मासिक संग्रह: नोव्हेंबर, २००१

संपादकीय:

आस्तिकांविरुद्धची आघाडी कशासाठी?
श्री. श्यामकान्त कुळकर्णीचे पत्र या अंकात अन्यत्र दिले आहे. श्री. कुळकर्णी ह्यांना पडलेला प्र न अनेकांच्या मनांत येत असावा. देव मानल्यामुळे फायदे पुष्कळ होतात हे मान्य आहे. पण तोटे फायद्यांपेक्षा जास्त आहेत. कारण फायदे व्यक्तींचे होतात. तोटे समाजाचे होतात. पुन्हा माझे आवडते उदाहरण द्यावयाचे झाले तर ते विहिरींचे आहे. जो आपली विहीर सर्वांत खोलपर्यंत खणील त्याचा फायदा. त्याच्या विहिरीला कायम पाणी, कारण तो बाकीच्यांच्या विहिरीमधले पाणी ओढून घेतो. देवाला मानणारा बाकीच्यांचे काय घेतो हा प्र न आता निर्माण होतो.

पुढे वाचा

अग्नि व यज्ञ: वेदकाल आणि विसावे शतक

अग्नीला साक्ष ठेवून सध्याचे भारतवर्षीय त्रैवर्णिक हिंदू लोक विवाह-संपादन करतात. अग्नीची साक्ष नसेल, तर तो विवाह धर्म्य समजला जात नाही. येथे असा प्रश्न उद्भवतो की, अग्नीचा व विवाहाचा संबंध काय? . . .

अशा प्रश्नांना उत्तर द्यावयाचे म्हणजे रानटी आर्यांची पुरातन काळी सामाजिक व भौम स्थिती काय होती ते पाहावे लागते.

ऋषींचे अतिप्राचीन पूर्वज वानरीय पाशवावस्थेत असताना, वानरांप्रमाणेच त्यांनाही झाडे, पर्वतांचे कपरे, गुहा वगैरेंच्या आश्रयाने राहून हिंस्र पशृंपासून, वादळांपासून व थंडीवाऱ्यापासून आपला बचाव मोठ्या संकटाने करावा लागे. . . . हरणे वगैरेंना बचावाकरिता शिंगे, दाढा, टापा वगैरे सहज शस्त्रे तरी असतात, मनुष्यांना तीही नाहीत.

पुढे वाचा

११ सप्टेंबर आणि भारतापुढील पर्याय

११ सप्टेंबर २००१ रोजी दहशतवादाने अमेरिकेत हाहाकार उडवून दिला. अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याचा मानबिंदू असलेले जागतिक व्यापार केंद्र आणि लष्करी सामर्थ्याचे मानबिंदू पेंटॅगॉन, हे दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य बनले. कॅपिटॉल हॉल आणि राष्ट्राध्यक्ष निवास हे राजकीय सामर्थ्याचे मानबिंदू या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. तालिबानच्या आश्रयास असलेला ओसामा बिन लादेन हा या हल्ल्यांमागील प्रमुख सूत्रधार असल्याचे अमेरिकेने घोषित केले. ओसामा, त्याची अल-कायदा ही अतिरेकी संघटना, आणि अफगाणिस्तानातील तालिबान राजवट यांना धडा शिकवण्याचा आता अमेरिकेने निर्धार केला आहे.
अमेरिका, इस्राएल आणि भारत हे आपले प्रमुख शत्रू असल्याचे ओसामाने यापूर्वीच जाहीर केले आहे.

