‘आमच्या शाळेत लैंगिक शिक्षणाचा कार्यक्रम करायचाय. इ. ८ वी / ९ वी च्या मुलांसाठी/मुलींसाठी, तर तुम्ही याल का?’, असा प्रश्न प्रत्यक्ष किंवा फोनने, आणि सोबत एक त्याच मजकुराचे पत्र ही माझ्यासाठी वारंवार घडणारी गोष्ट. मी येईन’ असे म्हणते आणि विचारते, ‘हा कार्यक्रम का आयोजित करावा असे वाटते आहे?’ या प्रश्नाच्या उत्तरात, ‘आम्ही दरवर्षी करतो/आम्हाला तसा आदेशच असतो’, अशी उत्तरे तरी असतात किंवा मुला मुलींचा या वयात पाय घसरू नये, त्यांना आजारांचा, गर्भारपणाचा धोका समजावा असा समस्यानिवारणाचा हेतू असतो.
माझ्या प्रश्नाला अपवाद म्हणून सुद्धा आजवर एकानेही मुलामुलींना स्वतःच्या लैंगिकतेची जाणीव होताना न्यूनगंड येऊ नये, मोकळेपणाने प्रश्न विचारायला अवकाश मिळावा, असे उत्तर दिलेले नाही.
विषय «इतर»
प्रार्थना . . .
[या शब्दाला शाळेच्या संदर्भात एक खास वेगळा अर्थ आहे. शाळेचा दिवस सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना म्हणून सुरू होतो. काही शाळांमध्ये रोज किंवा विशिष्ट दिवशी शाळासमाप्तीच्या वेळीही प्रार्थना म्हणण्याचा प्रघात आहे.
प्रार्थना या शब्दात ती कोणाला तरी केलेली विनंती असल्याचे जाणवते. पण प्रार्थना सर्वांनी म्हणताना मुलामुलींच्या मनात नेमके काय येत असेल? एका त-हेने प्रार्थना सर्वांनी म्हटलेले, वृंदगान किंवा समूहगान असते. संगीतात भावनांना उत्तेजित करण्याचे कौशल्य असते. एकत्रपणे संगीत गाता-ऐकताना त्याचा काही एक परिणाम मनांवर होणे साहजिक आहे. राष्ट्रगीताने किंवा स्फूर्तिगीतांनी देश-प्रेमाची भावना मनात भरून आल्याचा अनुभव अनेकांनी—-कदाचित सर्वांनी—-घेतला असेल.
सर्वांसाठी शिक्षण . . . ?
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात ‘शिक्षण’ ही समाजातल्या वरच्या वर्गाची आणि पुरुषांची मक्तेदारी होती. ते तसे नसावे आणि समाजातल्या सामान्यातल्या सामान्य स्त्री-पुरुषांपर्यंत ते पोचावे, यासाठी गेल्या शतकात अनेक प्रयत्न झाले, चळवळी झाल्या. सर्वांनी शिकण्यामध्ये—-शहाणे होण्यामध्ये एकंदरीतच समाजाचीही उन्नती होणार आहे हा विचार हळूहळू पचनी पडला. त्याचे फलित म्हणूनच स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने सर्वांपर्यंत शिक्षण पोचवणे ही
आपली जबाबदारी मानली.
एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिक्षण पोचवणे ही गोष्ट विशेषतः आपल्यासारखा गरीब देशासाठी सोपी नि िचतच नाही. या अंकात निर्देश केलेले सगळे हेतू सर्व मुलांपर्यंत पोचावेत असे तत्त्वतः आपले ध्येय असणे ठीक आहे.
विशेषांक: शिक्षणामागील हेतू
जुलै-ऑगस्ट २००२
विशेषांक: शिक्षणामागील हेतू
कुणी ठेविले भरून
कुणी ठेविले भरून
शब्दाशब्दांचे रांजणः छंद लागला बाळाला घेतो एकेक त्यांतून ।।१।।
काही सुबक रंगीत, काही पेलती मुळी न, काही जोडतो तोडतो, पाहतोही वाकवून ।।२।।
शब्द होतात खेळणीः खेळवितो ओठांवर, ध्यानी मनी जे जे त्याला देऊ पाहतो आकार ।।३।।
कधी वाटते उणीव शब्द येईना मनास, घाली पालथे रांजणः शब्दशोधाचा हव्यास ।।४।।
आणि अवचित त्याच्या ओठावरी शब्द येतोः शब्द त्याचीच घडणः बाळ आनंदे नाहतो ।।५।।
अशा त्याच्या शब्दासाठी माझी उघडी ओंजळः शब्द शब्द साठविते जसे मेघांना आभाळ ।।६।।
—- इंदिरा
लेखकांची ओळख
१. रेणू गावस्कर —- सुमारे पंधरा वर्षे डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल या रिमांड होममध्ये कुठल्याही पदावर नसताना मुलांबद्दलच्या आत्मीयतेमुळे शिकवायला जात. वंचित मुलांसाठी सतत काम. इंग्रजी साहित्याचा आणि रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याचा अनेक वर्षांचा अभ्यास.
२. जॉन होल्ट —- अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ. दुसऱ्या महायुद्धात सैन्यात भरती. नंतर शिक्षक म्हणून काम करताना मुलांच्या दृष्टीतून पाहून शिक्षणपद्धती असफल का ठरतात याचे विश्लेषण. शेवटी शालेय शिक्षणपद्धतीत काहीच बदल घडत नाहीत म्हणून शाळाच बंद कराव्यात अशी मांडणी करू लागले होते. ‘How Children Learn’, ‘How Children Fail’, ‘Escape from Childhood’, ‘Learning all the Time’, ‘Instead of Education’, ‘Never too Late’, अशा अनेक पुस्तकांचे लेखन.
