पृथ्वीवर ज्ञानाशिवाय अशी दुसरी कोणतीही वस्तु नाही, की जिचा कंटाळा न येतां, किंवा जिच्यापासून शरीरास किंवा मनास कोणतीही व्याधि न जडतां, जिच्या योगानें वृत्ति आमरण आनंदमय राहू शकेल. जे पुरुष ज्ञानसंपादनांत निमग्न झालेले असतात, त्यांसच या अमोलिक सुखाचा निरंतर लाभ होतो.
विश्वाच्या विशाल स्वरूपाच्या विचारांत जो गढून गेला व ज्याला ही पृथ्वी एखाद्या क्षुल्लक वारुळाप्रमाणे दिसू लागली, त्याला तीवरील कांहीं मुंग्यांस दुसऱ्यांपेक्षां दाणे अधिक सांपडले, किंवा काहींस मुळीच न सांपडल्यामुळे रिकामें फिरावे लागले, म्हणून खेद होणार आहे काय ? इराणची बादशाही पादाक्रांत करून डरायसाच्या सिंहासनावर पाय ठेवतांना वीरशिरोमणी अलेग्झान्डरास जो आनंद झाला असेल, त्यापेक्षां अखिलपरमाण्वंतर्गत गुरुत्वाकर्षणधर्म शोधून काढतांना न्यूटनास कमी आनंद झाला असेल, असे आम्हांस वाटत नाही!
विषय «इतर»
सुधारकाचे जाहीर पत्रक
ज्यांना हिंदुस्थानचा इतिहास यत्किंचित् अवगत असेल, त्यांना येथे इंग्रजांचा अंमल कायम होण्यापूर्वी आमची स्थिती कशी होती, व तो झाल्यापासून तींत किती बदल झाला आहे आणि पुढे किती होण्यासारखा आहे, हे स्वल्प विचाराअंती समजण्यासारखें आहे. मोंगलांच्या तीन-चारशे वर्षांच्या, किंवा मराठ्यांच्या दीडदोनशे वर्षांच्या अमलांत ज्या राज्यविषयक, समाजविषयक, नीतिविषयक व शास्त्रविषयक विचारांचा लोकांत आविर्भाव झाला नाही, ते विचार इंग्रज लोकांचे राज्य सर्वत्र स्थापित झाल्यापासून पुरती शंभर वर्षे झाली नाहीत तोंच चोहोकडे पसरून जाऊन, हिंदुस्थानच्या स्थितिस्थापकताप्रिय लोकांस एक प्रकारची अज्ञातपूर्व अशी जागृतावस्था झाल्यासारखी दिसत आहे, व आजमितीस हिचा अनुभव येथील लोकसंख्येच्या मानाने तिच्या अगदी स्वल्प अंशास होत आहे, हे जरी खरे आहे, तरी थोड्या वर्षांत, विद्याप्रसाराचा क्रम प्रस्तुतप्रमाणे अव्याहत चालल्यास, हा अनुभव बहुतेक लोकांस होऊं लागेल हे उघड आहे.
सुधारक काढण्याचा हेतु
पर्वत, नद्या, सरोवरें, झाडे, पाणी, राने, समुद्रकिनारे, हवा, खाणी, फुले व जनावरें ज्यांत स्पष्टपणे दाखविली आहेत असा एक, व ज्यांत पारधी व पारधीची हत्यारे, शेतकरी व शेतकीची अवजारे, बाजार व त्यांतील कोट्यवधि कृत्रिम जिन्नस, न्यायसभा व त्यांत येणारे शेंकडों लोक, राजसभा व त्यांत बसणारे-उठणारे सचिव, मंत्री वगैरे प्रमुख पुरुष, भव्य मंदिरे व उत्तम देवालये, बागा व शेतें, झोपड्या व गोठे, अनेक पदवीचे व अनेक धंदे करणारे पुरुष व स्त्रिया आणि त्यांची अर्भकें, ही ज्यांत व्यवस्थित रीतीनें काढिली आहेत असा एक, मिळून प्रत्येक खंडांतील ठळक देशाचे दोन दोन चित्रपट तयार करवून ते पुढे ठेवले, आणि त्यांकडे निःपक्षपातबुद्धीने काही वेळ पहात बसले, तर विचारी पुरुषांच्या मनावर काय परिणाम होतील बरें ?
