विषय «विवेकी विचार»

ज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ

ज्योतिष : शास्त्र की थोतांड?
“याचे स्पष्ट आणि निःसंदिग्ध उत्तर थोतांड हेच आहे.” ३ जुलै २०२१ ला साम टीव्ही मराठीवर मी चर्चेत सहभागी झालो होतो. वेळेच्या अभावी अनेक मुद्दे मांडायचे राहून गेले. त्यातील काही मुद्दे सविस्तरपणे मांडतो. प्रसारमाध्यमे असोत वा राजकारण, आपल्या देशात तार्किक आणि मुद्देसूद चर्चा करण्याचे अगदी तुरळक पर्याय आहेत. ‘आजचा सुधारक’ या विषयांवर विशेषांक प्रकशित करत आहे हे निश्चितच आशादायी आहे.

IGNOU सोबत आणखी ७-८ विद्यापीठे आहेत (जसे की बनारस हिंदू विद्यापीठ, कालिदास संस्कृत विद्यापीठ इत्यादी) जिथे हा विषय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. पण तो कलाशाखेत! हे

पुढे वाचा

अज्ञानाधारित अभ्यासक्रम

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) २०२१ पासून ज्योतिष विषयाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) प्रारंभ करण्याचे घोषित केले आहे.

“आकाशातील ग्रह-तार्‍यांचा मानवी जीवनावर सतत परिणाम होत असतो.” हे ज्योतिष विषयाचे पहिले गृहीतक आहे. खगोलशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की मानवी जीवनावर ग्रहतार्‍यांचा कोणताही परिणाम होत नाही; असे निरीक्षणांवरून सिद्ध झाले आहे. म्हणजे इग्नूच्या या अभ्यासक्रमासाठी कोणतेही सत्य गृहीतक नाही. म्हणून हा अज्ञानाधारित अभ्यासक्रम नकोच. अशी विज्ञानप्रेमींची मागणी आहे. 

फलज्योतिषाची भाकिते किती धादांत खोटी असतात याचे सत्यदर्शन घडविणारा लेख:…..

अष्टग्रही:-  फेब्रुवारी १९६२

तुम्ही जन्मकुंडली पाहिली असेल.

पुढे वाचा

मला पडलेले काही प्रश्न

प्रसंग पहिला

एक व्यक्ती एका कार्यालयात कामाला लागली. कधी? १ एप्रिल २०१९, सकाळी नऊ वाजता. नऊ वाजल्यापासून कार्यालय सुरू झाले. व्यक्तीच्या टेबलसमोरची जी खिडकी आहे, त्या खिडकीतून साधारण एक किलोमीटर अंतरावर ट्रॅक आहे आणि तिथून साधारण दिवसातून दोन वेळा ट्रेन पास होताना दिसते. त्या ट्रॅकपलीकडे अडीच ते तीन किलोमीटरवर एक मोठा डोंगर दिसतो. अर्थात डोंगराच्या पार्श्वभूमीवर ट्रेन पास होताना कार्यालयातून दिसते.

दोन वर्षांनी या व्यक्तीला प्रमोशन मिळाल्याचे पत्र मिळाले. हे पत्र मिळाले तेव्हा समोरून ट्रेन पास होत होती. त्यावेळेस तिथे कार्यालयात श्री संस्कारे नावाची व्यक्ती कामासाठी आलेली होती.

पुढे वाचा

फलज्योतिष : विश्वसनीय?

“जन्मवेळेच्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून त्या व्यक्तीच्या जीवनातील घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना कोणत्या” हे भविष्य वर्तवणे या पद्धतीला फलज्योतिष असे नाव आहे. या विषयावर जगभरात अनेक भाषांतून अगणित ग्रंथ निर्माण झालेले आहेत. स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणारे अनेक जण या ग्रंथांचा उपयोग करून भविष्य वर्तवण्याचे काम करतात. काही हौशी, तर बहुतेक व्यावसायिक आणि जगातील असंख्य व्यक्ती त्यांचेकडून स्वतःचे भविष्य जाणून घेतात. त्यांचा विश्वास असतो की अशी भाकिते अनेकदा खरी ठरतात. पण खरोखर अशी भाकिते खरी ठरतात का हे शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहणे जरूरीचे आहे.

