मासिक संग्रह: डिसेंबर, १९९०

तर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही!

तर्कापलीकडील जे पारलौकिकादि विषय आपल्या इकडे मानले आहेत, त्यांसंबंधीदेखील माझे तरी असे मत आहे की तर्काशिवाय दुसरे एखादे ज्ञानसाधन – वेद, श्रद्धा, सहृदयत्व, intuition, योगमार्गातील समाधी वगैरे वगैरेंपैकी एखादे ज्ञानसाधन – असले तर ते मानावे, पण एवढे लक्षात ठेवावे की या साधनाने होणारे ज्ञान आणि तर्काने होणारे ज्ञान यांची एकवाक्यता केल्याशिवाय ते ज्ञान खरे व टिकाऊ समाधान देऊ शकणार नाही. दुसरे असे की जोपर्यंत अशी एकवाक्यता झालेली नाही तोपर्यंत तर्काची मुस्कटदाबी करून भागावयाचे नाही.

ह्या विशेषांकाविषयी

नवा सुधारकाचा हा वा.म. जोशी विशेषांक वाचकांच्या हाती देताना आमची मनोवस्था काही संमिश्र अशी झाली आहे. जुलै ९० च्या अंकात आम्ही हा अंक काढणार असल्याचे जाहीर केले तेव्हा विशेषांक प्रकाशित करणे किती दुरापास्त असते याची आम्हाला कल्पना होती. साहित्य वेळेवर मिळणे कठीण असते, हे एक तर खरेच; पण त्याचा आम्हाला फारसा प्रतिकूल अनुभव आला नाही. ज्यांनी लेख देण्याचे मान्य केले त्यांनी बहुतेकांनी वेळेवर लेख पाठविले. पण त्यात दुसरी एक अडचण आली. जुलै अंकात या संकल्पित अंकास कल्पना देताना आम्ही असे म्हणालो होतो की वा.

पुढे वाचा

वामन मल्हारांची सत्यमीमांसा

वा.म. जोशी हे मानवी जीवनाचे एक थोर भाष्यकार म्हणून ओळखले जातात. त्यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटीस’ म्हणण्याचा प्रघात आहे. सॉक्रेटीसप्रमाणेच जीवनाचा अर्थ, त्याचे प्रयोजन आणि साफल्य शोधणे या गोष्टींभोवती त्यांचे तत्त्वचिंतन घोटाळत राहाते. सॉक्रेटिसाच्या संवादांचे भाषांतर ही त्यांची पहिली वाङ्यकृती असावी ही गोष्ट पुरेशी सूचक आहे. जीवनाचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान म्हणून त्यांनी ‘सत्य, सौजन्य आणि सौंदर्य’ या त्रयीचा निरंतर पुरस्कार केलेला आहे. या तत्त्वत्रयीतील ‘सत्य’ ह्या संकल्पनेचा वामनरावांनी केलेला विचार प्रस्तुत निबंधाचा चर्चाविषय आहे.

वा.मं. च्या नीतिशास्त्र-प्रवेश या बृहद्रंथात दहा परिशिष्टे जोडली आहेत. त्यांतील ‘सत्य हे साधन की साध्य?’

पुढे वाचा

वामन मल्हार जोशी

वामन मल्हारांचा जन्म २१ जानेवारी १८८२ रोजी झाला, आणि सुमारे ६१ वर्षाचे कृतार्थ जीवन जगून २० जुलै १९४३ या दिवशी मुंबईला त्यांचा अंत झाला. या घटनेलाही जवळ जवळ अर्धशतक लोटले आहे. वामनरावांची साहित्यातील कामगिरी तशी मोलाचीच. परंतु तत्त्वचिकित्सा – विशेषतः नैतिक तत्त्वज्ञान आणि एकूणच चौफेर तत्त्वविवेचन करणारे ते मराठीतले पहिले आधुनिक लेखक आहेत असे म्हणता येईल. त्यांच्या जीवनाचा पुढील संक्षिप्त आलेख नव्या पिढीतील सामान्य वाचकांना उपयुक्त होईल असे वाटते.

वामन मल्हार तत्त्वज्ञान हा विषय घेऊन १९०६ साली एम.ए. झाले. १९०६ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाला ते गेले असता त्यांची प्रोफेसर विजापूरकरांशी गाठ पडली.

पुढे वाचा

वा.म. जोशी यांची वाङ्मयविषयक भूमिका

वामन मल्हार जोशी यांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी प्रस्तुत लेखात केलेली नाही. त्यांच्या वाड्मयविचाराची अशा प्रकारची मांडणी व चिकित्सा वा.ल. कुळकर्णी व अन्य काही ज्येष्ठ समीक्षकांनी यापूर्वीच केलेली आहे. त्यामुळेच वामन मल्हारांच्या एकूण वाङ्मयविचाराची मांडणी करण्यापेक्षा त्यांचा वाड्मयाकडे पाहण्याचा दृष्टिकोण कोणता आहे, म्हणजेच त्यांची वाड़मयविषयक भूमिका कोणती आहे, ती कोणत्या तत्त्वांवर, सूत्रांवर आधारलेली आहे. तिची वैशिष्टये कोणती आहेत, याची चर्चा -चिकित्सा प्रस्तुत लेखात केली आहे.

वामन मल्हारांनी फार मोठ्या प्रमाणात वाङ्मयविषयक लेखन केले आहे असे दिसत नाही. ‘विचारसौंदर्य’ हा वाङ्मयविषयक लेखसंग्रह व अन्य काही ग्रंथनिविष्ट वा असंगृहीत वाङ्मयविषयक लेख वा परीक्षणे हे त्यांचे या प्रकारचे लेखन आहे.

