विषय «इतर»

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’: एका दृष्टिकोनातून

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट निर्माण केला. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट या पहिल्यावहिल्या चित्रपटनिर्मितीची गोष्ट हसतखेळत सांगतो. त्यात फाळक्यांचे झपाटलेपण, आपल्या ध्यासाकरता त्यांनी सोसलेले हाल, निर्मितीत त्यांना आलेल्या अडचणी आणि तरीही या सर्व प्रक्रियेत निर्मिकाला मिळणारा आनंद यांचे प्रभावी चित्रण आहे. याशिवाय एक धागा मोकाशी यांनी आपल्या चित्रपटात सातत्याने मांडला आहे. त्याची दखल घेण्यासाठी आणि इतरांनाही त्याची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.
मोकाशींना पहिल्या भारतीय चित्रपटाच्या गोष्टीला जोडून आणखी काहीतरी सांगायचे आहे, याची जाणीव अगदी सुरुवातीपासून होते.

पुढे वाचा

पत्रसंवाद/प्रतिक्रिया

गेल्या विशेषांकाचे अतिथि-संपादक प्रमोद सहस्रबुद्धे यांनी त्यांचे अंधश्रद्धांबाबतचे सर्वेक्षण सायबरावकाशात टाकले (mr.upakrama.org — नवे लेखन). त्यावरील चर्चा बहुतांशी सर्वेक्षण, ते सुधारण्याबाबत व व्यापक करण्याबाबत सूचना, अशी होती. एक प्रतिक्रिया मात्र जरा वेगळी होती, ती अशी — प्रेषकः गुंडोपंत लेखन मुळाबरहुकूम.]
काही वेळा काही लोक स्वतःला पुरोगामी म्हणण्याच्या नादात देशी ते सर्व गौण असे मानूनच चालू लागतात की काय असे मला वाटले. ख्रिश्चन धर्मात संत बन(व)ण्यासाठी चमत्कार व्हावा लागतोच! येथे अंधश्रद्धा नसते असे काही लोकांना वाटत असावे असो, आपला आपला विषय. सुधारकसारखी मासिके असा विषय सोडून देतात, कधीच चर्चेत घेत नाहीत हे पाहून मला गंमत वाटते.

पुढे वाचा

‘अमेरिकन शेती’ अंकाविषयी

[कोल्हापूरच्या सुभाष आठल्यांनी अमेरिकन शेतीच्या इतिहासाबाबतचा लेख केंद्रस्थानी ठेवून रचलेल्या जाने, २०१० (अंक XX-१०) या अंकाविषयी एक लेख व पत्र पाठविले आहे. पत्रातील काही भाग असा —
अंक Evidence Based असण्याऐवजी अभिनिवेशजन्य वाटला. न घडलेल्या घटना घडल्या म्हणून रिपोर्ट करणे असे या क्षेत्रांत, विशेषतः जागतिकीकरणाचे परिणाम, सेंद्रिय उत्पादने, जनुकबदल पिके, यांच्या संदर्भात हे घडत आहे. आसुचा दर्जा उच्च राहण्यासाठी संपादकांनी ऋश्रीश ठर्शीींळपस, आधारविरहित दोषारोप यांपासून आसु मधील लेखन शक्य तितके मुक्त राहील याची काळजी घेतली पाहिजे. पुढे आठले म्हणतात — सर्व लेखक समाजकार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार असे आहेत, स्वतः शेती करणारे कोणीच नाहीत, शेतीशास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञानी कोणीच नाहीत.