पुढे वाचा

तीच दहशत: लक्ष्य वेगळे

(नोम चोम्स्की |Noam Chomski] हे मॅसॅच्युसेट्स तंत्रविज्ञान संस्थेत भाषाविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. अमेरिकन परराष्ट्रधोरणाचे परखड टीकाकार म्हणून त्यांची कीर्ती आहे. ११ सप्टेंबर २००१ च्या घटना आणि त्यांचे संभाव्य पडसाद याबद्दल बेलग्रेडच्या एका रेडिओवाहिनीने चोम्स्कींची मुलाखत घेतली. तिच्यातील काही उतारे टाईम्स ऑफ इंडियाने २४ सप्टेंबर २००१ ला प्रकाशित केले. त्यांचा हा सारांश —-) तुम्हाला हल्ले का झाले असे वाटते?
ओसामा बिन लादेनला वाटते की १९९० मध्ये अमेरिकेने सौदी अरेबियात तळ स्थापणे, ही रशियाने अफगाणिस्तानावर केलेल्या आक्रमणाचीच आवृत्ती होती. मुळात इस्लामी धर्मस्थळे असलेल्या धर्मसंरक्षक सौदी अरेबियावरच्या या अतिक्रमणा-नंतर ओसामा आणि त्याचे ‘अफगाण’ साथी अमेरिकाविरोधी झाले.

पुढे वाचा

शस्त्रप्रेम आणि आदर्शवाद

[Cheryl Benard ही ऑस्ट्रियन स्त्री विएनातील एका संशोधन-संस्थेची संचालिका आहे. प्रामुख्याने स्त्री प्र नांबाबत जर्मन भाषेत लिहिणाऱ्या या लेखिकेची ‘मर्डर इन पेशावर’ (लेखन १९९८) ही कादंबरी नुकतीच पेंग्विन बुक्स, इंडियाने प्रकाशित केली. मुळात सामान्य गुन्हेगारकथा असलेल्या या कादंबरीत १९९८ च्या जरा आधीच्या पाक-अफगाण सीमेच्या स्थितीचे विवेचन आहे.
मॅलोन ह्या अमेरिकन व्यापाऱ्याला काही कारणाने एका अफगाण निर्वासितांच्या शिबिरात लपावे लागते. तिथे त्याची हमीद या आपल्या आईसोबत राहणाऱ्या सात वर्षांच्या ‘पोरक्या’ मुलाशी मैत्री होते. आता . . .]
हमीदला मॅलोनबद्दल काळजीही वाटते. त्याच्या झोपडीत शस्त्रे नाहीत.

पुढे वाचा

खादी आणि रोजगार

खादी आणि रोजगार ह्या दोन संकल्पनांची सांगडच बसू शकत नाही. तत्त्व म्हणून खादी स्वीकारल्यानंतर तिचा विचार रोजगारनिर्मितीसाठी करता येणार नाही असे माझे मत आहे. (पण माझे हे मत पूर्णपणे चुकीचे असू शकते आणि त्यासाठी ते तपासून पाहणे आवश्यक आहे.) खादीचा रोजगाराशी ३६ चा आकडा आहे. खादी ही स्वावलंबनासाठी आहे. रोजगार-निर्मितीसाठी नाही. कातणाऱ्याने जमल्यास विणणे शिकले पाहिजे; विणणारा स्वतः कातत असेल तर चांगलेच असे मानणारा हा विचार आहे. खादी ही अर्थव्यवस्थेच्या विकेन्द्रीकरणासाठी आहे. आणि रोजगाराला विकेन्द्रीकरणाचे वावडे आहे. केन्द्रीकरण केल्याशिवाय, कोणत्या तरी स्वरूपात संघटित प्रयत्न केल्याशिवाय रोजगार निर्माण होऊ शकत नाही.

पुढे वाचा

नैवेद्यातील घटक

मुंग्यांना साखर, कबूतरांना ज्वारी, गाईला मूठभर चारा टाकावा आणि धन्य व्हावे तोच प्रकार दारात नाना हेतूंपैकी एका हेतूने आलेल्या अतिथीला खायला-प्यायला देण्याचा. कणात विश्व पाहावे त्याप्रमाणे नैवेद्यात विश्वातल्या असंख्य गरिबांची क्षुधा शमल्याचे स्वप्न पाहावे! गरजूला काम देऊन पुरेसे वेतन द्यावे ही खरी सेवा. अनेकांच्या जमिनी जाताहेत. अनेकाचे रोजगार नष्ट होताहेत, अनेकां-वर नाना पटींनी अन्याय होत आहे त्यासाठी झगडणाऱ्या संस्थांना मदत करणे ही आजची गरज आहे. त्यातूनच गरिबांचा स्वाभिमान जपला जाईल. मागे सरकारने भिकाऱ्यांसाठी वसाहत सुरू केली. भीक देणे गुन्हा ठरवला. पण चार आणे देऊन अजिजी पाहून सुखावणाऱ्या धनिकबाळांनी ती योजना धुडकावून लावली.

