विषय «इतर»

बंजारा समाजातील ढावलो गीते

बंजारा समाजातील बहुसंख्य गीते स्त्रियांनी गायिलेली आहेत. त्यामुळे स्त्रीमनाच्या सामूहिक नेणिवेतील स्त्रीनिष्ठ अनुभवांचे पोत तपासून पाहण्याची संधी येथे घेतली आहे. जॅस मारितेनया मते, काव्याचा उगमच माणसाच्या समग्र व्यक्तिमत्त्वात आहे. तो म्हणतो, “It proceeds from the totality of the man, sense, imagination, intellect, love, desire, instinct, blood and spirit together” मानवाच्या आत्मकेंद्रात संवेदनशक्ती, कल्पनाशक्ती, बुद्धी, प्रेम, इच्छा आणि सहजप्रवृत्ती इ.साऱ्या गोष्टी एकत्र नांदत असतात. काव्यनिर्मितीच्या वेळी या आत्मकेंद्राशी संवाद साधला जातो आणि व्यक्तीच्या सामूहिक निश्चेतनातील निगूढ भावाशय काव्यात रूपबद्ध होऊ लागतो. लोकगीतात मात्र ‘मी’ कटाक्षाने टाळलेला आढळतो.

पुढे वाचा

पैशाने श्रीमंती येते का?

जगातल्या अनेक देशांपैकी भ्रष्टाचार ज्या देशांमध्ये अधिक आहे त्यांपैकी आपला एक देश आहे.जे भ्रष्टाचार करतात ते स्वतः श्रीमंत व्हावे म्हणन करतात. भ्रष्टाचाराने श्रीमंती आली नसती किंवा आपल्याला श्रीमंती येते असे वाटले नसते तर भ्रष्टाचार कोणी केला असता काय?
श्रीमंती दोन प्रकारची असते; पहिली असते वैयक्तिक श्रीमंती आणि दुसरी असते सार्वजनिक श्रीमंती. वैयक्तिक श्रीमंती म्हणजे धन, दौलत, इस्टेट वगैरे. पण वैयक्तिक श्रीमंती असलेली व्यक्ती दरिद्री असू शकते. मला एक कुटुंब माहीत होते. ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन होती. पण दोन वेळेच्या जेवण्याचेसुद्धा त्यांना वांधे होते.

पुढे वाचा

नास्तिकाची जडणघडण

कोवळे, शेंदरी कवडसे आधी आले. त्या लोभस उन्हात कवडेही ‘जगायला’ उतरले. त्यांना दाणे हवे होते आणि पाणी तर लागणारच होते. आम्ही त्यांच्या दाण्यापाण्याची सोय करू, करतोच, पण आम्हाला महागाई कणाकणाने फस्त करते आहे. त्याचे काय? येस्-फेस् करत, फेसबुकवर खिदळत, गुण उधळत जवान लोक सोन्यासारखा दिवस वाया घालवतानाही दिसतात. त्यांचे कुठे वनराईकडे लक्ष आहे? राईत देव नसेल, तर तिचे रक्षण कोण करेल? देव आहे असे मानावे तर अनाचाराचे अनार थुई थुई करतानाच दिसतात. आसपास त्या चटकचांदण्याच चमकते तुषार उडवत असतात. सणाचा धूरही विषारीच आहे.

