विषय «इतर»

अळीमिळी गुपचिळी

भारतात लोक कामव्यवहाराबद्दल बोलतच नाहीत. पाश्चात्त्य दृष्टिकोनात भारतीय उपखंड हे चित्रविचित्र इंद्रियानुभव घेणाऱ्यांचे आगर भासू शकते. त्या भागाच्या इतिहासात कामसूत्रही आहे, आणि आजचे पॉप स्टार्स ज्याचा उदोउदो करतात ते तांत्रिक व्यवहारही आहेत. भारतीयांना मात्र भारत हा पाश्चात्त्यांच्या लघळपणाविरुद्धच्या आणि चावट साहित्याविरुद्धच्या लढाईतील किल्ल्यासारखा वाटतो. हे बदलते आहे. चित्रपटातली चुंबने आणि कॉस्मॉपॉलिटन सारखी सचित्र मासिके आता भारतातही मान्य झाली आहेत. मध्ये दिल्लीत दोन समलिंगी स्त्रियांचा विवाहही झाला. पण पारंपरिक स्थितिवादी मूल्ये आजही जास्त प्रबळ आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच वर्षी समलिंगी व्यवहारांवरील बंदी अधोरेखित केली, आणि आजही भद्रकुटुंबातील भारतीय स्त्री मिनिस्कर्ट किंवा बिकिनी पेहरत नाही.

पुढे वाचा

अमेरिकन आरक्षण!

भारतीय लोक परदेशांत इतके यशस्वी कसे झाले? विशेषतः अमेरिकन संघराज्यात? इन्फोसिस, विप्रो आणि तसल्यांना येवढे महत्त्व कसे मिळाले ? ‘ग’, गुणवत्तेचा, हा उत्तराचा एक भाग झाला. पण सोबतच तो अनुल्लेखित ‘आ’, आरक्षणाचा, हाही भाग आहे हो आरक्षणाची अमेरिकन आवृत्ती! ऐकताना विचित्र वाटेल, पण अमेरिकेतल्या १९५०-७० या दशकांमधल्या नागरी हक्क चळवळीतच (Civil Rights Movement) भारतीयांच्या यशाची मुळे आहेत.
शतकानुशतके गुलामगिरी आणि पिळवणूक अमेरिकन काळ्यांनी भोगली, भारतातल्या अनुसूचित जातीजमातींसारखेच ते. त्यांनी त्याविरुद्ध लढा दिला, कधी प्राणाचे मोलही दिले. यातून १९६४ चा नागरी हक्क कायदा घडला.

पुढे वाचा

स्त्री-पुरुष भेद

स्त्री-पुरुष समतेसाठी काय-काय करावे लागेल याची यादी अनेक विचारवंत-तत्त्वज्ञांनी केली आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्नही सुरू आहेत. स्त्री-पुरुष समतेसाठी मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांच्या आड स्त्री आणि पुरुष यांची भिन्न मानसिकता येते काय, याचे उत्तर होय असे आहे. ते एक मानसशास्त्रीय कटु सत्य आहे.
स्त्री आणि पुरुष यांची मानसिकता ही आपल्या पूर्वजांकडून उत्क्रांत होत आलेली एक साखळी आहे. जेव्हा ते जोडीदार शोधतात तेव्हा दोघांच्या आवडी-निवडीची मानसिकता कमालीची भिन्न आढळते. ज्या काही समान आवडी-निवडी आहेत; उदा. सहकार्य करण्याची वृत्ती, विश्वासूपणा, प्रामाणिकपणा, ह्या दोघांनाही हव्या असतात; परस्परावलंबन आणि बुद्धिमत्ता दोघांत समान असते ; दोघांनाही ‘धोका दिला जाणे’ आवडत नाही.