अभ्यागत संपादकाचे मनोगत
“शिक्षण कशासाठी असते, त्यामागे कोणते हेतू असतात?’ असा प्रश्न जर मी आपल्याला विचारला, तर उत्तर देण्याआधी आपण प्रश्न विचाराल, “कोणते शिक्षण?’
लहान मूल बोलायला शिकते, शाळा-महाविद्यालयात विशिष्ट अभ्यासक्रम विद्यार्थी शिकतात, माणूस अनुभवातून शिकतो, मोटर चालवायला शिकतो, नवी भाषा शिकतो, कला महाविद्यालयात रंगमाध्यमाची काही कौशल्ये हस्तगत करतो, उत्तम कथा-कादंबऱ्यांच्या आकलनातून जीवनाचा अर्थ समजून घेऊ पाहतो, स्वतःला वा जवळच्या व्यक्तीला झालेल्या आजाराची माहिती पुस्तकांमधून जाणून तो, संगणकाकडून हवे ते काम करवून घ्यायला शिकतो, इ. इ. ही सर्व शिक्षणाचीच उदाहरणे आहेत, परंतु हेतूंचा विचार करता प्रत्येक ठिकाणी वेगळे उत्तर येऊ शकते.
शिक्षणामागचे मूलभत हेतू . . . एक प्रश्न
शिकणे ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. माणसाच्या प्रत्येक पिढीने आपली वाटचाल आधीच्या पिढीने सुपूर्द केलेली ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊन केलेली आहे. या शिदोरीतील ज्ञानाचे संचित पुढील पिढीकडे सोपवणे हा औपचारिक, अनौपचारिक, किंवा सहज शिक्षणामागचा मूळ हेतू आहे. यामुळे नव्या पिढीचे पाऊल मागच्याहून पुढे पडावे अशीही त्यामागे अपेक्षा आहे. ज्ञानाची उपलब्ध शिदोरी खूप मोठी असते. साहजिकच प्रत्येक व्यक्तीकडे ती संपूर्ण पोचवणे अशक्य आहे. दिलेल्या वेळात, त्यातले नेमके काय पोचवावेच, काय आवश्यक आहे, तर काय हवे तर बाजूला ठेवावे —- हा विचार करताना आधाराला शिक्षणामागचे मूलभूत हेतू घ्यावे लागतात.
व्यक्ती विरुद्ध नागरिक
आधुनिक काळात जगातील सर्व सुसंस्कृत समाजांनी शिक्षणाची आवश्यकता स्वीकारलेली आहे. अनेक मान्यवर विद्वानांना हे म्हणणे मान्य नाही. त्यांच्या मते जे उद्देश्य गाठण्याचा दावा शिक्षण करते ते गाठण्यास ते असमर्थ ठरलेले आहे. ह्या मताचा खरेखोटेपणा तपासण्याआधी शिक्षणामुळे काय साध्य व्हावे असे आपल्याला वाटते ह्याचा विचार करायला हवा. शिक्षणाच्या हेतूबद्दल एकवाक्यता नसणे स्वाभाविक आहे पण एका मुद्द्यावर मात्र विरोधकांमध्ये दोन कट्टर गट पडल्यासारखे दिसतात — शिक्षणाचा विचार व्यक्तीच्या संदर्भात करणारे आणि शिक्षणाचा विचार समाजाच्या संदर्भात करणारे.
शिक्षणामध्ये व्यक्तीला घडवण्याची क्षमता असते असे जर मानले तर असा प्रश्न उद्भवतो की शिक्षणाने माणसाला चांगली व्यक्ती म्हणून घडवावे की चांगला नागरिक म्हणून?
रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार
“आज शाळेत जायचं म्हणून रडतो आहेस, उद्या शाळेत जाणार नाही म्हणून यापेक्षा जास्त रडशील.”
रवींद्रनाथांच्या लहानपणी त्यांच्या घरी येऊन शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना एक थप्पड मारून ही जी भविष्यवाणी उच्चारली तीच त्यांच्या शिक्षणविषयक अनुभवांतील पहिली पायरी म्हणायला काहीच हरकत नाही. रवींद्रनाथांचा भाऊ सोमेंद्रनाथ आणि भाचा सत्यप्रसाद हे त्यांच्यापेक्षा केवळ दोनच वर्षांनी मोठे. त्यामुळे ही तीनही मुले तशी एकत्रच वाढली. दोन वर्षांच्या वडिलकी-मुळे हे दोघे शाळेत जायला लागले. पण छोटा रवी मात्र अजून शाळेत जायच्या वयाचा झालेला नाही असे घरच्यांनी ठरवून टाकले होते.
शिक्षण नकोच —- प्रत्यक्ष करणे आवश्यक
मी शिक्षणाला विरोध करतो. कृतिशील आयुष्यापासून वेगळे काढलेले शिक्षण आणि धमक्या, भीती, लोभ, लाच यांच्या दबावाखाली घडवून आणलेले शिक्षण यापेक्षा प्रत्यक्ष (काम) करणे उपयुक्त. स्वतः दिशा ठरवलेले, हेतुपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी केलेले काम.
आज जगभर शिक्षणाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे—-काही लोकांनी स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्यांना वळण लावणे, त्यांना आकार देणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांना शिकायला लावणे—-असा. मी त्याचा विरोधक आहे. हे शिक्षण प्रभावी, कार्यक्षम, मानवी कसे करता येईल यावर वेळ घालवण्यात अर्थच नाही. ते आता नव्याने मानवी करता येणार नाही कारण त्याचा हेतू मानवी नाही.