दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (२)

१९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि ब्रिटिश प्रशासकांच्या जागी भारतीय प्रशासक आले पण प्रशासनाचे स्वरूप जवळपास तेच राहिले. ब्रिटिश आराखड्यावर भारतीय संसदीय लोकशाहीचे स्वरूप आखले गेले. भारतीय प्रशासकीय सेवा, न्यायसंस्था, सैन्यदल, शिक्षणपद्धती सगळे जवळपास त्याच स्वरूपात पुढे चालू राहिले. वर्माच्या मते हे सातत्य टिकले कारण मध्यमवर्गाची स्वातंत्र्याची कल्पनाच ती होती. ब्रिटिशांची हकालपट्टी त्यांना हवी होती पण राज्यकारभाराची पद्धत तीच हवी होती.
१९४७ च्या सुरुवातीचा हा मध्यमवर्ग संपूर्ण लोकसंख्येच्या १०% सुद्धा असेल नसेल. वरती मूठभर अतिश्रीमंत उद्योजक, भांडवलदार, जमीनदार आणि राजघराण्यातले काही लोक आणि खालती प्रचंड संख्येचे शेतमजूर, कष्टकरी, कामगार, चतुर्थ श्रेणीतील नोकरवर्ग वगैरे.

पुढे वाचा

माफ करा! माझे मत बदलले आहे — माझी वर्तमान भूमिका

‘स्वतोमूल्य’ या विषयावरील माझे मत बदलले आहे हे वाचकांना कळविण्यासाठी मुद्दाम हे टिपण लिहिले आहे. चार-सहा महिन्यांपूर्वी स्वतोमूल्य विषयनिष्ठ, म्हणजे objective आहे, ते जाणणारी सारी मने, सर्व ज्ञाते, नाहीसे झाले तरी ते अबाधित राहणार आहे, असे मी मानीत असे. थोडक्यात स्वतोमूल्याविषयी मी G.E. Moore चे मत स्वीकारीत असे. मूर म्हणतो की स्वतोमूल्यवान वस्तू म्हणजे आपल्याला केवळ तिच्याखातर अभिलषणीय वाटावी अशी वस्तू, तिच्यामुळे आपल्याला हवे असलेले अन्य काही प्राप्त होते म्हणून नव्हे. आता मूरचे म्हणणे असे होते की जगातले सर्व विषयी (किंवा ज्ञाते) नाहीसे झाले तरी स्वतोमूल्यवान वस्तूचे स्वतोमूल्य अबाधित राहते.

पुढे वाचा

विवेकाचे अधिकार

विवेकाचे, म्हणजे reason चे, दोन अधिकार सर्वमान्य आहेत असे म्हणायला हरकत नाही. (१) एखादे विधान स्वयंसिद्ध (self evident) आहे हे ओळखणे. उदा. ‘दोन राशी जर तिस-या एका राशीबरोबर असतील, तर त्या परस्परांबरोबर असतात (२) अनुमाने करणे, म्हणजे एक विधान जर खरे असेल, तर त्यापासून निगमनाने व्यंजित होणारी विधानेही खरीच असतात असे ओळखणे. उदा. सर्व मनुष्य मर्त्य आहेत आणि सॉक्रेटीस मनुष्य आहे हे संयुक्त विधान जर खरे असेल, तर ‘सॉक्रेटीस मर्त्य आहे हे विधानही खरेच असले पाहिजे, ते असत्य असू शकत नाही.

पुढे वाचा

जातधंद्याची काटेरी कुपाटी नाहशी…

सध्यां जातिधर्माप्रमाणे कुणबिकीच्या आउतापैकी एक एक जातीचा कारू करतो, दुसरें दुसरीचा एवढेच नव्हे तर सनगाचे वेगवेगळाले भाग वेगवेगळाले कारू बनवितात. तेव्हां हत्यारे किंवा त्यांचे भाग बनविणारा एक, जोडणारा दुसरा आणि वापरणारा कुणबी तिसरा असली तन्हा होते. त्यामुळे त्यांतली व एकमेकांच्या ध्यानात येत नाहींत व सर्वच आउते अगदी निकृष्ट अवस्थेत पोहचली आहेत. परस्परावलंबी धंदे शाळेत शिकविले तर हत्यारें एकाच्या देखरेखीखाली तयार होऊन ती सुधारतील, आणि सध्यां नजरेस पडणारे तुटपुंजे कारखाने बघून त्यांच्या जागी मोठ्या प्रमाणावर धंदे काढण्याची व चालविण्याची अनुकूलता कारागिरांना येईल.

पुढे वाचा

संपादकीय

एका वेगळ्या प्रकारची परिस्थितिशरणता
आपल्या देशामध्ये, ह्या भारतभूमीत असे पुष्कळ लोक आहेत की जे आपल्यापुरतेच पाहत नाहीत, आपल्या शेजारपाजारच्यांची त्यांना आठवण असते. त्यांच्या वाट्याला आलेल्या संपत्तीचा एकट्याने उपभोग घेण्याचा त्यांना संकोच होतो. महात्मा गांधींनी तर त्या बाबतीत आपणा सर्वांना आदर्शच घालून दिला. दरिद्रनारायणाला जे मिळत नाही ते वापरण्याला त्यांनी आपल्या उत्तरायुष्यात नेहमीच नकार दिला. सर्वसाधारण भारतीयाइतकेच आपले जीवनमान राखण्याचा त्यांचा कटाक्ष होता. राहण्यासाठी मोठमोठे वाडे त्यांना मिळू शकत असताना त्यांनी झोपडीचा आश्रय केला. अशी दीनदयाळु, सुमनस्, दयार्द्र किंवा करुणाकर मंडळी भारतात बहुसंख्य नसली तरी पुष्कळ मोठ्या संख्येने आहेत.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