पुढे वाचा

अज्ञानाचे तत्त्वज्ञान

मी अज्ञानाचे समाधानकारक तत्त्वज्ञान मांडणारा वैज्ञानिक आहे; अशा तत्त्वज्ञानाने किती प्रगती करता येते, याचे मूल्य जाणणारा. या तत्त्वज्ञानाचे फळ म्हणून विचार-स्वातंत्र्य मिळते, हे जाणणारा. शंकांना घाबरायला नको. उलट नव्या शक्यता माणसांमध्ये जागवणारे मूल्य तेथून मिळते, हे शिकवू पाहणारा, जाहीर करू पाहणारा.
तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही ती स्थिती सुधारू शकता, अशी शक्यता असते. मला ही शक्यता, हे स्वातंत्र्य भविष्यातल्या पिढ्यांना मिळून हवे आहे. एक जबाबदार वैज्ञानिक म्हणून असे अज्ञानाचे तत्त्वज्ञान मांडणे मला गरजेचे वाटते. [रिचर्ड पी. फाईनमनच्या १९६३ सालच्या सीॲटल येथील भाषणातून डोंट यू हॅव टाईम टु थिंक ?

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-३)

या लेखात आपण आतापर्यंत जे प्रतिपादन केले त्याचा सर्वसाधारण आशय असा की जे मतदार सरकार निवडून देतात त्यांचे त्या विशिष्ट मतदाराला निवडून देण्याचे निकष सर्वस्वी निराळे असतात. पक्ष व त्यांचे नेते यांची स्टेजवर बोलण्याची व प्रत्यक्षातली उद्दिष्टे यांच्यात फार अंतर असते. जेव्हा एखादा उमेदवार निवडून येतो तेव्हा अनेकांची अनेक उद्दिष्टे साध्य झालेली असतात. प्रसंगी ती एकमेकांच्या अगदी विरोधी असतात.
पण या लोकशाही पद्धतीची सुप्त ताकद हे मतदार कधी कधी आश्चर्यकारकरीत्या दाखवून देतात. ताकदवान पक्ष व अगदी त्याच्या नेत्यालासुद्धा ते पूर्णपणे पराभूत करतात.

पुढे वाचा

नाशिकच्या बैठकीचा वृत्तान्त

आजचा सुधारक तीन मंडळे आणि एक व्यक्ती मिळून चालवले जाणारे मासिक आहे. मासिकाची मालकी विश्वस्त-मंडळा कडे असते, पण दैनंदिन व्यवहारांत तो अधिकार प्रकाशका चा असतो. इतर सर्वांचे काम मासिकाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत ठेवणे व यात चुका होत असल्यास योग्य त्या सूचना देणे ही विश्वस्त-मंडळाची जबाबदारी असते. प्रकाशक यासोबत मासिकाचे उत्पादन आणि वितरण यावरही देखरेख करत असतो.
मासिकातील मजकूर जमवणे, संपादित करणे, अक्षरजुळणी, मुद्रितशोधन, छपाई व वितरण करवून घेणे, ही संपादक-मंडळाची जबाबदारी असते. यातही कार्यकारी संपादक जास्त जबाबदेह, रपीशीरलश्रश आहे.
सल्लागार-मंडळ मासिकातील लेख, त्यांत यायला हवेत असे विषय, इत्यादींबद्दल संपादक-मंडळाला सल्ला देते.

पुढे वाचा

चिडीचूप

वाद हा प्रगल्भ समाजाचा अविभाज्य भाग. विचारपूर्वक केलेल्या संवादाचाच एक हिस्सा. पण वादाकडे भांडण म्हणून पाहणारा स्तर वेगळा असतो. वाद म्हणजे भांडण हे समीकरण पुरोगामी, प्रगल्भ आणि सशक्त समाजरचनेत स्वीकारार्ह ठरू शकत नाही. बुद्धिजीवी वर्गाची गळचेपी सुरू झाली की ही अशी अस्वीकारार्ह समीकरणे सहजपणे स्वीकारली जाऊ लागतात.
अनेक समाजधुरीणांचे तात्त्विक वाद महाराष्ट्राने अनुभवले आहेत. ‘आधी स्वराज्य की आधी सुराज्य’ यासारख्या टिळक-आगरकर वादातून सामाजिक-राजकीय सुधारणांची जाहीर चर्चा मराठी समाजमनाने ऐकली. तिचा वैचारिक पोत संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. साहित्याच्या प्रांतातील ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ यापासून श्लील-अश्लीलतेच्या मापदंडांपर्यंतचे अनेक वाद महाराष्टात सारस्वताच्या इतिहासात नोंदले गेले.

