विषय «इतर»

दोन्ही गोष्टी

सर्व संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो जगण्याचा. सर्व सामाजिक संरचनांपुढचा मूळ प्रश्न असतो इतर संरचनांशी जुळते घेण्याचा. आणि एका मर्यादेपर्यंत सर्व संरचना सामाजिकच असतात. आपण जिला नीतिमत्ता म्हणतो, जीनुसार आपण वागणुकीचे नियम ठरवतो, त्या कल्पनाव्यूहात वरील दोन्ही गोष्टी येतात. व्यक्ती म्हणून स्वतःसाठी जगणेही येते, आणि इतर व्यक्तींसाठी करण्याची कर्तव्येही येतात. या इतर व्यक्तींमध्ये आपला समाज, आपली जीवजात, इतर जीवजाती, हे सारेच येते. [ कॉलिन टज्च्या सो शल वुई रीप (अॅलन लेन, २००३) या पुस्तकातील बायॉलजी, मोरॅलिटी, एस्थेटिक्सः द मीनिंग ऑफ अॅग्रिकल्चर या प्रकरणातून.]

पुढे वाचा

बाजारपेठा आणि नीतितत्त्वे

मूळ लेखक : मायकेल सँडेल

इंग्लंडमध्ये बीबीसीतर्फे ‘रीथ लेक्चर्स’ची एक मालिका सादर केली जाते. एखादा प्रमुख विचारवंत महत्त्वाच्या विषयावर आपले विचार ह्या मालिकेतून लोकांसमोर मांडतो. २००९ साली ह्या व्याख्यानांकरिता प्रोफेसर मायकेल सँडल ह्या हार्वर्ड विद्यापीठातील तत्त्वज्ञानाच्या व्याख्यात्याला निमंत्रित केले होते. प्रोफेसर सँडल हे एक मान्यवर तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंत आहेत. ‘न्याय’ ह्या विषयावरील त्यांच्या व्याख्यानांना प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात. सगळ्यांचे हित (common good) जपणाऱ्या नव्या प्रकारच्या राजकारणाचे स्वरूप कसे असावे
ह्याचा विचार करणाऱ्या ह्या व्याख्यानमालिकेचे नाव नवे नागरिकत्व (A New Citizenship) असे आहे.

पुढे वाचा

तुमच्याशिवाय नाही

तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कशी दिसतील? ती प्रतीकात्मकच असतील, की वास्तविक (realistic) असतील? बरे, तत्त्वचर्चा स्वभावानेच कोरड्या, नीरस. कला मात्र व्याख्येनेच रसाळ. मग तत्त्वचर्चांची दृश्य रूपे कधी कलात्मक होतील का? चर्चा मुळात शब्द हे माध्यम ओलांडून बाहेर, दृश्य रूपांत जाऊ शकतील का? साधारणपणे आपल्याला हे प्रश्न पडतही नाहीत, मग अस्वस्थपणे त्यांची उत्तरे शोधणे तर दूरचेच. पण असे प्रश्न जागवणारा, ते सोडवायला चौकट पुरवणारा एक अनुभव नागपूरकरांना नुकताच आला. अमरावतीच्या संजय गणोरकरांचे मांडणी शिल्पांचे (installations) प्रदर्शन असा अनुभव देऊन गेले.
अमरावती जिल्ह्याची सुपीक जमीन, हा वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड या म्हणीचा आधार.

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-३)

[End of Ideology (तत्त्वादर्शीचा अंत!), Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), ह्या कळीच्या संकल्पना गेल्या लेखांशांत आल्या होत्या. आता इतर काही कळीच्या संकल्पना पाहू
या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची स्टेजवर बोलण्याची व प्रत्यक्षातली उद्दिष्टे यांच्यात फार अंतर असते. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा अनेकांची अनेक उद्दिष्टे साध्य झालेली असतात. प्रसंगी ती एकमेकांच्या अगदी विरोधी असतात.

पुढे वाचा

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’: एका दृष्टिकोनातून

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट निर्माण केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट या पहिल्यावहिल्या चित्रपटनिर्मितीची गोष्ट हसतखेळत सांगतो. त्यात फाळक्यांचे झपाटलेपण, आपल्या ध्यासाकरता त्यांनी सोसलेले हाल, निर्मितीत त्यांना आलेल्या अडचणी आणि तरीही या सर्व प्रक्रियेत निर्मिकाला मिळणारा आनंद यांचे प्रभावी चित्रण आहे. याशिवाय एक धागा मोकाशी यांनी आपल्या चित्रपटात सातत्याने मांडला आहे. त्याची दखल घेण्यासाठी आणि इतरांनाही त्याची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.
मोकाशींना पहिल्या भारतीय चित्रपटाच्या गोष्टीला जोडून आणखी काहीतरी सांगायचे आहे, याची जाणीव अगदी सुरुवातीपासून होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद/प्रतिक्रिया

