मासिक संग्रह: जानेवारी, २००८

संपादकीय संवाद ग्यानबाचा विवेकवाद

प्रिय वाचक,
स.न.वि.वि.
विवेकवाद ह्या नावाचे एक पुस्तकच प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी लिहिलेले आहे. प्रा. दि.य.देशपांडे आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाचे संस्थापक संपादक होते. आ.सु.त सुरुवातीपासून विवेकवाद म्हणजे काय, ती कोणती विचारसरणी, ह्याचे विवेचन करणारे शक्यतो सुबोध व सविस्तर लेख त्यांनी लिहिले. अशा वीस-बावीस लेखांचा तो संग्रह आहे. असे जरी असले तरी अधून मधून आमचे वाचक, क्वचित् लेखकही हा प्रश्न विचारत असतातच. कधी कधी तुम्ही समजता तो विवेकवादच नाही असे उद्गारही कोणी काढतात. “तुमच्या विवेकवादात भलेही ते बसत असेल, हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग आहे.”

पुढे वाचा

पत्रलेखन

सरस्वती के. देव, १६८ एफ वैद्यवाडी, ठाकुरद्वार, मुंबई ४०० ००२. दूरध्वनी : २३८५१३३१
नोव्हेंबरचा आजचा सुधारक वाचला. नेहमीप्रमाणे चांगला आहे. त्यातील शारदा यांची सुहासिनीची सत्त्वपरीक्षा हा लेख वाचला. त्यात सुहासिनीची करुण कहाणी फारच हृदयद्रावक आहे.
अजूनही पालक म्हणजे मुलाचे वा मुलींचे आई-वडील. ते शिक्षित आहेत, सुधारक आहेत पण बौद्धिकदृष्ट्या कमकुवत आहेत. केवळ पैसा हे माध्यम आजकाल फार महत्त्वाचे आहे. मुलगी एवढी शिकलेली आहे. पण व्यावहारिक दृष्टिकोण नाही. मागणी आली म्हणून हुरुळून जाऊन आईवडिलांनी लग्न उरकले. एरवी एवढ्या-तेवढ्यावरून वाद करणारी मुलगी विचार न करता आंधळेपणाने त्या मुलाशी लग्न करते.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय

डोकं कसं चालतं? (मेंदू आणि मन याबद्दल)
प्रकाशक आकार फाऊंडेशन, सांगली. प्रथमावृत्ती मे २००७. पृष्ठे १०४. किं.१०० रु.) डॉ. उल्हास लुकतुके
लेखक डॉ. प्रदीप पाटील स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहेत. त्यांनी एम.ए. (क्लिनिकल सायकॉलॉजी) ही पदवी घेतली आहे. मानसिक आरोग्याची सामाजिक जाण वाढावी यासाठी काम करणाऱ्या आकार फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. वैद्यकीय सेवा, शिक्षकी कार्य, सामाजिक उद्बोधन, लेखन, व्याख्याने यामध्ये ते कार्यमग्न असतात. त्यांचा मुक्काम सांगली येथे असतो.
माणसे जशी वागतात तशी का वागतात हे एक कोडे आहे. शायर अकबर इलाहाबादी म्हणतात ख्याल दौडा निगाह उठी क़लम ने लिखा ज़बान बोली मगर वही दिल की उलझनें किसी ने इसकी गिरह न खोली । विचार धावला, नजर उठली (नजरानजर झाली), लेखणीने लिहिले, जीभ बोलली, पण मनाची (हृदयाची) तीच कोडी, त्यांची गाठ कोणी सोडवली नाही.]

पुढे वाचा

नकोशी !

