विषय «संपादकीय»

संपादकीय

मित्रहो,
अलीकडे जाणवत असलेल्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे आणि वाढत्या वयामुळे संपादकमंडळाकडे मी संपादकत्वाच्या जबाबदारीमधून निवृत्त होण्याची इच्छा एक वर्षापूर्वीच व्यक्त केली होती. मासिकाचे संपादकत्व नव्या संपादकाकडे सोपविण्याची वेळ आता आली
आहे.
संपादकपदाची धुरा कोणाकडे सोपवावी याचा मी पुष्कळ विचार केला, बहुतेक सर्वांशी चर्चा केली. या सर्व विचारातून एक योजना मला सुचली. ती अशी –
संपादकमंडळ एकूण पाच जणांचे करावे, आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाने आळीपाळीने एक एक वर्षभर संपादकत्व करावे.
संपादकमंडळ पुढीलप्रमाणे असावे :
दिवाकर मोहनी, प्र. ब. कुळकर्णी, बा. य. देशपांडे, नंदा खरे आणि सुनीती देव.

पुढे वाचा

संपादकीय : अभ्यागत संपादकांचे

‘समान नागरी कायदा’ ह्या विषयावरील विशेषांकाच्या संपादनाची संधी आजचा सुधारकच्या संपादकांनी मला दिली ह्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते.
समान नागरी कायद्याबाबतची चर्चा प्रामुख्याने गेल्या १०-१२ वर्षांत आपल्यापुढे आली आहे. काहीतरी नैमित्तिक कारण मिळाल्याशिवाय ह्या प्रश्नाकडे समाजाचे लक्ष वेधले जात नाही असे खेदाने म्हणावे लागते. शहाबानोचा खटला किंवा बाबरी मशीदीचे उद्ध्वस्तीकरण किंवा सरला मुद्गलचा खटला ह्या प्रसंगाने समान नागरी कायद्याचा प्रश्न आपल्यापुढे येत राहिला. मात्र तो तडीस लावण्याचा प्रयत्न आजही होताना दिसत नाही.
भारतीय राज्यघटना अस्तित्वात येऊन आज ४६ वर्षे लोटली.

पुढे वाचा

संपादकीय

हा समान नागरी कायदा विशेषांक वाचकांच्या हाती देताना आम्ही अतिशय समाधानी आहोत. पण त्याचबरोबर अंकाचे संपूर्ण श्रेय अभ्यागत संपादकाचे आहे हे नमूद करणे आमचे कर्तव्य आहे. प्रा. जया सागडे यांच्या समर्थ संपादनातून बाहेर पडलेला हा अंक सर्वस्वी त्यांच्यांत कर्तृत्वाचे फळ आहे. अंकाची आखणी, विषयांची विभागणी, तज्ज्ञांकडून विषयाच्या विविध अंगांवर आमच्याने फिटण्यासारारखे लेख लिहवून घेणे, त्याकरिता पत्रव्यवहार करणे इत्यादि गोष्टी त्यांनी इतक्या आपलेपणाने केल्या की त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानणे हा केवळ उपचार झाला. त्यांचे ऋण आमच्याने फिटण्यासारखे नाही! त्यांच्यासारखा समर्थ संपादक विशेषांकाला लाभला हे आमचे भाग्य!

पुढे वाचा

संपादकीय

देशापुढील ज्वलंत प्रश्नांचा सर्वांगीण विचार व्हावा या हेतूने त्यावर तज्ञ लेखकांचे परिसंवाद घडवून आणून ते विशेषांकातून प्रसिद्ध करण्याचा आमचा विचार जाहीर केल्याला एक वर्ष लोटून गेले. परंतु एकही तसा विशेषांक बाहेर पडला नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत हे प्रथम सांगितले पाहिजे. मध्यन्तरी डॉ. भा. ल. भोळे ह्यांच्या संपादकत्वाखाली त्यांच्या सौजन्याने आगरकर विशेषांक आम्ही प्रकाशित करू शकलो, पण पूर्वी घोषित केलेल्या विषयांवरच्या विशेषांकाच्या प्रकाशनास फार उशीर झाला आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. पण या मधल्या काळात आम्ही निष्क्रिय राहिलेलो नाही हेही सांगावेसे वाटते.

पुढे वाचा

संपादकीय

आगरकरांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा जून-जुलै अंक आगरकरविशेषांक म्हणून वाचकांच्या हातांत देताना आम्हाला स्वाभाविकच आनंद होत आहे. ह्या अंकाचे संपादन डॉ. भा. ल. भोळे ह्यांनी केले असून त्यांचे संपादकीय निवेदन पुढे दिलेआहे. डॉ. भोळे ह्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल आम्ही त्यांचे अत्यन्त आभारी आहोत. ते आमच्यापैकीच असले व त्यांचे औपचारिक आभार मानण्याची तशी गरज नसली तरी ते मानल्याशिवाय आम्हाला राहवत नाही.
हा आगरकर विशेषांक प्रसिद्ध करीत असताना गेल्या वर्षी वर्षारंभी दिलेले एक आश्वासन मात्र आम्ही पाळू शकलो नाही ह्याबद्दल वाचकांची क्षमा मागणे आम्ही आपले कर्तव्य समजतो.

