विषय «संपादकीय»

संपादकीय

गेल्या दोन-तीन महिन्यांत काही आम्ही लिहिलेल्या व काही आम्ही प्रकाशित केलेल्या लेखांमुळे पुष्कळ पत्रे आली आहेत. त्या पत्रांना सविस्तर उत्तरे देण्याची गरज निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर काही पत्रांवर ताबडतोब काही ना काही कृती करण्याची गरज आहे अशा पत्रांमध्ये श्री. देवदत्त दाभोलकर ह्यांचा क्रम पहिला लागतो. श्री. भ. पां. पाटणकर (ऑगस्ट ९९ अंक पाहावा), श्री. ग. के. केळकर, श्री. प्रभाकर गोखले, ह्या आमच्या वाचकांनी पाठविलेल्या पत्रांना (चालू अंकात अन्यत्र प्रकाशित) क्रमशः उत्तरे पुढे दिली आहेत. मराठी भाषाप्रेमींना लिहिलेल्या अनावृत पत्राला आलेल्या उत्तरांपैकी काही या महिन्यात प्रसिद्ध करीत आहोत, बाकीची ऑक्टोबरमध्ये व त्यांचा समारोप शक्यतोवर नोव्हेंबरमध्ये करावा असा इरादा आहे.

पुढे वाचा

संपादकीय

अन्यायकर्त्याला सर्व समाजाचे संमोदन वा मूक अनुमोदन असते
ह्या अंकामध्ये अन्यत्र श्री. नाना ढाकुलकरांची दोन पत्रे प्रकाशित होत आहेत. त्यांच्या पूर्वीच्या पत्राला आम्ही जे उत्तर दिले त्याने त्यांचे समाधान झाले नाही हे उघड आहे. आजचा सुधारकचे धोरण व्यक्तीवर किंवा व्यक्तिसमूहावर (एखाद्या जातिविशेपावर) केलेली टीका शक्यतोवर न छापण्याचे आहे. त्या धोरणाला अपवाद करून ही पत्रे छापत आहोत. आमच्याकडे आलेल्या आणखीही काही लेखांत व्यक्तीवर टीका करणारा मजकूर आलेला आहे. तेवढा प्रसिद्ध करून ह्यानंतर असा मजकूर वगळला जाईल. आम्हाला विचारांशी भांडावयाचे आहे, व्यक्तींशी नाही, कारण व्यक्तीचे विचार बदलू शकतात ह्यावर आमचा ठाम विश्वास आहे.

पुढे वाचा

संपादकीय

विवेकाचे उग्र व्रत
सोनिया गांधी यांची उमेदवारी ही आपल्या देशातली एक फारच मोठी घटना झाली आहे. सगळ्या देशाचे लक्ष सध्या त्यांच्याकडे लागले आहे. आपल्या देशातली लोकशाही ही किती अपरिपक्व आहे त्याचे हे लक्षण आहे. भाजपासारख्या सत्तारूढ पक्षाला विदेशात जन्मलेल्या, जिने आजवर राजकीय आकांक्षा दाखविली नव्हती अशा एका साधारण बुद्धीच्या महिलेने आपली उमेदवारी जाहीर केल्याबरोबर भीतीने कापरे भरावे ही घटना अत्यंत दुःखद आहे. आमच्या देशाच्या दृष्टीने नामुष्कीची आहे. काँग्रेस पक्षाजवळ सोनिया गांधींच्यापेक्षा अधिक मातब्बर व्यक्ती नाही. आपण सारेच किती व्यक्तिपूजक आहेत हेच ही घटना स्पष्ट करते.

पुढे वाचा

संपादकीय

देशनिष्ठा म्हणजे शेजारधर्म
आमचे आजचा सुधारक हे मासिक विवेकवादाचा प्रसार करण्यासाठी जन्माला आलेले आहे हे आपण जाणताच. ते कोणत्याही विषयाचा किंवा मताचा प्रचार करीत नाही. प्रचारक मोठमोठ्याने ओरडतो आणि दुसरी बाजू, विरुद्ध मताचा आवाज, श्रोत्यांपर्यंत पोहचणार नाही असा यत्न करीत असतो आणि प्रसारक शांतपणे आपली बाजू मांडतो, दुसरी बाजू ऐकून घेतो, लोकांना ऐकू देतो. असो.
विवेकवाद म्हणजे काय हे स्पष्ट करण्याची प्रत्येक संधी घेण्याचे आणि त्या निमित्ताने आमच्या प्रतिपादनात पुनरुक्तीचा दोष आला तरी तो स्वीकारण्याचे आम्ही ठरविले आहे. ते करण्यासाठी काही टोकाची अतिरेकी मते मांडून लोकांना डिचवण्याचाही क्रम आम्ही चालविला आहे.

पुढे वाचा

संपादकीय

सारेच श्रद्धालु!
गेल्या महिन्याचे संपादकीय आणि स्फुट लेख वाचून दोन चांगली पत्रे आली. त्यांपैकी ज्या एका पत्रलेखकाला आपले नाव प्रकट करावयाचे नाही त्यांचे पत्र अन्यत्र प्रकाशित करीत आहोत. दुसरे पत्र ह्याच संपादकीयामध्ये पुढे येणार आहे. ह्या दुस-या पत्राच्या निमित्ताने आम्ही आमचे विचार मांडणार आहोत.
आम्ही वेळोवेळी जी संपादकीये आणि स्फुटलेख लिहितो त्यांतून आम्ही आम्हाला कळलेल्या विवेकवादाच्या दृष्टिकोनातून काही घटनांचा परामर्श घेत असतो. अशा आमच्या लेखनावर आमच्या वाचकांपैकी सगळ्यांनी आपली काही ना काही प्रतिक्रिया द्यावी अशी आमची इच्छा असते पण ती नेहमीच पूर्ण होत नाही.

