विवेकवाद – ४

विज्ञान, अध्यात्म आणि साक्षात्कार
गेल्या दोन लेखांकांत आपण पाहिले की ईश्वरारितत्वसाधक कोणताही युक्तिवाद निर्णायक नाही. त्यांपैकी काही निराधार गोष्टी गृहीत धरून त्यावर आधारलेले आहेत, तर काहींत स्वच्छ व्याघात आहे असे आपल्याला आढळून आले. पण एक युक्तिवाद अजून तपासायचा राहिला आहे, आणि त्यावर ईश्वरवाद्यांची बरीच भिस्त आहे. हा युक्तिवाद म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होतो या दाव्यावर आधारलेला. त्याकडे आता वळू.

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात असे म्हटले होते की कोणत्याही विधानावर विश्वास ठेवायचा (किंवा ते स्वीकारायचे) तर तो त्या विधानाच्या पुराव्यावर आणि त्या पुराव्याच्या प्रमाणात ठेवावा; आणि पुरावा आपल्याला तपासता येत नसेल, तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रमाण मानावे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ४)

लिंगपूजा, तापसवाद आणि पाप
जेव्हा पितृत्वाचा शोध लागला त्या क्षणापासून धर्माला लैंगिक व्यवहारात मोठा रस उत्पन्न झाला. हे अपेक्षितच होते; कारण जे जे गूढ आहे आणि महत्त्वाचे आहे अशा सर्व गोष्टींत धर्म रस घेतो. कृषीवलावस्था आणि मेंढपाळ अवस्था यांच्या आरंभीच्या काळात राहणाऱ्या मनुष्यांच्या दृष्टीने सुपीकपणा, मग तो जमिनीचा असो, गुराढोरांचा असो, किंवा स्त्रियांचा असो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. शेती नेहमीच पिकत नसे, आणि तसेच मैथुनातून अपत्यजन्मही नेहमी होत नसे. म्हणून धर्म आणि जादू (अभिचार) यांना इष्टफलप्राप्तीसाठी आवाहन केले जाई. सहानुभवात्मक अभिचाराच्या (sympathetic magic) तत्कालीन समजुतीनुसार लोक असे मानीत की मानवांतील बहुप्रसवत्व वाढले की जमिनीचेही वाढेल; आणि तसेच मानवांतील बहुप्रसवत्वाची आदिम समाजात मोठी मागणी असल्यामुळे तिच्याही वृद्ध्यर्थ विविध धार्मिक आणि अभिचारात्मक कर्मकांड सुरू झाले.

पुढे वाचा

यशोदाबाई आगरकर

यशोदाबाई आगरकर ह्या थोर समाजसुधारक कैलासवासी गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्नी होत. आगरकर बी.ए. च्या वर्गात असताना कऱ्हाडजवाज गावातील मोरभट फडके यांची कन्या अंधुताई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर तिचे नांव यशोदाबाई ठेवण्यात आले. या विवाहाच्या वेळी यशोदाबाईचे वय दहा वर्षांचे होते. आगरकर पुण्याला शिकत असल्यामुळे आणि यशोदाबाईचे वय लहान असल्यामुळे त्या या काळात माहेरी म्हणजे उंब्रजला रहात असत. आगरकर सुट्टीत आले की, मग त्या टेंभूला सासरी जात.

सन १८८० मध्ये आगरकर एम.ए. झाले आणि वर्षभरात ते पुण्याला न्यू इंग्लिश स्कूल व केसरी या कार्यांत गुंतल्यावर त्यांनी पुण्याला संसार थाटला.

पुढे वाचा

वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया

वा. वि. भट
संपादक ‘संग्रहालय’
अभिनव प्रकाशन
अंक मिळाला. लगेच वाचूनही काढला. त्यातील मनुताईंच्या परिचयाचा श्री. कुळकर्णी यांनी लिहिलेला लेख खूप आवडला. डॉ. भोळे यांचा सोव्हिएट रशिया व पूर्व युरोपातील घडामोडी संबंधीचा लेखही विचार प्रवर्तक आहे. श्री. दिवाकर मोहनी यांचे पत्र अत्यंत मार्मिक वाटले.

श्रीमती दुर्गा भागवत
अंक वाचनीय व उद्बोधकही आहे. बरट्रॅंड रसेल रसेलच्या पुस्तकाचा अनुवाद या मासिकाचे वैशिष्ट्य ठरावे.आपल्या कार्यात आपल्याला यश मिळो हीच इच्छा.

ना. ग. गोरे
अंक मिळाला. धन्यवाद, लेख आवडले.

श्री. वि. भावे (आय्. ए. एस्.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री दिवाकर मोहनींचे पत्रांना उत्तर

संपादक,
नवा सुधारक यांस,
सप्रेम नमस्कार

आपल्या ३ मे च्या अंकात माझ्या पत्राला उत्तरादाखल आलेली तीन पत्रे प्रकाशित झाली आहेत. डॉ. न. ब. पाटील, प्रा. म. ना. लोही, प्राचार्य ना. वि. करबेलकर, श्री. राम वैद्य आणि डॉ. विजय काकडे आदींनी मोठी पत्रोत्तरे पाठविली आहेत. त्याशिवाय श्री. वसंत कानेटकर, श्री. यदुनाथ थत्ते इत्यादींनीही आपापल्या प्रतिक्रिया कळविल्या आहेत. ती पत्रे आपण माझ्याकडे पाठविल्याबद्दल मी आपला आभारी आहे. पहिली गोष्ट अशी की कोठल्याही पूर्वग्रहाशिवाय ह्या प्रश्नाकडे बघितले जावे ह्यासाठीच मी माझे पत्र एखाद्या धर्माच्या कैवारी वृत्तपत्राला न लिहिता आपणांस लिहिले आहे.