पुढे वाचा

‘हाय’ काय अन् ‘नाय’ काय..!

आज मानव ‘विज्ञान’रूपी साधनांचा वापर करून निसर्गात घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेऊ शकतो. माणूस जेव्हा आदिम अवस्थेत होता तेंव्हा भोवताली घडणाऱ्या घटनांचा अर्थ समजून घ्यायला त्याच्या ‘मेंदू’ला कसरत करावी लागत होती. मग काय? मेंदूच्या आवाक्यातील गोष्टींनुसार तो या साऱ्या जगाचा अर्थ लावायचा प्रयत्न करू लागला. तदनुसार तग धरून राहण्यासाठी उपाययोजनाही करू लागला. अर्थातच हे सारे ‘चुका आणि शिका’ स्वरूपात सुरू असताना मानवी मेंदूने अनेक क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केली. एकप्रकारे मानवप्राणी त्याच्याकडे असलेले ‘मेंदू’ नामक अजब अस्त्र वापरून या गजब दुनियेत दिमाखात वाटचाल करू लागला.

पुढे वाचा

कोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे

अरिष्टांच्या काळात माणसाला सुस्पष्ट आत्मविश्वासाची आणि डोळस आशावादाची गरज असते. कोविड-१९ अरिष्टाने आपल्या पूर्वश्रद्धा, विश्वास आणि समजुतींमध्ये आमूलाग्र बदल घडविला आहे. प्रत्येक अरिष्टाप्रमाणेच कोविड-१९ अरिष्ट हे सुद्धा ‘मानवी कृतीमागच्या प्रेरकशक्तीं’तून (Spring of human action) उद्भवले असून, मानवाने आपल्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या जोरावर भौतिक जगावर आणि निसर्गसृष्टीवर मिळविलेल्या आणि उत्तरोत्तर वाढतच जाणाऱ्या वर्चस्वाचे ते फलित आहे. या अरिष्टाच्या दीर्घकालीन व विशेषतः आर्थिक परिणामांविषयी तज्ज्ञांमध्ये विचारमंथन सुरू झाले असून, संभाव्य उपायांची मांडणी केली जात आहे. भारतात, अल्पकाळात लोकांना रोजगार देऊन दीर्घकाळात त्यांची क्रयशक्ती/मागणी वाढवणारे अर्थधोरण स्वीकारावे की आधी लोकांच्या जीविताला प्राध्यान्य द्यावे, हा एक मोठाच पेचप्रसंग आहे. हा प्रश्न राज्यसंस्थेच्या व अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाचा आहे. कोरोना महामारीनंतर जगात सामाजिक पुनर्रचना करताना अर्थव्यवस्थेचे कोणते ‘प्रारूप’ (model) स्वीकारावे याचा विचार सुरू आहे, यासंदर्भातच आता आपण प्रमुख व्यवस्थाप्रकार व त्यांचा व्यक्तीच्या मनोरचनेवर होणारा परिणाम अभ्यासूया आणि अगदी संक्षेपात त्यांची तपासणी करूया. 

पुढे वाचा

नास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता

नास्तिक्य हा काही या लेखाच्या वाचक मंडळीस नवा विषय नसेल याची खात्री आहे. बुद्धिप्रामाण्यवादाच्या निरंतर प्रवासात सापडणारा एक टप्पा म्हणून आपल्याला नास्तिक्य ओळखीचे आहे. माणूस जन्मल्यापासून ते तो स्वतंत्र विचार करू लागेपर्यंत त्याच्यावर जे संस्कार होतात ते बरेचदा तर्कशुद्ध विचारांच्या प्रवाहाने नंतरच्या आयुष्यात धुतले न गेल्याने आपल्याला धार्मिकांची संख्या लक्षणीय दिसत असते. जसजसे तर्कशुद्ध विचारप्रवाह माणसाच्या मनातील कोपऱ्यांना स्पर्श करू लागतात तसतशी ही जळमटे दूर होतात आणि माणूस अधार्मिक, अश्रद्ध आणि मग नास्तिक असा प्रवास करतो. हे घडत असताना सदर बुद्धिप्रामाण्यवादी माणसाला दैनंदिन वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात मात्र नास्तिक नसलेल्या, बुद्धिप्रामाण्यवादी नसलेल्या धर्माचे संमिश्र असलेल्या सांस्कृतिक प्रभावाला आणि काही नैतिक कोड्यांना सामोरे जावे लागते.