पुढे वाचा

संपादकीया

श्री. ढाकुलकरांनी स्वामी विवेकानंदांच्या वचनांचा उल्लेख करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् आणि स्टालिन ह्यांच्यातील संवादाचा आधार घेतला आहे. भाकरी ही परमेश्वराची शक्ती आहे आणि ती त्याच्या कृपेने ह्या जन्मात मिळते असे त्यांनी सूचित केले आहे. परमेश्वराच्या कृपेने मोक्ष मिळतो किंवा भाकरी त्याच्या कृपेशिवाय लाभत नाही असे स्वामी विवेकानंदांना वाटत होते. आम्हाला तसे वाटत नाही. ईश्वर नाही, मोक्ष नाही, आपले सर्व व्यवहार ह्या पृथ्वीतलावर घडतात; त्यांचा जमाखर्च परलोकात कोणीही ठेवत नाहीत असे आम्ही मानतो. मानवाच्या मनावर संस्कार करणा-या अनेक घटना त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत घडत असतात.

पुढे वाचा

संपादकीय

अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गरज
महाराष्ट्राचे परात्पर शासनप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी फेब्रुवारी महिनासुद्धा गाजविला. “आधी २५ लाख रुपये परत करा आणि मग अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गमजा करा” अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी अ. भा. मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षांना उद्देशून केले हा सारा वृतान्त आमच्या वाचकांना माहीत आहेच. प्रश्न केवळ कोण काय बोलले ह्याचा नाही – प्रश्न अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आहे.
ज्यावेळी एखाद्या राजाचे राज्य असे, त्याच्या पदरी असणा-या पंडितांना तो पोसत असे, तेव्हा त्या पंडितांना त्याची भाटगिरी केल्यावाचून गत्यंतर नसे. बलाढ्य, लहरी व उद्दाम अशा नरेशाकडून त्यांचे कधी अपमान झाल्यास ‘अर्थस्य पुरुषो दासः’ असे म्हणून ते स्वतःचे सांत्वन करीत.

पुढे वाचा

संपादकीय

मागच्या अंकात पुष्कळ पत्रे प्रकाशित झाली. त्यांपैकी काही पत्रांना उत्तरे देण्याची गरज आहे. बारीकसारीक सूचनांचा अगोदर परामर्श घेऊ आणि गंभीर सूचनांचा मागाहून. श्री. मनोज करमरकर ह्यांनी मुखपृष्ठावर कॅप्टन ब्रीज यांचा उतारा छापून काय साधले असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि श्री. मधुकर कांबळे ह्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या लेखातील उतारे आवर्जून प्रकाशित करावे अशी आम्हाला विनंती केली. ही दोन्ही पत्रे आम्ही कोणता मजकूर पुनःप्रकाशित करतो वा करावा ह्यासंबंधी आहेत. तरी त्या संबंधीचे धोरण पुन्हा एकदा स्पष्ट करतो.
आमच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर एखाद्या जुन्या अथवा अल्पपरिचित पुस्तकातील जो भाग आम्हाला स्वतःला अंतर्मुख करतो, विचार करायला लावतो, अशा मजकुरातला एक अंश प्रकाशित करण्याचा आमचा प्रघात आहे.

पुढे वाचा

संपादकीय

सप्टेंबरचा अंक प्रकाशित झाल्यानंतर जातिभेद कसा घालवावा ह्या विषयासंबंधी आणि आजचा सुधारक हे मासिक महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लोकांना हा आपला सुधारक आहे असे कशामुळे वाटेल ह्याविषयी आणखी काही पत्रे आली. ती वाचून असे जाणवले की हा विषय येथेच थांबविणे इष्ट होणार नाही. जातिभेद नाहीसा व्हावा ह्याविषयी जरी सगळ्यांचे एकमत असले तरी आमच्या विचारसरणीवर इतिहासाचा पगडा आहेच. जातींच्या संबंधीचे वास्तव अतिशय दाहक आहे, उग्रभीषण आहे. ते वास्तव बदलण्यासाठी जे काय थातुरमातुर उपाय आम्ही सुचविले ते सद्य:स्थितीत उपयोगी नाहीत असा सूर आम्हाला ऐकू येत आहे.

पुढे वाचा

संपादकीय

एका वेगळ्या प्रकारची परिस्थितिशरणता
आपल्या देशामध्ये, ह्या भारतभूमीत असे पुष्कळ लोक आहेत की जे आपल्यापुरतेच पाहत नाहीत, आपल्या शेजारपाजारच्यांची त्यांना आठवण असते. त्यांच्या वाट्याला आलेल्या संपत्तीचा एकट्याने उपभोग घेण्याचा त्यांना संकोच होतो. महात्मा गांधींनी तर त्या बाबतीत आपणा सर्वांना आदर्शच घालून दिला. दरिद्रनारायणाला जे मिळत नाही ते वापरण्याला त्यांनी आपल्या उत्तरायुष्यात नेहमीच नकार दिला. सर्वसाधारण भारतीयाइतकेच आपले जीवनमान राखण्याचा त्यांचा कटाक्ष होता. राहण्यासाठी मोठमोठे वाडे त्यांना मिळू शकत असताना त्यांनी झोपडीचा आश्रय केला. अशी दीनदयाळु, सुमनस्, दयार्द्र किंवा करुणाकर मंडळी भारतात बहुसंख्य नसली तरी पुष्कळ मोठ्या संख्येने आहेत.

पुढे वाचा