जीव आणि जाणीवः उत्क्रांतिवादी दृष्टिकोन

स्वीकारलेल्या मर्यादा वैज्ञानिक दृष्टीने जीव (life) आणि जाणीव (consciousness) या संकल्पनांकडे पाहणाऱ्यांपैकी अनेकांना, विशेषतः जीवशास्त्रज्ञांना पटणारा दृष्टिकोन इथे मांडलेला आहे. काहीजणांना तो मर्यादित, सीमित वाटू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने स्वीकारलेली काही गृहीतके (assumptions) सुरुवातीला स्पष्ट करू.

१) ज्या भावना, विचार, श्रद्धा एखाद्याच व्यक्तीपुरत्या, किंवा मूठभरच व्यक्तींपुरत्या आहेत आणि ज्या ते इतरांना सांगू शकत नाहीत, त्या या चर्चेपुरत्या बाद केल्या आहेत. कधीकधी एखादी सुटी बाब उद्बोधक ठरू शकते, हे इथे नाकारले जात नाही आहे. पूर्णतः व्यक्तिनिष्ठ माहिती इतरांना शंकास्पद वाटू शकते, म्हणून ती वगळण्याचा सावधपणा दाखवला आहे, इतकेच.

पुढे वाचा

नर व मादी यांतील जनुकीय ‘हितसंबंध’

[ सूचनाः १) मनुष्यांबाबत सांस्कृतिक अंग महत्त्वाचे असल्याने ही मांडणी प्राकृतिकतेची पूर्वपीठिका एवढ्या मर्यादित अर्थानेच घ्यावी.

२) या मांडणीतील ज्ञानाचे श्रेय रिचर्ड डॉकिन्स व मॅट रिडली यांचे आहे.] स्वतःच्या प्रती छापल्या जाण्याची परंपरा अव्याहत राखणे हा जनुकांचा स्वभाव आहे. जनुके ज्या जीवाच्या केंद्रस्थानी वास्तव्य करीत असतात त्या जीवाची वर्तने ती प्रवर्तित करत असतात. ही वर्तने अशी असतात की जेणेकरून त्या जीवातली जनुके पुढे चालू राहतील. जीवाची धडपड ही जणू काही जनुकांनी त्याच्यावर सोपवलेल्या कार्यांची पूर्ती करण्यासाठी चालते. जीव ज्या तुंबळ जीवनसंघर्षात सापडलेला असतो (भक्ष्य-भक्षक, यजमान-परोपजीवी, सामाईक भक्ष्यासाठी स्पर्धा, सामाईक भक्षकांपासून वाचण्याची स्पर्धा, नर-नर, मादी-मादी, नर-मादी, पालक पाल्य, भावंडे-भावंडे इत्यादींतील संघर्ष) त्यातील आह्वाने पेलत तो आपले जनुकीय कार्य पार पाडण्यात यशस्वी ठरतो की नाही, यावर त्याच्यातील जनुके पुढे चालू राहतात की नाही हे ठरत असते.

पुढे वाचा

मेंदुविज्ञानाच्या बगीच्यात

विसाव्या शतकात बुद्धीला विशाल करणारे आणि उत्तेजित करणारे दोन प्रदेश अभ्यासासाठी खुले झाले. आपल्या डोक्यावर असलेले. असंख्य आकाशगंगा कवेत घेणारे अवकाश आणि त्याच डोक्याच्या आत बसलेले अनंत मेंदुपेशींनी बनलेले मेंदुविश्व. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्य झाले आहे. माणूस विचार का करतो? तो अनुभवतो म्हणजे काय ? तो नीतिमूल्ये निर्माण करतो, जपतो आणि बदलतोही. कोणते गुणविशेष त्याला माणूसपण आणि माणूसपद देतात ? “आहे प्राणीच, पण माणूस आहे” असे मोठ्या अभिमानाने माणूस स्वतःबद्दल म्हणतो. कथा, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान यांची निर्मिती माणसानेच केली.

