पवित्रतेची बदलती व्याख्या

प्रभाकर नानावटी नवीन संस्कृती
आर्थिक व्यवहारांचे व माहिती-संवाद तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण होत असलेल्या या कालखंडात सर्वस्वी वेगळी वाटणारी संस्कृती मूळ धरू पाहत आहे. ही नवीन संस्कृती मानवी हिताची असेल किंवा नसेलही. आता अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या उलथापालथींची अनेक कारणे असू शकतील. पृथ्वीतलावरील प्रत्येकाला हवामानबदलाचा फटका बसत आहे. आपल्यातील सर्वांना पेट्रोलियम पदार्थ संपून जाण्याच्या भीतीने त्रस्त केले आहे. ऊर्जास्रोतांची कमतरता/अभाव या भीतीमुळे आपल्या सर्वांनाच आर्थिक अरिष्टांना सामोरे जावे लागेल की काय अशी धास्ती वाटत आहे. हीच धास्ती पाण्यासाठी, अन्नासाठी, ऊर्जास्रोतांसाठी ठिकठिकाणी युद्ध पेटवत आहे.

पुढे वाचा

एक क्रान्तीः दोन वाद (भाग ५)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. तिसऱ्या भागात आपण क्यूबा व स्वीडन या दोन देशांमधील समाजवादाच्या आवृत्त्या तपासल्या. गंमत म्हणजे स्वीडन हे चांगला समाजवाद व चांगला भांडवलवाद या दोन्हींचे उदाहरण मानले जाते! यानंतर आपण काही देशांचा इतिहास तपासून पुढे पुनर्बाजारीकरणाचे प्रयत्न व त्यानंतरचे प्रश्न पाहिले. आपण जवळजवळ आजपर्यंत आलो आहोत !

पुढे वाचा

ई!

२६ फेब्रुवारी ‘०९ च्या लोकसत्ता मध्ये प्रशांत मोरे यांचा मराठी मासिकांची ग्लोबल स्पेस! हा लेख आहे. त्याचा मुख्य भाग असा.
निरनिराळी प्रसारमाध्यमे वरकरणी एकमेकांना मारक ठरत असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ती परस्परपूरक असतात. माध्यमांचे हे “एकमेका साह्य करू’ धोरण सध्याच्या बदलत्या काळात काहीशा मागे पडलेल्या मराठी भाषेतील मासिक स्वरूपात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांना अनुकूल ठरल्याचे दिसत आहे. पुणेस्थित साची वेबनेट प्रा. लि. या कंपनीने ‘मायईमॅगझिन्स डॉट कॉम’ नावाचे संकेतस्थळ इंटरनेटच्या महाजालात मराठी मासिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यानिमित्ताने माध्यमांच्या कोलाहलात कसेबसे तग धरून राहिलेल्या मराठी मासिकांना चक्क ग्लोबल स्पेस मिळाली आहे.

पुढे वाचा

‘मी’ आणि ‘माझे

विवेकी स्वार्थ हा कार्लचा धर्म आहे. तो मुक्त बाजारपेठेच्या वेदीवर पूजा करतो. फ्रॉईड जसे सर्व काही सुरत (Sex) आहे, असे मानायचा, तसे कार्ल सर्व सामाजिक व्यवहार, मग ते कितीही व्यामिश्र असोत, सोडवायला त्यांवर किंमतीचे लेबल लावतो, नागरी गृहसमस्या, शिक्षण. स्पर्धा आणि नफ्याची आशाच सर्व प्रश्न सोडवू शकते. मोठी थिअरी आहे, ही. सर्वांना प्रवाहातून त्यांचे त्यांचे बादलीभर पाणी घेण्यासाठी झगडू द्या, आणि त्या पाण्याचा हवा तो वापर करू द्या. काहीजण त्या पाण्यापासून वाफ बनवतील, काही पाणी पितील, काही आंघोळ करतील. उद्योजकता फोफावेल आणि लोक सुखी होतील.

पुढे वाचा

पाणी प्रश्नाचे स्वरूप, गुंतागुंत आणि तिढे

(१) मनुष्य स्वभाव मोठा मजेशीर आहे. जे फुकट मिळते त्याचा तो बेजबाबदार वापर करत राहतो मग गरज असो की नसो. निसर्ग साधनसंपत्ती तर सार्वजनिक, कोणाच्याच मालकीची नाही. त्यामुळे तिचा तर वापर कसाही, केव्हाही, कुठेही करण्याचा जणू जन्मसिद्ध हक्कच. आजपर्यंत हवा, पाणी, जमीन, जंगले यांचा असाच वापर आपण करत आलो. हे करता करता अमर्याद वाटणारे पाणी १०-१२ रुपये लीटरपर्यंत केव्हा येऊन पोहोचले ते कळलेही नाही!
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची लोकसंख्या ३५ कोटीच्या आसपास होती. आज ती ११० कोटीच्या घरात गेली आहे ड्ड म्हणजे तिप्पट.