पुढे वाचा

हतबलतेची जागतिक व्यापकता

सध्या सर्वत्र चीनचा बोलबाला आहे. संशोधने, आर्थिक क्षमता, नागरी व्यवस्था अशा अनेक संदर्भातून पाहता चीन आघाडीवर आहे. अमेरिकेच्या तर नाकी दम चीनने आणलेला आहे. चीनमध्ये बंडखोरी स्वागतार्ह तर मानली जात नाही, उलट बेमालूमपणे कापून काढली जाते. ऑलिंपिकमध्ये चीनला मिळणाऱ्या यशामागे खेळाडूंकडून उत्कृष्ट उतारा पदरात पडावा यासाठी त्यांचा लहानपणापासून अक्षरशः छळ केला जातो. याबद्दलच्या बातम्या आपण वाचलेल्या असतील.
शिक्षणव्यवस्थेतल्या भ्रष्टाचारातही चीन आपल्याप्रमाणेच आघाडीवर आहे. चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तिथे स्वयंस्फूर्त देणग्या घ्याव्याच लागतात. या देणग्या फक्त प्रवेशासाठीच नाही तर हुशार मुलांच्या तुकडीत जाण्यासाठी इतकेच नाही तर वर्गात फळ्यासमोरच्या पहिल्या-दुसऱ्या रांगेतल्या बाकावर जागा मिळण्यासाठीही असतात.

पुढे वाचा

पत्रसंवाद

विनायक श्रीकृष्ण महाजन, अर्थ, मु.पो.कुडावळे, ता. दापोली, जि.रत्नागिरी-415712
आजचा सुधारकच्या ऑक्टो. 2012 च्या अंकामधील ‘कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आजच हलाखीच्या स्थितीवर उपाय’ हा दिवाकर मोहनी यांचा लेख वाचला. या विषयावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यानी सुरुवातीसच व्यक्त केली आहे. चर्चेमध्ये सहभाग म्हणून काही गोष्टी लिहीत आहे. सर्वसमावेशक विकास असा धोशा लावणाऱ्या अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांच्या काळात काय घडते आहे हे आपण सर्वजण पहात आहोत. अनुभवत आहोत.
आपला देश हा कृषिप्रधान आहे. इंग्रजांच्या राजवटीत देशाचे काय झाले यापेक्षा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काय घडत आहे हे पहाणे औचित्याचे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा देशाच्या एकूण उत्पन्नात 50% वाटा शेतीचा होता.

पुढे वाचा

पत्रसंवाद

वृन्दाश्री दाभोलकर, 57, प्रतापसिंह कॉलनी, बारावकरनगर (संभाजीनगर), सातारा 415004. (मोबा.9881736366)
बंधुभाव हा शब्द आपण वापरतो. आसुच्या अलीकडील दोन्ही अंकांत तो अनवधानाने असावा-वापरलेला आढळला. हा शब्दप्रयोग अतिशय आक्षेपाहे आहे हे कुणीही विवेकवंत मान्य करेल.
‘बंधुभाव’ यात भगिनीभाव अध्याहृत/गृहीत धरलेला आहे. पण ही समावेशकता या शब्दात वस्तुतः अजिबात नाही. परंपराझापड असल्यामुळे त्यातील आक्षेपार्हता कुणाच्या सहजी लक्षातही येत नाही.
आपण सभेत बोलताना कायम ‘बंधुंनो व भगिनींनो’ (भगिनींनो असे स्वतंत्रपणे) संबोधतो. त्याच जातकुळीतील हा प्रकार असल्याने आपण त्याच धर्तीवर बंधुभाव ऐवजी बंधुभगिनीभाव हा शब्द वापरणे युक्त आहे.

पुढे वाचा

सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे

सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे
आधुनिक भांडवलशाहीचा जन्म झाला आणि आधुनिक औद्योगिकीकरण उदयास आले, त्यावेळी, ज्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणता येईल, असे काही विचारवंत निर्माण झाले. त्यांनी व्यक्तीच्या पराक्रमावर सरकारचे कसलेही बंधन असू नये, असे प्रतिपादन करण्यास सुरुवात केली. ‘प्रायव्हेट एन्टरप्राईजेस’ (खासगी उद्योगा)मुळे सर्वांनाच संधी मिळते. प्रत्येकाने आपापले हित पाहावे, म्हणजे सर्वांचेच हित साधेल, व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहील, ‘ग्रेटेस्ट गुड ऑफ दि ग्रेटेस्ट नंबर’ (जास्तीत जास्त लोकांचे हित) याच मार्गाने साधू शकेल, अशा प्रकारचे त्यांचे तत्त्वज्ञान होते.
सरंजामशाहीच्या जमान्यात सर्वसामान्य व्यक्तीला फारच थोडे स्वातंत्र्य असे.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (६)

माझ्यात जाणीव आली कुठून?