पुढे वाचा

आरसा

टीव्ही हे माध्यम आज पत्रकारितेच्या अर्थाची व्याख्या बदलत आहे. तटस्थ विश्लेषण, समतोल, सत्याबद्दल पावित्र्याची भावना, हे सारे मागे पडत आहे. बातम्या रंजक करून प्रेक्षकांना सतत उत्तेजित करणे, हा नवा गुरुमंत्र आहे. आज टीव्ही हे साठमारीचे रक्तरंजित मैदान झाले आहे मग ते झी-न्यूज ने गुडियाबद्दल सहानुभूती जागवणे असो की बिशन बेदीच्या स्टार न्यूज वरील कार्यक्रमाची आज किस की मौत आई है शैली असो. पत्रकारिता, वार्ताहरांचे काम आणि अभिव्यक्तीची इतर माध्यमे यांच्यातल्या सीमा पुसल्या जात आहेत. सत्य आणि कल्पित यांच्यात फरक उरलेला नाही मध्ये अमिताभ आणि अभिषेक यांनी त्यांच्या बंटी और बबली रूपात टीव्हीवर बातम्या दिल्या.

पुढे वाचा

विवेकवाद-भाग ९(ब): नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (प्रथम प्रकाशन फेब्रुवारी १९९१ अंक १.११, लेखक : दि. य. देशपांडे)

याच अंकात, अन्यत्र, स्वामी धर्मव्रत यांचे पत्र छापले आहे. नवा सुधारक च्या नोव्हेंबर अंकात मी प्रा. श्याम कुलकर्णी यांच्या पत्राला जे उत्तर दिले त्याच्या संदर्भात स्वामी धर्मव्रत यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की मी एक फार मोठी चूक करतो आहे, आणि केवळ मीच नव्हे, तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी आत्मविचाराच्या बाबतीत ती चूक करतात. आमच्या विवेचनात एक प्रचंड घोटाळा आहे. हा घोटाळा काय आहे, आणि आम्ही काय करीत असलेली चूक कोणती हे समजून घेण्याचा आणि स्वामी धर्मव्रतांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा येथे विचार आहे.

पुढे वाचा

विभावरी शिरूरकर/मालतीबाई बेडेकर/ बाळूताई खरे

अव्वल इंग्रजी अंमलातील शिक्षणविषयक आणि स्त्रीविषयक विचारातून निर्माण झालेले हिंगण्याचे ‘कर्वे विद्यापीठ’ विसाव्या शतकाच्या प्रारंभी एका मध्यमवर्गीय आकांक्षी शिक्षकाने आपल्या मुलींना शिक्षण देण्याचा निर्धार करणे. शंभर वर्षापूर्वी जन्माला आलेल्या बाळूताईंनी आपल्याला मिळालेल्या नव्या नजरेने स्वतःकडे, जगाकडे आणि उद्याच्या स्त्रीकडे पाहणे!
‘विभावरी शिरूरकर’ या वाययीन व्यक्तिमत्त्वाने कळ्यांचे निःश्वास, हिंदोळ्यावर, बळी, शबरी, खरे मास्तर अशा कथा कादंबऱ्यांची निर्मिती करणे. समाजाला हडबडून टाकणारे लेखन! विभावरीचे टीकाकार मध्ये सामाजिक प्रक्षोभाचे प्रतिसाद! बळी मध्ये तथाकथित गुन्हेगारी जमातीचे चित्रण स्त्रियांच्या प्रश्नावर समाजशास्त्रीय लेखन. विभावरीच्या साहित्यात विसाव्या शतकातील बदलत्या मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचे चित्र तिच्यासमोरील प्रश्नांचे आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील द्वंद्वाचे चित्रण!

