विषय «समीक्षा»

मार्क्सची अर्थमीमांसा : भाग २

निसर्ग ही भौतिक पदार्थांची एक व्यवस्था होय, असे निसर्गाविषयीचे मत मान्य केल्यास, निसर्गाकडे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा उत्पादनाचा स्त्रोत म्हणून पाहता येईल, अशी अनेक अर्थशास्त्रज्ञांची निसर्गाविषयीची भूमिका असते. मार्क्सही याला अपवाद नाही. 

मानव निसर्गात, निसर्गाच्या साह्याने जगणारा प्राणी आहे म्हणजे तो निसर्गावर जगणारा प्राणी आहे, असे म्हणण्यात हे अभिप्रेत असते की ज्या भौतिक पदार्थांची एक व्यवस्था निसर्ग असतो त्या भौतिक पदार्थांमध्ये – त्यांच्या अंगभूत गुणधर्मांमुळे – मानवाची गरजपूर्ती करण्याची शक्ती असते. या शक्तीला पदार्थांतील ‘उपयोगिता’ असे म्हणता येईल. पदार्थांतील उपयोगितेमुळे म्हणजेच त्यांच्या अंगी असलेल्या मूलभूत गुणधर्मांमुळे पदार्थांना जे मूल्य प्राप्त होते, त्यांना अर्थशास्त्रज्ञ ‘उपयोगमूल्ये’ असे म्हणतात.

पुढे वाचा

महाग पडलेली मोदीवर्षे

  • नोव्हें २०१६ च्या डिमॉनेटायझशन नंतर काळा पैसा, खोट्या नोटा आणि दहशतवाद कमी झाला का? 
  • मेक-इन-इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, आणि इतर योजनांनी रोजगारनिर्मितीला आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाली का?
  • स्वच्छ भारत योजनेपरिणामी उघड्यावर शौच करणे बंद होऊन भारतीयांचे स्वास्थ्य सुधारले का?
  • मोदीकाळात भ्रष्टाचाराला रोख लागून शासनव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम झाली का?
  • जगभरच्या नेत्यांना मिठ्या मारणारे आणि स्वतःचे मित्र म्हणवणारे मोदी भारताचे जगातील स्थान उंचावण्यात यशस्वी झाले आहेत का?
  • निवडणुकांमध्ये दोनदा संपूर्ण बहुमताने निवडून आलेले मोदीसरकार लोकशाही पाळत आहे का?

स्टॉक मार्केट उच्चांक पाहून “सब चंगा सी” म्हणणाऱ्या उच्च मध्यमवर्गासाठी, हिंदी-इंग्लिश-मराठी टीव्ही चॅनेल्सवरच्या झुंजींना बातम्या असे समजणाऱ्या, किंवा सोशल मीडियावरून माहिती मिळवणाऱ्या सर्वांसाठी वरील बहुतांश प्रश्नांचे उत्तर “होय, नक्कीच” असे आहे.

पुढे वाचा

सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे: पूर्वार्ध (ग्रंथपरिचय)

श्री. बर्ट्रांड रसेल लिखित ‘The Principles Of Social Reconstruction’ ह्या अल्पाक्षररमणीय ग्रंथाचे प्रचलित अरिष्टामुळे मिळालेल्या फावल्या वेळात वाचन करण्याची संधी मिळाली. कोविड-१९ अरिष्टामुळे संपूर्ण जग अगदी ढवळून निघाले आहे…निघत आहे. कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाचा जागतिक समाजावर (Global society), राष्ट्रांवर, समाजव्यवस्थेवर तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर अल्पकालीन (Short-run) तसेच दीर्घकालीन (Long-run) होणाऱ्या प्रभावाचे स्वरूप कसे असेल आणि त्या प्रभावाची दिशा काय असेल, एकूणच, एकविसाव्या शतकातील आधुनिक मानवाचे भवितव्य काय आणि कसे असेल? यासंदर्भात जगात सर्वच स्तरांतून चर्चेला आणि आत्मपरीक्षणाला सुरुवात झाली आहे.

श्री. रसेल ह्यांनी ‘प्रिंसिपल्स’चे लिखाण पहिल्या जागतिक महायुद्धाच्या (१९१४-१९१८) पार्श्वभूमीवर केले होते.

