोंडून ठेवून त्यांचा छळ केला जात असे. आम्ही त्या अंधाच्या कोठड्या पाहिल्या. माझ्या मनात आले, ह्या तुरुंगाच्या भिंती बोलू लागल्या तर किती क्रौर्याच्या करुण कहाण्या कानावर येतील! लोक इथल्या कलाकुसरीच्या, सौंदर्याच्या आठवणी घेऊन जातात. मला त्यापेक्षा तिथल्याअंधारकोठड्याच आठवत राहिल्या!

पुढे वाचा

खरं, पुनर्जन्म आहे?

आपण नसावं असं कोणालाच वाटत नाही. पण वाटून काय उपयोग? जन्माला आला तो जाणार हे ध्रुवसत्य आहे. तसे मृताला पुन्हा जन्म आहे का? तेही ध्रुवसत्य आहे काय? । सश्रद्ध भावनावादी म्हणतो, ‘हो, आहे. कारण पुनर्जन्म पूर्वजन्म मानला नाही तर कशाची संगती लागत नाही. जीवनाला आधार मिळत नाही. ‘मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले, तयासारिखें भोगणें प्राप्त झालें.’ या विचाराने दुःख सहन करायला धीर मिळतो. ‘सदाचार तो थोर सांडूं नये तो का बरे,तर त्यामुळे मनाचे समाधान करता येते, या जन्मी फळ न का मिळेना’.

पुढे वाचा