गेल्या विशेषांकाचे अतिथि-संपादक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी त्यांचे अंधश्रद्धांबाबतचे सर्वेक्षण सायबरावकाशात टाकले (mr.upakrama.org — नवे लेखन). त्यावरील चर्चा बहुतांशी सर्वेक्षण, ते सुधारण्याबाबत व व्यापक करण्याबाबत सूचना, अशी होती. एक प्रतिक्रिया मात्र जरा वेगळी होती, ती अशी — प्रेषकः गुंडोपंत लेखन मुळाबरहुकूम.]
काही वेळा काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणण्याच्या नादात देशी ते सर्व गौण असे मानूनच चालू लागतात की काय असे मला वाटले. ख्रिश्चन धर्मात संत बन(व)ण्यासाठी चमत्कार व्हावा लागतोच! येथे अंधश्रद्धा नसते असे काही लोकांना वाटत असावे असो, आपला आपला विषय. सुधारकसारखी मासिके असा विषय सोडून देतात, कधीच चर्चेत घेत नाहीत हे पाहून मला गंमत वाटते.

पुढे वाचा

‘अमेरिकन शेती’ अंकाविषयी

[कोल्हापूरच्या सुभाष आठल्यांनी अमेरिकन शेतीच्या इतिहासाबाबतचा लेख केंद्रस्थानी ठेवून रचलेल्या जाने, २०१० (अंक XX-१०) या अंकाविषयी एक लेख व पत्र पाठविले आहे. पत्रातील काही भाग असा —
अंक Evidence Based असण्याऐवजी अभिनिवेशजन्य वाटला. न घडलेल्या घटना घडल्या म्हणून रिपोर्ट करणे असे या क्षेत्रांत, विशेषतः जागतिकीकरणाचे परिणाम, सेंद्रिय उत्पादने, जनुकबदल पिके, यांच्या संदर्भात हे घडत आहे. आसुचा दर्जा उच्च राहण्यासाठी संपादकांनी ऋश्रीश ठर्शीींळपस, आधारविरहित दोषारोप यांपासून आसु मधील लेखन शक्य तितके मुक्त राहील याची काळजी घेतली पाहिजे. पुढे आठले म्हणतात — सर्व लेखक समाजकार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार असे आहेत, स्वतः शेती करणारे कोणीच नाहीत, शेतीशास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञानी कोणीच नाहीत.

पुढे वाचा

अज्ञानाचे तत्त्वज्ञान

मी अज्ञानाचे समाधानकारक तत्त्वज्ञान मांडणारा वैज्ञानिक आहे; अशा तत्त्वज्ञानाने किती प्रगती करता येते, याचे मूल्य जाणणारा. या तत्त्वज्ञानाचे फळ म्हणून विचार-स्वातंत्र्य मिळते, हे जाणणारा. शंकांना घाबरायला नको. उलट नव्या शक्यता माणसांमध्ये जागवणारे मूल्य तेथून मिळते, हे शिकवू पाहणारा, जाहीर करू पाहणारा.
तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही ती स्थिती सुधारू शकता, अशी शक्यता असते. मला ही शक्यता, हे स्वातंत्र्य भविष्यातल्या पिढ्यांना मिळून हवे आहे. एक जबाबदार वैज्ञानिक म्हणून असे अज्ञानाचे तत्त्वज्ञान मांडणे मला गरजेचे वाटते. [रिचर्ड पी. फाईनमनच्या १९६३ सालच्या सीॲटल येथील भाषणातून डोंट यू हॅव टाईम टु थिंक ?

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-३)

या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची स्टेजवर बोलण्याची व प्रत्यक्षातली उद्दिष्टे यांच्यात फार अंतर असते. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा अनेकांची अनेक उद्दिष्टे साध्य झालेली असतात. प्रसंगी ती एकमेकांच्या अगदी विरोधी असतात.
पण या लोकशाही पद्धतीची सुप्त ताकद हे मतदार कधी कधी आश्चर्यकारकरीत्या दाखवून देतात. ताकदवान पक्ष व अगदी त्याच्या नेत्यालासुद्धा ते पूर्णपणे पराभूत करतात.

पुढे वाचा

नाशिकच्या बैठकीचा वृत्तान्त

आजचा सुधारक तीन मंडळे आणि एक व्यक्ती मिळून चालवले जाणारे मासिक आहे. मासिकाची मालकी विश्वस्त-मंडळा कडे असते, पण दैनंदिन व्यवहारांत तो अधिकार प्रकाशका चा असतो. इतर सर्वांचे काम मासिकाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत ठेवणे व यात चुका होत असल्यास योग्य त्या सूचना देणे ही विश्वस्त-मंडळाची जबाबदारी असते. प्रकाशक यासोबत मासिकाचे उत्पादन आणि वितरण यावरही देखरेख करत असतो.
मासिकातील मजकूर जमवणे, संपादित करणे, अक्षरजुळणी, मुद्रितशोधन, छपाई व वितरण करवून घेणे, ही संपादक-मंडळाची जबाबदारी असते. यातही कार्यकारी संपादक जास्त जबाबदेह, रपीशीरलश्रश आहे.
सल्लागार-मंडळ मासिकातील लेख, त्यांत यायला हवेत असे विषय, इत्यादींबद्दल संपादक-मंडळाला सल्ला देते.

पुढे वाचा