पुढे वाचा

सामाजिक पुनर्रचनेची मूलतत्त्वे : उत्तरार्ध (ग्रंथसमीक्षा)

प्रस्तुत लेखाच्या पूर्वार्धात श्री.रसेल ह्यांच्या ‘The Principles of Social Reconstruction’ ह्या ग्रंथाच्या सारांशाविषयी जे विवेचन केले होते, ते मुख्यतः मांडणीप्रधान असून, ग्रंथाची स्थूलमानाने रूपरेषा देणे, एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते. परंतु मांडणी म्हणजे चिकित्सा नव्हे. त्यामुळे, आता आपण खंडणप्रधान विवेचनाकडे वळूया, ज्यायोगे श्री. रसेलांची नेमकी भूमिका वाचकांसमोर येईल, अशी आशा आहे. परंतु जेव्हा आपण चिकित्सा म्हणतो, तेव्हा तिला काही मर्यादा घालणे हितकारक ठरत असते. म्हणून या समीक्षेची मर्यादा हीच की यामध्ये आपण प्रस्तुत ग्रंथांतील ‘मालमत्ता’ (Property) या प्रकरणाचीच विशेषतः दखल घेणार आहोत.

पुढे वाचा

कविता – कालची व आजची

कविता आजची असो अथवा कालची, तिच्या निर्मितीमागील प्रेरणा मानव्य असते. तिला स्थलकालाचे बंधन नसते. साहित्य निर्मितीमागील प्रेरणा ही सर्वसामान्यपणे प्रत्येक देशात व भाषेत सारखीच असते. साहित्याची निर्मिती होण्यासाठी एक फार मोठी शक्ती आवश्यक असते. ती म्हणजे “प्रतिभा”! वामनाने यालाच ‘कवित्वाचे बीज’ असे म्हटले आहे. त्यासोबतच स्फूर्ती व कल्पनाशक्तीही महत्त्वाची असते. प्लेटो व अरिस्टॉटलने कलात्मक अनुकरणाचा (Artistic Imitation) सिद्धांत मांडलेला आहे. त्यांच्या मतानुसार अनुकरणाच्या माध्यमातून काव्याची निर्मिती होत असते. विल्यम वर्डस्वर्थने काव्य-स्फूर्तीची व्याख्या ”उत्कट भावनांचा सहज उत्स्फूर्त उद्रेक” अशी केलेली आहे. Prescott च्या मतानुसार प्रतिभा घडविणारी शक्ती म्हणजे ”कल्पनाशक्ती”.

पुढे वाचा

पुरस्कार: स्वीकार आणि नकार

अलीकडे चर्चेत राहिलेल्या साहित्यिकांच्या पुरस्कारवापसीच्या पार्श्वभूमीवर एका तरुण लेखकाचे विचारप्रवृत्त करणारे हे मनोगत. युवा साहित्य अकादमी पुरस्कार स्वीकारताना त्याने केलेल्या भाषणासह. मराठीतील या नव्या दमाच्या लेखकाचे हे विचारमंथन आपल्याला आश्वस्त करणारे आहे. ‘एकरेघ’ या लेखकाने चालवलेल्या ब्लॉगवरून साभार.
—————————————————————————–
कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांची हत्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात दादरी इथं गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून झालेली अखलाख या मुस्लीम व्यक्तीची हत्या, हे अगदी अलीकडचे प्रसंग. या व इतर काही प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी ‘साहित्य अकादमी’ या सरकारस्थापित स्वायत्त संस्थेचे पुरस्कार परत केल्यासंबंधीच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये येत आहेत.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय : क्रिएटिव्ह पास्ट्स (२)

सर्जक भूतकाळ , मराठी इतिहासलेखन

इतिहास हा विषय असा आहे के जो कधी बदलत नाही, असे (नेमाडेंच्या कादंबरीतील इतिहासाच्या प्राध्यापकाला) वाटण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठीतले इतिहासलेखन म्हणजे तर विविध अस्मितांनी भारलेल्या इतिहासकारांचा आविष्कार. महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वीच्या २६० वर्षांच्या इतिहासलेखनाचे जातीय-राजकीय ताणेबाणे उलगडण्याचे महत्त्वपूर्ण  कार्य  केलेल्या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचा नंदा खरेंनी करून दिलेल्या परिचयाचा उत्तरार्ध.