पुढे वाचा

वेध डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा

सुमारे पंचवीस वर्षांच्या सृष्टिनिरीक्षण व संशोधनानंतर सजीवांच्या उत्क्रांतीचा जो सिद्धान्त चार्ल्स रॉबर्ट डार्विन (१२ फेब्रुवारी १८०९ ते १९ एप्रिल १८८२) यांनी साकार केला, त्याची मांडणी त्यांनी अशी केली – सजीवांमध्ये प्रजोत्पादनाची प्रचंड क्षमता असते. त्यामुळे सजीवांची बेसुमार निर्मिती होते. सजीवांच्या प्रचंड संख्येच्या मानाने अन्न व निवाऱ्याच्या सुविधा कमी असल्याने त्यांच्यात जगण्यासाठी व तगण्यासाठी धडपड सुरू होते (struggle for existence). या धडपडीतूनच जीवघेणी स्पर्धा (competition) सुरू होते. स्पर्धेत तगून राहण्यासाठी परिस्थित्यनुरूप सजीवांच्या गुणांत बदल घडून येतात. बदललेल्या सुयोग्य गुणांची निसर्ग निवड करतो (natural selection).

पुढे वाचा

पैसा झाला मोठा !:

पुस्तक-परिचयामागील भूमिका
पैसा हा आपल्या आधुनिक जीवनाचा अतिशय महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. आपले कोणतेही वैयक्तिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक व्यवहार हे आता पैशांच्या मदतीशिवाय करता येत नाहीत. अठरा-एकोणिसाव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार हे वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाणघेवाणीतून केले जात. सोन्याचांदीची नाणी चलन म्हणून वापरली जात असली तरी मुख्यत: व्यापारी लोक आणि राजेरजवाडे ह्यांच्यासाठीच त्यांचा वापर होत असे. साहजिकच आजच्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती. आजही अनेक गोष्टींचे मोल पैशाच्या स्वरूपात मांडलेले अनेकांना आवडत नाही आणि पैसा सामाजिक नात्यांमध्ये बाधा आणतो असे मानले जाते.

पुढे वाचा

“धक्कातत्त्व”: पुस्तक-परिचय

एखाद्या राजवटीत जाणता अजाणता झालेल्या जुलमांसाठी व अन्यायांसाठी त्या राजवटीमागच्या विचारधारेला जबाबदार धरणे योग्य की अयोग्य? बरे, सर्वच राजवटी, त्यांमागच्या विचारधारा, वगैरेंची आर्थिक अंगे महत्त्वाची असतात. कौटिल्याच्या राज्य कसे चालवावे याबाबतच्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असे आहे. अॅडम स्मिथच्या पुस्तकाचे नाव द वेल्थ ऑफ नेशन्स आहे. मार्क्सच्या पुस्तकाचे नाव भांडवल असे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या नावात पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. सगळीकडे जाणवते हे, की राजवटी आणि त्यांच्या अर्थव्यवहाराच्या नीती, यांना सुटे करणे शक्य नाही.

पण राजवटींच्या आर्थिक-राजकीय विचारधारा आणि राजवटींमधले अन्याय यांची सांगड घालताना माणसे भेदभाव करतात.

पुढे वाचा

दुष्टाव्याचे मूळ

दोन देशांमधील सशस्त्र संघर्षाकडे आपण भीतीने, घृणेने पाहतो. पण आर्थिक संघर्ष युद्धांपेक्षा कमी भीतिदायक किंवा घृणास्पद नसतात. युद्ध हे शल्यक्रियेसारखे असते, तर आर्थिक संघर्ष प्रदीर्घ छळासारखे असतात. त्यांचे दुष्परिणाम युद्धांबद्दलच्या साहित्यातील वर्णनांइतकेच भयंकर असतात. आपण आर्थिक संघर्षांना महत्त्व देत नाही, कारण आपल्याला त्यांच्या घातक परिणामांची सवय असते. युद्धविरोधी चळवळी योग्यच आहेत. मी त्यांना सुयश चिंततो. पण मला एक सुप्त, कुरतडणारी धास्ती वाटत राहाते, की ती चळवळ विफल होईल, कारण ती मानवी हाव, हव्यास, या दुष्टाव्याच्या मुळांना स्पर्श करणार नाही. [नॉन-व्हायलन्स ङ्कवद ग्रेटेस्ट फोर्स या महात्मा गांधींच्या पुस्तकातील हा उतारा नाओमी क्लाईन (द शॉक डॉक्ट्रिन, पेंग्विन, २००७) उद्धृत करते.]

