न्यायमूर्ती हरिनाथ तिलहरी यांनी दि. १२ एप्रिल ९४ रोजी तलाकबाबत जो निकाल दिला त्याचे उलट सुलट पडसाद संपूर्ण मुस्लिम समाजात उमटत असून पूर्वीच्या शहाबानो प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरणही गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. पुरोगामी विचारवंत श्री. असगरअली इंजीनीअर यांनी निकालाचे स्वागत केले असून सय्यद
शहाबुद्दीन व अन्य मुस्लिम विचारवंतांनी टीका केली आहे.
न्यायालयासमोर मूळ प्रश्न तलाकचा नसून जमिनीचा होता. जो प्रश्न मुळातच न्यायालयासमोर नाही त्यावर निकाल देण्याचा न्यायमूर्ती तिलहरी यांना अधिकार नाही; हा निकाल म्हणजे इस्लामी शरीयतला आव्हान आहे; मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेपआहे, इत्यादि मते मुस्लिम विचारवंतांनी व्यक्त केली आहेत.
सहजप्रवृत्तीचे प्रशिक्षण
आपल्या स्वाभाविक प्रवृत्ती चांगल्याही नसतात आणि वाईटही नसतात; नैतिकदृष्ट्या त्या उदासीन असतात. त्यांना इष्ट वळण देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. जुनी ख्रिस्ती लोकांना प्रिय असणारी पद्धत सहजप्रवृत्तींना प्रतिबंध करण्याची होती, परंतु नची पद्धत त्यांना प्रशिक्षित करण्याची आहे. उदाहरणार्थ सत्तेची इच्छा घ्या. ख्रिस्ती नम्रता (humility) शिकविणे व्यर्थ आहे; त्यामुळे ती प्रवृत्ती दांभिक रूपे धारण करते एवढाच तिच्यामुळे फरक पडतो. तिला प्रकट होण्याच्या हितकर वाटा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. मूळची सहजप्रवृत्ती हजार प्रकारांनी शांत होऊ शकते-परपीडन, राजकारण, व्यापार, कला, विज्ञान- या सर्व गोष्टी जर यशस्वीपणे हाताळल्या गेल्या तर ती शांत होते.
पत्रव्यवहार
स.न.वि. वि.
‘आजचा सुधारक’ च्या जून ९४ च्या अंकात प्रा. श्री. गो. काशीकर यांचे सातारच्या विचारवेध संमेलनाविषयी एक पत्र प्रकाशित झाले आहे. त्यातील सर्व मुद्द्यांचा परामर्श येथे घेत नाही. त्यांच्या शेवटच्या वाक्याविषयी थोडेसे लिहितो. ते वाक्य असे, “एकंदरीत हे विचारवेध संमेलन विचारवेधाऐवजी विचारवध करणारे व विकारव्याधी जडलेले संमेलन झाले, असे खेदाने म्हणावे लागेल.”
प्रा. काशीकरांच्या या विधानाची वस्तुनिष्ठता तपासून घेण्यासाठी वाचकांना मदत होऊ शकेल, अशा फक्त एका घटनेचा तपशील येथे देतो. या संमेलनात २० फेब्रुवारी रोजी एका परिसंवादात मी आणि श्री.
गांधींचे ‘सत्य – एक प्रतिक्रिया
आजचा सुधारक या मासिकाच्या एप्रिल १९९४ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांचा गांधीचे ‘सत्य’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या संबंधात मला खालील प्रतिक्रिया नोंदवायची आहे.
सुरवातीलाच प्रा. देशपांडे यांनी सत्य, सत् व साधु या तीन पदांना अनुक्रमे ज्ञानशास्त्रीय, सत्ताशास्त्रीय आणि नीतिशास्त्रीय अर्थ कसा आहे हे स्पष्ट करून म्हटले आहे की व्यवहारात जरी कित्येकदा हे शब्द आपण लवचीकपणे वापरताना आढळत असलो तरी तात्त्विक चर्चेत या शब्दांचे अर्थ काटेकोरपणेच घेतले पाहिजेत.
चर्चेच्या ओघात subsistence आणि existence या पदांचे अर्थ स्पष्ट करताना अनुक्रमे ‘भाववान’ पदार्थ आणि अस्तित्ववान’ पदार्थ असे त्यांचे भाषांतर करण्यात आलेले आहे.
गांधींचे सत्य
श्री. देशपांडे (दि. य.) यांनी गांधीजींच्या तत्त्वज्ञानांतील सत्याच्या संकल्पनेचा शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. प्रयत्नांती परमेश्वर’ गूढ आणि अनाकलनीयच राहिला, त्या ऐवजी तो स्पष्ट व आकलनीय व्हायला हवा होता.
गांधींचा स्वतःचा ‘सत्याचा शोध त्यांच्या आत्मचरित्रांतील अवतरण देऊन, दि.यं.नी त्यावर निराशाजनक असा अभिप्राय दिला आहे.
God is Truth व Truth is God ही दोन वाक्ये ‘ईश्वराचे परिपूर्ण वर्णन’ म्हणून गांधींनी सुचवल्याचे सांगून, दि.य. ती वाक्ये असाधु व निरर्थक ठरवितात. अशी दुर्बोध भाषा वापरणारे लोक अप्रामाणिक असतात असे जरी दि.यं.ना
इतर
मा. संपादक, आजचा सुधारक, यास
सा. न.
