विवेकवाद – ६

सत्य, सत् आणि साधु
या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण सत्य म्हणजे काय? या प्रश्नाचा विचार केला. आपण असे म्हणालो की ‘सत्य’ हे विशेषण फक्त विधानांनाच लागू पडू शकते. विधान म्हणजे स्थूलमानाने बोलायचे तर एखाद्या गोष्टीचे वर्णन. वर्णन हे यथार्थ किंवा अयथार्थ असते; म्हणजे वर्य वस्तूचे स्वरूप जसे असेल तसे विधानात सांगितलेले असते, किंवा ते जसे नाही तसे सांगितलेले असते. जेव्हा विधानातील वर्णन यथार्थ असते तेव्हा ते सत्य असते, आणि अयथार्थ असते तेव्हा ते असत्य असते. उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान सत्य आहे, कारण त्यात पृथ्वीच्या आकाराचे वर्णन तो जसा आहे तसे केले आहे; उलट ‘पृथ्वी सपाट आहे हे विधान असत्य आहे कारण त्यात पृथ्वीचा आकार जसा नाही तसा असल्याचे सांगितले आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

[ पुढे दिलेले पत्र आम्ही छापणार नव्हतो. ते क्रोधाच्या भरात लिहिलेले असून त्यातील भाषा असभ्य आणि अभिरुचीहीन आहे, आणि ते वाचून आमच्या वाचकांना क्लेशच होतील याची जाणीव आम्हाला आहे. त्या पत्रात फक्त शिवीगाळ आहे, युक्तिवादाचा मागमूस नाही हे वाचकांच्या लक्षात येईलच. पण तरीसुद्धा ते पत्र छापायचे आम्ही ठरविले यांची दोन कारणे आहेत. एकतर तुम्ही हे पत्र छापणार नाहीच’ असे म्हणून लेखकाने आम्हाला एक प्रकारे आव्हानच दिले होते; ते आम्ही स्वीकारू शकतो हे त्याला दाखवायचे होते. आणि दुसरे म्हणजे मनुष्य सात्त्विक संतापाचा बुरखा पांघरून कोणत्या पातळीवर उतरू शकतो हे आम्हाला वाचकांना दाखवायचे होते, एवढेच नव्हे तर दुष्ट हेतूने डिवचले गेल्यानंतरही त्याला किती सभ्य आणि संयमी भाषेत उत्तर देता येते याचे प्रात्यक्षिकही लेखकाला दाखवायचे होते.

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

खरे म्हटले तर चंद्रगुप्तापूर्वीच आमचा राष्ट्रचंद्र मावळला होता. असे म्हणण्यास हरकत नाही. दोन किंवा अडीच हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारच्या राज्यविचारांनी, धर्मविचारांनी व सामाजिक विचारांनी आम्ही निगडीत झालो होतो, व त्यावेळी ज्या आचारांचे आम्ही गुलाम होतो तेच विचार आणि तेच आचार अद्यापि आम्हास बहुधा आपल्या कह्यात ठेवीत नाही काय? कोणतीही सचेतन वस्तू बहुधा दोन हजार वर्षे टिकत नाही. पण टिकलीच तर तीत जमीनआस्मानाचे अंतर झाल्याखेरीज राहावयाचे नाही. पण आमच्या शोचनीय राष्ट्रस्थितीत गेल्या दोन हजार वर्षांत म्हणण्यासारखा फेरफार झाला आहे, असे बहुधा कोणाही विचारी पुरुपास म्हणता येणार नाही!

पुढे वाचा

रक्षण की राखण ?

मनूचा पुढील श्लोक प्रसिद्ध आहेः
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने ।
रक्षन्ति स्थविर पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ।।

या श्लोकातील पहिले तीन चरण स्त्रीचे रक्षण करण्याचे काम अनुक्रमे तिचा पिता, तिचा पती आणि तिचा पुत्र यांच्याकडे सोपवितात. हे नैसर्गिक आणि न्याय्यही दिसते. स्त्री पुरुषापेक्षा शारीरिक सामर्थ्याने दुर्बल आहे, आणि तसेच तिच्यावर पुरुषाकडून बलात्कार होऊ शकतो, त्यामुळे तिला पुरुषाच्या मदतीची गरज आहे, असे मानणे रास्त आहे. त्यामुळे पहिल्या तीन चरणांबद्दल आक्षेप घेण्यासारखे काही नाही असे म्हणता येईल. परंतु या विचाराशी चौथ्या चरणातील ‘स्त्री स्वातंत्र्याला पात्र नाही’ हा विचार विसंगत दिसतो.

पुढे वाचा

विवेकवाद – ५

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात ‘आपण कशावर विश्वास ठेवावा?’ अरा प्रश्न आपण विचारला होता, आणि त्याचे उत्तर ‘अर्थात् सत्य विधानांवर’ असे एका वाक्यात दिले होते. परंतु यावर एक आक्षेप असा घेतला जाऊ शकेल की ‘सत्य विधानावर विश्वास ठेवावा’ हे उत्तर पूर्णपणे बरोबर नाही. त्यावर विश्वास ठेवणे नेहमीच इष्ट असेल असे नाही. कित्येकदा सत्यदर्शन अनिष्टही असू शकते. उदा. एखाद्या मनुष्याला जर गंभीर आजार झाला असेल तर पुष्कळदा रोग्याला डॉक्टर ते सांगत नाही. रोगी कदाचित् मानसिक धक्क्याने आणि निराशेने हातपाय गाळील, आणि रोगाला प्रतिकार करण्याची त्याची शक्तीच नाहीशी होऊ शकेल.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ५)