पुढे वाचा

“अन्नाचा अधिकार”

भारतातील गोरगरीब लोकांची उपासमार सुरू आहे. ही समस्या किती गंभीर आहे याचा दोन पद्धतीने मागोवा घेता येतो. त्यातील पहिला प्रकार म्हणजे भारतातील किती लोकांना निरोगी जीवनासाठी आवश्यक एवढी पोषणमूल्ये देणारा आहार मिळत नाही याचा अंदाज घेणे. दुसऱ्या प्रकारामध्ये जागतिक पातळीवर ‘भुकेच्या समस्ये’च्या संदर्भात भारताचे स्थान इतर देशांच्या तुलनेत कोठे आहे ते तपासणे. आपल्या पंतप्रधानांनी ‘देशातील एकाही नागरिकाला एक दिवसही अनैच्छिक उपास करण्याची वेळ येऊ देणार नाही’ अशी जाहीर ग्वाही दिली असली तरी वास्तवात देशातील बहुसंख्य जनता अर्धपोटी जीवन कंठित आहे वा कुपोषणग्रस्त आहे.

पुढे वाचा

निवडणुका, खरे स्वरूप व मध्यमवर्ग (भाग-२)

[End of Ideology (तत्त्वादर्शाचा अंत!) ही कळीची संकल्पना गेल्या लेखांशात आली. Criminalization of Politics (राजकारणाचे गुन्हेगारीकरण), मध्यमवर्गाचा संभ्रम, या काही कळीच्या राजकीय संकल्पना प्रत्यक्षदर्शी व सोप्या पद्धतीने स्पष्ट करणारा हा लेखांश आहे, मूलभूत महत्त्वाचा.]
या लोकशाहीच्या नमुन्याची रचना करताना, देशी विदेशी घटनेच्या रचनाकारांचा विचार करताना त्यांच्याकडून कदाचित काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असावे. घटना बनविताना मानवी स्वभाव, मानवी समूहांचे समूह म्हणून वागण्यामागचे विचार किंवा वागणूक याचा पूर्ण विचार केला आहे किंवा कसे, याचा अंदाज येत नाही. कारण जेव्हा आपण लोकशाहीतल्या नेत्याचे मूळ विचार व नंतर वागणूक पाहतो तेव्हा आपल्याला खटकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात.

पुढे वाचा

मेकॉलेचे चारित्र्यहननः एक लाजिरवाणा अध्याय

ऐतिहासिक घटना किंवा व्यक्ती यांचे विश्लेषण करताना आपण बरीच माहिती गोळा करतो. ते करताना एक महत्त्वाचा दंडक पाळावा लागतो, तो म्हणजे माहिती तत्कालीन संबद्ध व्यक्तींनी लिहिलेली असावी व ती व्यक्तीही विश्वासार्ह असावी. माहितीवर आधारलेल्या व्यक्तिगत मतापेक्षा त्या व्यक्तीने घटनेचे केलेले चक्षुर्वैसत्यं वर्णन महत्त्वाचे असते. घटना घडून काही वर्षे गेल्यावर आठवणीप्रमाणे लिहिलेले वर्णन कमी विश्वासार्ह असते. आज प्रत्यक्षात अनेक लेखक ही पथ्ये पाळत नाहीत त्यामुळे हास्यास्पद निष्कर्ष काढतात. काही वेळा असा प्रकार अज्ञानातून होतो व ते क्षम्यही आहे. पण बऱ्याच वेळा तद्दन खोटा प्रचार जाणूनबुजून केला जातो व ते अश्लाघ्य आहे.

पुढे वाचा