आपला एप्रिल १९९४ चा अंक वाचला. त्यातील ललिता गंडभीर यांनी दिलेल्या ‘गीता साने यांच्या पत्रास उत्तर’ मधील काही विचार खटकतात. त्या संदर्भात वे एकूणच स्त्री-मुक्ती चळवळीच्या संदर्भात पुढील विचार मांडावेसे वाटतात
पूर्ण स्त्री-मुक्तीच्या उपरोक्त व्याख्येमधील स्त्रीच्या लैंगिक शुद्धतेला अवास्तव महत्त्व देणे बंद हा मुद्दा खटकतो. यामुळे केवळ एका स्वैराचारी, बेबंद समाजाची निर्मिती होईल अशी भीती वाटते. तेव्हा स्त्रियांच्या लैंगिक शुद्धतेला महत्त्व देणे बंद करण्याऐवजी पुरुषांच्या लैंगिक शुद्धतेबाबत स्त्री-मुक्तिवाद्यांनी व स्त्री-पुरुष समानतावाद्यांनी आग्रह धरावा असे वाटते.
स्वायंभुव मनूची ‘निष्कारण निन्दा?
मनु हा वस्तुतः स्त्रीद्वेष्टा नाही, त्याने स्त्रियांविषयी करू नये ती विधाने केलेली नाहीत, पुरुषाने स्वतःच्या स्वार्थासाठी स्त्रीला बंधनात जखडून ठेवले पाहिजे असे मनूचे मत नाही, तरीदेखील त्याच्या वचनांचा विपर्यास करून पुरोगामी अभ्यासक मनूची निंदाकरतात आणि मनुस्मृतीचे सखोल अध्ययन न करताच आपला अभिप्राय वाचकांच्या गळी, वेळोवेळी उतरवितात असे मत डॉ. के. रा. जोशी ह्यांनी ‘संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ ह्याविषयी दोन लेख लिहून प्रतिपादन केले आहे. डॉ. जोशी ह्यांनी ज्या मनुस्मृतीचा कैवार घेतला आहे तिचे वास्तविक स्वरूप आपण आधी पाहू या.
चर्चा : संदर्भ न पाहता लावलेले अर्थ
संपादक आजचा सुधारक यांस,
स.न.वि.वि.
“संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ” हे, याच नावाने लिहिलेल्या (आजचा सुधारक, मे १९९४) के. रा. जोशी यांच्या लेखातील मजकुराचेच रास्त वर्णन असावे असे वाटते. ‘मनूची निंदा करण्यासाठी ज्या वचनाचा भरमसाठ आधार घेतला जातो. या प्रस्तावासह ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ चा जोशी यांनी दिलेला अर्थ असा की “स्त्रियेला कुठल्याही अवस्थेत संरक्षणासाठी स्वातंत्र्याची (स्वतःवर निर्भर राहण्याची) पाळी येऊ नये.” श्री. जोशी यांच्या मते मनूने या श्लोकाद्वारे स्त्रियांना सामाजिक सुरक्षेचे कवच दिले असून, आजच्या परिस्थितीत (‘मनूला बुरसट मानणार्याो व स्वतःला प्रगत मानणार्याा समाजाच्या संदर्भात) ‘मनूच्या या उपाययोजनेची दखल घेण्यासारखी नाही काय हे प्रत्येकाने निर्मळ मनाने स्वतःशीच ठरवावे असा त्यांनी वाचकास कळकळीचा सल्ला दिला आहे.
दंगली का होतात आणि कशा त्या थांबतील?
‘दंगल’ हा शब्द वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी मी प्रथम ऐकला तो सोलापुरात. मुसलमान समाजाची वस्ती तेथे बर्या च प्रमाणात आहे. १९३० सालाच्या आगेमागे तेथे हिंदू-मुसलमानांचे दंगे वरचेवर होत असत.
‘फोडा आणि निर्वेध राज्य करा हे परकीय ब्रिटिश सत्तेचे धोरण होते. १८५७ सालच्या बंडापासून ब्रिटिश सत्ताधार्यांरनी या दुष्ट राजनीतीचा पाठपुरावा केला होता. त्याला पाने आली होती, आणि प्रतिवर्षी भारतभर ठिकठिकाणी हिंदू-मुसलमानांच्या दंग्यांचे भरघोस पीक ब्रिटिश सत्ताधार्यां च्या पदरात पडत असे.
भारतामधून ब्रिटिश सत्तेची उचलबांगडी झाली, की हिंदू-मुसलमान दंगेदेखील इतिहासात जमा होऊन जातील, या स्वप्नात आम्ही होतो.
अमेरिकन शिक्षण : दशा आणि दिशा
सार्वजनिक शाळांचा जनक म्हणून गणला जाणारा होरेस मॅन हा १८३० च्या एका भाषणात म्हणाला होता, ‘शिक्षण हाच सामाजिक समतेचा पाया आहे. १६३५ ते १८०० पर्यंत येथील बहुसंख्य विश्वविद्यालये व प्राथमिक माध्यमिक शाळा खाजगी मालकीच्याहोत्या. शिक्षण हे पैसेवाल्यांच्या हातातील खेळणे होऊन बसले होते. मध्यमवर्ग व तळागाळाची जनता ही शिक्षणापासून जवळजवळ वंचित झाली होती. पण अशी ‘स्फोटक शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती ही उगवत्या लोकशाहीला मारक ठरेल हे लक्षात घेऊन होरेस मॅन, हेन्री बर्नार्ड व चार्ल्स वाइलीसारख्या शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या जिवाचे रान करून धर्म-जात ह्यांच्या मर्यादा उल्लंघून सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रचंड मोहीम अंगीकारली व १८५० च्या सुमारास ‘सार्वजनिक (पब्लिक) शाळांचा पाया घालून अमेरिकन लोकशाहीचा पाया मजबूत केला.