इ.स. २००५ च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील गोष्ट. हॉस्पिटलच्या सभोवतालच्या परिसरात ताजुद्दीन बाबांच्या दर्यासमोर वार्षिक उरूस जोरात होता. आमच्या प्रादेशिक पातळीवरच्या ह्या शासकीय रुग्णालयात रोज सुमारे २०० ते २५० रुग्णांवर उपचार होतात. पण उरुसाच्या वेळी आमच्या परिसरातल्या एका शेडवजा इमारतीत जिला दर्गाह म्हणतात ह्या १५ दिवसांत रोज अक्षरशः हजारो भुते शांत करण्यात येत होती. बाबांच्या कृपेने चमत्कार घडून ती भुते झाडावरून वानर पळावेत तशी रुग्णांच्या अंगातून निघून जातात असा लक्षावधींचा विश्वास होता. ह्या यात्रावजा उरुसात रस्त्याच्या एका कडेला एक सावळीशी तिशी-बत्तीशीची मुलगी आपल्या दोन लहानग्यांना सांभाळत एक चहाचा ठेला चालवीत होती.

पुढे वाचा

आजची एक भूमिकन्या सीता

एका भारतात दोन-तीन, अनेक भारत आहेत. शहरी, शिकले सवरलेले, सुस्थित भारतीयांची जी समाजस्थिती दिसते, त्यांची जी संस्कृती पाहायला मिळते तिच्यावरून संपूर्ण समाजाची कल्पना करणे योग्य होणार नाही. ग्रामीण भागात जन्या रूढी, रीति-रिवाज टिकून आहेत. बायकांच्या बाबतीत स्त्रियाच स्त्रियांच्या वैरिणी हे सत्य पदोपदी आढळते. तहत हेचा सासुरवास, हंडाबळी, बायको टाकून देणे, एकीच्या उरावर दुसरी आणून बसविणे असे अनेक प्रकार चालू असतात. बालविवाह होत आहेत ते तर टी.व्ही.वर दिसतात, पण टीव्हीवर न दिसणारे अनेक प्रकार आहेत. भूतपिशाच्चाची बाधा, भानामती, करणी, अंगात येणे असे अनेक प्रकार स्त्रीमनोरुग्णांचे आहेत.

पुढे वाचा

हिंसेचे ‘डावे’ ‘उजवे’ पुजारी

स्वातंत्र्य प्राप्त करताना येथील राजकीय पक्ष व गटांनी विविध मार्ग चोखाळले. अहिंसक आंदोलनाद्वारे फार मोठ्या लोकसमुदायाने परकीयांविरुद्ध संघर्ष केला. साध्य-साधनशुचितेचा आग्रह धरत कोणतेही आंदोलन व कृती ही हिंसक होऊ नये कारण ती अंतिमतः अनैतिक असते असा या चळवळीचा आग्रह होता. कोणतेही आंदोलन कोणत्याही वेळेस भावनातिरेकामुळे निरपराध्यांच्या हत्येस कारणीभूत ठरू शकते हे लक्षात गेऊन, कोणताही संघर्ष हा व्यक्तीपेक्षा प्रवृत्तिविरुद्ध असावा कोणत्याही जिवाची हिंसा होऊ नये अशा भूमिकेतून हे अहिंसक आंदोलन सुरू होते. एकाबाजूला परकीयांचा विरोध तर दुसऱ्या बाजूला परकीयांचा सूड घेण्याच्या वृत्तीने बेभान झालेल्या स्वकीयांचा विरोध सहन करीत करीत हे अहिंसक आंदोलन सुरू राहिले.

पुढे वाचा

मानवी लैंगिक जीवन – समज/गैरसमज

(१) पुरुषांच्या लैंगिक समस्या कोणकोणत्या असतात ?
अविवाहित/विवाहित पुरुषांमध्ये जवळ जवळ सर्वच लैंगिक समस्या थोड्या प्रमाणात कधी ना कधी तरी अनुभवास येतात. त्यांमध्ये नपुंसकत्व, शीघ्रवीर्यपतन, विलंबित वीर्यपतन, कामपूर्तीचा अभाव, कामपूर्ती उशीरा होणे, कामवासना अति वाढणे, कामवासना कमी होणे, वेदनायुक्त संभोग ह्या समस्या असतात. त्यांतील काही समस्या परिस्थितीनुरूप असतात, इतर शारीरिक व मानसिक कारणांनी लैंगिक समस्या निर्माण होतात. ह्याची सविस्तर माहिती टप्प्याटप्प्याने आपण पुढे पाहणार आहोत.
पुरुषांच्या गैरसमजामुळे ते घाबरतात व समस्या स्वतः निर्माण करतात, त्यात, हस्तमैथुन वाईट असते, स्वप्नातील वीर्यपतन (चुकीचा शब्दप्रयोग स्वप्नदोष) वाईट असते, अति हस्तमैथुनाने वीर्य पातळ होते, शिश्न वाकडे होते, नपुंसकत्व येते, पिता बनू शकत नाही, शीघ्रवीर्यपतन होते, वजन कमी होते.