अध्यात्मवादी टिळक व भौतिकवादी आगरकर
[एक ऑगस्ट ही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. १८५६ मध्ये जन्मलेल्या दोन माणसांच्या विचारांचा ठसा महाराष्ट्राच्या पुढच्या सबंध सामाजिक इतिहासावर उमटलेला आहे. ज्या दोन भिन्न दिशांना समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न या समाजातल्या शक्ती करत आल्या आहेत व आजही करत आहेत, त्या दिशा या दोघांच्या विचारांत सूचित झालेल्या होत्या. आणि या दोन दिशांमागे होती दोन जीवनविषयक तत्त्वज्ञाने : अध्यात्मवाद आणि भौतिकवाद. आजसुद्धा सामाजिक विचार, सौंदर्यशास्त्र इ. सर्व आघाड्यांवर भौतिकवादाला अध्यात्मवादाविरुद्धची लढाई नेटाने लढवावी लागत आहे, लागणार आहे. त्या दृष्टीने हा लेख मननीय ठरावा. नवभारत च्या ऑगस्ट १९५६ च्या अंकावरून काहीसा संक्षिप्त करून तो तात्पर्य च्या १९८२ च्या अंकात प्रसिद्ध केला होता.
प्रा. दि. य. देशपाण्डे यांचे मराठीतील तत्त्वचिंतन
[प्रस्तुत निबंध महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या दापोली अधिवेशनात (ऑक्टो.२००६) वाचण्यात आला आहे.]
प्रा. दि. य. देशपांडे तत्त्वज्ञानाचे अध्यापक होते आणि आजन्म तत्त्वज्ञानाचेच निष्ठावंत अभ्यासक होते. त्यांची व्यक्तिगत अल्पशी ओळख अशीः
सुमारे साठ वर्षांपूर्वी, १९४० साली नागपूर विद्यापीठातून ते एम्.ए. झाले. पुढील दोन वर्षे १९४१ ते ४३ अमळनेर येथील Indian Institute of Philosophy येथे त्यांनी रिसर्च फेलो म्हणून काम केले. नंतर १९४४ पासून १९७५ पर्यंत एकतीस वर्षे तर्कशास्त्र व तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. यांतले पहिले वर्ष सांगलीला विलिंग्डन महाविद्यालयात. नंतर मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सरकारी महाविद्यालयांत जबलपूर, नागपूर, अमरावती इ.
गावगाडा २००६ (भाग ३)
दुष्काळी भाग, निरीक्षणे व चिंतन
खेड्यात राहणारी, विशेषतः दुष्काळी भागातील माणसे सभोवतालच्या परिस्थितीमुळे रुक्ष झालेली असतात असे आपल्याला अनेक गोष्टींतून प्रत्ययास येते. म्हणजे जेवण करणे, हा एक आवश्यक नैसर्गिक उपचार असतो. बाकी काही नाही. ज्यांना त्या क्रियेला ‘उदरभरण’ म्हणणेसुद्धा रुचत नाही त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. बऱ्याच वेळा खेडूत बंधू ‘तुकडा खाणे’ किंवा ‘तुकडा मोडणे’ म्हणतात; म्हणजे “चला पाव्हणं तुकडा खायला”, किंवा “झाला का तुकडा खाऊन ?” वगैरे.
दुष्काळी परिस्थिती व नदीकाठच्या काळ्या रानाची परिस्थिती खूप वेगळी असते. काळ्या जमिनीतील शेतकऱ्याला शेतीची खूप कमी काळजी असते असे म्हणतात.
