धर्मग्रंथ-दहन आंदोलने

या लेखात भारत आणि दोन प्रगत देशांतील धर्मग्रंथ-दहन आंदोलने आणि संबंधित कायद्यांचा संक्षिप्त आढावा घेऊन वस्तुस्थितीचे विश्लेषण केले आहे.

यावर्षी डेन्मार्क आणि स्वीडनमधील कुराण जाळण्याच्या, आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अश्या घटना समोर आल्या आहेत. वकील आणि उजव्या विचारसरणीचे डॅनिश राजकारणी रासमस पैलुडन यांनी २१ जानेवारी रोजी स्टॉकहोम येथील तुर्कस्तानच्या दूतावासासमोर इस्लाम आणि मुस्लिम स्थलांतराच्या विरोधात तासभर भाषण केले आणि त्यानंतर कुराणची प्रत जाहीरपणे जाळली. स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्या सलवान मोमिका नावाच्या आणखी एका इसमाने २८ जून रोजी इस्लामी ईद-उल-अजहा सणादरम्यान स्टॉकहोमच्या सर्वांत मोठ्या मशिदीसमोर कुराणची पाने फाडून जाहीरपणे जाळली.

पुढे वाचा

गुणवत्ता विरुद्ध आरक्षण

गुणवत्ता विरुद्ध आरक्षण हा आपल्या समाजात निरंतर सुरू असलेला आणि विशिष्ट गंड निर्माण करणारा प्रश्न आहे.

खरे तर घटनाकारांनी विशिष्ट समाजघटकांसाठी स्वातंत्र्यानंतर काही मर्यादित काळासाठी आरक्षणाची तरतूद ठेवली होती. तथापि राजकारण्यांनी आपल्या फायद्यासाठी आरक्षण हा घटनेचा मूलभूत अधिकार असल्यासारखे प्रस्थापित केले. सध्या तर आरक्षणाविरुद्ध जो कोणी काही बोलायचा, करायचा प्रयत्न करेल तो राष्ट्रद्रोही असे ठरवण्याइतकी गंभीर परिस्थिती आहे. घटनाकारांनी नेमून दिलेल्या कालावधीत विशिष्ट समाजाचा विकास आपण करू शकलो नाही याचे वैमनस्य अथवा अपराधीपण राज्यकर्त्यांना कधीच वाटले नाही आणि त्याचा उपयोग करून आपला विकास करून घेण्याची संधी गमावल्याचे वैषम्य तशा समाजघटकांनाही वाटले नाही. 

पुढे वाचा

भ… भवितव्याचा!

शिक्षणव्यवस्थेविरुद्ध लढा हा पूर्वीपासून चालत आला आहे. पूर्वी काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. आजकाल कायद्याने सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला असला तरी शिक्षणातील नेमके मर्म काय याबाबतीत वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर; जेव्हा व्यक्ती सक्षम होऊन कारकीर्द घडवण्याच्या मार्गावर असतो तेव्हादेखील त्याचे मार्गदर्शन न झाल्याचे जाणवते. बहुतांश भाग ग्रामीण असून भारतामध्ये भवितव्याच्या केवळ ठराविक दिशाच निवडल्या जातात. त्यामागे परंपरागत जुने विचार, आर्थिक समस्या अशा वेगवेगळी कारणे आहेत. भवितव्य ऐन शिखरावर असताना आपण निवडलेला अभ्यासक्रम शिकूनदेखील त्यात गुणवत्ता नाही हे विद्यार्थ्यांस जाणवते.

पुढे वाचा

मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २

निसर्ग ही भौतिक पदार्थांची एक व्यवस्था होय, असे निसर्गाविषयीचे मत मान्य केल्यास, निसर्गाकडे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा उत्पादनाचा स्त्रोत म्हणून पाहता येईल, अशी अनेक अर्थशास्त्रज्ञांची निसर्गाविषयीची भूमिका असते. मार्क्सही याला अपवाद नाही. 

मानव निसर्गात, निसर्गाच्या साह्याने जगणारा प्राणी आहे म्हणजे तो निसर्गावर जगणारा प्राणी आहे, असे म्हणण्यात हे अभिप्रेत असते की ज्या भौतिक पदार्थांची एक व्यवस्था निसर्ग असतो त्या भौतिक पदार्थांमध्ये – त्यांच्या अंगभूत गुणधर्मांमुळे – मानवाची गरजपूर्ती करण्याची शक्ती असते. या शक्तीला पदार्थांतील ‘उपयोगिता’ असे म्हणता येईल. पदार्थांतील उपयोगितेमुळे म्हणजेच त्यांच्या अंगी असलेल्या मूलभूत गुणधर्मांमुळे पदार्थांना जे मूल्य प्राप्त होते, त्यांना अर्थशास्त्रज्ञ ‘उपयोगमूल्ये’ असे म्हणतात.

पुढे वाचा

परीक्षण – निर्वासित

मूळ पुस्तक : निर्वासित (आत्मकथन), लेखक : उषा रामवाणी,  
उषःकाल पब्लिकेशन, मुंबई १ जून २०२३

निर्वासित म्हणून ओळखले जाणारे सिंधी लोक महाराष्ट्रातील गावागावातून व्यापारी म्हणून स्थिरावले. पण त्या समाजातील मान्यतांपेक्षा निराळ्या आकांक्षा बाळगणाऱ्या मुलीला आईवडिलांच्याच घरात निर्वासित असल्यासारखे वाटले. अशा उपेक्षित मुलीचा संघर्ष किती तीव्र असेल? उषा रामवाणी यांच्या ‘निर्वासित’ या आत्मकथनातून त्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड, मायेचा ओलावा मिळण्यासाठी आसुसलेले हळवे मन दिसते. अर्थार्जनासाठी खडतर वाटचाल त्यांनी केली. अथक प्रयत्न केले. मराठी भाषेवर केवळ प्रभुत्व नव्हे तर प्रेम असणाऱ्या या तडफदार स्त्रीची संघर्षगाथा वाचनीय तर आहेच पण डोळ्यात अंजन घालणारीही आहे. 

