‘काही वर्षांपूर्वीपर्यंत चालू असलेल्या मध्यंतरी बंद केलेल्या हजाराच्या नोटा पुन्हा सुरू करण्यात आल्या’ अशी बातमी अलिकडेच वाचली. हे काम फार पूर्वीच व्हायला हवे होते. दुसरे महायुद्ध सुरू असताना त्यावेळच्या सरकारला गरज वाटल्यावरून एक रुपयाच्या नोटा प्रसृत करण्यात आल्या आणि चलनवाढीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. पहिले महायुद्ध सुरू झाले त्यावेळी बाजारातून कवड्या, गंडे, टोल्या यांचे उच्चाटन झाले आणि दुस-या महायुद्धानंतर चांदीची नाणी चलनातून हद्दपार झाली.
खाजगी मालकी जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत पैशांची गरज पडणारच. पैशाचे स्वरूप मात्र बदलत जाणार आणि धातूच्या नाण्यांच्या ऐवजी किंवा नोटांच्या ऐवजी नुसताच आकडा या खात्यावरून त्या खात्यात हिंडणार.
पाळणाघरे, अपप्रवृत्ती कशी?
आजचा सुधारकच्या डिसेंबर ९८ च्या अंकात (९:९, २७६-२७८), पाळणाघरांची वाढ : एक अपप्रवृत्ती’ हा स्फुट लेख प्रसिद्ध झाला असून, त्यामध्ये याच विषयावर सप्टेंबर १९९८ च्या अंकातील स्फुट लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रियांना संपादकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या ताज्या स्फुटात कोणताही नवा मुद्दा अथवा विचार आलेला नाही. या विषयावरील संपादकांची भूमिका अवास्तव, असंतुलित व काहीशी दुराग्रही आहे असे खेदाने म्हणावे लागते. या विषयावरील चालू चर्चेत आम्ही खालील मुद्दे मांडू इच्छितो.
(१) महागाई फार झाली आहे, हा या वर्षीचा नैमित्तिक अपवाद वगळता, म्हणणे खरे नाही.
एक सर्वेक्षण
औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाची प्रगती, भांडवली अर्थव्यवस्थेचा रेटा यांमुळे उत्पादनांच्या साधनांचे ध्रुवीकरण झाले असून या आर्थिक चक्रात माणसे अधिकाधिक गुरफटत आहेत, त्यांची कुटुंबे भरडली जात आहेत असे मानून त्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांचे जीवनमान कसे आहे, जगण्याची पद्धत कशी आहे, हे शोधण्याचा प्रयत्न चिं. मो. पंडित यांनी केला आहे.
त्यासाठी त्यांनी एक सर्वेक्षण करावयाचे ठरवले असून त्यासाठीची प्रश्नावली खाली देण्यात आली आहे. वाचकांनी सर्वेक्षणाची ही प्रश्नावली भरून चिं. मो. पंडित यांना पाठवावी ही विनंती. – सं.
दुस-या महायुद्धानंतर जगभर स्वातंत्र्याची आणि समाजवादी लोकशाहीची एक लाटच आली.
पृथ्वीचा कॅन्सर
जमीन, हवा, पाणी या जड पदार्थांसह व विविध प्राणी, वनस्पती, एकपेशीय जीव, यांसह, आपली पृथ्वी हाच एक सजीव पदार्थ आहे ही कल्पना किंवा उपमा आता सर्वमान्य ठरत आहे. या पृथ्वीवरील सर्वच सजीव व निर्जीव घटक एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांवर परिणाम करतात हे आता कोठे आपल्याला समजू लागले आहे. सजीव सृष्टीच्या आगमनापूर्वी पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायु अजिबात नव्हता, व कबनडायॉक्साइड भरपूर होता. सजीव वनस्पतींनी सूर्यप्रकाश व क्लोरोफिल यांच्या साहाय्याने त्यातील ब-याचशा कार्बनडायॉक्साइडचे रूपांतर प्राणवायू व कार्बन ह्यांमध्ये करून टाकले व वातावरणात प्राणवायूचे प्रमाण जवळपास एकपंचमांश इतके झाले.
श्री. श्याम कुलकर्णी ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने निसर्गावर विजय मिळविणे हा विज्ञानाचा हेतु नाही
आमचे मित्र श्री. श्याम कुलकर्णी ह्यांचे अनेक दिवसांनतर एक पत्र आले आहे. ते शब्दशः खाली देत आहोत. त्यांच्या पत्राच्या निमित्ताने विवेकवादाच्या काही पैलूंवर पुन्हा
आणि थोडा अधिक स्पष्ट प्रकाश आम्हाला टाकता येईल अशी आशा आहे.]
नियति नव्हे तर दैवगती
‘पुन्हा एकदा नियतिवाद’ या सप्टेंबर १९९८ च्या ‘आजचा सुधारक’ मधील लेखात नियति हा शब्द अयोग्य आहे असे लेखकाचे मत असल्यास त्यास दैवगती हा शब्द वापरता येईल परंतु विश्वातील सर्व घटना नियमबद्ध आहेत असेही म्हणता येत नाही. विज्ञान हे पूर्णपणे नियमबद्ध आहे असे आपण समजतो तरी सर्व वैज्ञानिक सिद्धान्त आदर्श अटी पूर्ण झाल्यासच सिद्ध होतात व त्या आदर्श अटी पूर्ण करणे बरेच वेळा अशक्य कोटीतील असते.