पुढे वाचा

धक्का देणारी विधाने

पूर्वीच्या काळी वंशावरून माणसांना कमी दर्जाचे ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. आजदेखील तसे अजून चालू असेल. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना मानवी व्यवहाराचे मानदंड म्हणून स्वीकारण्यात आले. कोणताही मानव-समूह समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना लायक आहे असे सिद्ध करण्यासाठी मग विविध देशांत राहणारे मानवसमूह हे बौद्धिक, वैचारिक व नैतिक क्षमतेच्या बाबतीत समान आहेत असे गृहीत धरण्यात आले. या गृहीत कृत्यालाच पुढे एक प्रकारचे नैतिक वलय प्राप्त झाले. खरे म्हणजे असे गृहीत धरण्याची काही आवश्यकता नव्हती. प्रत्येक माणूस-मग तो कोणत्याही वंशाचा, देशाचा असो, तो केवळ माणूस आहे म्हणूनच समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना पात्र आहे या विधानाला कोणताही बाह्य आधार देण्याची आवश्यकता नाही.

पुढे वाचा

मुलगा की मुलगी ?

‘मला मुलगाच हवा’ या हट्टापायी आपल्या देशात हजारो स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत. मुलगा हवा यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक वा आर्थिक कारणे काहीही असोत, उत्क्रांती व विज्ञान मात्र यासंदर्भात फार वेगळे चित्र उभे करत आहे. मुलीपेक्षा मुलगा त्याच्या आईला फार तापदायक ठरू शकतो. जन्माच्या वेळचे मुलाचे वजन, पुरुषजातीतील टेस्टोस्टेरॉन ग्रंथिस्रावाचा वाढता प्रभाव, वा मुलांमधील जन्मतःच असलेला व्रात्यपणा इत्यादी गोष्टी मुलाला जन्म देणाऱ्या आईच्या जिवावर उठू पाहत असतात. शेफील्ड विद्यापीठात पुनरुत्पादन वर्तणूक या विषयावर संशोधन करत असलेल्या विपी लुम्मा या प्राध्यापिकेच्या मते जन्माला घातलेला प्रत्येक मुलगा सामान्यपणे आईचे आयुष्य चौतीस आठवड्यांनी कमी करत असतो.

पुढे वाचा

भारतीय सेक्युलॅरिझम निधार्मिकता नाही की नास्तिकता

भारताची राज्यघटना १९ नोव्हेंबर १९४९ रोजी प्रथमतः स्वीकृत करण्यात आली. तिच्या उपोद्घातात (झीशरालश्रश) भारताच्या सेक्युलरपणाचा उल्लेख नाही. सेक्युलर हा शब्द ४२ व्या घटनादुरुस्तीने घातला गेला. ही दुरुस्ती १ सप्टेंबर १९७६ पासून अमलात आली. दुरुस्ती बिलासोबत जेथे उद्दिष्टे आणि कारणे ह्यांचे विधान असते तेथेही हा शब्द समाविष्ट करण्याचे प्रयोजन काय ह्याचा काही खुलासा नाही. किंवा ह्याचे औचित्यसूचक काही निवेदन नाही. सेक्युलर हा शब्द ४२ वी घटनादुरुस्ती लागू होण्यापूर्वी घटनेत फक्त एकदा आला आहे, कलम २५ (२) (र) मध्ये, ते राज्याला आर्थिक वित्तविषयक, राजकीय अथवा धर्मव्यवहारांशी निगडित पण तद्भिन्न जे आचार असतात त्यांविषयी कायदे करण्याचा अधिकार प्रदान करते.

पुढे वाचा