पुढे वाचा

पुरुषांच्या नावे एक खुले पत्र

प्रिय सद्गृहस्थहो, आमच्याविषयी व आमच्या उद्दिष्टांविषयी आपण आपल्या मनात काही गैरसमज बाळगून आहात, असे आमच्या निदर्शनास आले आहे. आपण सर्व एकत्र येऊन एक अधिक संतुलित समाज बनविण्याच्या कामात या गैरसमजुती व काही तद्दन खोट्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण होतो. आपल्या मनातील हे अपसमज-गैरसमज दूर करावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. कृपया तसे करण्याची संधी आम्हाला द्यावी.
१. तुमचे लिंगच्छेद करण्याचा आमचा अजिबात इरादा नाही.
२. (स्त्री व पुरुषांच्या) भूमिकांची अदलाबदल करणे हे आमचे ध्येय नाही. हजारो वर्षे आम्ही ज्या तुरुंगात खितपत पडलो त्यात तुम्हाला बंदिस्त करून ठेवणे हे आमचे उद्दिष्ट नाही.

पुढे वाचा

साहित्याचा एकाकी/एकटा आवाज

मी आता आपल्यासमोर जे काही मांडणार आहे ते एका टीकाकाराच्या किंवा व्यावसायिक समीक्षकाच्या दृष्टिकोणातून नव्हे वा एखाद्या अॅकॅडेमिक प्रोफेसरच्या दृष्टिकोणातूनही नव्हे. तो आहे एका लेखनकर्मीचा दृष्टिकोण, ज्याच्यासाठी साहित्य हे गेली चाळीस-पन्नास वर्षे एक आसऱ्याचे ठिकाण, निवारा-आणि दुःख आणि वेदनांच्या क्षणी परमशांती आणि सांत्वना देणारा असा एक चिरतन स्रोत राहिलेले आहे.
फॉकनरने कुठेतरी असे म्हटलेले आहे की ज्या माणसांना आयुष्य जगता येते ती ते जगतात, आणि ज्यांना ते जमत नाही अशी माणसे आयुष्याविषयी लिहितात. मी या दुसऱ्या वर्गात मोडणारा आहे. खरे तर प्रत्येक कलावंत हा कमी अधिक प्रमाणात त्या प्रागैतिहासिक आदिम कलावंतासारखाच असतो, जो लाखो वर्षांपूर्वीच्या त्या काळात, इतरांबरोबर शिकारीला न जाता मागे गुहेत थांबायचा; इतरांच्या जगण्याचे तो निरीक्षण करायचा.

पुढे वाचा

विनाशकाले विपरीत ‘धर्म’

अलिकडेच तीन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. एक मुंबईत, दुसरी ढाका येथे आणि तिसरी ब्रुसेल्सला. तीनही ठिकाणी चर्चासत्रांचा मुख्य विषय होता – धर्म आणि दहशतवाद. धर्म हा हिंसेची वा हत्याकांडाची प्रेरणा कशी होऊ शकतो? गांधीजींची हत्या करणारा नथुराम कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थाने प्रेरित झालेला नव्हता, तर प्रखर हिंदुत्वाने भारलेला होता. इंदिरा गांधींना ठार मारणारे शीख सुरक्षा गार्ड्स हेही धर्मभावनेने झपाटलेले होते. फाळणीच्यावेळी झालेला लक्षावधी लोकांच्या हिंसेचा आगडोंब, दक्षिण आणि उत्तर आयर्लंडमधील कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट ख्रिश्चनांमधील १०० वर्षे चालू राहिलेला हिंसाचार, इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यात आजही चालू असलेले घनघोर युद्ध या सर्वांमागे धर्म हीच उदात्त प्रेरणा आहे.

पुढे वाचा