पुढे वाचा

आवाहन

स्नेह

पोषक अन्न, सगळ्या ऋतूंत संरक्षण देणारी वस्त्रे आणि सोयींनी युक्त निवारा ह्या माणसाच्या प्राथमिक गरजांमध्ये आता शिक्षण आणि आरोग्य ह्यांचाही समावेश झाला आहे. भारतात शिक्षणाचा संबंध ज्ञानार्जनाशी कमी आणि अर्थार्जनाशीच जास्त आहे. परंतु world economic forum नुसार भारतातील दरवर्षी शिक्षण घेऊन रोजगार शोधण्यास निघणाऱ्या जवळपास सव्वा कोटी तरुणांपैकीव्यवस्थापनाच्या क्षेत्रातील प्रत्येकी चारपैकी एकच तरुण रोजगारक्षम (employable) असतोअभियांत्रिकीच्या क्षेत्रातील पाच पैकी एकतरप्रत्येकी दहा पदवीधर तरुणांपैकी एकच तरुण रोजगारक्षम असतो.

‘मुख्यतः अर्थार्जना’साठी शिक्षण घेणाऱ्या भारतीय तरुणांची प्रत्यक्ष रोजगारक्षमतेत ही परिस्थिती आहे. ह्याचा

पुढे वाचा

मनोगत

सादर निरोप

नंदा खरेंनंतर एका वर्षाच्या आत ‘आजचा सुधारक’ने आणखी दोन खंदे विचारवंत गमावले.

सुनीती देव

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ता, विवेकी विचारवंत, आणि ‘आजचा सुधारक’च्या संपादकमंडळात अनेक वर्षे कार्यरत सुनीती देव ह्यांचे २ मे २०२३ ला निधन झाले. अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयात त्या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. परंतु नागपुरात त्यांची ओळख फार वेगळी होती. सुनीतीताई जगन्मित्र होत्या. त्यांचे सोबत असणे अतिशय आश्वासक वाटे. त्यांचे हास्य केवळ त्यांच्यापुरते नसून संपूर्ण वातावरणात आह्लाद पसरवणारे होते.

‘आजचा सुधारक’च्या अगदी सुरुवातीपासून (तेव्हाचा, नवा सुधारक) त्या संपादकमंडळात तर होत्याच, पण तेव्हा वर्गणीदारांची यादी बनवण्यापासून, पत्ते आणि तिकिटे चिकटवून अंक पोस्टात टाकण्यापर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 

पुढे वाचा

तंत्रज्ञानाचा समाजावरील परिणाम

हल्ली मुले स्मार्टफोनला चिकटून असतात म्हणून जे पालक चिंतित असतात त्यांच्या पालकांना तीसेक वर्षांपूर्वी टीव्हीचीही तशीच भीती वाटत होती. त्याआधीच्या पिढीतील तरुण मुले रेडिओमुळे बिघडतील अशीही भीती त्यांच्या पालकांनी व्यक्त केली होती. तंत्रज्ञानाविषयी लोकांची प्रतिक्रिया कशी बदलते त्याविषयी प्रतिभावंत विज्ञानकथालेखक डग्लस अ‍ॅडम्स यांनी सांगितलेल्या ठोकताळ्यांचा स्वैर अनुवाद काहीसा असा करता येईल: “तुमच्या बालपणापासून प्रचलित असलेले तंत्रज्ञान तुम्हाला स्वाभाविक आणि जीवनावश्यक वाटते. तुमच्या तरुणपणात जे शोध लागतात ते तुम्हाला क्रांतिकारक वाटतात आणि त्यांवर तुम्ही चरितार्थही चालवू शकता. परंतु, तुमच्या म्हातारपणी लागलेले शोध मात्र विकृत असतात, तरुणाईला वाईट नादाला लावून जगबुडी आणणारे असतात.”

पुढे वाचा

गुणाकाराची बेरीज – वजाबाकी

लहानपणी आजी एक गोष्ट सांगत असे. भस्मासुराची गोष्ट. त्यात म्हणे भोळ्या शंकर महादेवाने भस्मासुराला एक वरदान दिले. आणि त्यात त्याला अशा काही शक्ती प्राप्त झाल्या की तो भस्मासूर ज्या कोणत्याही वस्तूवर, गोष्टीवर किंवा प्राण्यावर हात ठेवेल तो तात्काळ नष्ट होईल, जळून भस्म म्हणजे राख होईल. ही गोष्ट ऐकताना त्या भस्मासुराबद्दल राग येत होता की त्याला मिळालेल्या त्या शक्तीबद्दल त्याचा हेवा वाटत होता? हे आजतागायत ठरवता आलेले नाही. आपल्याला अशी शक्ती मिळाली तर कित्ती मज्जा! असा विचार मनात येत असतानाच आजी त्या भस्मासुराला दोन शिव्या हासडत विष्णूला मोहिनी रूप घ्यायला लावून त्या भस्मासुरालाच संपवून टाकत असे.

पुढे वाचा