पुढे वाचा

‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह

तत्त्वज्ञानाचे धडे गिरवताना संकल्पनांशी बौद्धिक कबड्डी खेळावी लागते. अनेक संकल्पना बुद्धीच्या कचाट्यात आरामात सापडतात. काही संकल्पना मात्र अश्या असतात की त्या काही केल्या सापडत नाहीत. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे, प्रथमदर्शनी अस्तित्वात आहे असे वाटणारी एखादी संकल्पना जवळून ऊहापोह केल्यावर मृगजळाप्रमाणे नाहीशी होऊ शकते. दुसरे म्हणजे, त्या संकल्पनेचे अस्तित्व आपल्याला नाकारता येऊ शकत नाही, पण तिच्या एकसंधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ शकते. म्हणजे एक नव्हे तर अनेक संकल्पना तेथे असू शकतात. अश्या संकल्पना एवढ्या एकसंध नसतील की त्या ‘एक संकल्पना’ म्हणून हातात सापडाव्या, किंवा त्या जरी एकसंध असल्या तरी इतक्या लवचिक असतात की सहजपणे निसटून जाव्यात.

पुढे वाचा

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन

बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : जगाला प्रभावित करू शकणाऱ्या अलौकिक शक्तीचे, व्यक्तीचे वा वस्तूचे अस्तित्व बुद्धिगम्य नाही म्हणून ते स्पष्टपणे नाकारणे. परंतु ज्यावेळी आपण ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ठळकपणे उद्धृत करत आहोत त्यावेळी अलौकिक शक्तीसहीत धर्म/पंथ/धम्म/दीन/रिलिजन (religion) अशा धर्माधीष्ठित जीवनपद्धतीसुद्धा नाकारत आहोत आणि म्हणूनच हिंदू-नास्तिक, मुस्लिम-नास्तिक, बौद्ध-नास्तिक, ख्रिश्चन-नास्तिक इत्यादी संभ्रमात टाकणारे शब्द आणि ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ ही संज्ञा यातील फरक स्पष्ट करता येईल. धर्माचे अस्तित्व स्वीकारून फक्त ईश्वर नाकारणे हे अपुरे आहे. ‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’ हे अलौकिक शक्तीपुरते मर्यादित नसून मानवी जीवनातील इतर घटकांनासुद्धा लागू होते अशी पूर्ण आणि स्पष्ट मांडणी बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्यात अपेक्षित आहे.

पुढे वाचा

बुद्धी, विवेक आणि वास्तव (भाग १)

आपण ‘कुणापासून’ तरी निर्माण झालो, आपण आहोत त्याअर्थी आपल्याला आई-वडील आहेत हे सरळ आहे हे गृहीत धरणं जीवउत्पत्तीच्या सध्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्यच आहे. बहुतांश सजीव जन्माला यायला आई-वडील लागतात त्याचप्रमाणे माणूस आणि इतर सजीव पृथ्वीवर यायलादेखील कुणीतरी लागत असणार – अन्यथा आपण कुठून आलो याचं उत्तरच सापडत नाही – हा विचार ‘या सृष्टीचा निर्माता कुणीतरी असणार’ या दृढ झालेल्या धारणेमागे होता/आहे. आपले आई-वडील कोण हे निश्चित करता येतं, त्यांना समोर दाखवता येतं. (अर्थात आई-वडील ही निश्चिती, विशेषतः ‘वडील’ ही निश्चिती, एका टप्प्यावर करता येऊ लागली). सृष्टीनिर्मात्याबाबत हे शक्य नाही. परंतु ती धारणा अत्यंत बळकट झाली असल्याने ‘निर्माता दिसला नाही तरी आहे’ याबाबत बहुसंख्यांच्या मनात संदेह नसतो.

पुढे वाचा