ज्यांची देवाच्या अस्तित्वावरच नव्हे तर देवाच्या चांगुलपणावर व दयाळूपणावरदेखील श्रद्धा आहे ते लोक सहसा प्रतिपादन करतात की संकटसमयी ही श्रद्धा अनेकांसाठी दिलासाकारक ठरते. ह्या प्रतिपादनाचा जरा खोलात जाऊन विचार करू या.
जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, जेव्हा जगण्यातला आनंदच हरवला आहे असे वाटते, तेव्हा स्वतःची समजूत काढण्याचे वेगवेगळे मार्ग लोक वापरतात. एक प्रकारची माणेस स्वतःला सांगतात, “सध्याच्या दुःखभोगामागे सर्वशक्तिमान परमेश्वराची अंतिमतः माझ्या भल्यासाठीच काही योजना असेल. मला कदाचित ती समजू शकत नसेल, तेव्हा प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून दुःख आणि वेदना निमूटपणे सोसाव्यात हेच माझ्या हिताचे आहे.”