तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ९)

उद्गमन (२)

गेल्या लेखांकात आपण उद्गमनाची समस्या समजावून घेतली. ती समस्या अशी आहे की निसर्गाचे ज्ञान मिळविण्याचा एकमेव उपाय म्हणजे उद्गमन. परंतु ही क्रिया अवैध असल्यामुळे तिचे निष्कर्ष कधीही पूर्णपणे सिद्ध झाले असे म्हणता येत नाही. ते कमीअधिक प्रमाणात संभाव्य असू शकतात, पण पूर्णपणे निश्चित असू शकत नाहीत. म्हणून मग उद्गामी अनुमाने त्यातल्या त्यात विश्वासार्ह कशी होतील असा प्रश्न उपस्थित होतो. याचे उत्तर या लेखांकात द्यावयाचे आहे.
निसर्गातील प्रक्रम (Order in Nature)
निसर्गाची वाटचाल नियमबद्ध आहे, आणि प्रत्येक घटना कोणत्या तरी नियमानुसार घडते असे वैज्ञानिक मानतो.

पुढे वाचा

इंग्रजी: एक पुनरवलोकन

Why is some Jat teenager in Meerut reading Jane Austen ? Why does a place like Meerut have a course in English at all ? Only because the Prem Kishens of the country need a place where they can teach rubbish?
– English, August Upamanyu Chatterjee
भारतात इंग्रजीचे स्थान काय असावे यासंबंधी आजवर बरेच लिहून झाले आहे. बरीच उलट-सुलट चर्चाही झाली आहे. तेव्हा परत या विषयाकडे कोणी का वळावे असा प्रश्न मनात स्वाभाविकच उभा राहू शकतो. त्याचे समाधानकारक उत्तर देणे कठीण आहे.

पुढे वाचा

जातीय दंगली आणि त्यामागील विचारप्रणाली

१८९३ साली मुंबईत पहिली जातीय दंगल झाली. म्हणजे एका अर्थी यावर्षी आपण जातीय दंगलींचा शतकोत्सव साजरा करीत आहोत. गेल्या शंभर वर्षांत अशा जातीय दंगलींचा उद्रेक अधून मधून सतत होत आला आहे व त्या दंगलींतून माणसातील पशुत्वाचे दर्शनही भरपूर झाले आहे. प्राणहानी व वित्तहानी किती झाली याचे तपशीलवार आकडे या दंगलींच्या अहवालातून उपलब्ध आहेत. अशा दंगलींमुळे राष्ट्राची एकता धोक्यात येते, त्याच्या प्रगतीला खीळ बसते, हे मान्य असूनही आपल्या सामाजिक व राजकीय जीवनातून अशा दंगलीना कायमचे निपटून काढण्यात आपण अपेशी ठरलो आहोत. उलट बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर उफाळलेल्या दंगलीत परस्पर-विद्वेषाचा व हिंसाचाराचा एक नवाच उच्चांक गाठला गेला.

पुढे वाचा

इतर

‘मला कोणी शत्रू नाही ही तुझी बढाई आहे ना !
माझ्या मित्रा ! तुझी ही प्रौढी व्यर्थ आहे..
शूराला साजेशा पद्धतीने जीवनाच्या संघर्षात जे उडी घेतात
त्यांना अनेक शत्रू निर्माण होतातच
तुला जर कुणी शत्रूच नसेल तर….
त्याचा अर्थ एवढाच की तुझ्या हातून
काही घडलेलेच नाही.
कोणाही विश्वासघातक्याच्या पेकाटात
तू लाथ घातली नाहीस.
दुष्टाच्या तावडीतील शिकार तू सोडवून आणली नाहीस.
कोणत्याही अन्यायाचा मुकाबला करण्यास तू धजावलाच नाहीस.
खरं सांगू ? तूं एक भ्याड आहेस भ्याड !

वृत्त आणि विवेक

एन्.टी. रामाराव यांचे लग्न ही मोठीच खबर आहे. राष्ट्रीय आघाडी आणि तेलगू देसम् या राजकीय पक्षांचे अध्यक्ष, आंध्राचे माजी मुख्यमंत्री असे हे बडे प्रस्थ आणि मुख्य म्हणजे त्यांचे (जवळपास ‘अवघे पाऊणशे वयमानं’. असे असताना त्यांनी ३६ वर्षाच्या घटस्फोटिता लक्ष्मी शिवपार्वती या आपल्या चरित्र – लेखिकेशी दुसरे लग्न केले आहे. सदान्कदा भगवे कपडे परिधान करून स्वामी विवेकानंदांची मधून मधून आठवण द्यायला ते विसरत नसत. या प्रौढा- वृद्धविवाहाने त्यांची प्रतिमा आणि निवडणुकीच्या मोसमात मते खेचण्याचे सामर्थ्य यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याची त्यांना जाणीव नसेल असे कोण म्हणेल ?

पुढे वाचा

विवाह संस्था आणि स्त्री

प्रश्न : विवाहसंस्था नष्ट झाली तर मुलांचा प्रश्न निर्माण होईलही; पण स्त्रियांचा तरी विकास होईल का ?

