नास्तिकवाद आणि स्त्रिया

सत्यासत्यता, अज्ञान व अपसमज यांच्या पलीकडे जाणारी नास्तिकता हवी आहे

नवी दिल्ली: फर्नांड डी व्हॅरेन्स, संयुक्त राष्ट्रांचे अल्पसंख्याकांच्या समस्यांवरील विशेष संवाददाते, यांनी भारतातील “बिघडत चाललेल्या” (मानवी) अधिकारांच्या बिघाडाचे “मोठ्या प्रमाणात झालेला, पद्धतशीर आणि धोकादायक बिघाड” असे वर्णन केले आहे.

त्यांनी मणिपूरचा दाखला देऊन म्हटले आहे, “जिचे भयानक अत्याचारांमध्ये रूपांतर होऊ शकेल अशा मुस्लिम आणि इतर धार्मिक ’इतरेजनांना’ व्यापक प्रमाणावर बळीचा बकरा बनवण्याच्या आणि त्यांच्या अमानवीकरणाच्या प्रक्रियेचे हे लक्षण आहे.” “२०१४ आणि २०१८ च्या दरम्यान अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये ७८६% वाढ झाल्याचे दिसून आले” अशा एका अभ्यासाचा त्यांनी हवाला दिला.

पुढे वाचा

पुरोगामी महाराष्ट्र : हिंदुत्वाची नवी प्रयोगशाळा

माझा एक किरायेदार मॉं निर्मलादेवीचा भक्त होता. तो चंदीगढ येथून नागपूरमध्ये माझ्याकडे राहण्यास आल्यावर सहजयोग आध्यामिक लोकांच्या संपर्कात आला. त्याने मला सहजयोगाद्वारे मनुष्याची दु:खे कशी दूर होतात, मनाला कसा आनंद मिळतो, यावरील चित्रपट पाहण्यासाठी मोफत तिकीट दिले होते. मी आणि माझी मोठी मुलगी थिएटरमध्ये तो चित्रपट पाहण्यास गेलो. त्या चित्रपटातील कथानक आणि दृष्ये पाहून आम्हा दोघांवर फारसा परिणाम झाला नाही. मी आधीच बौद्ध धर्मातील सहजयान पंथाबद्दल वाचलेले होते. त्यामुळे सहजयोगावरील चित्रपट पाहणे सुरू असताना मेंदूत बौद्धांच्या सहजयान पंथातील गोष्टीशी तुलना सुरू होती.

पुढे वाचा

नास्तिकांची मांदियाळी 

नास्तिक्य हा सहसा लोकांच्या फार आवडीचा नसलेला किंवा दुर्लक्षित केलेला विषय. मग नास्तिक म्हणजे स्वतःला जास्त शहाणे समजणारे, दीड शहाणे, आगाऊ, इथपासून ते नास्तिकता म्हणजे टोकाची भूमिका घेणे इथपर्यंत बिरुदांचा वर्षाव केलेला असतो. आणि हे सगळं करताना नास्तिक, नास्तिक्य, बुद्धिप्रामाण्य, विवेक म्हणजे नेमकं काय, हे येतं कुठून, भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात नास्तिकांची परंपरा किती मोठी आहे, ह्या सगळ्याचा विचार तर सोडाच पण कित्येकदा गंधही नसतो. तेव्हा नास्तिक परिषद म्हटल्यावर हे नास्तिक एकत्र येऊन करतात काय, ह्यांना परिषद घ्यायची काय गरज पडते, असे प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

पुढे वाचा

किर्लोस्कर मासिक, अंधश्रद्धा निर्मूलनाची एक सामाजिक चळवळ

महाराष्ट्रातील औंध संस्थानात लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १९१० साली पहिला उद्योगसमहू काढला. ह्या किर्लोस्कर उद्योगसमहूाचे ‘किर्लोस्कर खबर’ हे मुखपत्र हे त्या काळचे एक नवमतवादी, पुढारलेले मासिक होते. १९२० ऑगस्टला त्याचा पहिला अंक निघाला. 

आपल्या समाजात ज्या अनिष्ट कल्पना व रूढी बोकाळल्या आहेत त्यांचे स्वरूप उघडे करून त्यांना आळा घालण्याचे प्रयत्न हे मासिक करील असे आश्वासन शंकरराव किर्लोस्कर यांनी या अंकात दिले. सामाजिक सुधारणा, जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये वैचारिक पातळीवर किर्लोस्कर मासिकातून तर प्रत्यक्षात किर्लोस्करवाडीमध्ये जोपासली जातच होती. र.धों. कर्वे, महादेवशास्त्री दिवेकर, वि.दा.

पुढे वाचा

नास्तिकांचे अध्यात्म

सध्या इये मराठीचिये देशी नास्तिक मेळाव्यांचा हंगाम आहे. आयोजनातील वीरश्री पहाता लवकरच नास्तिकांसाठी आरक्षणाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, सावधान!!! त्याचवेळी हे ‘असले’ मेळावे घेऊन काय साध्य होणार? ह्या प्रश्नावर घमासान चर्चा झडत आहेत. एकुणांतच नास्तिकांत हाणामाऱ्या फार. सगळेच शहाणे, तेंव्हा असे होणारच. त्यात सर्व नास्तिकही समान नाहीत. त्यातही देव नाहीच अशी खात्री असलेले/ल्या, नुसती शंका असणारे/ऱ्या, निसर्गपूजक असे प्रकार आहेत. त्यामुळे इथे जरी मी ‘नास्तिक असे करतात’ वगैरे विधानार्थी भाषा वापरली असली तरी मी आपला माझ्यापुरता बोलतो आहे. ‘आपुलाचि वाद आपणांसी’ अशा प्रकारचा हा संवाद आहे.