ख्रिस्ती नीती
‘विवाहाची मुळे कुटुंबात रुजलेली आहेत, कुटुंबाची विवाहात नाहीत’ असे वेस्टरमार्क म्हणतो. हे मत ख्रिस्तपूर्व काळात उघडे सत्य म्हणून स्वीकारले गेले असते; परंतु ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर ते एक महत्त्वाचे विधान झाले असृन त्याचे प्रतिपादन त्यावर जोर देऊन करावे लागते. ख्रिस्ती धमनि, आणि विशेषतः सेंट पॉलने, विवाहाविषयी एक अगदी नवीन कल्पना मांडली: ती अशी की विवाह प्राधान्याने अपत्योत्पादनाकरिता नसून तो अविवाहितांमधील लैंगिक संबंधाच्या (fornication) पापाचे निवारण करण्यासाठी आहे.
सेंट पॉलची विवाहविषयक मते कॉरिंथमधील रहिवाश्यांना त्याने लिहिलेल्या पहिल्या पत्रात पूर्ण स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत.

पुढे वाचा

धर्म की धर्मापलीकडे?

तुम्हाला धर्म हवा की नको? ह्या प्रश्नाचे एका शब्दात नेमके उत्तर द्या, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. धर्म की धर्मापलीकडे? हा प्रश्नही काहीसा याच स्वरूपाचा आहे. समाजामध्ये ‘धर्म हवा’ असे म्हणणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात असतो, तर ‘धर्म नको’ असे म्हणून या वर्गाला विरोध करणारा दुसरा एक छोटा वर्गही आढळतो. या दोन वर्गांमध्ये आढळणार्‍या विरोधाचे स्वरूप समजावून घेण्यासाठी या विरोधाचे ‘शाब्दिक’ अणि ‘वास्तव’ असे दोन प्रकार ध्यानात घेतले पाहिजेत.

शाब्दिक विरोध
शाब्दिक विरोधाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असते. ‘धर्म’ या संज्ञेचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे, याविषयी प्रत्येक व्यक्तीच्या धारणा वेगवेगळ्या असतात.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

संपादक, नवा सुधारक यांस
स. न. वि.वि

‘नवा सुधारक’ (जून) मिळाला.

तुम्ही दर महिन्याला वैचारिक खाद्य चांगले पुरवताहात याबद्दल धन्यवाद. रसेलची (विवाह आणि नीती) ही अनुवादित लेखमाला व श्रीमती पांढरीपांडे यांचा स्त्री दास्य याबद्दलचा लेख विचारप्रवर्तक आहेत. त्या अनुषंगाने मला दोन प्रश्न उपस्थित करायचे आहे. त्याबद्दल ‘ तयार उत्तरे’ नको आहेत. पण विचारमंथन हवे आहे.

“पुरुष हा बहुस्त्रीक (पॉलीगामस्) आहे व प्रकृतितः स्त्री तशी नाही ” हे विधान शास्त्रीयदृष्ट्या बरोबर आहे का? की त्यात पितृसत्ताक कुटुंबनीतीचेच दर्शन आहे? स्त्री पुरुषांतील प्रीती आणि त्या प्रीतीतील ‘एकनिष्ठा’ सहजात आहे की ‘अक्वायर्ड’ आणि ‘एन्व्हायरनमेंटल’ आहे ?

पुढे वाचा

आगरकर म्हणतात –

सोलापूरकर अपरिचिता’चा पहिला प्रश्न असा आहे की ‘समाजात एकंदर सुधारणा हव्यात तरी कोणत्या?’ सुधारकाला असा प्रश्न करणे म्हणजे काय झाले असता तू ‘सुधारक या पदवीचा त्याग करण्यास तयार होशील, असे त्यात विचारण्यासारखेच आहे! यावर त्याचे उत्तर एवढेच आहे की, बालविवाहाचे नाव नाहीसे झाले, प्रत्येक स्त्रीस शिक्षण मिळू लागले, विधवावपन अगदी बंद झाले, स्त्रीपुनर्विवाह सर्वत्र रूढ झाला, व संमतिवयाच्या कायद्यासारखे अनेक कायदे पसार झाले, तरी त्याची तृप्ती होण्याचा संभव नाही! त्याच्या सुधारणावुभुक्षेस मर्यादाच नाही असे म्हटले तरी चालेल! ज्याप्रमाणे समुद्राला नद्यांचा, लोभ्याला द्रव्याचा, कर्णाला दानाचा व धमला शांतीचा कंटाळा कधी येत नाही किंवा आला नाही, त्याप्रमाणे खच्या सुधारकाला सुधारणेचा वीट येण्याचा कधीच संभव नाही….

पुढे वाचा

विदर्भातील पुरोगामी विदुषी – कै. प्रा. मनू गंगाधर नातू

माझे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील गुरू डॉ. भालचंद्र फडके मला १९६६ मध्ये अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रो. श्रीमती म. गं. नातू यांच्याकडे घेऊन गेले. डॉ. भालचंद्र फडके यांनी माझी हमी घेतल्यामुळे बाईंनी मला पीएच्. डी. करिता मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. मी विदर्भातील नोकरी सोडून पैठणला आलो. १९७६ मध्ये मला पीएच्. डी. मिळाली. बाईंशी या निमित्ताने आलेला ऋणानुबंध पुढेही कायम राहिला. १९४६ पासून १९७७ पर्यंत बाई विदर्भ महाविद्यालयात होत्या. निवृत्त झाल्यानंतर त्या नागपूर येथे स्थायिक झाल्या. दि. ३ एप्रिल १९८८ रोजी बाई नागपूर येथे निधन पावल्या.

पुढे वाचा