पुढे वाचा

‘आश्रमहरिणी’च्या निमित्ताने

आश्रमहरिणी ही वामन मल्हार जोशी यांची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. वामनरावांची कलात्मकता, त्यांची वैचारिकता आणि त्यांची प्रागतिक सामाजिक विचारसरणी या कादंबरिकेत प्रभावीपणे प्रगटली आहे. धौम्य-सुलोचना – भस्तिगती यांची त्रिकोणी प्रेमकथा एवढाच या कादंबरीचा आशय नाही, तर विधवापुनर्विवाह आणि अपवादात्मक परिस्थितीत द्विपतिकत्वही समर्थनीय ठरू शकते असे प्रतिपादन करणारी ही कादंबरी आहे.

बालविवाहाचा निषेध आणि विधवा-पुनर्विवाहाचा पुरस्कार एकोणिसाव्या शतकापासूनच सुधारक समाजापुढे मांडत आले होते. तरीसुद्धा अजून विधवा पुनर्विवाहाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी निकोप नव्हती. ही समाजाची परंपराप्रियता वामनरावांनी हेरली. त्याचबरोबर पौराणिक वर्णन – पद्धतीचा चतुराईने वापर करून आश्रमहरिणत पोथीचा आभास त्यांनी निर्माण केला.

पुढे वाचा

सत्यशोधक वामन मल्हार जोशी

वा.म. जोशी ‘सत्यं, शिवं, सुंदरम’ या तत्त्वत्रयीचे निष्ठावंत उपासक आहेत. सत्यनिष्ठेने जीवनाला भरभक्कम आधार मिळतो. नीतिमत्तेने जीवनाला स्वास्थ्य लाभते, आणि सौंदर्याने जीवनात आनंद निर्माण होतो. मानवतेच्या सर्वांगीण हिताकरिता उपकारक अशी ही तत्त्वे आहेत.

वाड्मयकलाविषयक माझी दृष्टी या लेखात वामनराव जीवनवादी दृष्टीने कलेची मीमांसा करतात. ‘कला हे जीवनाचे एक अंग आहे, पण ते जीवनसर्वस्व नाही’ असे म्हणून नंतर ते सांगतात,’जीवनात कला नसेल तर ते बेचव, नीरस, कळाहीन होईल हे खरे, पण सत्य नसेल तर ते लुळे, आंधळे, पांगळे होईल आणि नीती नसेल तर ते रोगट, कुजके, नासके होईल.

पुढे वाचा

वा.म. जोशी यांच्या कादंबरी-वाङ्मयातील सुधारणावाद

वामन मल्हार जोशी यांच्या कादंबरी-वाड्मयाचा चिकित्सक अभ्यास करून त्यात वास्तववादाचा, गांधीवादाचा, समाजवादाचा शोध घेण्याचा प्रयत्न समीक्षकांनी केला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी वा.म.जोशी यांना तात्विक कादंबरीचे जनक ठरविले आणि केवळ ‘तत्त्वप्रधान कादंबरी’ म्हणून रागिणीचा विचार करून चालणार नाही असा अभिप्रार डॉ. भालचंद्र फडके यांनी दिला. परंतु या तत्त्वचर्चेचे मूल्य कोणते या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी बहुतेक समीक्षकांनी टाळली आहे. अपवाद् प्रा. म.ग. नातू यांच्या ‘कै. वा. म. जोशी यांच्या स्त्रीजीवनविषयक चिंतनातील माघार’ या लेखाचा करावा लागेल. ( विवेकाची गोठी, अमेय प्रकाशन) वा. म.

पुढे वाचा

सुशीलेचा देव: एक टिपण

‘सुशीलेचा देव’ ही कादंबरी पुन्हा वाचताना या कादंबरीत सुशीलेच्या आणि इतर पात्रांच्या देवविषयक कल्पनांच्या बाबतीतली क्रांती दाखवणे हा वामन मल्हारांचा या कादंबरीच्या लेखनामागचा हेतू खरोखरीच आहे का असा प्रश्न पडला. सुशीला हे या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. बाळू, सुनंद, रावबा हे तिचे बाळपणापासूनचे. सवंगडी, विनायकराव हे सुशीलेचे वडील आणि गिरिधरराव हे विबाचे वडील. ही कादंबरीतली पात्रे आहेत का? कादंबरी हे एक कल्पित विश्व असते. पात्रे, प्रसंग, घटना यांनी घडलेले, स्वयंपूर्ण असे कल्पित जग. ही कादंबरी वाचताना असे वाटते की हे कल्पित जग नाही.

पुढे वाचा

वा.म. जोशी आजही प्रस्तुत का वाटतात?

मराठी वाङ्येतिहासातील १८८५ ते १९२० या महत्त्वपूर्ण कालखंडात दामन मल्हार जोशी यांचा उदय झाला; इतकेच नव्हे तर कादंबरीकार व कथाकार म्हणून त्यांनी नावलौकिकही मिळवला. हा नावलौकिक दुहेरी स्वरूपाचा होता. एकीकडे वामन मल्हारांनी तत्कालीन बुद्धिजीवी, रसिक वाचकांशी आपल्या कादंबच्यातून — विशेषतः रागिणीतून — संवाद साधला; आणि दुसरीकडे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांसारख्या साक्षेपी समीक्षकाचे तत्काल लक्ष वेधून घेतले. वाचक व समीक्षक यांना एकाच वेळी आवाहन करणे, त्या कालातील सगळ्याच मोठ्या लेखकांना साध्य झाले, असे म्हणता येणार नाही. हे खास वामन मल्हारांचे वैशिष्ट्य आहे.

त्यांचे दुसरे वैशिष्ट्य हे की, त्यांच्या या आवाहनातील सातत्यही वेगवेगळ्या कारणांमुळे टिकून राहिले.

पुढे वाचा