पुढे वाचा

नास्तिकता कशासाठी?

आस्तिकता आणि नास्तिकता ह्या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आपल्या आजूबाजूच्या समाजातील माणसे काही प्रमाणात आस्तिक तर काही प्रमाणात नास्तिक असतात. पण उघडपणे आपण आस्तिक आहोत असे सांगणाऱ्यांपेक्षा नास्तिक आहोत असे सांगणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. ज्यांची धर्मग्रंथ, श्रुती-स्मृती, मंत्रसंहिता, उपनिषदे ह्यांवर परमश्रद्धा आहे आणि ज्यांना वेदाच्या दिव्यतेबाबत आस्था आहे अशांना आस्तिक म्हणतात. तर ज्यांचा वेदावर विश्वास नाही, जे वैदिक सिद्धांताबाबत तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची चिकित्सा करतात ते नास्तिक आहेत. मात्र नास्तिकता म्हणजे एवढेच असे नव्हे. नास्तिकता म्हणजे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टिकोन होय.

पुढे वाचा

नास्ति(ऐ)क्याची गोची!

नास्तिक म्हणून काहीही लिहिताना दहा वेळा विचार करावा लागतो. प्रथम “लिहायची गरज आहे का? सगळे तेच तेच तर लिहितात!” ही स्वतःलाच बजावणी! घरच्यांना सांगितल्यावर “तुला काय करायचे ते उद्द्योग कर बाहेर, आम्हांला नको सांगू, तुमच्या पापात आम्ही सहभागी नाही” अशी आपण वाल्मिकी होण्याची कोणतीही शक्यता नसतानाही वाल्या-कोळ्यास कुटुंबाकडून मिळालेली सणसणीत प्रतिक्रिया आपणास देतील का? तरीही मनाचा हिय्या करून लेख लिहिल्यावर तो “छापणाऱ्याला आवडेल का आणि लोक तो वाचतील का? अश्या असंख्य प्रश्नांना पार करून मगच हा लेखरूपी गर्भ आकार घेऊ लागतो!

पुढे वाचा

आरोग्याविषयीच्या अंधश्रद्धा व उपचार

आपले आरोग्य चांगले असावे असे कोणाला वाटत नाही? मला शारीरिक व्याधी जडू नये, मला कोणताही मानसिक आजार होऊ नये ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र हे होऊ नये यासाठी जी काळजी घ्यावी लागते त्यासाठी मात्र कोणाचीच तयारी नसते. कारण ही तयारी ठेवायची तर स्वतःला खूप बदलावे लागते. आरोग्याबाबतच्या अंधश्रद्धेचेही असेच आहे. आरोग्य तर चांगले पाहिजे पण त्याच्याशी संबंधित अंधश्रद्धा सोडायच्या नाहीत, तर हे जमणार कसे? यासाठी आरोग्य आणि अंधश्रद्धा यांचा काय संबंध आहे हे आपण आता समजून घेऊया.

आरोग्याशी संबंधित अनेक अंधश्रद्धा आहेत, ज्या निखालसपणे अज्ञानावर आधारित आहेत.

पुढे वाचा

शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार

काही महिन्यांपूर्वी एका जीवश्चकंठश्च मित्राला अखेरचा निरोप देण्याचा दुर्दैवी अनुभव घेतला. त्यावेळी मनात आलेले विचार अस्वस्थ करून गेले. ते समविचारी बुद्धिमंतांसमोर ठेवण्यासाठी हा लेखनप्रपंच.

माझा मित्र अत्यंत श्रद्धाळू, देवभक्त आणि सर्व कर्मकांडांवर ठाम विश्वास ठेवणारा होता. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार पारंपरिक पद्धतीने होणार याविषयी मनात काही संदेह नव्हता. तरीही तो सर्व प्रकार पाहून गलबलून आले. मित्राच्या जाण्याचे दुःख बाजूला राहिले. त्याच्या पार्थिव देहाची विटंबना चालू होती आणि विधींच्या नावाखाली त्याच्या सुपुत्राकडून जे काही प्रकार करून घेतले गेले, ते पाहून उद्वेग वाटला. काही काळापूर्वी आद्य सुधारक आगरकरांचा ‘शहाण्यांचा मूर्खपणा अथवा आमचे प्रेतसंस्कार’ या शीर्षकाचा एक निबंध वाचल्याचे आठवले आणि गेल्या दीड शतकात आपल्या धर्मात आणि संस्कृतीत किती फरक झाला ते पाहाण्याची इच्छा झाली आणि तो लेख पुन्हा एकदा वाचला.

पुढे वाचा

विवेकवाद आणि नास्तिकता

आपण दररोजच्या व्यवहारात नास्तिकता आणि विवेक यांचा सर्रास वापर करतो. कोणत्याही गोष्टीबाबत सारासार विचार करण्याच्या वृत्तीला लोकभाषेत विवेक करणे असे म्हटल्या जाते. थोडक्यात, कोणत्याही गोष्टीची योग्यायोग्यता ठरविताना किंवा विशिष्ट कृती करताना विवेक बाळगला पाहिजे, असे नेहमी आपल्या कानावर येते. नास्तिकता या संज्ञेबाबत ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणाऱ्याला लोक नास्तिक म्हणतात आणि ते बरेचसे बरोबरही आहे. परंतु या शब्दांचे नेमके अर्थ आणि त्यांचा इतिहास काय आहे, याचा सामान्य माणूस फारसा विचार करीत नाही. किंवा तसा विचार करून या शब्दांचा वापर करीत नाही. तसेच या दोन संकल्पनांचा परस्परात काय सबंध आहे, याचाही बारकाईने विचार करण्याचे कारण कोणाला वाटत नाही.

पुढे वाचा