आपण कालकुपीत बसून आपला जन्म होण्यापूर्वीच्या काळात जायचे ठरविल्यास आपण त्यावेळी कुठे होतो, हे सांगता येईल का? पुन्हा एकदा कालकुपीत बसून आपल्या मृत्यूनंतरच्या भविष्काळातील फेरफटका मारण्याचे ठरविल्यास आपण कुठे आहोत, हे तरी सांगता येईल का? स्पष्ट सांगायचे तर आपण कुठेही नाही. एके दिवशी आपल्या तुटपुंज्या आयुष्याची काही कारण नसताना सुरुवात होते व विनाकारण समाप्तही होते. किती गुंतागुंत व गोंधळ? फक्त आयुष्याचा विचार करण्यासाठी जाणीव नावाची चीज असल्यामुळे असले भंपक प्रश्न आपल्याला सुचत असावेत, असेही वाटण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा

आत्मा आणि पुनर्जन्म : सत्य की कपोलकल्पित? (भाग-१)

भारतामध्ये आणि त्यांत प्रामुख्याने हिंदूंमध्ये आत्मा, पुनर्जन्म या गोष्टी अगदी रोमारोमांत भिनल्या आहेत. श्रीमद्भगवद्गीतेतील ‘वसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा’ ‘मारोत देहास परी मरेना’ आणि त्याचबरोबर
‘सांडुनिया जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन।
तशींचि टाकूनि जुनी शरीरें आत्माहि घेतो दुसरी निराळीं।
आणि म्हणूनच ‘जन्मतां निश्चयें मृत्यु मरतां जन्म निश्चयें।
असे भगवंतांनी आणि हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या थोर ऋषिमुनींनी सांगून ठेवले असल्यामुळे अनादि काळापासून हे तत्त्वज्ञान खरेच असले पाहिजे अशी जनसामान्यांचीच नाही तर अगदी उच्चशिक्षित डॉक्टर्स, इंजीनिअर्स, व शास्त्रज्ञांचीही खात्री आहे.

पुढे वाचा

भारतातील लोकशाहीकरण – एक समस्या

भारत हा जगातील, लोकशाही स्वीकारलेला एक मोठा देश, म्हणून ओळखला जातो. सरंजामशाहीतून पारतंत्र्यात गेलेल्या व कालांतराने स्वतंत्र झालेल्या देशांना उपलब्ध पर्यायांतून तसा नवीन व फारसा वादग्रस्त नसलेला लोकशाहीचा पर्याय निवडावा लागल्याने अनेक देशांनी तो स्वीकारला देवील. यापूर्वीच लोकशाही स्वीकारलेल्या व नांदवणाऱ्या देशांची उदाहरणे समोर असतानाच लोकांची, लोकांसाठी, लोकांकरवी हे लोकशाहीचे ब्रीदवाक्यच साऱ्या नागरिकांना लुभावणारे व आश्वासक वाटल्याने आता आपली सत्ता आली म्हणजे नवराष्ट्र हे सर्वांना हितकारी ठरेल हा भाबडा आशावादही त्यामागे होता. मात्र लोकशाही स्वीकारणे व ती अंगीकारणे यातली तफावत लक्षात न आल्याने व केवळ लोकशाही स्वीकारल्याने सारे प्रश्न सुटतील असे गृहीत धरल्याने आज आपल्याला लोकशाही असून देखील एक सर्वव्यापी जनअसंतोषाला सामोरे जावे लागते आहे.

पुढे वाचा