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

हिंदु धर्मात बरीच व्यंगे आहेत म्हणून यहुदी, महंमदी, ख्रिस्ती किंवा अशाच प्रकारच्या दुसर्‍या एखाद्या धर्माचा अंगीकार करणार्‍या मनुष्यास विचारी ही संज्ञा सहसा देता येणार नाही. तसेच, आमचे काहीं रीतीरिवाज मूर्खपणाचे आहेत, म्हणून प्रत्येक गोष्टींत परकीयांचे अनुकरण करणे हेही कोणत्याही दृष्टीने त्याचे त्याला किंवा इतरांला परिणामी विशेष सुखावह होण्याचा संभव नाही, असे आम्हांस वाटते. उदाहरणार्थ, कित्येक प्रसंगी धोतरे नेसणे सोईस्कर नाही म्हणून युरोपियन लोकांप्रमाणे दिवसभर पाटलोण घालून बसणे, किंवा ते लोक विशेष कामाकडे कागदांचा उपयोग करतात म्हणून आपणही तसे करणे हे केवढे मूर्खपण आहे बरें?

पुढे वाचा

स्त्रीचे दास्य आणि स्त्रीमुक्तीची वाटचाल

स्त्रीचे समाजात नेमके कोणते स्थान आहे? एक व्यक्ती म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून तिचा समाजात दर्जा काय आहे? या प्रश्नाचा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल की सामाजिक व आर्थिक स्थित्यंतराशी आणि प्रस्थापित मूल्यव्यवस्थेच्या परिवर्तनाशी तो निगडीत आहे.

प्रत्यक्ष समाजव्यवस्थेमधील सहभाग, सहभागाचे स्वरूप, स्वतःच्या भोवताली घडणाच्या घटना संबंधी निर्णय घेण्याची क्षमता व निर्णयाचे क्षेत्र यांवर स्त्रीचे स्थान अवलंबून आहे. ऐतिहासिक स्वरूपाचा आढावा घेतल्यास आपल्या समाजातील स्त्रीचे स्थान कसे होते व ते कसकसे बदलत गेले यावर प्रकाश पडू शकेल.

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्त्रीचे समाजातील स्थान पुरुषाच्या बरोबरीचे होते असे दिसते.

पुढे वाचा

दहशतवाद आणि धर्म

स्वातंत्र्योत्तर भारताला ज्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले त्यातील दहशतवादाची समस्या ही अत्यंत महत्त्वाची मानावी लागते. सद्यःपरिस्थितीतील दहशतवादाचे स्वरूप व व्याप्ती देशाच्या एकतेला आणि अखंडतेलाच आव्हान देऊ लागली आहे. निरपराध व्यक्तींचे शिरकाण हे ह्या समस्येचे एक प्रभावी अंग आहे. ह्यामुळेच दहशतवादाच्या समस्येचे विश्लेषण करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच दहशतवादी कृत्यांशिवाय कोणत्याही समस्येकडे शासनाचे लक्ष जात नाही, म्हणून अशी कृत्ये करावी लागतात, असाही समज बळावत चालला आहे. दहशतवादाच्या मागे नेहमीच राजकीय, आर्थिक कारणे असतात व म्हणून आर्थिक संपन्नता हेच दहशतवादाला खरे उत्तर आहे असे मतही व्यक्त केले जाते.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ३)

पितृसत्ताक व्यवस्था
पितृत्व या शरीरशास्त्रीय गोष्टीची ओळख पटल्याबरोबर पितृत्वाच्या भावनेत एक नवीन घटक प्रविष्ट झाला आणि त्यामुळे जवळजवळ सगळीकडे पितृसत्ताक समाजांची निर्मिती घडून आली. अपत्य हे आपले ‘बीज’ आहे हे ओळखल्याबरोबर पित्याच्या अपत्यविषयक भावकंदाला (sentiment) दोन गोष्टींमुळे नवे बळ लाभते – अधिकाराची आवड आणि मृत्यूनंतर जीवनाची इच्छा. आपल्या वंशजांचे पराक्रम हे एका अर्थाने आपलेच पराक्रम आहेत आणि त्यांचे जीवन आपल्याच जीवनाचा विस्तार आहे; व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेचा तिच्या मृत्यूबरोबरच अंत होत नाही आणि वंशजांच्या चरित्रांतून तिचा हवा तितका विस्तार होऊ शकतो या कल्पना स्वाभाविक होत्या.

पुढे वाचा

विवेकवाद – ३

कर्मसिद्धांत, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म या लेखमालेतील दुसर्‍या लेखांकाच्या शेवटी आपण ‘कर्मसिद्धांत’ नावाच्या एका प्रसिद्ध उपपत्तीचा उल्लेख केला. तेथे आपण ईश्वराच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या स्वरूपाचा विचार करीत होतो, आणि आपण असा युक्तिवाद केला होता की जगात जे प्रचंड अशिव आढळते – म्हणजे भयानक दुःख, क्रौर्य, अज्ञान, दुष्टाचार, रोगराई इत्यादि जे आढळते, ते सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि सर्वथासाधु अशा ईश्वराच्या अस्तित्वाला बाधक आहे. या युक्तिवादाला दिल्या गेलेल्या अनेक उत्तरांचे आपण परीक्षण केले आणि शेवटी कर्मसिद्धांतापाशी येऊन ठेपलो. कर्मसिद्धांतानुसार जगातील अशिवाचे कारण आपण मानवच आहोत आणि त्याकरिता ईश्वराला जबाबदार धरणे चूक आहे.

पुढे वाचा