पुढे वाचा

संपादकीय

महाराष्ट्र फाउंडेशन ह्या अमेरिकेमधल्या अनिवासी महाराष्ट्रीय श्री.सुनील देशमुख यांनी स्थापलेल्या संघटनेने आपल्या ह्या मासिकाला, आजचा सुधारक ला, उत्तम वैचारिक मासिकाला द्यावयाचा रु. ५०,००० चा पुरस्कार दिला आहे हे सांगण्यालाआम्हाला आनंद होत आहे.
आम्ही महाराष्ट्र फाउंडेशनचे त्यासाठी अत्यन्त आभारी आहोत. मासिकाच्या ह्या यशाचे श्रेय कोणा एकट्याचे नसून लेखकांसह सगळ्या परिवाराचे आहे ह्याची कृतज्ञ जाणीव संपादकाला आहे.
ह्या पुरस्कारामुळे आमची विचारप्रवर्तक उत्कृष्ट साहित्य सतत देण्याची व समाजपरिवर्तनासाठी निष्ठेने आंदोलने चालविण्याची जबाबदारी वाढली आहे. ती पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करूच आणि त्याहीकरिता आपणा सर्वांचे साह्य आम्हाला लागेल.

पुढे वाचा

संपादकीय

हा सहाव्या वर्षाचा पहिला अंक. मार्च ९५ चा अंक प्रकाशित झाला तेव्हा आजच्या सुधारकने पाच वर्षांची वाटचाल पुरी केली होती, आणि या अंकाबरोबर तो सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. गतेतिहासाकडे मागे वळून पाहिले तर पाच वर्षे संपली हे सांगूनही खरे वाटत नाही. दर महिन्याचा अंक प्रकाशित करण्याच्या धामधुमीत काळाचे भानही नाहीसे होत होते. या काळात अनेक अडचणी आल्या, नाहीत असे नाही; पण त्या आपोआप सुटत गेल्या. जुने वर्गणीदार बरेचसे दरवर्षी गळत गेले, पण नवेही मिळत गेले आणि जरी स्वावलंबी होण्याकरिता अवश्य असलेले साडेसातशे वर्गणीदारांचे लक्ष्य आम्ही गाठू शकलो नाही, तरी कूर्मगतीने का होईना आम्ही त्याच्याजवळ जात राहिलो.

पुढे वाचा

संपादकीय

आजचा सुधारकच्या स्तंभांमधून अधूनमधून अन्यत्र प्रकाशित झालेला मजकूर पुनःप्रकाशित होत असतो. असा मजकूर कधीकधी आमच्या पुष्कळ वाचकांच्या वाचनात आलेला असतो. मग असा मजकूर पुन्हा प्रसिद्ध करण्याचे प्रयोजन काय असा प्रश्न आमच्या काही वाचकांनी उपस्थित केला आहे.
लेखकाला प्रसिद्धी देणे हा त्यामागचा हेतू नाही हे स्पष्टच आहे कारण तो लेख ज्याचा प्रसार पुष्कळ मोठा आहे अशा नियतकालिकातून घेतलेला असतो. तो केवळ वाचनीय असतो म्हणून नव्हे तर त्यातील आशय चिंतनीय-मननीय असतो, त्यातून समाज परिवर्तनाची आणखी एखादी समस्या अधोरेखित होत असल्यामुळे तो संग्राह्य होत असतो, म्हणून तो पुनःप्रकाशित केला जातो, हे सांगण्याची गरज आहे.

पुढे वाचा

संपादकीय

आमच्याकडे गेल्या महिन्यामध्ये दोन महत्त्वाची पत्रे आली. दोन्ही आमच्या चांगल्या मित्रांची आहेत. त्यांपैकी एक श्री. ग. य. धारप ह्यांचे; ते जुलै अंकात प्रकाशित झाले आहे. त्यानंतर आमच्याकडे पोचलेले, पण त्याहून महत्त्वाचे पत्र आहे श्री. वसंतराव पळशीकरांचे.
ह्या दोन पत्रांच्या निमित्ताने आमच्या संपादकीय धोरणाचा आम्हाला पुनरुच्चार करावा लागणार आहे. श्री. धारप ह्यांच्या पत्राचा परामर्श घेण्याच्या अगोदर श्री. पळशीकरांच्या पत्राचा विचार करू. श्री. पळशीकर ह्यांचे पत्र खाली देत आहोत :

संपादक, आजचा सुधारक
स.न.
जून १९९४ च्या अंकाच्या आरंभी बट्रँड रसेल ह्यांचे वचन छापले आहे.

पुढे वाचा

सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार वितरण-समारंभाचा वृत्तांत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दि. १४ जुलै ह्या गोपाळ गणेश आगरकर ह्यांच्या जन्मदिनी, पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला होता.

पाहता पाहता टिळक स्मारक मंदिरातील सभागृह श्रोत्यांनी गच्च भरले. त्यात आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी होती. डॉ. भा. दि. फडके, श्री वसंत पळशीकर, डॉ. अनिल अवचट, ताहेरभाई पूनावाला, श्री मुकुंदराव किर्लोस्कर, डॉ. बाबा आढाव, श्री विलास चाफेकर, डॉ. भा. ल. भोळे, इ. इ.

सुरुवातीला श्रीमती नीता शहा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा अहवाल सादर केला.

पुढे वाचा