‘विवेक व विज्ञान’ ‘श्रद्धा व अध्यात्म’ हा वाद अनेक शतकांपूर्वी चालू झाला व अजूनही चालू आहे. या प्रक्रियेमध्ये पाश्चात्त्य-भारतीय हा फरक स्पष्ट दिसतो. युरोप अमेरिकेतील वादांत लोक केवळ पुरातन तत्त्वज्ञानावर विसंबून राहत नाहीत. दोन्ही पक्षाचे लोक विरुद्ध पक्षातील आजच्या नवीन विचारांचा संदर्भ लक्षात घेऊन वाद-प्रतिवाद करतात. भारतात ही स्थिती नाही. उदाहरणार्थ, श्रद्धा-धर्म-अध्यात्म मानणारे लोक विवेकी साहित्य वाचत नाहीत. एवढेच नव्हे तर अशा साहित्यात नवनवीन विचारांची भर पडत आहे, हेही त्यांना माहीत नसते, व माहीत करून घ्यायचे नसते. गेल्या सहासात दशकांत नव्याने आलेल्या तत्त्वांची संक्षिप्त माहिती सोप्या शब्दांत देण्याकरिता हा लेख लिहीत आहे.
विषय «इतर»
पुस्तक परीक्षण – Putting Women First, Women and Health in a Rural Community.
माणसाच्या आरोग्याची पाळेमुळे तो राहतो, त्या भोवतालात दडलेली असतात. त्याचे कुटुंबातील व समाजातील स्थान, त्याचा आर्थिक स्तर, आसपासचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वातावरण, तसेच त्याच्या मनातील श्रद्धा/विश्वास हे त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत असतात. म्हणूनच पश्चिमी वैद्यकशास्त्राचा आद्य जनक हिपोक्रेटस म्हणाला होता. “माणसाला कोणता आजार झाला आहे हे जाणण्यापेक्षा कोणत्या आणि कशा प्रकारच्या माणसाला आजार झाला आहे, हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.”
वरील विधान निर्धन, ग्रामीण स्त्रियांना अधिक प्रकर्षाने लागू होते, कारण अशा स्त्रियांभोवती रूढी, परंपरा, सामाजिक संकेत, सांस्कृतिक निर्बंध यांचा विळखा अधिक घट्ट असतो.
प्रकाशित झाले मेंदूच्या अंतरंगात,
[ एक साक्षात्कारी अनुभवकथन या नावाने चित्रा बेडेकरांचा लेख आसुच्या —– अंकात छापला गेला होता. बेडेकरांनी आता ती पूर्ण कहाणी तपशिलात पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. त्याचा हा त्रोटक परिचय. – सं. ]
माणसाची कुशाग्र बुद्धिमत्ता, अनाकलनीय मन, गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व, त्याचं अवघं अस्तित्व हे सर्व कशात सामावलंय याचा शोध घ्यायचा ठरवलं तर त्याचं मूळ मेंदूत सापडतं. ‘मी’ म्हणून आपण अस्तित्वात असतो, आपल्याभोवती जग असतं, ते जग आपल्याला कसं वाटतं, कसं जाणवतं किंवा कसं भासतं हे आपल्या मेंदूतल्या क्रियाप्रकियांवरून ठरत असतं.
कॉर्पस कॅलोजमने जोडले गेलेले मेंदूचे दोन अर्धगोल बाहेरच्या जगाचं आपल्याला एकसंध आकलन करून देण्यात वाकबगार असतात.
मराठी तरुण काय वाचतात ?
1.0. छप्पन्न तरुण-तरुणी. वये, 18 ते 25 वर्षे. शिक्षणे, बारावी ते पी.एच.डी. करत असलेले; पण डॉक्टर-एंजिनियरांची संख्या भरपूर. गावे, महाराष्ट्रभर विखुरलेली. निर्माणसाठी (हा एक युवक-युवतींसाठीचा कार्यक्रम आहे, अभय व राणी बंग यांनी सुरू केलेला.) एकत्र आलेली ही मुले. एका अर्थी महाराष्ट्रातल्या संवेदनशील, सामाजिक जाणिवा जाग्या असलेल्या मुलीचा हा छेद किंवा सूचिपरीक्षा.
1.1. तर या मुलांना दोन याद्या घडवायला सांगितले. प्रत्येकाने आपल्याला सर्वांत आवडलेली पाच पुस्तके आणि पाच चित्रपट नोंदायचे होते. सध्या माणसे वापरत असलेली ही ज्ञान कमावण्याची व मनोरंजन करवून घेण्याची दोन महत्त्वाची माध्यमे.
संपादकीय
आजचा सुधारक चा पाण्यावरचा हा विशेषांक वाचकांपुढे ठेवताना मी जरा बेचैन झालो आहे. पाणी हा विषय इतका मोठा आणि आपल्या जिव्हाळ्याचा आहे की एकट्यादुकट्या माणसाने त्याला न्याय देणे अवघड आहे. तरीदेखील हे धारिष्ट्य आसु वरील प्रेमापोटी आणि वाचकांच्या उदारपणावर विश्वास ठेवून करत आहे.
पाणी हा पदार्थ मोठा विचित्र आहे. घन, द्रव आणि वायुरूप (बर्फ, पाणी, वाफ) अशा तिन्ही अवस्थेत तो आढळतो. त्याला स्वतःची ना चव ना रंग. पाण्यात जेवढे पदार्थ विरघळतात तेवढे आणि तितके विविध (रसायने, खनिजे -) पदार्थ इतर कुठल्याच द्रवात विरघळत नाहीत.