पुढे वाचा

जहाल विभावरी, मवाळ मालतीबाई

आपल्याला आवडणाऱ्या, प्रिय असणाऱ्या कोणत्याही कलावंताला पाहायची, त्याच्याशी बोलायची उत्सुकता सर्वसामान्य वाचकांच्या मनात जशी असते तशी ती मलाही विभावरी शिरूरकर या लेखिकेबद्दल बरीच वर्षे वाटत होती. वास्तविक मराठी भाषा आणि साहित्य यांचा अभ्यास करत असून आणि त्यांत पुरेपूर रस वाटत असूनही पदवी परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत मी केवळ त्यांची ‘बळी’ ही एकमेव कादंबरी वाचली होती. प्रौढ-अविवाहित कुमारिकांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडणाऱ्या ‘कळ्यांचे निःश्वास’ मधील काही कथांविषयी (उदा. बाबांचा संसार माझा कसा होणार ?’ किंवा ‘त्याग’, ‘अंतःकरणाचे रत्नदीप’ इ.) अभ्यासकांनी जे ओघाओघात लिहिले होते, ते नजरेखालून गेले होते.

पुढे वाचा

विभावरी शिरूरकर उर्फ मालतीबाई बेडेकर यांच्या लेखनाचे आकलनः सामाजिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून

१९०५ साली जन्मलेल्या बाळूताई खरे या लेखिकेने १९३३ साली कळ्यांचे निःश्वास नावाचा ग्रंथ श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या प्रकाशनपूर्व अवलोकनासह प्रसिद्ध केला. मराठी समाजामध्ये या लघुकथासंग्रहाने वादळ उठविले. त्या काळातील शिक्षित तसेच अविवाहित आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्य आणि आकांक्षांबद्दल या लघुकथांमधून काही मांडले आहे. विशेष म्हणजे अशा स्त्रिया ज्या दडपणुकीच्या बळी ठरतात त्याबद्दल स्पष्टपणे बोट दाखवीत या कथा लैंगिकतेची चर्चाही करतात. स्त्रियांची लैंगिकता आणि स्वत्व ही दोन्ही पुरुषाच्या अहंकारामुळे छिन्नभिन्न कशी केली जातात याचे चित्रण या कथांमधून येते. भारतीय समाजातील दुहेरी नीतिमूल्ये आणि संकुचित, कठोर आणि कर्मठ आदर्श या सर्वांची चिकित्सा अप्रत्यक्षपणे करून स्वतंत्र देश म्हणून भारताची घडण घडवायची तर स्त्रीप्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी या लेखनातून पुढे येताना दिसते.

पुढे वाचा

उपभोगासाठी भीतीचे संचलन

… एका सांसदीय वादविवादात चर्चिलने आपली वास्तवावरील पकड दाखवून दिली. संरक्षणखर्च का वाढवावा, हे सांगताना तो म्हणाला, “…आपण क्षीण वारसा आणि निरागस इतिहास असलेले तरुण समाज नाही आहोत. आपण जगाची संपत्ती आणि व्यापार यांचा सर्वथा प्रमाणाबाहेर भाग स्वतःसाठी हडपला आहे. आपण हवे तेवढे भूक्षेत्र घेतले आहे. ही आपली मालमत्ता हिंसेने कमावलेली आणि प्रामुख्याने बळजोरीने राखलेली आहे. आम्हाला ही सत्ता शांतपणे भोगू द्या, हा आपला दावा आपल्याला जितका विवेकाधारित वाटतो, तेवढा इतरांना बहुतेक वेळी वाटत नाही.”
यातील शब्दप्रयोगांचे स्पष्टीकरण भारतात द्यायची गरज नाही.

पुढे वाचा

‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’

[बघण्याच्या पद्धती (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. १९७२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या श्रद्धा, ज्ञान आणि परंपरा ह्यांनी कसे संस्कारित झालेले असते हे युरोपिअन तैलचित्रांच्या माध्यमातून तपासते. पुस्तकातील सात निबंधांमधून लेखक वाचकाच्या मनात प्रश्न जागे करू इच्छितात. काही निबंध शब्द आणि प्रतिमा ह्यांचा वापर करतात तर काही निबंध फक्त प्रतिमांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडतात.

पुढे वाचा