पुढे वाचा

मातृत्व

हा लेख वाचण्या आधी वाचकाला थोडी पार्श्वभूमी समजणे महत्त्वाचे आहे. माझी आई मी तीन वर्षांची असताना मृत्यू पावली. एकत्र कुटुंबात माझ्या काकीने मला प्रेमाने वाढवले. म्हणून मला आईची अनुपस्थिती जाणवलीही नसती, पण भोवतालच्या समाजाने ती जाणवून दिली. आईवेगळी मुलगी म्हणून शेजारी, नातेवाईक माझी कीव करीत. वडिलांचे मित्र मुलींना आईची जरुरी असते म्हणून माझ्यासमोर वडिलांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह करीत. माझ्या बहिणीला व मला शिस्त लावण्याचा वडिलांनी फारसा प्रयत्न केला नाही. आमच्या बेशिस्त वागणुकीचे कारणही इतरांच्या मते ‘आम्हाला आई नव्हती’ हेच होते.

पुढे वाचा

मीमांसा: सुखदुःखाची

‘सुख पाहतां जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ असे तुकाराम महाराज म्हणाले! बहुधा सर्वांचाच अनुभव याहून वेगळा नसावा. सुख किंवा दुःख हे अनुभवावे लागते. अनुभव घ्यायचा तर पंचेंद्रियांमार्फत आणि मनामार्फतच ह्याचा अनुभव घेता येतो. सर्वसामान्यांची मजल ‘मन’ आणि ‘इंद्रिये’ यांच्या पलिकडे जात नाही. आणि यांच्या पलिकडे जाता येते किंवा यांच्या पलिकडेच खरे सुख आहे असे सांगणाऱ्यांना अध्यात्म-वादी म्हणतात. सर्वसामान्य माणसे काय किंवा अध्यात्मवादी काय दोघांनाही दुःख नको असते आणि फक्त सुखच सुख हवे असते. उत्तम आरोग्य, चांगली विद्या किंवा कला, भरपूर पैसा आणि इस्टेट, सुशील-सुंदर बायको किंवा नवरा, उत्तमोत्तम कपडे आणि दागदागिने, गुणवान आणि कर्तबगार संतती यांचा लाभ म्हणजे सुख अशी सर्वसामान्यांची सुखाची कल्पना असते.

पुढे वाचा

फटाक्यांना घाला आळा आणि प्रदूषण टाळा

हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी, सणांचा राजाच म्हणा ना! ह्या सणाइतकी आकर्षणे किंवा वैशिष्ट्ये इतर सणांत क्वचितच सापडतील. त्यांतील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे फटाके. फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे जणू रंगांशिवाय होळी,
फटाक्यांची सुरवात चीनमध्ये झाली हे सर्वश्रुत आहे. चीनमध्ये प्राचीन काळी भूत-पिशाच्च-सैतान ह्यांना मोठे आवाज करून घालवण्यासाठी फटाके उडवत असत. म्हणजे फटाक्यांचे उगमस्थान अंधश्रद्धा हे होय. पण भारतात जे पूर्वापार फटाके वाजविले जातात ते मजा म्हणून. पूर्वी फटाके फक्त दिवाळीतच वाजवले जात. पण आजकाल फटाके लावण्याचे ‘प्रसंग’ इतके वाढले आहेत की फटाके फक्त दिवाळीतच वाजतात की सकाळी-संध्याकाळी, उन्हाळी-हिवाळी, असा प्र न पडतो.

पुढे वाचा