लेखक परिचय
चिं.मो.पंडित : स्थापत्य विशारद, सल्लागार म्हणून निवृत्तीनंतर शेती व त्यासंबंधी प्रश्न सोडवू पाहणाऱ्यांशी संपर्क राखून असतात.
आसुचे जुने लेखक पत्ता : 6, सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई 400 057 दूरध्वनी – 26147363
सुहास परांजपे : मुंबई आय.आय.टी.मधून केमिकल इंजिनिअरिंग चे पदवीधर. नोकरी न करता अनेक वर्षे स्वयंसेवी संस्थांत कार्य.
SOPPECOM (Society for Peoples Porticipatory Ecosystem Management) चे संस्थापक सभासद, K. Joy यांचेबरोबर कार्यरत. पाणी व्यवस्थापनावर पुस्तक, अहवाल.
पत्ता : 9, सर्वेष को.सो. India Hume Pipe Co. शेजारी, ठाणे (पूर्व), 400 603, दूरभाष 25324538
सीमा कुलकर्णी : SOPPECOM बरोबर कार्यरत.
पाव नाही? केक खा!
पाव नाही? केक खा!
आजकाल एक गैरसमज प्रचलित झाला आहे, की विज्ञान-तंत्रज्ञानाचे गतकाळातील यश पाहता पुढेही सर्व प्रश्न नेहेमीच विज्ञान-तंत्रज्ञानाने सुटत राहतील; भलेही पृथ्वीची लोकसंख्या कितीही वाढो. विज्ञानाबाबतच्या अपुऱ्या आकलनातून हा गैरसमज विश्वव्यापी झाला आहे. जसे, सिक्युरिटी अॅण्ड ग्रोथ या पुस्तकाचे लेखक बार्नेट व मोर्स हे थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम थेट उलटा करून ही भूमिका मांडतात. ते लिहितात, “संसाधनांमध्ये फरक असतो आणि सर्व संसाधने सारखीच नसतात, हे विज्ञानाने खोटे पाडले आहे. आजच्या जगात तुम्ही कोणत्या संसाधनापासून सुरुवात करता याला महत्त्व उरलेले नाही.”
पूर्व विदर्भातील परंपरागत पाणी-व्यवस्थापन
पाण्याला आपण जीवन म्हणतो. पण त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही म्हणूनच त्याला जीवन म्हणायचे काय? आपल्या देशात जेथेजेथे पाणी-व्यवस्थापनाच्या परंपरागत पद्धती विकसित झाल्या आहेत त्या पाहिल्या, तेथील लोकाचे त्या पद्धती विकसित करण्यामागील विचार आणि तंत्रे पाहिली, पाण्याचा वापर करण्याचे नीतिनियम पाहिले, तर पाण्याला जीवन का म्हणतात ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येते. अशीच पाणी व्यवस्थापनाची एक परंपरागत पद्धत आपल्या विदर्भाच्या झाडीपट्टीच्या भागात अस्तित्वात आहे. असा सर्वसामान्य समज असतो की जेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असते त्या भागातील लोकांनी पाण्याचे व्यवस्थापन करणे ही त्यांची अत्यंत तातडीची गरज असते.
पाण्याच्या लढाया समजून घेऊ या
पाण्यासाठी चाललेली समाजातील खळखळ सहज दिसत नाही, जाणवत नाही; परंतु अनेक पातळ्यांवर ती सतत चालूच असते; देशादेशांत, प्रांताप्रांतांत, विभाग उपविभागांत, जिल्हापातळीवर, राजकीय पक्षांत, जातीजमातींत, अगदी व्यक्तिगत शेतकऱ्यांमध्येदेखील. सुदैवाने प्रसारमाध्यमांनी भाकीत केलेली ‘जलयुद्धे’ मात्र अजून तरी झालेली नाहीत. युद्धे झाली, पण ती तेलावरून. एक मात्र लक्षात घ्यायलाच हवे, की या अस्वस्थतेचे परिणाम आर्थिक विकास, सामाजिक स्थैर्य, सुरक्षा आणि पर्यावरणावर जरूर होतात. आणि नेहमीच वंचित, गरिबांतले गरीब, ह्यांच्यासारखेच नद्यानाले, पाणथळ प्रदेश, भूगर्भीय जलस्रोत हे सारे धोक्याच्या छायेत असतात.
मतभेद, अगदी तीव्र स्वरूपाचे मतभेद, हे वाईट, नकारात्मक असतातच असे नाही.
गावगाडा : सहकार (भाग-२)
शेतीसारखा व्यवसाय करणारा समाज हा, हा व्यवसाय करण्याइतका सक्षम असला पाहिजे. कारण दर १-२ वर्षांनी त्याच्यावर काहीतरी अस्मानी संकट येत असते. कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, तर कधी बेमोसमी पाऊस, तर एखादी कीड, तर कधी कमी पिकलेल्या धान्याची परदेशातून आयात. सरकारच्या सर्व विभागांकडून, म्हणजे नियोजन खाते, अर्थखाते, पाणी-पाटबंधारे, वीज या सर्व विभागांकडून त्याच्याविषयीचा दृष्टिकोन हा योग्य असा नसतो. कशासाठी? जर धान्य महाग झाले तर नागरी मतदार नाराज होतात म्हणून! धान्याचे भाव कमी करण्यासाठी धान्य आयात करण्यात येते. मध्यंतरी कांद्याचे भाव खूप वाढले होते तेव्हा टी.व्ही.वर