जपून टाक पाऊल
माणसांना आपली अपत्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक वगैरे दृष्टीने आदर्शवत् व्हावीत, निरोगी राहावीत असे वाटते. सर्वच सजीवांची पिल्ले सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते गुण असले तर जास्त जगतात व जनतात. माणसे यात हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक काही करण्याचे प्रयत्नही करतात, हे माणसांचे वैशिष्ट्य. मुळात हे केवळ सजीव रचनांनी परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे एक अंग आहे पूर्णपणे नैसर्गिक आणि अपेक्षित. यामुळेच काही वर्षांपूर्वी पुण्याच्या डॉ. हे.वि. सरदेसायांचे घरोघर ज्ञानेश्वर जन्मती (किंवा तसल्या) नावाचे पुस्तक खूप लोकप्रिय झाले. त्याच काळात डॉ. स्पॉकचे बेबी ॲण्ड चाइल्ड केअर हे पुस्तक खपाबाबत बायबलशी स्पर्धा करत होते.
अज्ञाताचे दार
मला शंका, अनिश्चितता, अज्ञान सहन करत जगता येते. एखादी गोष्ट माहीत नसताना जगणे हे चुकीच्या उत्तरांसोबत जगण्यापेक्षा जास्त रंजक आहे. ही एक बाब मान्य करा आपण प्रगती करत असतानाच खात्री नसणेही सोबत येईल; पर्याय सुचण्याच्या, शोधण्याच्या संधीही येतील, (मग) आपण आजचे तथ्य, आजचे ज्ञान, आजचे केवल सत्य, यांबाबत फार उत्साही असणार नाही, प्रगती साधायला अज्ञाताचे दार किलकिलेच असायला हवे.
[भौतिकीचा तज्ज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता रिचर्ड पी. फाइनमन, द सायन्स ऑफ गुड अँड ईव्हिल (The Science of Good and Evil, Michael Shermer, Henry Holt & Co.,
गावगाडा २००६ (भाग-२)
[सध्याच्या खेडेगावांमधील सामाजिक स्थितीवर गांवगाडा-२००६ या नावाने काही लेख प्रकाशित करण्याची इच्छा आम्ही गेल्या अंकात नोंदली. अनिल (पाटील) सुर्डीकर यांच्या लेखाचा एक भागही गेल्या अंकात प्रकाशित झाला. हा लेखाचा पुढील भाग दिवाळीनंतर येते कार्तिकी एकादशी, पंढरपूरची वारी. एकूण चार मोठ्या एकादश्या आषाढी, कार्तिकी, माही व चैत्री. त्यांपैकी जास्त मोठ्या आषाढी व कार्तिकी. हा इकडचा भाग विदर्भ-मराठवाडा ते पंढरपूर अशा मार्गावर येत असल्याने बहुतेक प्रत्येक गावात पंढरपूरला जाणारी कोणत्यातरी भागातील पालखी जाताना अथवा येताना ठेपतच असते. त्या दिवशी गावात गडबड असते.
आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही पण निदान पंढरपूरची वारी करणाऱ्यांचे सत्कार करून त्यांचे तरी दर्शन घ्यावे, अशी भावना असते.
डिझायनर मुले
दोन किस्से सांगतो नवरा-बायकोस हवे आहे “उत्तम’ मूल. सर्वोत्तम असेल तर बरेच. गोरे, घाऱ्या डोळ्यांचे, कोणत्याही रोगाचा मागमूसही त्याच्या गुणसूत्रात नसलेले, बलवान,… वगैरे, वगैरे. यादी तशी मोठी आहे. यासाठी नवरा-बायकोस नैसर्गिकरीत्या मूल जन्मले नाही तरी चालणार आहे. म्हणजे दोघेही ‘नॉर्मल’ आहेत तरीसुद्धा. कारण ‘सर्वोत्तम’ मूल जन्माला घालायचे असेल तर त्यासाठी वेगळी पद्धत आहे. ‘इन व्हिट्रो’ पद्धत. यात स्त्रीबीज आणि पुरुष शुक्राणू तपासले जातील. त्यातील रोगट भाग काढून टाकला जाईल. ते ‘स्वच्छ, निरोगी’ केले जातील. मग दोन्ही एकत्र करून गर्भ तयार केला जाईल.