गीता साने: हो, विवाहसंस्था नष्ट झाली तर स्त्रीवरच्या जबाबदाऱ्या कमी होतील आणि विकास होईल. आज बायकांना हे करावसं वाटतं, ते करावस वाटतं, पण जमत नाही. उर्मी एकदा निघून गेली की गेली! हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. माझ्यासारख्या बाईचं सुद्धा मुलं लहान असताना हेच झालं. पण मुलींची जबाबदारी समाजावर व्यवस्थितपणे सोपवून मगच विवाहसंस्था नष्ट करता येईल. दुसरं असं की, बाईला कुणा पुरुषाचं आकर्षण वाटलं की आज समाज तिला धारेवर धरतो.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक,आजचा सुधारक यांस स.न.वि.वि. आपल्या मासिकाच्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात श्री. शांतिलाल मुथ्था ह्यांचा ‘समाजातील मुलींची घटती संख्या: कारणमीमांसा व उपाययोजना’ ह्या शीर्षकाचा लेख व त्यावरील श्री. दिवाकर मोहनी ह्यांचे भाष्य वाचावयास मिळाले. श्री. मुथ्था ह्यांची चिंता सार्थ आहे व त्यांनी केलेली कारणमीमांसा व सुचविलेली उपाययोजनाही बुद्धीला पटणारी आहे. पण श्री. मोहनींनी ह्या संदर्भात व्यक्त केलेले विचार मात्र तर्कसंगत वाटले नाहीत.

मूळ प्रश्नाचा विचार करणे व त्यावर उपाय कोणते करावेत ह्याचा शोध घेणे सोडून, श्री. मोहनी ‘पुरुषांकडून स्त्रियांची होणारी छेडखानी’ ह्या विषयाकडे वळले आहेत.

पुढे वाचा

नागपूरपासून दूर – मागे, मागे

सध्याची पंचायत समिती, ‘राष्ट्रीय विस्तार योजना’ या दुर्बोध नावाने जन्माला आली. चारपाच वर्षांत तिचेच ‘सामूहिक विकास योजना’ असे नामांतर झाले. आणि तिला सध्याचे नामरूप येऊनही आता तीस वर्षे उलटली आहेत. या विकास योजनेत मी उमेदीची सहासात वर्षे घालवलेली. मधूनच जुने सोबती भेटतात. कुणी मोठ्या पदापर्यंत पोचलेले असतात. असेच एकदा जोशी भेटले. मी उत्सुकतेने विचारले, ‘खेड्यांचे चित्र आता पार पालटले असेल नाही ?’ माझा आशावाद पाहून म्हणाले, ‘मेड इन इंडिया वाचली का ? आपल्या अकोल्याच्या पुरुषोत्तम बोरकरची ती कादंबरी वाचा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.’

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ८)

उद्गमन (Induction)

सहाव्या प्रकरणात आपण विधानांचे दोन प्रमुख प्रकार पाहिले. ते म्हणजे (१) विश्लेषक- अवश्य-प्रागनुभविक विधाने आणि (२) संश्लेषक आयत्त-आनुभविक विधाने. त्याआधी तिसऱ्या प्रकरणात आपण निगामी आणि उद्गामी अनुमानप्रकारांची ओळख करून घेतली होती. आता या प्रकरणात विधानांच्या वरील विभाजनाच्या साह्याने निगामी व उद्गामी अनुमानप्रकारांचे स्वरूप अधिक विस्ताराने समजाऊन घेऊ.

‘उद्गमन’ हा शब्द काहीसा शिथिलपणे वापरला जातो. त्याच्या प्रमुख अर्थी त्याने निगमनाच्या पूर्ण विरुद्ध प्रकारच्या अनुमानाचा बोध होतो. निगमन हा अनुमानप्रकार पूर्णपणे निर्णायक आहे, हे आपण पाहिले आहे. त्याला ‘demonstrative inference’ म्हणजे सिद्धिकारक (सिद्धिक्षम) अनुमान असेही म्हणतात, कारण त्याची साधके जर सत्य असतील तर वैध निगमनाचा निष्कर्ष अवश्यपणे सत्यच असतो.

पुढे वाचा

फलज्योतिषावर शोधज्योत

फलज्योतिष हे एक शास्त्र आहे असा अनेक लोकांचा विश्वास असतो. त्याचे उदाहरण म्हणून कधी काळी कोणीतरी सांगितलेले खरे ठरलेले भाकित लोक सांगतात. पण त्यानेच किंवा इतरांनी सांगितलेली शेकडो चुकीची ठरलेली भाकिते ते सोइस्करपणे विसरून जातात. वास्तविक खरेपणा खोटेपणा ठरविण्यासाठी खरी आणि खोटी दोन्ही भाकिते लक्षात घेतली पाहिजेत.

फलज्योतिष सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत. पाश्चात्य, भारतीय, चिनी इ. त्यांत एकवाक्यता नाही. भारतीय पद्धतीचा विचार केला तरी तिच्यातील सायन-निरयन वाद, दशांचे प्रकार, नक्षत्रपुंज आणि त्यांचे प्रदेश – या व अशा अनेक तपशिलातील विरोधाभास श्री रिसबूड यांनी १९९१ मध्ये लिहिलेल्या फलज्योतिष काय आहे व काय नाही या पुस्तकामध्ये अतिशय सुबोध रीतीने स्पष्ट करून दाखविला आहे.

पुढे वाचा