पुढे वाचा

‘निर्माण’

मी हृषिकेश सध्या पुण्यामध्ये कायद्याचे शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागातून येताना काही पुसट स्वप्नेही पाहिली होती. मात्र या सगळ्यात स्वतःला हरवून बसलो आहे, असे नेहमी वाटायचे. ज्या गोष्टी करण्यात मला आनंद यायचा नाही त्या स्वीकाराव्या लागायच्या, किंवा समाजाने तयार केलेल्या चौकटबद्ध जीवनपद्धतीत अडकल्याचा भास व्हायचा. समाज म्हणजे काय? समाजासाठी काही करावे! असे काही मनात आलेही नव्हते. परंतु पुढे वाचन केले. काही संस्थांची कामे पाहिली किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेतला. यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला, पण संधी निर्माण झालीच नाही. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली.

पुढे वाचा

शेतीः शिक्षणाचे माध्यम

“आमच्या मुलांपैकी कोणालाही बैलांकडून काम करून घेता येत नाही. शेतीच्या तंत्राची माहिती नाही. आम्ही मेल्यावर हे लोक बहुतेक मातीची ढेकळं खाऊनच जगणार आहेत.” एक शेतकरी तावातावाने बोलत होता.
माझ्या मनात प्रश्न उभा राहिला, यासाठी दोषी कोण? मुलांनी शाळेत जायला हवे, किमान दहावी पास (किंवा नापास) असायला हवे असे खेड्यातील प्रत्येकालाच वाटते. पुढे जाऊ शकला तर फारच आनंदाची गोष्ट. कुठे चपराशी म्हणून लागला तर गंगेत घोडे न्हाले. आता शाळेत त्याला शेतीविषयी काही ज्ञान मिळते का? काही धडे असतात शेतीबद्दलड्डथोडीशी माहिती जाता जाता सांगणारे, पण शेतीचे असे ज्ञान जे प्रत्यक्ष शेती करायला उपयोगी असेल ते बहुतेक शेतकी विद्यालयांतही मिळत नाही.

पुढे वाचा

एक क्रान्ती : दोन वाद (भाग ४)

[एक क्रान्तीःदोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. तिसऱ्या भागात आपण क्यूबा व स्वीडन या दोन देशांमधील समाजवादाच्या आवृत्त्या तपासल्या. गंमत म्हणजे स्वीडन हे चांगला समाजवाद व चांगला भांडवलवाद या दोन्हींचे उदाहरण मानले जाते! आता त्यापुढे – ]
अमेरिका भांडवलवाद
आधीच्या अराजकी स्थितीकडून व्यवस्थापित आवृत्तीत शिरला. लोकशाही समाजवादाचा दबाव, निवडणुका जिंकण्यासाठीचा लोकानुनय, तेजीमंदीवरील केन्सवादी उपाय, अशा सायातून भांडवलवादातली मुक्ती बरीचशी मर्यादित झाली.

पुढे वाचा

मे. पुं. रेगे : स्मृतिसभा

२८ डिसेंबरला (मे. पुं.) रेगेसरांच्या स्मृतिदिनी परममित्र प्रकाशनाने प्राज्ञ पाठशाळेच्या सहकार्याने दिवसभराचा कार्यक्रम आयोजित केला आहे, व त्या निमित्ताने अनेक मान्यवर रेगेसरांविषयी बोलणार आहेत, हे कळायचाच अवकाश, की जाणे निश्चित केले. परतले, ती अतीव समाधानाने, कार्यक्रम संपल्यावरही भैरवीचे सूर मनात रेंगाळतच राहिले.
प्रास्ताविकानंतर प्रा. मिलिंद मालशे ह्यांनी सरांच्या व्यावसायिक जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. केवळ बौद्धिक व्यापारांमध्ये रममाण न होता त्याचबरोबरीने समाजाभिमुख राहून विविध सामाजिक प्रश्नांचा मूलगामी विचार करून त्यांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्यातील त्यांची हातोटी विलक्षण होती व त्याहून विशेष म्हणजे “समाजातील जातिभेद, विषमता, दारिद्र्य पाहून त्यांना प्रचंड अपराधी असल्यासारखे वाटत असे आणि हे अपराधीपण बाळगूनच ते वावरत असत” असे त्यांच्या कन्या रूपा रेगे – नित्सुरे यांनी आवर्जून सांगितले.

पुढे वाचा

स्साऽऽल्या मुलींनी पब्मध्ये जायचे नसते

भारतीय मुली बरेच काही करू शकतात. विमाने उडवू शकतात आणि उडवतात. सैन्यात भरती होऊन देशाचे शत्रूपासून रक्षण करतात. त्यांना माऊंट एव्हरेस्ट चढता येते, आणि त्या चढल्या आहेत. त्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (उएज) होऊ शकतात, इंद्रा नूयींसारख्या. काही तर एखाद्या देशाच्याही मुख्य कार्यकारी अधिकारी होतात, इंदिरा आणि सोनिया गांधींसारख्या. या आणि इतरही बऱ्याच गोष्टी भारतीय मुली करतात. पण त्यांना पब् मध्ये जाऊन पिता येत नाही. श्रीराम सेना आणि त्यांचे भगवे जुळे भावंड राष्ट्रीय हिंदु सेना या संघ परिवारातल्या कट्टर संस्थांचा तसा ऑफिशियल आदेश आहे.

पुढे वाचा