उघड्या तोंडाची जात
“… प्रत्येक देशांत त्या देशाच्या उच्च संस्कृतीची वाहक अशी जी अॅरिस्टॉक्रसी पाहिजे, तशी तयार होण्यास त्या समाजामध्ये स्त्री-पुरुषसंबंध देखील खुला पाहिजे. कारण ज्या समाजांत हा खुला संबंध असतो तो समाज अधिक आकर्षक होतो आणि त्यामुळे त्या समाजांत शिरावे अशी इतरांस इच्छा उत्पन्न होते. “अॅरिस्टाक्रसी’ होऊ इच्छिणा-या समाजाने केवळ लखोटबंद राहून उपयोगी नाहीं तर इतरांना आपणांत समाविष्ट होण्याची संधि दिली पाहिजे आणि आपल्या वर्गात समाविष्ट होण्याची इतरांची इच्छा जिवंत ठेविली पाहिजे. ब्राह्मणांत शिरावे अशी ब्राह्मणेतरांची इच्छा असल्यास त्यांस संधि द्यावी. ब्राह्मण समाज अधिकाधिक आकर्षक करावा व त्या समाजामध्ये इतर जातींतील चांगल्या व्यक्तींना येण्यास संधि मिळावी.
पत्रव्यवहार
मी नथुराम…..वर बंदी नको
संपादक, आजचा सुधारक,
मी नथुराम गोडसे बोलतोय… या नाटकावरील बंदीच्या संदर्भात झालेली चर्चा वाचली. नाटकावर बंदी घालणे चूक आहे असे मला वाटते व या विषयावर अधिक व्यापक चर्चा होणे अगत्याचे आहे. माझ्या भावना दुखावतात म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल वा कलाकृतीबद्दल ‘फतवा काढण्यासारखे काही कृत्य करून आपण त्याचे समर्थन करीत आहोत काय?
व्यक्तिगत दृष्ट्या एक गोष्ट मला प्रथमच स्पष्ट करावी वाटते. मी व्यक्तिशः आजपर्यंत तरी गांधीजी हे महात्मा आहेत व नथुरामने केलेले कृत्य चुकीचे व वाईट आहे असे मानत आलो आहे.
स्फुट लेख -आजचा सुधारक हा आपला सुधारक कसा वाटेल? (२)
श्री. खिलारे आणि श्री. नानावटी यांची मागच्या म्हणजे नोव्हेंबर १८ च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली पत्रे वाचून मनात काही विचार आले ते सगळ्या वाचकांपुढे ठेवीत आहोत.
लेख कोणी लिहिला आहे ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे आणि केवळ त्यातील विधानांचा, मतांचा आणि सूचनांचा परामर्श घेणेच योग्य होईल असे जे आम्ही पूर्वी म्हटले होते त्या आमच्या मतांत फरक झालेला नाही. पत्रलेखकांनी पाषाणच्या डॉ. कांबळे ह्यांच्या दवाखान्याचे उदाहरण दिले आहे. डॉ. कांबळे ह्यांच्या ठिकाणी आवश्यक ते वैद्यकीय कौशल्य असेल तर त्यांचा दवाखाना कोणत्याही वस्तीत नीट कसा चालेल हे आम्ही सर्वांनी बघितलेच पाहिजे.
ऊर्जेचे नियमन
ऊर्जा म्हणजे निसर्गातल्या शक्तीचेच एक रूप आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये. उष्णता, वीज, पाण्याचा साठा हे ऊर्जेचे अविष्कार आहेत. ऊर्जेचा संचय (concentration) जर प्रमाणाबाहेर होऊ लागला तर ती विध्वंसक आणि प्रलयकारी होऊ शकते. त्यासाठी तिचे विरेचन किंवा नियमन होणे आवश्यक असते. उष्णता प्रमाणाबाहेर वाढली तर तिच्या भक्ष्यस्थानी काय काय पडेल ते सांगता येत नाही. नद्यांना पूर आले किंवा धरणे फुटेपर्यंत पाणी साठले तर हाहाकार होतो. तसाच प्रकार विजेच्या लोळाचा! ऊर्जेचे विरेचन (वाटप) होऊन प्रलय टळण्यासाठी जी प्रक्रिया होते तिचाही काही निसर्गनियम आहे.
दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (३)
ह्यानंतरच्या भागात वर्मा नैतिकतेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या सामाजिक तणावाचा मागोवा घेतात. नक्षलवादी चळवळीचा उदय आणि अस्त, जयप्रकाश नारायणांची नवनिर्माण चळवळ, १९७४ चा इंदिरा गांधींनी चिरडून टाकलेला देशव्यापी रेल्वे-संप आणि लगेच पोखरणला केलेली भूमिगत अणुचाचणी आणि सरतेशेवटी आणीबाणी. ह्या सर्व घटनांमधून वर्मा मध्यमवर्गाच्या मनोवृत्तीचे फार चांगले विवरण करतात.
ह्या मनोवृत्तीला ख-या अर्थाने धक्का बसला १९९० मध्ये जेव्हा व्ही.पी. सिंग ह्यांनी मंडल कमिशनच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची योजना जाहीर केली. या घटनेमुळे एक आर्थिक-सामाजिक प्रक्रिया वेगाने पूर्णत्वाला पोचण्याची शक्यता निर्माण झाली.. वर्मा म्हणतात, हरित क्रांतीमुळे आणि टेनन्सी कायद्यांमुळे सुस्थितीत आलेले ग्रामीण भागातील कनिष्ठ जातीपैकी काही वर्ग मध्यमवर्गाजवळच्या केकवर हक्क सांगू लागले.