राजेंद्र व्होरा यांच्या आगरकरांविषयीच्या टीकेस आपण प्रत्युत्तर देणे आवश्यक होतेच का? व्होरा यांचे आगरकरांच्या लिखाणाविषयीचे निरीक्षण आपण अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे, त्यांचा निष्कर्ष आपणास मान्य नाही. पण आगरकर हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असले तरी त्यालाही मर्यादा असल्यास हरकत नसावी.
– मधुकर देशपांडे
३ राज अपार्टमेंटस्, ४४/१
शिवदर्शन चौक, विद्यानगरी, पुणे ४११००९

संपादक,
आजचा सुधारक
आपल्या मासिकाचा मी नुकताच वर्गणीदार झालो आहे. मागील १०-१५ अंक मागून घेतले होते तेही माझ्याजवळ आहेत. सहज अंक चाळून पहात असता मला काही विचार सुचले ते आपल्यापुढे मांडत आहे.

पुढे वाचा

स्फुटलेख

महाराष्ट्रातल्या एकूण सर्व रहिवाशापैकी २०% लोक सोडले तर बाकीचे ८०% लोक कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शासकीय मदतीला कमीअधिक प्रमाणात पात्र ठरत असावे.
जे मदतीला पात्र ठरत नाहीत त्यांच्यापैकी अर्धे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १०% लोक असे साहाय्य घेणे नामुष्कीचे वाटून त्यासाठी जात बदलणार नाहीत अशी आशा आहे. म्हणजे दाखला मागण्यातल्या, मिळविण्यातल्या अडचणी पार करून जास्तीत जास्त १०% लोक त्या सवलतींसाठी लायक नसताना सवलती मागतील असा अंदाज करता येतो.
आपल्याला ह्या जातींच्या गुंत्यातून बाहेर पडावयाचे असेल तर त्यासाठी दोन उपाय आम्हाला सुचतात.

पुढे वाचा

बाराखडीतील अं’ चे स्वरूप

आजचा सुधारकच्या जुलै ९८ च्या अंकात ‘अ’ च्या स्थानाविषयी काही उद्बोधक चर्चा ‘स्फुटलेख’ या शीर्षकाने केलेली आढळली. हा ‘शिक्षाशास्त्र (उच्चारणशास्त्र) व व्याकरणशास्त्र’ यांच्या अंतर्गत येणारा विषय, त्या दृष्टीने पुढील माहिती उपयोगी होण्याचा संभव वाटतो. अ आ च्या बाराखडीत “अं अः’ का येतात, तर ते अनुस्वार-विसर्गाची ओळख व्हावी म्हणून. ‘अं’ व ‘अ’ हे स्वरापुढे क्रमाने येणारे अनुस्वार व विसर्ग होत, (अं अः इत्यचःपरौ अनुस्वारविसग) अशी स्पष्ट नोंद व्याकरणशास्त्रात केलेली आहे. अनुस्वार व विसर्ग हे नेहमी स्वरापुढेच येतात, व्यंजनापुढे कधीही येत नाहीत. यास्तव मुलांना त्यांची ओळख व्हावी म्हणून सोयीसाठी स्वरांतला आदिस्वर ‘अ’ म्हणून त्याच्या साहाय्याने ही ओळख करून देण्यात येते.

पुढे वाचा

करा आणि शिका

बहुतेक शाळांमध्ये विज्ञान हा विषय फक्त व्याख्यानांच्या रूपात शिकविला जातो. शिक्षकांनी व्याख्यान द्यावे आणि मुलांनी ते ऐकावे हीच पद्धत वापरली जाते. प्रयोगातून विज्ञान क्वचितच शिकविले जाते. आणि ज्या थोड्या शाळांत प्रयोग केले जातात तेही फक्त शिक्षकाने तीस चाळीस (किंवा जास्तच) मुलांना एकदा करून दाखवायचे आणि सर्वांनी ते पाहायचे असा प्रकार असतो. विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करून पहाता येत नाहीत. वर्गातील विद्यार्थी संख्या, विज्ञान-तासिकेत असणारा वेळ, वर्षातील सुट्यांची संख्या हे सर्व पाहता उत्साही शिक्षकालाही फारसे वेगळे करता येत असेल असे वाटत नाही. अशा नीरस पद्धतीमुळे मुलांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होणे कठीणच.

पुढे वाचा

नीती आणि समाज

अनेक व्यक्ती एकत्र राहतात तेव्हा समाज तयार होतो. व्यक्तींचे समूहात राहणे सुखकर व्हावे, समाज-जीवन सुरळीत चालावे व समाजाची प्रगत व्हावी यासाठी व्यक्तींनी आपल्या वर्तनावर काही बंधने घालून घेणे आवश्यक असते. किंवा दुस-या शब्दांत, समाजाने, व्यक्तीने कसे वागावे यासाठी, काही मार्गदर्शक नियम घालून द्यावे लागतात व ते नियम पाळले जातील यासाठी प्रयत्न करावा लागतो.

बहुतेक सर्व मानवी समाजांमध्ये आजतागायत ‘धर्म’ मार्गदर्शक नियम घालून देत असे. पण त्यातील अनेक त्रुटी लक्षात आल्यामुळे आता बहुतेक विचारी व्यक्ती धर्माची जागा ‘नीती’ ने घ्यावी असे मानू व बोलू लागल्या आहेत.

पुढे वाचा