एक इतिहासकार मात्र सरकारी नोकरीत असूनही राजवाडेपंथी होते. हे होते त्र्यं.शं. शेजवलकर. ते भाइसंमंच्या चिपळूणकरी वळणाच्या राष्ट्रवादी इतिहासाला विरोध करत; आणि सरदेसायांच्या नानासाहेब पेशव्याच्या चरित्रालाही विरोधी प्रस्तावना लिहीत.

पुढे वाचा

पुस्तक परिचय : क्रिएटिव्ह पास्ट्स (१)

सर्जक भूतकाळ , मराठी इतिहासलेखन

—————————————————————————इतिहास हा विषय असा आहे के जो कधी बदलत नाही, असे (नेमाडेंच्या कादंबरीतील इतिहासाच्या प्राध्यापकाला) वाटण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठीतले इतिहासलेखन म्हणजे तर विविध अस्मितांनी भारलेल्या इतिहासकारांचा आविष्कार. महाराष्ट्र राज्य निर्मितीपुर्वीच्या २६० वर्षांच्या इतिहासलेखनाचे जातीय-राजकीय ताणेबाणे उलगडण्याचे महत्वपूर्ण  कार्य  केलेल्या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचा खास परिचय नंदा खरेंच्या शैलीत …

—————————————————————————      ‘फक्त महाराष्ट्रालाच इतिहास आहे. इतर प्रांतांना केवळ भूगोल असतो’, हे अनेक महाराष्ट्रीयांचे मत अनिल अवचट आपल्या बिहारमधल्या ‘पूर्णिया’ जिल्ह्याबद्दलच्या पुस्तकात सुरुवातीलाच नोंदतात. नंतर मात्र गौतम बुद्ध बिहारमध्येच वावरून गेला हे आठवून महाराष्ट्रीय मत किती उथळ आहे हे अवचटांना जाणवले!

पुढे वाचा

आरोग्य व्यवस्थेचा पंचनामा

वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ञांच्या मुलाखती घेऊन आणि तत्संबंधी संकलन व लेखन करून डॉ. अरुण गद्रे यांनी ‘कैफियत’ या छोटेखानी पुस्तकात देशातील आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती घेतली आहे. या पुस्तकातील ७७ डॉक्टरांची स्वगतं, म्हणजे अस्तंगत होणाऱ्या जातीने जणू आपल्या रक्षणासाठी मारलेल्या हाकाच आहेत. हे पुस्तक वाचून सामाजिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, संघटना, राजकीय पक्ष आपल्या बेशुद्ध अवस्थेतून बाहेर येतील, अशी किमान आशा करायला हरकत नाही. कारण लेखकानेही पुस्तकात सामाजिक, राजकीय दबाव वाढत जाईल व अंतिमतः बेलगाम खाजगी वैद्यकीय क्षेत्रावर नियंत्रण आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुढे वाचा

भारतातील रॅशनॅलिस्ट चळवळ

एका अभ्यासू रॅशनॅलिस्टच्या मते भारत देश हा फक्त धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचाच देश नसून  नीरिश्वरवाद, विवेकवाद, मानवतावाद, चिकित्सक वृत्ती, अज्ञेयवाद यांचेही अंश कुठे ना कुठे तरी या देशात प्राचीन काळापासून सापडतात. जेव्हा हे मत आपण धसास लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा यातील खरेपणाविषयी संशय वाटू लागतो. कारण आपल्या आवती भोवती धर्माच्या अतिरेकामुळे विवेक, मानवता यांना पायदळी तुडवलेली उदाहरणं मोठ्या प्रमाणात सापडतात. परंतु डॉ. जॉन (जोहान्नेस) क्वॅक या एडिनबरो विद्यापीठातील प्राध्यापकाला मात्र आपल्या देशातील हा वेगळेपणा चटकन लक्षात येतो. त्यानी यासंबंधी एक प्रबंधच सादर केला असून त्याच प्रबंधाची पुस्तकी आवृत्ती Disenchanting India या नावाने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केली आहे.

पुढे वाचा